Halloween Costume ideas 2015

मनुष्य हा पृथ्वीवरचा मूळनिवासी नाही

आज एका वेगळ्या आणि रोचक अशा विषयावर आपल्याला चर्चा करावयाची आहे. विषय पृथ्वीवर मनुष्याच्या अस्तित्वाचा आहे. तर चला पाहूया पृथ्वीवर मनुष्याची निर्मिती कशी झाली? खरे तर या प्रश्नाचे उत्तर आजपावेतो विज्ञानालाही आत्मविश्वासाने देता आले नाही. याबाबतीत विज्ञानाकडे दोन मतप्रवाह प्रचलित आहेत. पहिला मतप्रवाह असा की, लाखो वर्षापूर्वी अवकाशात एक आगीचा गोळा होता तो इतका उष्ण झाला की कालांतराने त्यात एक महाविस्फोट झाला व त्याचे अनेक तुकडे झाले व ते अवकाशात, ग्रह-ताऱ्यांच्या रूपात सूर्याभोवती तरंगू लागले. पृथ्वीसुद्धा त्या तुकड्यांपैकी एक तुकडा आहे. कालांतराने ती थंड झाली व त्यावर अस्तित्वात असलेल्या पाण्यातून सुरूवातीला एक पेशी व त्यानंतर अनेक पेशींच्या जीवांची निर्मिती झाली. मनुष्यही त्यांच्याचपैकी एक होय. याला ’बिगबँग थेअरी’ असे म्हणतात. दूसरा मतप्रवाह डार्विनला माणणाऱ्यांचा आहे. डार्विणचा उत्क्रांतीचा सिद्धांत आज 21 व्या शतकातही बऱ्याच प्रमाणात लोकप्रिय आहे. डार्विणच्या मते माणसाची उत्पत्ती माकडापासून झाली.मात्र हा मतप्रवाह माणणाऱ्यांना दोन प्रश्नाची उत्तरे आजपावेतो देता आलेली नाहीत. 1. माकडांमध्ये उत्क्रांती होवून त्यांचा मनुष्य झाला तर सर्व माकडांमध्ये ही प्रक्रिया का झाली नाही? आज जी कोट्यावधी माकडे पृथ्वीवर माकड म्हणून जन्माला येतात व माकड म्हणूनच मरतात ते कसे काय? 2. फक्त माकडांमध्येच उत्क्रांती का झाली? त्या काळात अस्तित्वात असलेल्या गाढ, हत्ती, घोडे वगैरे प्राण्यांमध्ये उत्क्रांती का झाली नाही?
    अलिकडे अमेरिकेमध्ये एका तिसऱ्या मतप्रवाहाचा जन्म झालेला आहे. तो काय हे आपण पुढे पाहूच. अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त इकॉलॉजीस्ट (पर्यावरणतज्ज्ञ) डॉ. अॅलिस सिल्व्हर यांनी एक आश्चर्यजनक दावा केलेला आहे की, ’ मनुष्य हा पृथ्वीवरचा मूळ निवासी नाहीच. इथे तो एलियन (परग्रही जीव) आहे. वास्तविक पाहता त्याची निर्मिती दुसरीकडे कुठेतरी झालेली आहे व कालांतराने, काही कारणाने त्याला पृथ्वीवर पाठविण्यात आले असावे आणि मग येथे माणसांचा विस्तार झाला असावा. हा दावा त्यांनी आपले प्रसिद्ध पुस्तक ’ह्युमन्स आर नॉट फ्रॉम अर्थ’ अर्थात ’मनुष्य हा पृथ्वीचा रहिवाशी नाही’ या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक अॅमेझॉनवर उपलब्ध असून, त्याला पाच पैकी चार स्टार मिळालेले आहेत. हे पुस्तक बेस्ट सेलर पुस्तकांच्या यादीत समाविष्ट झालेले आहे. या पुस्तकामध्ये केलेले दावे खालीलप्रमाणे -
    1. मणुष्य ज्या ठिकाणी जन्माला आला त्या ठिकाणची गुरूत्वाकर्षण शक्ती आणि पृथ्वीवरील गुरूत्वाकर्षण शक्ती यामध्ये फार फरक आहे. ज्या ग्रहावरून तो आला आहे त्या ग्रहावरची गुरूत्वाकर्षण शक्ती ही फार कमी असावी. त्यामुळे त्या ठिकाणी त्याला चालणे, फिरणे व वजन उचलणे यामध्ये फारसा त्रास होत नसावा. मात्र पृथ्वीवर त्याला हा त्रास होतो. पाठीच्या कण्याचे जेवढे विकार माणसाला होतात त्या पाठिमागे पृथ्वीवरचे गुरूत्वाकर्षण हेच प्रमुख कारण आहे. कारण की, पृथ्वीवरचे मूळ रहिवाशी (जनावरे) जे आहेत त्यांचा पाठीचा कणा हा आडवा (हॉरिझाँटल) म्हणजे पृथ्वीला समांतर असा आहे, मात्र माणसाच्या पाठीचा कणा उर्ध्वगामी (उभा) म्हणजे व्हर्टीकल आहे, म्हणून त्याला पृथ्वीवरील मूळ प्राण्यांच्या तुलनेत जास्त त्रास होतो.
    2. मनुष्यामध्ये जेवढे काही स्थायी आजार आढळतात तसे आजार पृथ्वीवरील मूळ रहिवाशी असलेल्या जनावरांमध्ये आढळत नाहीत. डॉ. अॅलीसच्या मते पृथ्वीवर एकही असा मनुष्य नाही ज्याला काही ना काही आजार होत नाही. या उलट जनावरांना तात्पुरते काही आजार होतात व नैसर्गिकरित्या आपोआप कमी होतात. त्यांना कुठल्याही इस्पीतळात जावे लागत नाही. काही कारणाने गुरांच्या रूग्णालयात नेले तरी आजार तात्पुरते असतात.
    3. मनुष्य हा सूर्यप्रकाशात फार काळ राहू शकत नाही. राहिल्यास त्याला उष्माघाताचा त्रास होतो. याउलट पृथ्वीच्या मूळ रहिवाश्यांना सूर्य प्रकाशाचा कधीही त्रास होत नाही. सतत सूर्यप्रकाशात राहूनसुद्धा त्यांना उष्माघात तर सोडा साधा त्वचेचा रोग होत नाही.
    4. प्रत्येक माणूस कधी ना कधी आयुष्यामध्ये अशा पद्धतीने उदास होवून जातो की जसा आपल्या गावापासून लांब गेलेला प्रवासी उदास होवून जातो. जनावरांमध्ये अशी प्रक्रिया होत नाही.
    5. जमिनीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक प्राण्याचे तापमान बाहेरील वातावरणाप्रमाणे आपोआप रेग्युलेट (नियमित) होत असते. उदा. कडक उन्हामध्ये त्यांच्या शरीराचे तापमान जे असते ते चटकन ऊन जावून सावली आल्याक्षणी बदलून जाते. याउलट माणसाचे असते. त्याच्या शरीराचे तापमान स्वयंचलितरित्या नियमित होऊ शकत नाही. उलट वातावरणाच्या बदलामुळे तो आजारी पडतो. त्यासाठी वैद्यकीय शास्त्रात ’व्हायरल डिसीज’ हा शब्दच प्रचलित आहे.
    6. माणसाचा डीएनए पृथ्वीवरील इतर जीवांपेक्षा उच्च दर्जाचा आहे.
    7 पृथ्वीच्या मूळ रहिवाशांना अन्न शिजवून खावे लागत नाही ते सरळ निसर्गातून अन्न प्राप्त करतात आणि कुठलीही प्रक्रिया न करता खातात. या उलट माणसाला अगोदर अन्न शिजवून मऊ करून आपल्या पाचन शक्तीच्या अनुकूल बनवावे लागते. तरच ते खाता येते. पाचनशक्तीतील हा फरक मनुष्य हा या पृथ्वीवरचा रहिवाशी नाही हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे. जेव्हा मनुष्य हा आपल्या मूळ ग्रहावर होता तेव्हा त्याला अतिशय उच्च दर्जाचे अन्न मिळत असावे. जे की, तो कुठल्याही प्रक्रियेशिवाय ग्रहण करीत असावा.
    8. पृथ्वीच्या मूळ रहिवाशांचे वर्गीकरण दोन प्रकारात करता येते. एक शिकार तर दूसरा शिकारी. दररोज उगवत्या सूर्याबरोबर प्राणी अन्नाच्या शोधात निघतात. काही शिकार करतात तर काही शिकार होऊन जातात. माणसाचे असे नसते.
    9. माणसाला वातावरणापासून स्वतःची रक्षा करण्यासाठी ठोस अशा घरांची आवश्यकता असते. माणसाव्यतिरिक्त पृथ्वीवरील इतर मूळ रहिवाशांना अशी गरज भासत नाही. ते बिळामध्ये, पाण्यामध्ये किंवा झाडाच्या फांदीवर कुठेही सहज राहू शकतात.
    10. माणसाला झोपण्यासाठी अतिशय सुरक्षित आणि मऊ असे अंथरून लागते. जे की, पृथ्वीच्या मूळ रहिवाशांना लागत नाही. यावरून सिद्ध होते की, मनुष्य ज्या मूळ ठिकाणाहून आलेला आहे त्याठिकाणी त्याच्या राहण्याची आरामदायी (लक्झरीयस) व्यवस्था होती. जी त्याच्या शरीराच्या नाजूकपणाच्या अनुकूल अशी होती. पृथ्वीवर हजारो वर्षांपासून राहूनसुद्धा त्याच्या प्रकृतीत आणि नजाकतीमध्ये फरक पडलेला नाही, याचा अर्थ त्याला पृथ्वीशी कधीच एकरूप होता येणार नाही म्हणून त्याला कधी ना कधी आपल्या मूळ ग्रहावर परत जावेच लागेल.
    11. पृथ्वीच्या मूळ रहिवाश्यांच्या डोक्यामध्ये जरी मेंदू असला तरी त्याला समज माणसाएवढी देण्यात आलेली नाही. 40 किलोचा माणूससुद्धा चारशे टन वजणाच्या हत्तीला त्याच्या मस्तकावर बसून लिलया हाताळू शकतो. माणसाला अफाट विचार शक्ती दिली गेलेली आहे. डॉ. अॅलिस सिल्व्हर इथपर्यंत म्हणतात की मनुष्य हा कुठल्यातरी अपराधाची शिक्षा भोगण्यासाठी कदाचित या ’क’ दर्जाच्या तुरूंग रूपी पृथ्वीवर पाठविण्यात आलेला असावा. येथील शिक्षा भोगून त्याला परत आपल्या मूळ ग्रहावर जावयाचे आहे.
    12. ते पुढे म्हणतात, माणसाने केलेल्या भौतिक प्रगतीवरून एक गोष्ट लक्षात येते की, त्याला पृथ्वीवर येवून काही हजार वर्षे झाली असावीत व आल्यापासून तो या पृथ्वीला आपल्या मूळ ग्रहासारखे आलीशान रूप देण्याचा प्रयत्न करीत आहे. याच घटनाक्रमामध्ये तो कधी चाकेचा शोध लावतो तर कधी टेलीफोनचा, कधी पेनचा शोध लावतो तर कधी विमानाचा. एकंदरित आपल्याला सुसंगत अशा सोयी सुविधा त्याने अगदी अलिकडच्या काळात मिळविलेल्या आहेत. तो जर का लाखो वर्षाचा इथला रहिवाशी असता तर हे संशोधन कधीचेच करून मोकळा झाला असता. शेकडो वर्षापासून त्याचा उपभोग मनुष्य घेतांना आढळून आला असता.
    या आणि यासारखे अनेक तर्क डॉ. अॅलीस यांनी आपल्या पुस्तकात दिलेले आहेत. विशेष म्हणजे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून आजपर्यंत कोणीही त्यांच्या या तर्कांना छेद देण्याचे धाडस करू शकलेला नाही.
    या संबंधी ज्युडाईजम, ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम या तिन्ही एक ईश्‍वर माणणाऱ्या धर्माममध्ये माणसाच्या उत्पत्तीचा एकच सिद्धांत मांडलेला आहे, तो म्हणजे माणसाची रचना अल्लाहने स्वतः करून त्यांची जन्नतमध्ये राहण्याची सोय केली. यात एक स्त्री आणि एक पुरूष होते. त्यांचे नाव बायबलमध्ये अॅडम आणि ईव्ह तर कुरआनमध्ये आदम आणि हव्वा असे नमूद आहे. त्यांना जन्नतमध्ये एक विशिष्ट अशा झाडाचे फळ खाण्यापासून प्रतिबंध करण्यात आला होता. मात्र सैतानाने शपथा घेऊन-घेऊन त्या दोघांना फसविले आणि ते फळ खाण्यास प्रेरित केले. त्यांनी ते फळ खाल्ले आणि अल्लाहच्या कोपाचे पात्र झाले. तेव्हा त्यांना पृथ्वीवर पाठवून देण्यात आले. या संदर्भात कुरआनमधील सुरह ’ताहा’च्या आयत क्र. 116 ते 124 मध्ये या संबंधीचा घटनाक्रम खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेला आहे - आम्ही जेव्हा दुतांस (फरिश्ते) यांना आदमसमोर नतमस्तक होण्यास सांगितले तेव्हा ते सारे नतमस्तक झाले पण इब्लिस (सैतान) ने नतमस्तक होण्यास नकार दिला. - म्हणून आम्ही आदमला सांगितले हा तुझा आणि तुझ्या पत्नीचा वैरी आहे. त्याने तुम्हा दोघांना जन्नतबाहेर घालवू देऊ नये (असे झाल्यास) तुम्ही संकटात सापडाल. - इथे तुम्हाला उपाशी रहावे लागत नाही की उघडे रहावे लागत नाही. - तसेच इथे तुम्हाला ना तहान लागते ना उन्हाची झळ पोहोचते. - पण सैतानने त्यांना भुलविले आणि म्हणाला, ”आदम ! मी तुला शाश्‍वत जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेला वृक्ष दाखवू? आणि असे राज्य ज्याला अंतच नाही? मग त्या उभयंतांनी त्या झाडाचं फळ खाल्ल आणि त्यांची गुप्तांग उघडी पडली. मग ते स्वर्गातील झाडांच्या पाणांनी आपले शरीर झाकू लागले. त्यांनी आपल्या विधात्याशी दगा केला. ते भरकटून गेले. - पण त्यांच्या विधात्याने मात्र त्यांचा स्विकार केला. त्यांच्याकडे वळला आणि त्यांना मार्ग दाखविला. - आणि म्हणाला, ”तुम्ही सर्व इथून जा, तुम्ही एकमेकांचे वैरी ठराल, मात्र माझ्याकडून तुमच्याकडे मार्गदर्शन आल्यास जे माझ्या मार्गदर्शनाचे पालन करतील ते कधीच भरकटणार नाहीत अथवा अभागी ठरणार नाहीत. - जर माझ्या आठवणीकडे पाठ फिरविली तर त्यांचे जगणे अडचणीचे होईल आणि पुनरूत्थानाच्या दिवशी (द डे ऑफ जजमेंट) आम्ही त्यांना आंधळे उभे करू.
    वाचकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की डॉ. अॅलीस सिल्व्हर हे नास्तीक असून एक वैज्ञानिक आहेत. त्यांनी आपल्या पुस्तकात जो युक्तीवाद केलेला आहे तो कुठल्या धर्मगुरूने केलेला नाही. म्हणून प्रत्येक बुद्धीजीवी व्यक्तीसमोर यापुढे फक्त दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक - तर डॉ. अॅलीस यांचा युक्तीवाद खोडून काढणे किंवा दोन - त्यांचा युक्तीवाद मान्य करणे. म्हणजेच पर्यायाने कुरआनच्या सुरे ताहामध्ये आलेल्या वर नमूद आयातींवर विश्वास ठेवणे. आपण बुद्धिवादी आहात आता निर्णय आपल्या हाती आहे.


- एम.आय. शेख
9764000737

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget