Halloween Costume ideas 2015

लवकरच जगाला चांगल्या नागरिकांसाठी मुस्लिमांकडे पहावे लागेल


पाश्चात्य जीवनशैलीचा सर्वात मोठा दुष्परिणाम वाढत्या मनोरूग्णांच्या संख्येच्या रूपाने पुढे येतोय.  आज युरोप आणि अमेरिकेमध्ये सर्वात जास्त प्रॅ्निटस मनोरूग्ण चिकित्सा तज्ञांची इस्पितळे इतरांच्या तुलनेत जास्त चालतात. याचाच अर्थ तेथे आणि आता येथेही मनोरूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. म्हणून किमान मुस्लिमांनी आपल्या मुलांचे संगोपन शरियतनुसार करावे.कारण इस्लाम आलाच मुळी सभ्यतेची स्थापना करण्यासाठी आणि ही सुरूवात लहान मुलांपासून करणे अपेक्षित आहे.


वो जिनके होते हैं खुर्शिद आस्तीनों में 

उन्हें कहीं से बुलाओ बडा अंधेरा है

भारतीयांना या गोष्टीचा मोठा अभिमान आहे की, युरोप व अमेरिकेमध्ये आपल्या नागरिकांनी मोठी झेप घेतलेली आहे. सिलीकॉन व्हॅली तर जवळ-जवळ भारतीयांच्या ताब्यात आहे. पण असे का आहे? याचा फारसा कोणी विचार करतांना दिसत नाही. वास्तविक पाहता आम्हा भारतीयांची मागील पिढी कष्टाळू, प्रामाणिक, पापभिरू आणि उच्च नैतिक मुल्यांनी नटलेली शेवटची पिढी होती, म्हणून त्यांनी युरोप आणि अमेरिकेमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला व स्थानिकांच्या नाकर्तेपणामुळे रिक्त झालेल्या महत्त्वाच्या खुर्च्या आपल्या अंगभूत गुणांच्या बळावर मिळविल्या. मात्र त्यांचीच पुढची पिढी त्यांच्यासारखी कर्तृत्वान न निपजता वाया जातांना दिसून येत आहे. नव्या पिढीने समकालीन स्थानिक पिढीचे संस्कार आत्मसात केले असून आता ही पिढी आळशी, उद्धट, अप्रमाणिक असल्याचे दिसून येते. उच्च नितीमुल्यांचा त्यांनी त्याग केलेला आहे. शालेय स्तरापासूनच ड्रग्जचे सेवन व लैंगिक सक्रीयता त्यांना निष्क्रिय करून टाकत आहे. दळणवळणाच्या साधनांची सहज उपलब्धता, सोशल मीडिया, ओटीटी प्लेटफॉर्ममुळे जग एकवटलेले आहे. दर्जेदार मनोरंजनाच्या नावाखाली अनैतिक संबंधांचे उदात्तीकरण करणाऱ्या मालिकांचा सुळसुळाट झालेला आहे. एकंदरित पाश्चिमात्य (अ) सभ्यता युरोप आणि अमेरिकेमधून विस्तारित होऊन आता भारतामध्ये पूर्ती स्थिरावलेली आहे. हे मुंबई क्रूझ ड्रग पार्टीच्या घटनेतून नुकतेच स्पष्ट झालेले आहे. 

चांगली युवा पिढी महागड्या शाळा महाविद्यालयातून नव्हे तर चांगल्या कुटुंबातून निपजते व चांगले कुटुंब चांगल्या मात्यापित्यामुळे निर्माण होते आणि त्यांची वाणवा आजकाल सर्वत्र दिसून येत आहे. जीवनमान उंचावण्याच्या नादात पती-पत्नी दोघेही ’जॉब’ करण्यासाठी दिवसभर घराबाहेर असतात व रात्री उशीरा घरी येतात. साहजिकच त्यांच्या या दिनचर्येचा परिणाम त्यांच्या मुलांवर होतो. मुलं चांगली निपजावीत म्हणून महागड्या शाळा- महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो. तेथे त्यांना भौतिक शिक्षण जरूर मिळते पण नैतिक शिक्षण मिळत नाही. याचा एकंदरित परिणाम मुलं सुशिक्षित तर होतात पण सुसंस्कृत होत नाहीत. म्हणून आजची तरूण पिढी व्याभिचारी, बलात्कारी, भ्रष्ट, संकीर्ण, जेमतेम योग्यता असलेली पुढे येतांना दिसून येते आणि हा भांडवलशाही लोकशाही व्यवस्थेचा अपरिहार्य परिणाम आहे. या व्यवस्थेतून चांगले व्यापारी उद्योजक तर मोठ्या संख्येने निर्माण होतात पण चांगली माणसं निर्माण होत नाहीत. 

मुलांच्या बाल्यवस्थेतील संगोपनाची नैसर्गिक जबाबदारी मातेची असते. पण काही महिन्याच्या मेटर्निटी लिव्ह शिवाय तिला मुलांच्या संगोपनासाठी पुरेशी सुट्टी मिळू शकत नाही. अनेक मातांना दूध पिणारे बाळ पाळणाघरात सोडून ऑफिसला जावे लागते आणि छातीत दाटून आलेले अमृतसमान दूध अक्षरशः पिळून वॉसबेसनमधून वाहून टाकावे लागते. त्यातून बाळाच्या मुलभूत अधिकारांचे हनन तर होतेच स्त्रीला आपल्या मातृत्वाशी तडजोड करावी लागते, हे मोठे दुर्दैव आहे. दूध पिण्याच्या आणि पाजण्याच्या प्रक्रियेतून आई अन् बाळाची जी जवळीक निर्माण होत असते त्यातून मातेचे बाळाप्रती वात्सल्य वाढते. दूध बेसीनमध्ये वाहवल्याने बाळाची आईशी जी शारीरिक सलगी असते ती कमी होते. त्याचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम दोघांनाही भविष्यात भोगावे लागते. मूल आणि मातेमध्ये एका प्रकारचा अदृश्य दुरावा निर्माण होतो, जो मूल जसजसे मोठ होत जाईल तसतसा वाढत जातो.

भ्रष्टाचारातून मिळविलेल्या मिळकतीतून मुलांचे संगोपन

मुलांचे शिक्षण महाग आहे. आई-वडिल दोघेही कमावल्याशिवाय ते पूर्ण करणे शक्य नाही. असा समज व्यापक प्रमाणात निर्माण झाल्यामुळे आई-वडिल मुलांच्या प्राथमिक आयुष्याशी तडजोड करून पैसा कमावण्यासाठी सातत्याने घराबाहेर राहतात. त्यामुळे मुलांचा त्यांच्या जवळीकीचा नैसर्गिक हक्क हिरावल्या जातो. एवढेच नव्हे तर रात्रंदिवस काम व भ्रष्टाचार करून जो प्रचंड पैसा आई-वडिल कमावतात त्यातून मुलं चांगली निपजण्यापेक्षा वाईट निपजतात याची असंख्य उदाहरण आपल्या आजुबाजूला पसरलेली आहेत. भ्रष्टाचार करून मिळविलेल्या संपत्तीतून शिकून मोठे झालेली मुलं पुढे तिसऱ्या दर्जाचे नागरिक म्हणून पुढे येतात. या संबंधित सय्यद अबुल आला मौदूदी रहे. यांचे विचार चिंतनीय असे आहेत. ते खालीलप्रमाणे - 

राष्ट्रीय उन्नती का रहस्य

’’राष्ट्रों की उन्नती के लिए ये बात लाभदायक नहीं बल्कि अति हानिकारक है कि उनकी नस्लों की शिक्षा-दिक्षा तमाम की तमाम सुख एवं वैभव के वातावरण में हो और उनको कठिनाइयों, विपत्तियों, धनहीनता तथा अथक परिश्रम का सामना ही न करना पड़े. ये चीज़ उस सब से बड़े प्रशिक्षालय (ट्रेनिंग सेंटरों) को बन्द कर देगी जिस में मनुष्य की शिक्षा-दिक्षा, तुम्हारे स्कुलों और कॉलेजों से अत्युत्तम ढंग पर होती है. वो प्रशिक्षालय समय का प्रशिक्षालय है जिस को श्रेष्ठ अल्लाह ने स्थापित किया है, ता कि मनुष्य की सहनशीलता, सहिष्णुता, साहस तथा उत्साह की परीक्षा करे और उन्हीं को पास करे जो परीक्षा में पूरे उतर आयें. ये एक ऐसी भट्टी है जो अशुद्ध को शुद्ध से विभेदित करती है और तपा-तपा कर खोट निकालती है. यहां विपदायें इसलिए डाली जाती हैं कि हमारे अंदर उन से मुक़ाबले की शक्ति पैदा हो, कठिनाइयां इस लिए पैदा की जाती हैं कि मनुष्य उन पर अधिकार प्राप्त करने का प्रयास करे, कठोरता इसलिए होती है कि मनुष्य की कमजोरियां दूर हों और उस की छिपी हुई शक्तियां व्यवहारिक-क्षेत्र में प्रकट हों. जो लोग इस प्रशिक्षालय से निवृत्त होकर निकलते हैं, वही संसार में कुछ कर के दिखाते हैं, और संसार में आज तक जितने बड़े-बड़े काम किए गए हैं, वो इस प्रशिक्षालय की सनद हासिल किए हुए लोगों ने ही किए हैं. तुम इस प्रशिक्षालय को बन्द कर के संसार को सुख-गृह में परिवर्तित करना चाहते हो, ता कि तुम्हारी नस्लें सुखार्थी, दुस्साहसी, कामचोर और डरपोक बनकर उठें. तुम चाहते हो कि तुम्हारी सन्तान भोगविलास के पालने में आंख खोले, ऊंचे स्कूलों और विराट निवास स्थानों में रह कर शिक्षा प्राप्त करे और युवक होकर जीवन-क्षेत्र में कदम रखे तो इस प्रकार कि उनके पास एक ’उपयुक्त आरम्भ’ के लिए पर्याप्त पूंजी मौजूद हो. तुम आशा रखते हो कि इस प्रकार वे संसार में सफल होंगे और उन्नति के आसमानों पर चमकेंगे. परन्तु तुम को मालूम होना चाहिए कि ऐसी शिक्षा-दिक्षा के साथ तुम तीसरी श्रेणी के पशु पैदा कर सकते हो या अधिक से अधिक द्वितीय श्रेणी के, प्रथम श्रेणी के मनुष्य तुम्हारी नस्लों में कभी न उठेंगे. विश्वास न आये तो विश्व का इतिहास और महान विभूतियों की जीवन-चर्या उठा कर देख लो, तुम को प्रथम श्रेणी के जितने भी मनुष्य मिलेंगे, उन में कम से कम नब्बे प्रतिशत ऐसे होंगे जो दीन व अकिंचन (ग़रीब) माता-पिता के यहां पैदा हुए, विपदाओं की गोद में पल कर उठे, इच्छाओं के खून और कामनाओं के त्याग के साथ युवावस्था व्यतीत किया, जीवन रूपी समुद्र में बिना किसी साधन-सामग्री के फेंक दिए गए, लहरों से तैरना सीखा, थपेड़ों से बढ़ने का पाठ पढ़ा और अन्ततः सफलता-तट पर अपनी उच्चता की पताका लहरा कर ही छोड़ा.’’ (इस्लाम और बर्थ कंट्रोल सफा नं 119-121)

ईश्वराने स्त्री पुरूषांची शारीरिकच नव्हे तर मानसिक रचना सुद्धा अशी केलेली आहे की पुरूष घराबाहेरील कष्टाची कामे करण्यासाठी अनुकूल असतात तर महिला घरातील कामांसाठी अनुकूल असतात. महिलांना अर्थार्जनापासून पूर्णपणे मुक्त ठेवण्यामागे ईश्वरीय इच्छा हीच आहे की तिने बालसंगोपन (जे की तिच्यासाठी उत्तम आणि अनुकूल आहे) व्यवस्थित करावे. पण पाश्चिमात्यांच्या मूर्ख विचारसरणीचा एवढा जबरदस्त परिणाम झालेला आहे की, अनेक पिढ्यांचे उध्वस्तीकरण, याची देही याची डोळा पाहूनही आपल्याला अजून अक्कल आलेली नाही. उदा. जी गृहिणी अंगभर कपड्यात राहून घरातील कामे करते त्या गृहिणीला तुच्छ लेखणारे आपण तेच काम, परपुरूषांच्या बिभत्स नजरेच्या कैदेत राहून विमानातील महिला तोकड्या कपड्यात करतात तेव्हा त्यांना हवाई सुंदरी म्हणून आपण खोटा सम्मान देतो. केवढा हा दांभिकपणा? कुठलेही तर्कसंगत कारण नसताना गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स आपली तरूण पिढी केवळ यासाठी घालून फिरते की युरोप आणि अमेरिकेतील लोक तशा जिन्स घालतात. अशा मूर्खपणापासून आपल्या पिढीला विनाशाकडे ढकलणारेही आपणच. ही मानसिक गुलामगिरी ज्यांना करावयाची आहे त्यांनी खुशाल करावी. किमान गंभीर प्रवृत्तीच्या हिंदू बांधवांनी आपल्या गुरूकुल परंपरेची लाज बाळगून व मुस्लिम बांधवांनी आपल्या शरई परंपरेची लाज बाळगून आपापल्या पाल्यांचे संगोपन आपापल्या पद्धतीने जरी केले तरी आपण देशाला पर्यायाने जगाला चांगल्या नागरिकांचा पुरवठा करू शकतो. नसता कुठलाही अणुबॉम्बचा न वापरता हे पिसाळलेले तरूण पृथ्वीचा नाश करतील. 

पाश्चात्य जीवनशैलीचा सर्वात मोठा दुष्परिणाम वाढत्या मनोरूग्णांच्या संख्येच्या रूपाने पुढे येतोय.  आज युरोप आणि अमेरिकेमध्ये सर्वात जास्त प्रॅ्निटस मनोरूग्ण चिकित्सा तज्ञांची इस्पितळे इतरांच्या तुलनेत जास्त चालतात. याचाच अर्थ तेथे आणि आता येथेही मनोरूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. म्हणून किमान मुस्लिमांनी आपल्या मुलांचे संगोपन शरियतनुसार करावे.कारण इस्लाम आलाच मुळी सभ्यतेची स्थापना करण्यासाठी आणि ही सुरूवात लहान मुलांपासून करणे अपेक्षित आहे. असे न झाल्यास कशी पिढी निर्माण होते याचे प्रात्यक्षिक आपण आपल्या अवतीभोवती रोजच पाहतोय. सभ्यतेचे मेरूमनी म्हणून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या रूपाने एक रोल मॉडेल आपल्यासमोर उपलब्ध आहे. त्यांच्या बाबतीत कुरआनने घोषणा केलेली आहे की, ’’आणि निःसंशय तुम्ही नीतिमत्तेच्या उच्च दर्जावर आहात.’’  (कुरआन : सुरे अलकलम : आयत नं.4). दुसऱ्या एकेठिकाणी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की, ’’प्रत्येक धर्माचे एक वैशिष्ट्ये असते आणि इस्लामचे वैशिष्ट्ये लज्जा आहे.’’ या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून जेव्हा आपण आपल्या मुलांचे संगोपन करून तेव्हा देशात व विदेशात चारित्र्यसंपन्न, संयमी, दृढ निश्चयी, आपल्या इच्छा-आकांक्षावर (नफ्स) नियंत्रण ठेऊन जबाबदारीची कामे करण्यासाठी तरूणांची सर्व क्षेत्रीय मागणी वाढेल तेव्हा मागणी प्रमाणे आपण पुरवठा करू शकू. असा पुरवठा करण्यासाठी जग मुस्लिमांकडूनच अपेक्षा ठेवेल हे लक्षात असू द्या. कारण बालसंगोपनाचे सर्वंकष योजना (कुरआन आणि हदीसच्या स्वरूपात) फक्त तुमच्याकडे आहे दुसऱ्यांकडे नाही. विशेषतः मुस्लिम महिलांनी कटाक्षाने या गोष्टीकडे लक्ष द्यावे की तुमच्या पदराखाली भविष्यातील अबुबकर रजि., उमर रजि., उस्मान रजि., अली रजि., सुमैय्या रजि., आएशा रजि. आकार घेत आहेत. पुढच्या पिढीला नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ आणि बलवान बनविण्यामध्ये तुमची भूमिका तुमच्या पुरूषांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. 

बालसंगोपन एक दुर्लक्षित विषय

कुठल्याही देशाला आपल्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श मनुष्यबळाची सातत्याने गरज भासत असते. ती गरज पूर्ण करण्याची जबाबदारी त्या-त्या देशातील नागरिकांची असते. ती जबाबदारी कुठल्याही कारणाने जर एखाद्या देशाचे नागरिक पूर्ण करू शकत नसतील तर त्या एवढा राष्ट्रीय कृतघ्नापणा दूसरा कोणता असू शकतो बरे ! आपल्याच देशातील सध्याची स्थिती पहा गेल्या अनेक वर्षांपासून लष्कराच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये अधिकाऱ्यांची सातत्याने कमतरता भासत आहे, ती पूर्ण करण्यासाठी पुरेसे पात्र तरूण आपल्याकडे नाहीत. आज आयटी क्षेत्राला ज्या दर्जाचे अभियंते पाहिजेत त्या दर्जाचे अभियंते मिळत नाहीत. त्यांच्याकडे पदव्या आहेत पण कौशल्य नाही. इच्छा आहे पण लायकी नाही. म्हणून अनेक कंपन्यांची कामगिरी खालावलेली आहे अनेक अभियांत्रिकी विद्यालये बंद पडलेली आहेत. बेरोजगारी सातत्याने वाढत आहे. शिकूनही रोजगार मिळत नसल्याने तरूणांमध्ये वैफल्य वाढत आहे. अनेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे ते भलत्याच मार्गाला लागलेले आहेत. या सर्वासाठी त्यांचे आई-वडिल जबाबदार आहेत, ज्यांनी त्यांचे संगोपन व्यवस्थित केलेले नाही. मागची पिढी स्वार्थी ठरल्याने नवीन पिढीची अडचण झालेली आहे.

चंगळवादी जीवन पद्धती माणसाला ऐशआरामी व निरूद्देश्य जगण्याकडे प्रेरित करत असते. आणि एकदा का माणूस चंगळवादाच्या चक्रव्यूवहात अडकला की त्यातून तो सुटू शकत नाही. म्हणूनच आपण पाहतो एकीकडे कृषी सारखा महत्त्वाचा जीवनावश्यक व्यवसाय धोक्यात आलेला असतांना सिनेमा, टीव्ही, ओटीटी, यू ट्यूब, फेसबुक, फॅशन, कॉस्मॅटिक्स सारख्या निरूपयोगी व्यवसायांची भरभराट होत आहे. देशाला दृढनिश्चयी संयमित पिढीची गरज असतांना कंबर हलवून डान्स करणाऱ्या नाच्यांचा पुरवठा मात्र जोरात सुरू आहे. ही परिस्थिती जगात सर्वत्र वाढत असून, लवकरच ही आपल्या शेवटच्या टोकाला पोहोचणार आहे. किंबहुना पश्चिमेत ती पोहोचलेली सुद्धा आहे. अफगानिस्तानमध्ये 41 देशाच्या सर्वसाधन संपन्न फौजांचा झालेला लाजीरवाना पराभव हे याचे ताजे उदाहरण आहे. 

माणसांच्या मनात जे काही चांगले वाईट मुल्यं रूजतात ते बालपणीच रूजतात आणि नेमक्या त्याच काळात आई-वडिल दोघेही जॉबनिमित्त बाहेर असतील आणि मोलकरणींकडे मुलांच्या संगोपनाची जबाबदारी असेल तर अशाच पिढ्या आकार घेणार जश्या आज घेत आहेत. 

उपाय

आपल्या प्रिय भारत देशाला भविष्यात लागणाऱ्या संयमी आणि चारित्र्यवान नागरिकांचा सर्वक्षेत्रीय पुरवठा करण्यासाठी मुस्लिमांना उभे रहावे लागेल. त्यासाठी कुठली नवी योजना तयार करण्याची गरज नाही. फक्त शरीयतमध्ये दिलेल्या तरतुदींची मुलांच्या वयानुसार कालबद्ध अंमलबजावणी करण्याची गरज आहे. गरीबीमुळे ज्यांना या जबाबदारीची जाणीव नाही त्यांच्या पाल्यांची जबाबदारी श्रीमंत शेजाऱ्यांनी तसेच मुस्लिम संस्था संघटनांनी उचलावी. ही सुद्धा एक सामाजिक जबाबदारी आहे. 

विस्तार भयामुळे शरई संगोपनाचा तपशील देणे शक्य नाही. कारण कुरआनमध्ये बाळ जन्मताच त्याला आईने किती वर्ष दूध पाजवावे? त्याचे नाव कसे ठेवावे? त्याच्यावर संस्कार कोणते करावेत? त्यांचे अंथरूण कधी वेगळे करावे? त्याला कुठल्या वयात नमाजची सक्ती करावी? भींतीवर चाबूक कधी लटकवून ठेवावा? इथपासून ते मुलांना शिक्षण कधी, कोणते आणि कसे द्यावे? याचा सविस्तर तपशील उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे मार्गदर्शन सुरे लुकमानमध्ये केलेले आहे. त्याचा वाचकांनी अभ्यास करावा आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून आदर्श नागरिकांचा पुरवठा करण्याची जबाबदारी उचलावी. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ’’हे अल्लाह! आम्हाला व आमच्या देशबांधवांना देशासाठी भविष्यात लागणारे योग्य नागरिक घडविण्याची समज आणि शक्ती दे.’’ (आमीन.)

- एम. आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget