Halloween Costume ideas 2015

सूरह यूनुस:ईशवाणी (सुबोध कुरआन)


(७५) मग त्याच्यानंतर७२ आम्ही मूसा (अ.) आणि हारून (अ.) यांना आपल्या संकेतांसहित फिरऔन आणि त्याच्या सरदारांकडे पाठविले परंतु त्यांनी आपल्या मोठेपणाची घमेंड केली७३ आणि ते अपराधी लोक होते.

(७६) मग जेव्हा आमच्याकडून सत्य त्यांच्यासमोर आले तेव्हा त्यांनी सांगितले की ही तर उघड जादू आहे.७४

(७७) मूसा (अ.) ने सांगितले, ‘‘तुम्ही सत्याला असे बोलता जेव्हा ते तुमच्यासमोर आले? ही जादू आहे काय? खरे पाहाता जादूगार सफल होत नसतात.’’७५

(७८) त्यांनी उत्तरात सांगितले, ‘‘तू याकरिता आला आहेस काय की आम्हाला त्या पद्धतीपासून परावृत्त करावेस ज्यावर आमचे पूर्वज आम्हाला आढळले आणि पृथ्वीवर मोठेपणा तुम्हा दोघांचा चालावा?७६ तुमचे म्हणणे तर आम्ही ऐकणारे नाहीच.’’

(७९) आणि फिरऔन ने (आपल्या माणसांना) सांगितले , ‘‘प्रत्येक कलानिपुण जादूगारास माझ्यासमोर हजर करा.’’

(८०) जेव्हा जादूगार आले तेव्हा मूसा (अ.) नी त्यांना सांगितले, ‘‘जे काही तुम्हाला फेकावयाचे आहे फेका.’’

(८१) मग जेव्हा त्यांनी फेकले तेव्हा मूसा (अ.) नी सांगितले, ‘‘हे  जे काही तुम्ही फेकले आहे ती जादू आहे,७७ अल्लाह आताच यांना रद्दबातल करीत आहे.’’ उपद्रवी लोकांच्या कामाला अल्लाह सुधारू देत नाही.

(८२) आणि अल्लाह आपल्या आदेशाने सत्याला सत्य करून दाखवितो मग  अपराध्यांना  ते  कितीही  अप्रिय  का  वाटेना.’’



७२) या ठिकाणी त्या टीपांना नजरेसमोर ठेवावे जे सूरह ७, आयत १०० ते १७१ मध्ये मूसा आणि फिरऔनच्या घटनेविषयी लिहिले आहे, त्यांना पाहावे.

७३) म्हणजे त्यांनी आपली संपत्ती आणि सत्ता आणि सुखवैभवाच्या नशेत चूर होऊन स्वत:ला दासत्वाच्यापासून उच्च्तर समजून घेतले आणि आज्ञापालनात नतमस्तक होण्याऐवजी अकडून राहिले.

७४) म्हणजे आदरणीय पैगंबर मूसा (स.) यांचा संदेश ऐकून याचप्रमाणे सांगितले जे मक्का येथील अनेकेश्वरवादी मुहम्मद (स.) यांचा संदेश ऐकून म्हटले होते, ``हा व्यक्ती तर जादूगार आहे.'' (पाहा  याच सूरहची आयत नं. २) येथे पूर्णक्रम दृष्टीसमोर ठेवल्यास स्पष्ट होते की आदरणीय मूसा (अ.) आणि हारून (अ.) सुद्धा वास्तविकपणे त्याच सेवेसाठी नियुक्त केले गेले होते ज्यासाठी आदरणीय नूह (अ.) आणि त्यांच्या नंतरचे सर्व पैगंबर आदरणीय मुहम्मद (स.) यांच्यापर्यंत नियुक्त केले गेले होते. या अध्यायात आरंभापासून एक विषय चालत आला आहे. तो विषय म्हणजे फक्त सृष्टीनिर्माता, पालनकर्ता आणि शासनकर्ता अल्लाहला आपला उपास्य मानावे व स्वामी मानावे. तसेच हे स्वीकार करा की तुम्हाला या जीवनानंतर दुसऱ्या जीवनात अल्लाहसमोर हजर व्हायचे आहे आणि आपल्या कर्मांचा हिशेब द्यावयाचा आहे. आता जे लोक पैगंबर (स.) यांच्या आवाहनाला नाकारत आहेत, त्यांना समजावून दिले जात आहे की तुमच्याच सफलतेचाच नव्हे तर समस्त मानवजातीच्या सफलतेचा आधार याच मार्गदर्शनाचा स्वीकार करण्यावर आहे. हाच या अध्यायाचा केंद्रिय विषय आहे. या संदर्भात ऐतिहासिक काळातील पैगंबरांचा उल्लेख आला आहे. याचा अर्थ असाच होतो की जो संदेश या अध्यायात प्रस्तुत केला आहे तोच संदेश सर्व पैगंबरांचा होता. याच संदेशाला घेऊन आदरणीय मूसा (अ.) आणि हारून (अ.) फिरऔन आणि त्याच्या राष्ट्रातील सरदारांकडे गेले होते. जर असे असते की आदरणीय पैगंबर मूसा (अ.) आणि हारून (अ.) यांचे मिशन एका विशिष्ट राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राच्या गुलामीतून मुक्त करणे असते तर या घटनेला ऐतिहासिक उदाहरणाच्या स्वरुपात प्रस्तुत करणे अगदी अनावश्यक ठरले असते. यात बिल्कूल शंका नाही की या दोन्ही पैगंबरांच्या मिशनचा हा एक भाग होता की बनीइस्राईल (एक मुस्लिम समुदाय) त्यांना एका अनेकेश्वरत्व राष्ट्राच्या पकडीतून सोडविणे, परंतु हा एक गौण उद्देश होता, मूळ उद्देश मुळीच नव्हता. मूळ उद्देश तोच होता जो कुरआननुसार सर्व पैगंबरांचा मूळ उद्देश आहे आणि सूरह ७९ मध्ये याचा स्पष्ट उल्लेख केला आहे, ``फिरऔनच्याकडे जा कारण त्याने दासत्वाची सीमा पार केली आहे आणि त्याला विचार की सुधारणा करण्यास तू तयार आहेस का? मी तुझ्या पालनकर्त्या प्रभुकडे तुझे मार्गदर्शन करतो. काय तू त्याच्या शिक्षेचे भय बाळगणार?'' परंतु फिरऔन आणि त्याच्या दरबारी लोकांनी त्या संदेशाचा स्वीकार केला नाही. शेवटी आदरणीय मूसा (अ.) यांनी आपल्या मुस्लिम समुदायाची त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली, म्हणून त्यांच्या मिशनचा हा भाग इतिहासामध्ये प्रसिद्ध झाला. कुरआननेसुद्धा या भागाला त्याचप्रमाणे विवेचन करून प्रस्तुत केले. परंतु जो मनुष्य कुरआनच्या विस्तृत विवेचनाला त्याच्या पूर्णत्वापासून वेगळे करत नाही, तर त्या विशिष्ट भागाला समष्टी रूपातच पाहतो आणि समजून घेतो, असा मनुष्य या गैरसमजुतीत कधीच पडणार नाही की एखाद्या राष्ट्राला किंवा समुदायाला स्वतंत्र करण्यासाठी पैगंबर पाठविला जातो. पैगंबर पाठविण्याचा मूळ उद्देश तर सत्य धर्माचे आवाहन लोकांना करणे असते.

७५) म्हणजे जादू आणि चमत्कारामध्ये जी एकरूपता असते, त्याच्या आधारावर तुम्ही लोकांनी नि:संकोचपणे त्यास जादू म्हटले आहे. परंतु बुद्धीहीनांनो! तुम्ही हे पाहिले नाही की जादूगार लोक कशा प्रकारच्या चरित्राचे आणि आचरणाचे लोक असतात आणि कोणत्या उद्देशासाठी ते जादूगरी करतात.  काय एखाद्या जादूगराचे हेच काम असते की नि:स्वार्थ आणि बेधडक एका हुकूमशाह बादशाहच्या दरबारात येऊन त्याला  त्याच्या  पथभ्रष्टतेवर  टोकावे. तसेच  त्यास  एकेश्वरत्व  आणि  मनाची  पवित्रता  स्वीकारण्याचे आवाहन  करावे? तुमच्याकडे एखादा जादूगार आला असता तर (अनेक दंडवत त्याने घातले असते, स्तुतिगान केले असते आणि आपला तमाशा दाखविण्यासाठी आणि मदतीसाठी बादशाहपुढे हात फैलावले असते) या पूर्ण विषयाला एका वाक्यात सांगितले गेले आहे की जादूगार सफलता प्राप्त् करणारे नसतात.

७६) हे स्पष्ट आहे की आदरणीय मूसा (अ.) आणि हारून (अ.) यांची मागणी बनीइस्राईलींच्या सुटकेविषयी असती तर फिरऔन आणि त्याच्या दरबारी लोकांना शंका घेण्याचे काहीच कारण नव्हते. फिरऔन आणि त्याच्या दरबारी लोकांना वाटले की या दोन्हींचे म्हणणे देशात फैलावले तर देशाचा धर्म बदलून जाईल आणि अशा स्थितीत देशात आमचे श्रेष्ठत्व नव्हे तर त्यांचे श्रेष्ठत्व स्थापित होईल. त्यांच्या या शंकेचे कारण तेच होते की आदरणीय मूसा (अ.) इजिप्शियन लोकांना अल्लाहची भक्ती करण्याचे आवाहन करत होते आणि यामुळे ती अनेकेश्वरवादी व्यवस्था धोक्यात आली होती ज्यामुळे फिरऔनची बादशाही आणि त्याच्या सरदारांची सरदारी आणि धर्मगुरुची गुरुगीरी स्थापित होती. (पाहा अध्याय ७, टीप ८८, अध्याय ४० टीप ४३)

७७) जादू तो नव्हता जो मी दाखविला होता. जादू हा आहे जो तुम्ही दाखवित आहात.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget