अल्लाहच्या मर्यादांचे पालन करणारे आणि त्यांचा भंग करणारे जसे काही लोक एका जहाजावर स्वार आहेत. काही लोक तळमजल्यावर आहेत तर काही वरच्या मजल्यावर आहेत., जे लोक तळमजल्यावर आहेत त्यांना जेव्हा पाण्याची गरज भासते तेव्हा ते वरच्या मजल्यावर जातात आणि तिथले लोक आक्षेप घेतात की खालच्या मजल्यावरील लोकांनी जहाजात एक छिद्र करून रास्त खाली वाहत असलेले पाणी घ्यावे. म्हणजे वरच्या लोकांना त्रास होणार नाही. जर इतर लोक त्यांना तसे करण्याची अनुमती देतील तर जहाजावरील सर्वच लोक पाण्यात बुडतील आणि जर त्यांना तसे करण्यापासून रोखले तर मग सर्व लोक सुरक्षित राहतील. (बुखारी)
मानवी समाजाची स्थितीदेखील अशीच काहीशी आहे. समाजाच्या जहाजावर जे लोक आहेत त्यामध्ये नेक, वाईट, गाफील आणि बुद्धिवान हर प्रकारचे लोक आहेत. आणि हे सर्व एकाच दिशेने प्रवास करत आहेत. समुद्रातील लाटा आणि वारा त्या जहाजाला कधी एका बाजूला तर कधी दुसऱ्या बाजुला वळवतात. जसे हे जहाज गतिमान आहे तसेच मानवी समाजदेखील नेहमी गतिमान असतो. जर लोक असे समजतात की हे जहाज एकाच ठिकाणी स्थिर आहे तर त्यांना याचा अंदाजदेखील येत नाही की केव्हा कोणती हलाखीची परिस्थिती त्यांच्यावर कोसळेल. अशाच प्रकारे माणसाने अशी समज करून घेऊ नये की तो एका भूभागावर खंबीरपणे स्थापित आहे. त्याची शक्तीसुद्धा नेहमी त्याची साथ देणार नाही, नव्हे तो ह्या जीवनाचा प्रवास करत आहे. पण जर माणसाने हे तथ्य समजून घेतले असेल की जसे जहाज तरंगत आहे तसेच त्यांचे जीवनसुद्धा या जगात स्थिर नसून नेहमी परिस्थितीनुसार हालचाल करत आहे. कोणत्याही क्षणी त्याच्यावर कोणती आपत्ती कोसळू शकते. माणसाने आपल्या इच्छेमागे धाव घेतली तर तो नक्कीच विनाशाकडे गेल्याशिवाय राहणार नाही. पण माणूस नेहमी आपल्या ऐटित राहतो. अहंकार करतो. तो दुसऱ्याची पर्वा करत नाही आणि जर दुसऱ्याची पर्वा केली नाही तर त्याच्यावरही संकटे येऊ शकतात.
जेव्हा जहागीरदार उच्चभ्रू लोक असे समजतील की आम्हीच या धरतीवरील सर्वेसर्वा आहोत, मोठमोठ्या उद्योगांचे, कारखैन्यांचे मालक आम्हीच आहोत आणि बाकीचे सर्व लोक त्यांचे गुला३म आहेत. जेव्हा धार्मिक मंडळी असे समजू लागेल की आम्हीच या धरतीचे मालक आहोत आणि बाकीचे गुलाम आहेत. अशाच प्रकारे शक्तिशाली लोकांची देखील समजूत झाली तर त्या जहाजावर वरच्या मजल्यावर बसलेल्या लोकांनी खालच्या मजल्यावरील लोकांना पाणी घेऊ दिले नाही आणि खालच्यांनी जहाजात छिद्र पाडून पाणी घेण्याचा प्रयत्न केला तर परिणाम खालचे आणि वरचे दोन्ही लोक समुद्रात बुडून जातील. गुलाम असो की श्रीमंत लोकांनी अहंकार केला तर ते आपल्या विनाशाला आमंत्रण देतील. पाण्यावर तरंगत असलेल्या जहाजासारखे मानवी समाज विनाशाकडे वाटचाल केल. आणि कितीही धनवान असो की शक्तिशाली कुणीही वाचणार नाही.
संकलन :
सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment