Halloween Costume ideas 2015

जेव्हा बॅरिस्टर जिन्नांनी टिळकांना निर्दोष सोडविले


1908 मध्ये बॉम्बे हायकोर्टाने लोकमान्य टिळकांना 6 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला होता. इंग्रज शासनाद्वारे देशद्रोहाचा हा पहिलाच खटला होता. टिळकांना शिक्षा झाल्याची बातमी येताच मुंबईत दंगली सुरू झाल्या. त्यांच्या शिक्षेविरूद्ध बॉम्बे हायकोर्टात दाद मागण्यात आली. या घटनेसंबंधी आपल्या आत्मकथेमध्ये (रोजेस इन डिसेंबर)मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधिश एन.सी. छागला यांनी लिहिले आहे की, ज्या दिवशी हायकोर्टात या खटल्याचा निर्णय होणार होता त्या दिवशी मी केवळ टिळकांना पाहण्याच्या इराद्याने कोर्टात गेलो होतो. या खटल्यात टिळकांकडून वकीलपत्र बॅ. मोहम्मद अली जिन्ना यांनी घतले होते. त्या काळी जिन्नांचा समावेश देशातील मोजक्याच मोठ्या वकीलांमध्ये होत होता. थोड्याच वेळात टिळक कोर्टरूममध्ये आले आणि दुसऱ्या लाईनमध्ये बसले. त्यानंतर जिन्ना आले आणि पहिल्या लाईनमध्ये बसले. टिळकांचे वकील असल्यामुळे त्यांच्यासाठी आसन आरक्षित होते. काही वेळानंतर निर्णय आला. टिळकांना दिलेली शिक्षा रद्द करण्यात आली. याचे श्रेय जिन्नांच्या जोरदार युक्तीवादाला दिले गेले. निर्णय झाल्या झाल्या बॅ. जिन्ना उठले आणि त्यांनी टिळकांशी हस्तांदोलन केले. जिन्नांशी अनेक वर्षांचा संपर्क असल्यामुळे मला या गोष्टीची जाणीव होती की जिन्नांच्या मनामध्ये टिळकांविषयी मोठा सन्मान होता. तसेच ते गोखल्यांचाही फार आदर करत. विशेष म्हणजे हा सन्मान तेव्हाही कायम होता जेव्हा जिन्ना हे मुस्लिम लीगचे नेते झाले. (एल.एस. हरदेनिया)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget