Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(८१) ते तोंडावर म्हणतात की, आम्ही आज्ञाधारक आहोत, पण जेव्हा ते तुमच्यापासून निघून जातात तेव्हा त्यांच्यापैकी एक गट रात्री एकत्र होऊन तुमच्या गोष्टींविरूद्ध सल्लामसलत  करतो. अल्लाह त्यांच्या या सर्व कुजबुजींची नोंद घेत आहे. तुम्ही त्यांची पर्वा करू नका आणि अल्लाहवर भीस्त ठेवा, तोच भीस्त ठेवण्यास पुरेसा आहे.
(८२) काय हे लोक कुरआनवर विचार करीत नाहीत? जर हे अल्लाहशिवाय अन्य कोणाकडून असते तर यांत पुष्कळसा विसंवाद आढळला असता.१११
(८३) जेव्हा त्यांच्यापर्यंत शांततेची किंवा धोक्याची बातमी पोहचते तेव्हा हे तिचा (सर्वत्र) प्रसार करतात. जर त्यांनी पैगंबर आणि जबाबदार लोकांसमोर निवेदन केले असते तर  त्यांच्यातील जाणकार लोकांनी तिचे स्वरूप जाणून अचूक निष्कर्ष काढला असता.११२ तुम्हा लोकांवर अल्लाहची कृपा व मेहरबानी नसती तर (तुमच्या उणिवा अशा होत्या की) काही  मोजक्या व्यक्ती सोडून तुम्ही सर्वजण शैतानच्या नादी लागला असता.
(८४) तर हे नबी (स.)! तुम्ही अल्लाहच्या मार्गात लढा, तुम्ही आपल्या स्वत:खेरीज इतर कोणासाठी जबाबदार नाही तथापि श्रद्धावंताना लढण्यासाठी प्रवृत्त करा, दूर नाही की अल्लाह  इन्कारकरणाऱ्यांचा जोर मोडून काढील. अल्लाहचा जोर सर्वात प्रचंड व त्याचे शिक्षा कठोर आहे.
(८५) जो चांगुलपणाची शिफारस करील त्याला त्यात वाटा मिळेल आणि जो वाईट गोष्टीची शिफारस करील त्याला त्यातून वाटा मिळेल,११३ आणि अल्लाह सर्व गोष्टींवर नजर ठेवणारा  आहे.
(८६) आणि जेव्हा एखादा अदबीने तुम्हाला सलाम करील तर त्याला त्यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे उत्तर द्या किंवा कमीतकमी त्याचप्रमाणे,११४ अल्लाह प्रत्येक गोष्टीचा हिशेब घेणारा आहे.
(८७) अल्लाह ज्याच्याशिवाय अन्य कोणीही ईश्वर नाही, तो तुम्हा सर्वांना त्या कयामतच्या दिवशी एकत्र करील ज्याच्या येण्यात कोणताही संशय नाही आणि अल्लाहच्या वचनापेक्षा  अधिक खरे वचन कोणाची बरे असू शकेल?११५




१११) ढोंगी, दांभिक, पाखंडी आणि कमी ईमान असणाऱ्यांच्या आचरणावर वरील आयतमध्ये तंबी देण्यात आली आहे, कारण त्यांना कुरआनविषयी शंका होती की काय ते अल्लाहकडून  आहे? त्यांना विश्वास पटत नव्हता की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर दिव्य प्रकटन होत आहे. तसेच हे आदेश अल्लाहकडूनच पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित होत आहेत.  म्हणून या दांभिकांच्या कपटपूर्ण आचरणाची निंदा केल्यानंतर आता सांगितले जात आहे, `हे लोक कुरआनवर विचारच करीत नाही. अन्यथा ही वाणी स्वत: साक्ष देत आहे की अल्लाह  व्यतिरिक्त दुसऱ्याची ही वाणी होऊच शकत नाही.' कोणी मनुष्य याचे सामर्थ्य ठेवून नाही की वर्षानुवर्षे वेगवेगळया परिस्थितीत वेगवेगळया वेळी, वेगळया विषयावर व्याख्यान देत  जावे. प्रारंभापासून अंतापर्यंत त्याचे पूर्ण वक्तव्यें एकरुप, एकरंग आणि एक संतुलित संग्रह बनावा ज्याचा एकभाग दुसऱ्याशी टकराव करीत नाही किंवा नीतीत बदल होण्याचा कुठेच सुगावा लागत नाही. ज्यात संवाददात्याच्या मनातील विभिन्न स्थिती आपापल्या विभिन्न रंगात दिसून येत नाहीत की यावर पुनरावलोकनाची गरजसुद्धा भासत नाही.
११२) तो संघर्षाचा क्षण होता म्हणून चहुकडे अफवा पसरत होत्या. कधी केव्हा धोक्याची निराधार बातमी येऊन मदीना आणि लगतच्या भागात चिंतेचे वातावरण निर्माण व्हायचे. कधी  केव्हा चालाख शत्रू एखाद्या खऱ्या धोक्याला लपविण्यासाठी संतोषपूर्ण बातम्या पाठवित असे आणि लोक त्यांना एकून बेफिकीर होत असत. या अफवा फैलावण्यात ते लोक जास्त  आवडीने भाग घेत असत ज्यांना फक्त हंगामा होणे आवडत होते. अशा लोकांना इस्लाम आणि अज्ञानतेच्या या संघर्षात काहीच रस नव्हता. त्यांना या अफवेच्या गंभीर परिणामांची  खबरसुद्धा नव्हती. त्यांच्या कानावर काही नवीन आले तर जागोजागी त्याचा फैलाव करणे त्यांचे काम होते. याच लोकांना या आयतद्वारे फटकारले गेले आहे आणि त्यांना सकतीने  सचेत करण्यात आले आहे की अफवा फैलावू नका. जी खबर त्यांना मिळाली ती जबाबदार व्यक्तीपर्यंत पोहोच करून गप्प बसावे.
११३) म्हणजे ही आपली आपली पसंत आणि भाग्य आहे की कोण अल्लाहच्या मार्गात प्रयत्नशील राहातो आणि सत्याच्या सत्कीर्तीसाठी लोकांना जागृत करतो. या कामाचा त्याला  चांगला मोबदला मिळतो. दुसरा एखादा कोणी अल्लाहच्या दासांना भ्रमात टाकतो आणि त्यांना निरुत्साही करतो आणि त्यांना अल्लाहच्या वाणीला प्रसिद्धी मिळण्याच्या प्रयत्नांपासून दूर  ठेवतो. असा मनुष्य तर अल्लाहच्या शिक्षेचा हकदार बनतोच.
११४) त्यावेळी मुस्लिम व मुस्लिमेतरांचे संबंध तणावपूर्ण होते. यास्थितीत आशंका होती की मुस्लिम लोकांनी मुस्लिमेतरांशी अशिष्ट व्यवहार करू नये. म्हणून त्यांना आदेश दिला गेला   की जो तुमच्याशी आदरपूर्ण व्यवहार करील त्याच्याशी तुम्ही तसाच किंबहुना त्यापेक्षा जास्त आदरपूर्वक व्यवहार करावा. शालीनतेचे उत्तर शालीनताच आहे. तुम्ही तर दुसऱ्यांपेक्षा  जास्त शिष्टाचारपूर्ण असणे आवश्यक आहे. संदेशदाता आणि प्रचारक लोकांसाठी, जगाला जे सरळमार्गी बनवण्यास आणि सत्यपंथी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत; अशिष्टतता, कडवे  बोल उचित नाहीत. ह्याने तर तुमचे मन संतुष्ट होईल परंतु तुम्ही ज्या उद्देशासाठी कार्यरत आहात, त्याला नुकसान सहन करावे लागते.
११५) म्हणजे ईशद्रोही, अनेकेश्वरवादी, नास्तिक आणि अधर्मी जे काही करीत आहेत त्याने ईश्वराच्या ईशत्वात काहीच फरक पडत नाही. एक अल्लाह असणे आणि अल्लाह निरंकुश  असणे एक अशी वास्तविकता आहे जी कुणाच्या बदलण्याने बदलू शकत नाही. एके दिवशी तो अल्लाह सर्वांना एके ठिकाणी जमा करून प्रत्येकाला त्याचे कर्मफळ दाखवून देईल.  त्याच्या सामर्थ्य शक्तीपासून पळून कोणीही वाचू शकत नाही. म्हणून अल्लाह कदापि या गोष्टीचा गरजवंत नाही की त्याच्यातर्पेâ कोणी त्याच्या विद्रोहींशी द्वेष करावा किंवा त्यांना  त्रस्त करावे. या आयतचा संबंध वरील आयतीशी आहे आणि हीच आयत या पूर्ण वार्ताक्रमाचा अंतसुद्धा आहे जो मागील तीन चार प्रभागापासून (रूकअ) चालत आला आहे. या दृष्टीने  आयतचा अर्थ आहे की जगात मनुष्य ज्या पद्धतीने वाटेल त्याप्रमाणे त्याने चालावे आणि मनाला वाटेल त्या मार्गात आपले प्रयत्न आणि कष्ट झेलावे. शेवटी एके दिवशी सर्वांना  अल्लाहसमोर हजर व्हायचेच आहे ज्याच्याशिवाय कोणी ईश्वर नाही. तिथे प्रत्येक जण आपले कर्मफळ पाहून घेईल.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget