Halloween Costume ideas 2015

पाश्चात्य राष्ट्रांची लाचारी


एखाद्या जनसमूह, राष्ट्र, संस्कृती-सभ्यतेकडे जेव्हा मानवतेला देण्यासारखे काही नसते तेव्हा तो जनसमूह राष्ट्र किंवा संस्कृती-सभ्यता दुसऱ्या संस्कृतीला प्रामुख्याने त्यांच्या धर्माला शिव्या घालण्याचे कार्य करत असतात. पाश्चात्य राष्ट्रांची सध्या अशीच गत झाली आहे. हे तथ्य नाकारता येणार नाही की पाश्चात्य संस्कृतीने मानवतेला इतके ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञान दिले आहे की इस्लामव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही सभ्यतेने दिलेले नाही. तसे जगात मानवतेचा विचार करणाऱ्या आणि त्यांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या केवळ दोनच संस्कृती-सभ्यता आहेत. यात पहिल्या क्रमांकावर इस्लामचा तर दुसरा पाश्चिमात्यांचा. ज्ञान-विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पाश्चात्य भेदाभेद करत नाहीत. त्यांनी या क्षेत्रातील आपलं सर्वस्व दिलेलं आहे आणि म्हणूनच एकंदर जगाने त्यांचे आभार मानायला हवेत. पण जेव्हा गोष्ट मानवी हक्काधिकार आणि त्यांच्या मूल्यांची आहे अशा वेळी ते लोक आपला आणि परका असा भेद करत असतात. इस्लाममध्ये आपल्या आणि परक्याचा भेद होत नसतो. हा धर्म आणि याचे शिक्षण साऱ्या जगाला आणि तमाम मानवतेला आपले समजतो, कारण सर्व मानवजातीचा निर्माता एकच म्हणून सारे मानव समान ही इस्लामची पायाभूत शिकवण आहे.
या उलट पाश्चात्य संस्कृती जगात आपल्या पलीकडे कोणच नाही. जगातील साऱ्या सुखसोयी आणि संपत्तीवर त्यांचाच एकट्यांचा ताबा असावा यासाठी ते सतत जगात कुठे ना कुठे युद्ध करत असतात, जेणेकरून त्या देशाच्या नागरिकांचे मनोबल खचून जावे. त्यांच्यावर युद्ध लादून त्यांच्या संपत्तीची नासधूस करावी. या देशात तेल असल्यास त्या स्रोतांवर ताबा मिळवावा. त्यांच्या या वृत्तीमुळे त्यांना मानसिक रोग जडला आहे. ते जरी तोंडातून शांतता-सौहार्दाचे शब्द काढत असले तरी त्यांची प्रत्यक्ष कृत्ये त्यांची साथ देत नसतात. यामुळे त्यांच्यामध्ये विनाशकारी शक्ती शिगेला पोहचल्या आहेत. इस्लाम धर्माला शिव्या घालणं, त्यास मानवतेविरूद्ध कालबाह्य ठरवणं, त्याच्या शिकवणींना जहाल ठरवणं यात त्यांना खूप रस आहे. याचे कारण असे की पाश्चात्यांच्या तोडीला दुसऱ्या कुण्या संस्कृती-सभ्यतेकडे मानवि मूल्यांच्या आधारावर हे जग जिंकण्याची ताकद नाही. पाश्चात्यांना आव्हान फक्त इस्लामचेच आणि इस्लामचे प्रेषित ज्यांनी इस्लामच्या मनवी मूल्यांच्या बळावर एकेकाळी साऱ्या जगाला आकर्षित केले होते आणि आशिया, यूरोप या खंडांमधील जवळपास साऱ्याच भूभागाला इस्लामच्या शिकवणींनी मानवतेला सावरलं सजवलं. आता जरी पाश्चात्यांकडे ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाचा भलामोठा आधार असला तरी कल्याणाकरिता मानवतेला देण्यासाठी काहीच शिल्लक नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी ते रात्रंदिवस इस्लामला लक्ष्य करत आहेत जेणेकरून पुन्हा एकदा ही पोकळी इस्लामने भरून काढू नये. पुन्हा मानवजातीला या काळातील महाशक्तीच्या गुलामीतून मुक्त करून शेकडो वर्षांचा त्यांचा ताबा हिसकावून घेऊ नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रेषितांची अवमानना करणं, इस्लामला बदनाम करणं एवढाच त्यांचा धंदा शिल्लक उरला आहे. फ्रांसचे मॅक्रॉन किंवा इतर देशांचे सत्ताधारी किंवा मानवतेविरूदध विचारधारा असणाऱ्या शक्ती किंवा जसमूहाच्या अशा कार्यांना या संदर्भात पाहिले जावे. काही सकारात्मक विचार नसले तरी नकारात्मक मानसिकताच फोफावते. मुस्लिमांनी अशा क्षुल्लक विचारांना काडीमात्र किंमत देऊ नये. त्यांच्या तोंडाला तोंड देऊ नये. कारण त्यांना जे अभिप्रेत आहे ते हेच की मुस्लिमांनी स्वतःच्या विकासाचा विचार सोडून ज्यांना काडीचीही किंमत नाही अशांच्या मागे लागून आपली शक्ती संपवावी. जे लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गोष्ट करतात ते कधीतरी मानवी मूल्यांची त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचारांची गोष्ट का आणि कुठवर करणार आहेत? इराक, अफगाणिस्तान, सीरिया, येमेन त्याआधी व्हिएतनाम, कोरिया, कंबोडियामध्ये या लोकांनी कोट्यवधी लोकांची हत्या केली, अब्जावधीच्या संपत्तीची नासधूस केली आणि हडपली. जर एखाद्या मुस्लिमाने चूक केली, एखाद्या माणसाची हत्या केली तर लगेचच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गोष्ट करतात. लाखो चिमुकल्यांच्या डोक्यावरून त्यांच्या आई-वडिलांचा आधार संपवला. कोट्यवधींना आपले घरदार सोडून जगभर सैरावैरा भटकण्यास विवश केले तेव्हा अभिव्यक्ती आणि त्याचे स्वातंत्र्य कुठे गेले होते? युद्धात जे मारले गेले ते वाचले पण जे बचावले आहेत ते मरण मागत आहेत. त्यांना औषधे पुरवण्यासही मज्जाव करणारे हे अभिव्यक्त ज्यांना मानवतेचा गंधही लागला नव्हता अशा या जहाल प्रवृत्तीच्या इस्लामविरूद्ध शक्तींना कणभरही महत्त्व मुस्लिमांनी देऊ नये.
- सय्यद इफ्तिखार अहमद,
संपादक

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget