Halloween Costume ideas 2015

सूरह अत् तौबा: ईशवाणी (सुबोध कुरआन)


(२७) मग (तुम्ही हेसुद्धा पाहिले आहे की) अशाप्रकारे शिक्षा दिल्यानंतर अल्लाह ज्याला इच्छितो त्याला पश्चात्तापाची सुबुद्धीसुद्धा प्रदान करतो.२४ अल्लाह क्षमाशील व दया दाखविणारा आहे. 

(२८) हे श्रद्धावंतांनो! अनेकेश्वरवादी अपवित्र आहेत, म्हणून या वर्षानंतर हे माqस्जदे हरामजवळ फिरकतादेखील कामा नये२५ व जर तुम्हाला हलाखीची स्थिती येण्याचे भय वाटत असेल तर दूर नव्हे की अल्लाहने इच्छिले तर त्याने आपल्या कृपेने तुम्हाला श्रीमंत करावे. अल्लाह सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे. 

(२९) युद्ध करा ग्रंथधारकांपैकी त्या लोकांविरूद्ध जे अल्लाहवर व मरणोत्तर जीवनावर श्रद्धा ठेवत नाहीत,२६ आणि अल्लाह व त्याच्या पैगंबराने जे काही निषिद्ध ठरविले आहे त्याला निषिद्ध करीत नाहीत,२७ आणि सत्य धर्माला आपला धर्म (दीन) बनवीत नाहीत. (त्यांच्याशी युद्ध करा) इथपावेतो की त्यांनी स्वहस्ते जिझिया (रक्षा-कर) द्यावा व छोटे (अधीनस्थ) बनून राहावे.२८ 

(३०) यहुदी म्हणतात की ‘उजैर’ अल्लाहचा पुत्र आहे,२९ आणि ‘इसाई’ म्हणतात की मसीह (येशू) अल्लाहचा पुत्र आहे. या अवास्तव गोष्टी आहेत ज्या ते आपल्या तोंडातून काढतात, हे त्या लोकांचे अंधानुकरण आहे, जे त्यांच्यापूर्वी द्रोहामध्ये गुरफटले होते.३० अल्लाहचा कोप त्यांच्यावर. कोठून हे बहकविले जात आहेत. 

(३१) यांनी आपल्या धर्मपंडितांना व संतांना अल्लाहशिवाय आपला पालनकर्ता (प्रभू) बनविले आहे,३१ आणि अशाचप्रकारे मरयमपुत्र मसीहलादेखील. वास्तविक पाहता त्यांना एक उपास्याशिवाय इतर कोणाचीही भक्ती करण्याचा आदेश दिला गेला नव्हता, तो ज्याच्यशिवाय इतर कोणीही भक्तीचा अधिकारी नाही, पवित्र आहे तो त्या अनेकेश्वरवादी गोष्टींपासून ज्या हे लोक करीत आहेत.



२४) हुनैनच्या युद्धात विजयप्राप्तीनंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी पराजित शत्रूबरोबर ज्या उदारतेचा आणि शालिनतेचा व्यवहार केला होता त्याचा परिणाम हा झाला की त्यांच्यापैकी अनेक जण मुस्लिम झाले होते. या उदाहरणाने मुस्लिमांना दाखवून द्यावयाचे आहे की तुम्ही असे का समजून घेतले की अरबच्या सर्व अनेकेश्वरवादींना आता संपविले जाईल. नाही, पूर्वींच्या अनुभवांना पाहून तर तुम्हाला ही आशा वाटावी की जेव्हा अज्ञानतापूर्ण व्यवस्थेचा विकास आणि अस्तित्वाची कोणतीच आशा शिल्लक  राहणार  नाही  आणि  सर्व  आश्रय  समाप्त्  होतील  ज्यांच्यामुळे  ते आतापर्यंत  अज्ञानतापूर्ण  व्यवस्थेशी चिकटून होते; अशा स्थितीत ते स्वत:हून इस्लामच्या कृपाछत्राखाली आश्रय घेण्यासाठी येतील. 

२५) म्हणजे भविष्यात त्यांचा हज आणि जियारत फक्त बंद नाही तर मस्जिदे हरामच्या सीमेतसुद्धा त्यांचा प्रवेश बंद आहे, जेणेकरून अनेकेश्वरत्व आणि अज्ञानता पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता शिल्लक राहणार नाही. `नापाक' (अपवित्र) म्हणजे ते स्वत: अपवित्र आहेत असा होत नाही. याचा अर्थ असा होतो की त्यांचे विश्वास, आस्था, त्यांचा चरित्र, त्यांचे कर्म आणि जीवन व्यतीत करण्याची अज्ञानतापूर्ण व्यवस्था अशुद्ध आहे आणि याच अशुद्धतेमुळे ते हरमच्या सीमेत प्रवेश करू शकत नाहीत. इमाम शाफई (रजि.) यांच्याजवळ या आदेशाचा उद्देश आहे की ते मस्जिदे हराममधे प्रवेश करू शकत नाहीत. इमाम अबू हनीफा (रह.) यांच्यानुसार, ते हज, उमरा आणि अज्ञानतापूर्ण रूढी-परंपरा कार्यान्वित करण्यासाठी हरमच्या सीमेत प्रवेश करू शकत नाहीत. इमाम मालिक (रह.) यांच्या मते केवळ मस्जिदे हरामच नव्हे तर कोणत्याच मस्जिदमध्ये त्यांचा प्रवेश निषिद्ध आहे. परंतु हे शेवटचे मत खरे व योग्य नाही, कारण पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्वत: मस्जिदे नबवीमध्ये अनेकेश्वरवादींना प्रवेश करण्याची अनुमती दिली होती.

२६) ग्रंथधारक जरी अल्लाह आणि परलोकवर विश्वास ठेवण्याचा दावा करतात परंतु सत्य तर हे आहे की ते अल्लाह व परलोकावर ईमान राखत नाहीत. अल्लाहवर ईमान राखण्याचा अर्थ हा नाही की मनुष्याने मानावे की अल्लाह आहे. याचा अर्थ तर हा आहे की, मनुष्याने अल्लाहला एकमेव उपास्य आणि एकमेव पालनहार मानावे आणि अल्लाहचे अस्तित्व, त्याचे गुण, त्याचे हक्क आणि अधिकारात स्वत: भागीदार बनू नये किंवा दुसऱ्यांना भागीदार ठरवू नये. इसाई आणि यहुदी हे दोन्ही हा अपराध करतात. नंतरच्या आयतीमध्ये याचे स्पष्टपणे वर्णन केले आहे. म्हणून त्यांचे अल्लाहला मानणे निरर्थक आहे आणि याला कदापि ``अल्लाहवर ईमान'' म्हटले जाऊ शकत नाही. याचप्रकारे आखिरत (परलोक) चा अर्थ हा होत नाही की मनुष्याने मान्य करावे की मृत्यूपश्चात मनुष्याला पुन्हा जिवंत केले जाईल. परंतु यासह हे मान्य करावे लागते की येथे शिफारसचे कोणतेच प्रयत्न, एखादी देणगी एखाद्या संताशी असलेले संबंध कामी येणार नाही आणि कोणी दुसऱ्याचे प्रायश्चित बनणार नाही. अल्लाहच्या न्यायालयात खरा न्याय होईल. मनुष्याचे ईमान आणि कर्माशिवाय इतर कशाचाच विचार केला जाणार नाही. या विश्वासाशिवाय परलोकला मानणे निरर्थक आहे. परंतु यहुदी आणि िख्र्तासी लोकांनी याच दृष्टीने आपले विश्वास आणि आस्थांना खराब केले म्हणून त्यांचा परलोकवरील विश्वाससुद्धा अमान्य आहे.

२७) म्हणून या शरियतला आपल्या जीवनाचे नियम बनवत नाही जी अल्लाहने आपले पैगंबर मुहम्मद (स.) द्वारा अवतरित केली आहे.

२८) म्हणजे युद्धाचा उद्देश हा नाही की त्यांनी ईमान धारण करावे आणि सत्यधर्माचे अनुयायी बनावेत. युद्धाचा उद्देश हा आहे की त्यांची स्वायत्तता आणि श्रेष्ठता समाप्त् व्हावी. ते पृथ्वीवर शासक आणि सत्ताधारी बनून राहू नयेत तर पृथ्वीव्यवस्थेची सत्ता आणि शासनाधिकार व नेतृत्व सत्य धर्मियांच्या हातात यावेत आणि हे लोक त्यांचे आश्रित बनून व आज्ञापालक बनून राहावेत. `जिझिया' (रक्षाऱ्कर) मोबदला आहे त्या आश्रयाचा आणि रक्षणाचा जे जिम्मीना (इस्लामी राज्याची मुस्लिमेतर प्रजा) इस्लामी राज्यात दिले जाते. तसेच ती निशाणी आहे की हे लोक आदेशाधीन राहण्यास राजी आहेत. `हाताने जिझिया देणे' म्हणजे सरळ सरळ आज्ञापालन करून प्रतिष्ठेने जिझिया देणे आहे. `लहान बनून राहणे' म्हणजे पृथ्वीवर मोठे (श्रेष्ठ) ते नाहीत तर ईमानधारक मोठे आहेत जे अल्लाहचे प्रतिनिधी (खलीफा) असण्याचे कर्तव्य पार पाडत आहेत. सुरवातीला हा आदेश यहुदी व िख्र्तासी लोकांसाठी दिला गेला होता. नंतर स्वत: पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मजूसींकडून जिझिया घेऊन त्यांना जिम्मी बनविले. यानंतर सहाबा (रजि.) यांनी सर्वसंमतीने अरबच्या बाहेरील सर्व राष्ट्रांवर या आदेशाला लागू केले. हा जिझिया ज्याच्यासाठी मोठमोठे क्षमायाचनात्मक वादविवाद एकोनावीसाव्या शतकाच्या युगात मुस्लिमांकडून केले गेले. त्या युगातील काही लोक आजपण आहेत जे खुलासे देतात. परंतु अल्लाहचा दीन (जीवनपद्धत) यापेक्षा अत्युच्च् व श्रेष्ठ आहे की अल्लाहच्या विद्रोहीसमोर या जीवनपद्धतीला विवश होण्याची काहीच गरज नाही. साधे सरळ तत्त्व आहे की जे लोक अल्लाहने अवतरित जीवनपद्धतीचा स्वीकार करीत नाहीत आणि स्वत: निर्मित किंवा दुसऱ्यांकरवी निर्मित मार्गावर चालतात, ते तर फक्त इतक्याच स्वायत्तेचे अधिकारी आहेत की ते स्वत: जितके अपराध करू इच्छितात ते करावेत. पंरतु यांना हा अधिकार नाही की अल्लाहच्या धरतीवर सत्ताधिश आणि शासनाधिकारी ते बनावेत, मनुष्याची जीवनव्यवस्था त्यांनी आपल्या मार्गभ्रष्टतेने बनवावी? आणि आपल्या या मार्गभ्रष्टतेवर लोकांना चालवावे? आणि लोकांची सामूहिक जीवनव्यवस्था आपल्या मार्गभ्रष्टतेनुसार चालवावी. सत्ताधिकार जिथे कोठे त्यांना प्राप्त् होईल तिथे बिघाड फैलावतच जाईल. अशा स्थितीत ईमानधारकांचे दायित्व असेल की त्यांना यापासून बेदखल करावे आणि त्यांना कल्याणकारी जीवनव्यवस्थेच्या आधीन करावे. आता प्रश्न उरतो की हा जिझिया काय आहे? याचे उत्तर म्हणजे जिझिया त्या स्वातंत्र्याची किंमत आहे जे त्यांना इस्लामी शासनव्यवस्थेत आपल्या मार्गभ्रष्टतेवर चालण्यास दिले जाते. या किमतीला (रकमेला) त्या कल्याणकारी शासन व्यवस्थेवर खर्च केली जाते जी त्यांना या स्वातंत्र्याला बहाल करते आणि त्यांच्या (जिम्मींच्या) अधिकांराची रक्षा करते. याचा  मोठा  फायदा  म्हणजे  जिझिया  देताना  दरवर्षी  जिम्मी  लोकांत  ही  भावना  ताजी होते  की अल्लाहच्या मार्गात जकात देण्यापासून ते असमर्थ आहेत आणि मार्ग भ्रष्टतेवर चालण्यासाठी आपण किंमत मोजत आहोत हे मोठे दुर्भाग्य आहे. याची जाण त्यांना दरवर्षी होत जाते. 

२९) `उजैर' म्हणजे `एजरा' (एनठअ) आहे ज्यांना यहुदी आपल्या धर्माचे पुनर्स्थापक मानतात. त्यांचा काळ इ. पू. ४५०  च्या आसपासचा दाखविला जातो. इस्त्राईली कथनानुसार आदरणीय सुलैमान (अ.) यांच्यानंतर जो परीक्षाकाळ बनीइस्राईलींवर आला होता. त्यात तौरात जगातून नाहीसा झाला होता. तसेच बाबिलच्या कैदेमुळे इस्राईली वंशाला आपले धर्मशास्त्र, आपल्या रूढी-परंपरा आणि राष्ट्रभाषा इबरानीपासून अनभिज्ञ केले होते. शेवटी याच उजेर किंवा एजरा याने बायबलच्या ``जुन्या करारा'ला पुन्हा व्यवस्थित केले आणि नवीन धर्मशास्त्र बनविले. याचमुळे इस्राईली लोक त्यांचा अतिसन्मान करतात आणि हा सन्मान या सीमेपर्यंत जाऊन पोहचला की काही यहुदी गटांनी त्याला (उजेर) अल्लाहचा पुत्र बनवून टाकले. येथे कुरआनचा अभिप्राय हा नाही की सर्व यहुदीनी एकत्रित येऊन एजरा यास खुदाचा पुत्र (बेटा) बनविले. कुरआन स्पष्ट करतो ते म्हणजे अल्लाहविषयी यहुदी लोकांच्या विश्वासामध्ये जो दोष निर्माण झाला तो या सीमेपर्यंत पोहचला की एजरा यास अल्लाहचा पुत्र बनविणारे त्यांच्यात जन्माला आले.

३०) म्हणजे मिस्र (इजिप्त्), यूनान, रोम, इराण आणि दुसऱ्या देशांतील लोक पूर्वी पथभ्रष्ट झालेले होते. त्यांचे तत्त्वज्ञान, अंधविश्वास व कल्पनांनी प्रभावित होऊन त्या लोकांनीसुद्धा तशीच भ्रष्ट धारणा स्वीकारली.

३१) हदीसकथन आहे की माननीय अदी बिन हातिम हे पूर्वी िख्र्तासी होते. जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सेवेत हजर होऊन इस्लामचा स्वीकार केला तेव्हा त्यांनी त्या वेळी जे प्रश्न विचारले होते त्यात हा प्रश्नसुद्धा विचारला की या आयतमध्ये आमच्यावर आमचे विद्वान आणि संतांना `ईश्वर' बनविण्याचा जो आरोप ठेवला गेला आहे त्याची वास्तविकता काय आहे? पैगंबरांनी उत्तर दिले, ``काय हे सत्य नाही की हे लोक ज्यांना अवैध (हराम) ठरवितात त्यांना तुम्ही अवैध मानता. तसेच ज्यांना ते वैध (हलाल) ठरवितात त्यांना तुम्हीसुद्धा वैध (हलाल) मानता? त्यांनी सांगितले की हे तर आम्ही अवश्य करतो. पैगंबरांनी सांगितले, ``हेच कृत्य त्यांना `ईश्वर' बनविणे आहे.'' याने माहीत होते की अल्लाहच्या ग्रंथाने प्रमाणित न केलेल्या गोष्टी मानवी  जीवनासाठी  जे  लोक  वैध  किंवा  अवैध  ठरवितात  ते  `ईशत्वाच्या'  पदावर  आपोआप विराजमान होतात. जे अशा लोकांनी निर्मित धर्मशास्त्राला (शरियत) मान्य करतात, ते त्यांना `प्रभु' स्वीकार करतात. हे दोन्ही आरोप म्हणजे एखाद्याला अल्लाहचा पुत्र ठरविणे आणि कुणाला धर्मशास्त्रनिर्मितीचा अधिकार देणे, यामुळे हेच सिद्ध होते की हे लोक अल्लाहवर ईमान ठेवण्याच्या दाव्यात खोटे आहेत. अल्लाहला हे मानतात परंतु त्यांची ईशधारणा चुकीची आहे ज्यामुळे ईश्वराला मानणे किंवा अमान्य करणे एकसारखे झाले आहे.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget