Halloween Costume ideas 2015

संपन्न राज्यव्यवस्थेकडून अधोगतीकडे प्रस्थान

 


राष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये जेव्हा अनियमित आणि अनपेक्षित घटना घडत असतात त्या वेळी सामान्य नागरिक किंवा विचारवंत त्या घटनांची नोंद घेत नसतात. तेव्हा या घटना राजकीय सामाजिक व्यवस्थेमध्ये दुर्घनांचे रूप घेत असतात. वर्तमानात इतक्या गंभीर परिस्थितींना संपूर्ण राष्ट्राला तोंड द्यावे लागत असते की त्या घटनांमुळे भविष्यात होणाऱ्या परिणामांची दखल घ्यायला त्यांना वेळ मिळत नाही. कारण प्रचलित राज्यव्यवस्था त्यांना गंभीर आणि अविरत समस्यांमध्ये अडकवून ठेवते. पण या घटना वर्तमानातून भूतकाळात आपला ठसा उमटवित असतात. त्यांची नोंद होत असते आणि राष्ट्रांचा प्रवास आपण ठरवलेल्या ध्येय-उद्दिष्टांचा मार्ग सोडून इतरत्र वळण घेत असतो तेव्हा त्यांना पूर्वपदावर आणणे कोणत्याही राष्ट्राला अत्यंत कठीण असते. काही देश भरकटलेल्या राज्य-सामाजिक प्रवालाहा पूर्वपदावर आणण्यात यशस्वी होत असतात, पण यासाठी त्यांना मोठे बलिदान द्यावे लागते. ही तर शक्तिशाली राष्ट्राची गोष्ट. पण जी राष्ट्रे शारीरिक शक्तीने, बुद्धिमत्तेने दुर्बल असतात, सोयी-सुविधांच्या अभावाने ग्रासलेल्या असतात किंवा एका मोठ्या समाजाची दिशाभूल करून त्यांना खोटी स्वप्ने दाखवून त्यांना सत्तेचे श्रीमंतीचे स्वप्न दाखवून आपल्या प्रभावाखाली आणि बौद्धिक नियंत्रणाखाली आणलेले असते तेव्हा अशा राष्ट्राची वाटचाल भविष्याकडे नव्हे तर भूतकाळातील अराजकतेकडे होत असते. राष्ट्राच्या एका समुदायाने जर अशा शक्तीविरूद्ध अभे ठाकण्याचा प्रयत्न केला तर शासन प्रशासन सर्वशक्तिनिशी त्यांना दाबून ठेवते. त्यांच्यावर अनन्य अत्याचार करत असते. अशा राज्यव्यवस्थेची पुढची वाटचाल विध्वंसाकडे होत असते.याची जाणीव उशिराने का होईना विचारवंत बुद्धिजीवींना होत असते, परंतु तोपर्यंत परिस्थिती त्यांच्या आवाक्याबाहेर निघून जाते. परिणामी गेल्या कित्येक दशकांपासून जे राष्ट्र विकासाकडे लोककल्याणाला वाहून गेलेल्या उद्दिष्टांकडे वाटचाल करत असते, तेच राष्ट्र झपाट्याने विध्वंसाकडे पूर्ण शक्तीने उलट प्रवास करते. अशा राष्ट्राचा हा प्रवाह देशाच्या सत्ताधाऱ्यांना अनुकूल असतो, मात्र राष्ट्रासाठी प्रतिकूल असतो. सत्ताधारीवर्ग आपल्या अल्पशा काळाच्या उद्दिष्टांसाठी याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्याच राष्ट्राची अधोगतीला बळ प्राप्त करून देतो. या दुष्टचक्रात जगातील बरीच राष्ट्रे विध्वंसाला बळी पडलेले आहेत. जगभरातील विविध राष्ट्रांच्या इतिहासाचे अध्ययन केले तर अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला मिळतील.

महत्त्वाचा प्रश्न असा आहे की राष्ट्रातील काही घटक सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली का येत असतात? या सत्ताधारीवर्गाद्वारे कोणती आकर्षणे त्यांना दाखवली जातात? याचे सोपे उत्तर असे की प्रत्येक सत्ताधारीवर्ग आपल्या नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी आणि भवितव्याशी त्यांचे नाते तोडण्यासाठी त्यांच्यासमोर गत सभ्यता आणि संस्कृतीची स्वप्ने दाखवत असतो. सत्ताधारीवर्गाला गतवैभवाची पुनरावृत्ती करण्यात काही एक रस नसतो. जरी त्यांचे उद्दिष्ट प्रमाणिक असले तरी भूतकाळाचे वर्तमानात रुपांतर करणे त्यांच्या आवाक्यात नसते. कारण सृष्टीचा प्रवास नेहमी भविष्याकडे मार्गक्रमण करत असतो. उलट दिशेने कोणताही पुढचा प्रवास करता येत नाही. जर कुणी करायचा प्रयत्न केला तर त्यांना यश मिळणार नाही. खरे तर ते आपल्या अशा भूतकाळाकडे निघालेले असतात ज्याला स्वतः त्यांनीच नाकारले होते आणि राष्ट्रबांधणी, न्यायव्यवस्था आणि मानवी जीवनमूल्यांसाठी त्यांनी स्वतःच्या भूतकाळाला तिलांजली दिलेली असते.

ही एक वास्तविकता आहे आणि बऱ्याच लोकांना मान्य नसणार तरीदेखील हे मानवी जीवनाचे असे कटु सत्य आहे की ज्याच्याकडे दुर्लक्ष केल्यावर कोणतेही राष्ट्र किंवा लोकसमूह स्वतःचाच विनाश पत्करत आहे. काय ते? गतवैभव आणि संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचे कोणत्याही लोकसमूहाचे स्वप्न. त्याचबरोबर संस्कृतीला अधिकाधिक समृद्ध करणे हे आहे. एखाद्या जनसमूहाची संस्कृती कोणत्याही राज्यव्यवस्थेतील साऱ्या सह-लोकसमूहांची संस्कृती असू शकत नाही. म्हणून एखादा समूह जितक्या प्रमाणात आपली विशिष्ट संस्कृती समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो तेवढीच ती संस्कृती फॅसिस्टबादाकडे प्रस्थान करत असते आणि असे करताना राष्ट्रीय जनमाणसांत एक दोन नव्हे तर जितके लोकसमूह आहेत त्या सर्वांना आपल्या संस्कृतीला धोका वाटू लागल्याने राष्ट्रीय कलहात याचे रूपांतर होते. मग या कलहाचा धोका साऱ्या नागरिकांना, सर्व लोकसमूलांना पत्करावा लागतो.

ही वस्तुस्थिती टाळण्यासाठी कोणत्याही भौगोलिक सीमांतर्गत राहणाऱ्या विविध जाती-संप्रदाय, धार्मिक समूह आपले वैयक्तिक हितसंबंधांना बाजूला सारून स्वतःसाठी एका न्याय्य समाजाची स्थापना करतात. म्हणजे एका सर्वसमावेशक राज्यव्यवस्थेची स्थापना करतात. या राज्यव्यवस्थेतील घटक-समूहांना काही अंशी आपल्या वैयक्तिक आणि सांप्रदायिक उद्दिष्टांना तिलांजली द्यावी लागत आहे, पण राज्यव्यवस्था आणि स्वतःचे राष्ट्रहित जपण्यासाठी ते आपल्या काही हक्कांचा त्याग करतात. या बदल्यात त्यांना काही मूलभूत अधिकार, न्यायिक हक्काधिकार, कायदे-नियम आणि संविधानाचे राज्य निर्माण करायचे असते. हा प्रवास कोणत्याही राष्ट्रासाठी संस्कृतीसाठी खडतर असतो, पण एवढा खडतर प्रवास केल्यानंतर एक सर्वसंपन्न भवितव्याच्या उंबरठ्यावर पोचल्यानंतर जर त्या राष्ट्राला, जनसमूहांना ‘पेगासस’सारख्या महाकाय आपत्तीशी झुंज द्यावी लागत असते तेव्हा त्यांचे ऐहिकच नव्हे तर आत्मिक अस्तित्वदेखील संपून जाते. नागरिक हेरगिरीला बळी पडतात तेव्हा जी बलिदाने देऊन एका सभ्य मानवी समाजाची उभारणीसाठी त्यांनी दीर्घकाळ आणि सर्वंकष प्रयत्न केले होते ते सर्व धुळीस मिळतात. नागरिकांचे अस्तित्व शून्यात परिवर्तित होते.

- सय्यद इफ्तिखार अहमद

मो.: ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget