अपुर्या ज्ञानाच्या पोपटपंची विचारवंताचा थवा समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालतोय. सर्वसामान्य माणसांशी सहज सोपे संबंध जोडत जाणारी माध्यमे चुकीचा भ्रम पक्का करताहेत. फेकन्यूज, पेडट्रोलर्स, व्यवस्था समर्थक अभ्यास समित्या़ एसीतले बावळट समाजशास्त्री यांचा प्रादुर्भाव असहनीय आहे़ त्यातही वॉटस्अॅप फेसबुकीच्या मृगजळात गुपचुप विष कालवून विशेष समाजाला टारगेट करण्याचा ठेका घेतलेले फेकठग उतावीळ झालेत़
दुर्लक्षित करण्यात अशा गोष्टींचा कचरा खूप असताना, एका कट्टर हिटलरी मित्राच्या होलसेल धर्मांधता पसरविणार्या पोस्टचा खुळखुळाट होता़ मी एका मेसेजपाशी जरा थांबलो, ’आपली भाषा संस्कृत हीच राष्ट्रभाषा-राज्यभाषा असायला हवी़ मोगलांची हिंदी राष्ट्रभाषा करून आपण देशाला गुलामी मानसिकतेत ठेवले आहे़’ सुरवातीला हसलो हा अचार मुर्खपणावर पण मेसेज टाईप करणारी व्यक्ती बँकिग क्षेत्रातील आणि मुस्लिम नावाची आहे़ यात विशेष कुतूहल वाटू लागले़ अख्खा सुट्टीचा दीपावली दिवस यावरल्या प्रतिक्रिया बरसत होत्या़ ज्या मित्राच्या ग्रुपवर हे सुरू होते, त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही़ सर्वधर्म समभाव वगैरे बाळगताना आपण गप्प बसू नाही तर आपल्या क्षेत्रातील लोकांच्या नजरेत येऊन उगाच वैर वगैरे कशाला? म्हणून त्याने मला समजावले़ विषयावर मोगल बादशहांची खिल्ली उडवित, खोट्या इतिहासाची संदर्भहीन धुरळा उडत होता़
शेवटी रात्रीच्या गप्पाटप्पांत त्याने आपापली अस्वस्थता सांगितली आणि मग एक मेसेज टाईप केला़ “देश ही संकल्पना सुरू होण्याचा काळ कोणता?” मोगलांची हिंदी? फक्त भारतात मोगलच झाले का? संस्कृत आता कुठे आहे? कृपया याचा विचार करावा़ केवळ एखाद्या बहुसंख्य समुहाला बरे वाटावे म्हणून कसल्याही गोष्टीला हुंकार भरावा ही विखारी मानसिकता आपण इतरांपेक्षा कसे वेगळं आहो हे दाखविण्याच्या नादात अख्या धर्मसमुहाला वेठीस धरण्याचा खुळासोस, तळाला बुडवून टाकला पाहिजे़
एका साध्याखोट्या संदेशाने दोनशेहून अधिक लोकांनी आपलं ऐतिहासिक ज्ञान पाजळत ‘मुस्लिम’ समुह कसा? किती? बाद आहे हे सिद्ध करण्याची धडपड केली़
‘आधीच उल्हास त्यात फाल्गून मास’ गैरसमजांच्या विषारी प्रचारात या मुस्लिम नाव असणार्या बँकरला फोन करून माझ्या मित्राने संयमी भाषेत समज दिली़ ताणतणावांनी व्यापलेली बहुभाषिक खंडप्राय भारतात संस्कृत ही अभिजन ब्राह्मणांची संपर्क भाषा होती़ मध्ययुगीन किंवा त्याहीपूर्वी आणि नंतर या भाषेला राजकीय लागुलचालनाचे रूप मिळाले़ तार्किकदृष्ट्या पाहिले तरी या भाषेला शालेय अभ्यासक्रमात तिसर्या / चौथ्या दर्जावर ठेवण्यात आले आहे़ केवळ सरकारी दातृत्वावर कागदी अस्मितेवर ही भाषा जीवंत ठेवण्याचा प्रयत्न सुरूय. एकूण लोकभाषा माध्यमातून वर्ग-वर्णवादावर परखड व्यक्त होणार्या असंख्य बोलीभाषांवर लगाम घालण्याच्या हेतूने भाषेचे प्रामाणीकरण केले गेले़ केवळ नावालाच संस्कृतचा उदो-उदो करण्यात आला़ भाषापंडीत, भाषाशास्त्रज्ञ म्हणूनच या विषयावर लिहिले, बोलले पाहिजे असे नाही़
अलिकडच्या इतिहासातील संत परंपरेची मांडणी, ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेची भगवद्गीतेची भाषा हजारो भाषांच्या समुहातून जीवंत आणि वापरांतून सर्वसामान्य झालेली हिंदी, ही संस्कृतातून नव्हे तर सुफीसंत तत्वज्ञानातून आलेली आहे़ जातसमुहाची सर्वमान्य भाषाच जीवंत राहते़ या तत्वानुसार खडीबोली ब्रजभाषा, अस्सल उर्दू यांच्या जडणघडणीतून सिनेमा ट़ि व्ही़ माध्यमांनी स्विकारलेली भाषा कोणती आहे?
उर्दू मिश्रीत हिंदी़ आता याही भाषांच्या सरमिसळीचा ग्लोबलडाटा झालाय. एकजिनसी भाषा उरत नाहीये़ त्यामुळे जात-धर्म अस्मितेशी भाषेला चिकटवून अनुनय साधण्याचा कुटील डाव फोल ठरतोय. भाषेचे राजकीयकरणातून निर्माण होणारे प्रश्न आणि त्याचे वाईट परिणाम हेच सत्य. म्हणून ‘भाषा’ यावर अधिक न भाष्यकरता, माणूस समजून घेणारी कोणतीही भाषा ही माझी-आपली भाषा व्हावी़ सध्यातरी राष्ट्रभाषा हिंदी आहे़ मग आपण हिंदीच बोलतो? किंवा बोलतो ती हिंदीच आहे का? मोगलांपासून मुस्लिम भारतीय हे नाते केवळ मुद्दाम भाषाअस्मितेशी जोडून आपण विषारी तणकटाला नाव देतोय का? या प्रश्नांचे उत्तरी गुजहाळ सुरू राहू दे! नंतर उर्दूबद्दल बोलत राहू शुक्रीया, धन्यवाद, थँक यू जजाकल्लाह,आभार.
‘सबका होकर देख चुका हूं,
वापस खुद का हो जाऊं?
दुर्लक्षित करण्यात अशा गोष्टींचा कचरा खूप असताना, एका कट्टर हिटलरी मित्राच्या होलसेल धर्मांधता पसरविणार्या पोस्टचा खुळखुळाट होता़ मी एका मेसेजपाशी जरा थांबलो, ’आपली भाषा संस्कृत हीच राष्ट्रभाषा-राज्यभाषा असायला हवी़ मोगलांची हिंदी राष्ट्रभाषा करून आपण देशाला गुलामी मानसिकतेत ठेवले आहे़’ सुरवातीला हसलो हा अचार मुर्खपणावर पण मेसेज टाईप करणारी व्यक्ती बँकिग क्षेत्रातील आणि मुस्लिम नावाची आहे़ यात विशेष कुतूहल वाटू लागले़ अख्खा सुट्टीचा दीपावली दिवस यावरल्या प्रतिक्रिया बरसत होत्या़ ज्या मित्राच्या ग्रुपवर हे सुरू होते, त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही़ सर्वधर्म समभाव वगैरे बाळगताना आपण गप्प बसू नाही तर आपल्या क्षेत्रातील लोकांच्या नजरेत येऊन उगाच वैर वगैरे कशाला? म्हणून त्याने मला समजावले़ विषयावर मोगल बादशहांची खिल्ली उडवित, खोट्या इतिहासाची संदर्भहीन धुरळा उडत होता़
शेवटी रात्रीच्या गप्पाटप्पांत त्याने आपापली अस्वस्थता सांगितली आणि मग एक मेसेज टाईप केला़ “देश ही संकल्पना सुरू होण्याचा काळ कोणता?” मोगलांची हिंदी? फक्त भारतात मोगलच झाले का? संस्कृत आता कुठे आहे? कृपया याचा विचार करावा़ केवळ एखाद्या बहुसंख्य समुहाला बरे वाटावे म्हणून कसल्याही गोष्टीला हुंकार भरावा ही विखारी मानसिकता आपण इतरांपेक्षा कसे वेगळं आहो हे दाखविण्याच्या नादात अख्या धर्मसमुहाला वेठीस धरण्याचा खुळासोस, तळाला बुडवून टाकला पाहिजे़
एका साध्याखोट्या संदेशाने दोनशेहून अधिक लोकांनी आपलं ऐतिहासिक ज्ञान पाजळत ‘मुस्लिम’ समुह कसा? किती? बाद आहे हे सिद्ध करण्याची धडपड केली़
‘आधीच उल्हास त्यात फाल्गून मास’ गैरसमजांच्या विषारी प्रचारात या मुस्लिम नाव असणार्या बँकरला फोन करून माझ्या मित्राने संयमी भाषेत समज दिली़ ताणतणावांनी व्यापलेली बहुभाषिक खंडप्राय भारतात संस्कृत ही अभिजन ब्राह्मणांची संपर्क भाषा होती़ मध्ययुगीन किंवा त्याहीपूर्वी आणि नंतर या भाषेला राजकीय लागुलचालनाचे रूप मिळाले़ तार्किकदृष्ट्या पाहिले तरी या भाषेला शालेय अभ्यासक्रमात तिसर्या / चौथ्या दर्जावर ठेवण्यात आले आहे़ केवळ सरकारी दातृत्वावर कागदी अस्मितेवर ही भाषा जीवंत ठेवण्याचा प्रयत्न सुरूय. एकूण लोकभाषा माध्यमातून वर्ग-वर्णवादावर परखड व्यक्त होणार्या असंख्य बोलीभाषांवर लगाम घालण्याच्या हेतूने भाषेचे प्रामाणीकरण केले गेले़ केवळ नावालाच संस्कृतचा उदो-उदो करण्यात आला़ भाषापंडीत, भाषाशास्त्रज्ञ म्हणूनच या विषयावर लिहिले, बोलले पाहिजे असे नाही़
अलिकडच्या इतिहासातील संत परंपरेची मांडणी, ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेची भगवद्गीतेची भाषा हजारो भाषांच्या समुहातून जीवंत आणि वापरांतून सर्वसामान्य झालेली हिंदी, ही संस्कृतातून नव्हे तर सुफीसंत तत्वज्ञानातून आलेली आहे़ जातसमुहाची सर्वमान्य भाषाच जीवंत राहते़ या तत्वानुसार खडीबोली ब्रजभाषा, अस्सल उर्दू यांच्या जडणघडणीतून सिनेमा ट़ि व्ही़ माध्यमांनी स्विकारलेली भाषा कोणती आहे?
उर्दू मिश्रीत हिंदी़ आता याही भाषांच्या सरमिसळीचा ग्लोबलडाटा झालाय. एकजिनसी भाषा उरत नाहीये़ त्यामुळे जात-धर्म अस्मितेशी भाषेला चिकटवून अनुनय साधण्याचा कुटील डाव फोल ठरतोय. भाषेचे राजकीयकरणातून निर्माण होणारे प्रश्न आणि त्याचे वाईट परिणाम हेच सत्य. म्हणून ‘भाषा’ यावर अधिक न भाष्यकरता, माणूस समजून घेणारी कोणतीही भाषा ही माझी-आपली भाषा व्हावी़ सध्यातरी राष्ट्रभाषा हिंदी आहे़ मग आपण हिंदीच बोलतो? किंवा बोलतो ती हिंदीच आहे का? मोगलांपासून मुस्लिम भारतीय हे नाते केवळ मुद्दाम भाषाअस्मितेशी जोडून आपण विषारी तणकटाला नाव देतोय का? या प्रश्नांचे उत्तरी गुजहाळ सुरू राहू दे! नंतर उर्दूबद्दल बोलत राहू शुक्रीया, धन्यवाद, थँक यू जजाकल्लाह,आभार.
‘सबका होकर देख चुका हूं,
वापस खुद का हो जाऊं?
- साहिल शेख
8668691105
8668691105
Post a Comment