Halloween Costume ideas 2015

भाषणबाजी झाली तेज, प्रचाराला आला वेग

एप्रिल महिना सुरू होताच सूर्य आणि प्रचार दोन्ही तापत असल्याचा अनुभव येत आहे. प्रचारामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तर सोडा स्वतः पंतप्रधानांनी मर्यांदाचे उल्लंघन केल्याचे  स्पष्ट जाणवत आहे. एकीकडे योगी आदित्यनात आणि मुख्तार अब्बास नक्वी भारतीय लष्कराचे कौतूक करत असतांना त्यांना ’मोदी सेना’ म्हणून संबोधित केले. तर स्वतः मोदींनी  नवीन मत देणाऱ्या तरूण मतदारांनी बालाकोटच्या कार्यवाही करणाऱ्या सैनिकांना आपले पहिले मत समर्पित करावी अशी भावनिक हाक दिली. या दोन्ही गोष्टी आचारसंहितेच्या  उल्लंघनाचे उत्कृष्ट नमुने आहेत. एवढ्यावरच न थांबता भाजपाने डीटीएच सेवेच्या माध्यमातून नमो टीव्ही ऐन निवडणूक आचारसंहितेची परवा न करता लाँच केला, असा विरोधकांनी  आरोप केला. त्या टीव्हीच्या मार्फत रात्रंदिवस जोरदार प्रचार सुरू केलेला आहे. ज्युलियो रिबोरो व पूर्व नौसेना अध्यक्ष अ‍ॅडमिनरल रामदास यांच्यासह अनेक सेवानिवृत्त सनदी  अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून वरील सर्व बाबींची पुरेशी नोंद निवडणूक आयोग घेत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. शिवाय, नसरूद्धीन शहासह इतर 600 बॉलिवुड  कलाकारांनी भाजपला मतदान न करण्याचे आव्हान केलेले आहे. दरम्यान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजपा दोघांचेही जाहिरनामे प्रकाशित झालेले आहेत. काँग्रेसच्या  जाहिरनाम्यामध्ये 20 टक्के गरीब लोकांना महिना 6 हजार रूपये मदत देण्याचे आश्वासन देण्यात आलेले असून, बेरोजगारी - दूर करण्याचेही आश्वासन देण्यात आलेले आहे. शिवाय,  इंग्रजांच्या काळापासून चालत आलेले देशद्रोहाचे कलम काढून टाकण्याचे व नीति आयोग बरखास्त करण्याचा मनसुबा जाहीर केलेला आहे. या जाहिरनाम्याचे वैशिष्ट्य म्हणजे सच्चर  कमिटीबद्दल मौन बाळगण्यात आलेले आहे.
भाजपच्या जाहिरनाम्यामध्ये जम्मू कश्मीरला खास संवैधानिक दर्जा देणारे कलम 370 आणि 35 (ए) काढून टाकण्याबद्दल आश्वासित करण्यात आलेले आहे. शिवाय, राम मंदिरचे  निर्माण करण्याच्या आश्वासनासह अन्य आश्वासने देण्यात आलेली आहेत. भाजपकडून सर्वात जास्त प्रचार प्रधानमंत्री स्वतः करीत असून, त्यांनी दिवसातून 3 ते 4 सभा करण्याचा  सपाटा लावलेला आहे. प्रत्येक सभेमध्ये ते पुलवामा आणि बालाकोटचा उल्लेख प्रामुख्याने करत आहेत. त्यावरून त्यांचा इरादा स्पष्ट आहे. काँग्रेसने एकीकडे आपल्या जाहिरातीतून  भाजपची लाज काढायला सुरूवात केली असून, भाजपतर्फे काँग्रेसला पाकिस्तानी ठरविले जात आहे. प्रधानमंत्री मोदींनी काँग्रेसच्या निवडणूक जाहिरनाम्याला पाकिस्तान धार्जीने म्हणून  हिनविले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात बहुजन वंचित आघाडीचीही दखल घेतली जात असून, तीसरा पर्याय म्हणून ते समोर येत आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदार संघात अब्दुल  सत्तार यांनी घेतलेल्या नाट्यमय माघारीमुळे औरंगाबादच्या निवडणुकीमध्ये खैरे विरूद्ध जाधव विरूद्ध झांबर विरूद्ध जलील असा चौकौनी फड रंगणार असून कोणताही उमेदवार जिंकला  तरी फारसे मताधिक्य कोणालाही मिळणार नाही. ज्याचाही विजय होईल तो काठावरचा विजय होईल. महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे लागलेले आहे.
एकंदरित लोकसभा निवडणूक प्रचारांमध्ये रंग भरत आहे. दरम्यान, काही प्रतिष्ठित संस्थांची भाकीतेही प्रकाशित झालेली असून, त्यात एनडीएला युपीएपेक्षा थोड्याशा जागा अधिक  मिळतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget