Halloween Costume ideas 2015

अर्नब गोस्वामीच्या अटकेचा चौथास्तंभ व पत्रकारितेला तिळमात्र धक्का नाही


अर्नब गोस्वामीला गुन्हेगार म्हणून अटक झालेली आहे. त्यामुळे अटकेचा पत्रकारितेला व चौथ्या स्तंभाला तीळमात्र धक्का लागलेला नाही. त्याचप्रमाणे त्यांनी पत्रकारितेची जबाबदारीसुध्दा पाळली नाही. त्यांना झालेली अटक ही वैयक्तिक आहे. अर्नब गोस्वामीची अटक पत्रकार म्हणून झालेली नसून फसवणूक व आत्महत्येकरिता प्रवृत्त करणारा व्यक्ती म्हणून झालेली आहे. त्यामुळे अर्नब एक गुन्हेगार आहे. ही बाब सर्वांनी लक्षात घेतली. त्यांच्यावर जी कारवाई होत आहे ती कायद्याच्या चाकोरीतून होत आहे.

त्याचप्रमाणे देशात अनेक न्यूज चॅनल आहेत. परंतु प्रत्येक चॅनलच्या पत्रकारांची एक बोलण्याची व वागण्याची शैली असते. ती शैलीसुध्दा अर्नबमध्ये कधीच दिसून आलेली नाही. पत्रकार तो असतो संपूर्ण बाबींचा विचार करून व समतोलता बाळगून कार्य करीत असते. भारत देश हा छोटा देश नसून १३० कोटी जनतेचा देश आहे. त्या पध्दतीने मीडिया आपली जबाबदारी सटीक पध्दतीने पाळून आपले कार्य करीत असते. भारतीय मीडिया गल्लीपासून व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संपूर्ण माहिती १३० कोटी जनतेपर्यंत पोहचवीत असते. ती कशा पध्दतीने समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे याचे दायित्व पत्रकारांवर असते आणि मीडिया व संपूर्ण पत्रकार मोठ्या जबाबदारीने आपले कार्य पूर्ण करतात. कारण कार्यप्रणाली, न्यायपालिका यांच्या चौकटीतून कार्य करावे लागते आणि तेथून तयार होतो चौथास्तंभ.

अर्नब गोस्वामीचा विचार केला तर त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात राजकारण जास्त व पत्रकारिता कमी दिसून येते. ज्यांचे चुकले त्यांच्यावर पत्रकारानी ताशेरे ओढलेच पाहिजे व अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे. परंतु त्यातून समाधान काढण्याकरिता मार्गदर्शन करण्याचे काम पत्रकारांचे असते असे मला वाटते. पक्ष-विपक्षातील कोणताही व्यक्ती असो त्याच्या लहान-मोठ्याचा विचार न करता समाजकार्यासाठी व देशहीतासाठी वेठीस आणन्याचे काम पत्रकारांचे असते. हे कार्य पत्रकार करतात सुध्दा.

देशातील अनेक घोटाळे, हत्या, आत्महत्यां, अपहरण या घटना मीडियाच्या व वर्तमानपत्राच्या माध्यमातूनच उघडकीस येत असतात याचे संपूर्ण श्रेय पत्रकारांना जाते. कारण त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते ती म्हणजे चौथ्या स्तंभावर कुठलीही आस येऊन नये. त्या पध्तीने पत्रकार, मीडिया व वृत्तपत्र आपले कार्य करीत असते. परंतु रिपब्लिक चॅनलने गेल्या काही दिवसांपासून मीडियाला एक धब्बा लावलेला आहे. त्यामुळे मीडियाने रिपब्लिकपासून दूरी ठेवली आहे. त्यामुळे अर्नब गोस्वामीपासून पत्रकारितेला, मीडियाला व चौथा स्तंभला कोणताही धोका नाही व बदनामीसुध्दा नाही. अर्नब गोस्वामीनेच मीडिया व पत्रकारितेला बदनाम करण्याचे काम केले आहे. मीडियामध्ये स्वत:चे वर्चस्व रहावे याकरिता त्यांनी अनेक कारनामे केलेत हालाकी ते हतकंडे पत्रकारिता कधीच स्वीकारू शकत नाही. अर्नब गोस्वामी यांनी टिआरपी घोटाळा करून रिपब्लिक चॅनलला कमी दिवसात उंचावर नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे भारतात मीडियामध्ये संपूर्ण वाहिन्यांची बदनामी झाली. यावर अनेकांनी ताशेरेसुध्दा ओढले. मुंबई पोलिस विभागाबद्दल मीडियाच्या माध्यमातून तथ्यहीन आरोपसुध्दा केले. अर्नबच्या वागण्यावरून असे वाटत होते की स्वत:ला मीडियाचा शनशहा समजत होते. अर्नबच्या वागणुकीवरून स्पष्ट होते की त्यांनी मीडियाला व पत्रकारितेला बदनाम करण्याचे काम केले आहे. पत्रकारिता त्याला म्हणतात जो व्यक्ती चारही बाजूंनी विचार करतो. फक्त एक बाजू घेणारा व्यक्ती कधीच पत्रकार राहू शकत नाही. महाराष्ट्र पोलिस किंवा मुंबई पोलिस विभाग जेही अर्नबच्या विरोधात कारवाई करीत आहे त्यात अवश्य तथ्य असावे. कारण मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी टीआरपीसारखे घोटाळे उघडकीस आणले. म्हणजेच मुंबई पोलिसांचे काम कायद्याच्या चाकोरीतून, जबाबदारीतून आणि नियमांना धरून होत आहे. त्यामुळेच आजही जगात मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंडच्या पोलिस विभागाशी केल्या जाते. अर्णव गोस्वामीचा काय गुन्हा आहे ही बाब अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी मीडियाला व मुंबई पोलीस विभागाला सांगितली आहे.

अक्षता नाईक म्हणतात की अन्वय नाईक यांनी सुसाईट नोटमध्ये तीन जणांची नावे लिहून ठेवली होती. त्यात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी, फिरोज शेख, नितेश सारडा हे होते तरी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. आज महाराष्ट्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. आज महाराष्ट्र पोलिसांच्या या कार्याला मी मनापासून सलाम करते अशी प्रतिक्रिया अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी दिली आहे. त्यामुळे अवश्य काहीतरी सत्य असावे असे मला वाटते. अर्नब गोस्वामी प्रकरणाचे राजकारण कोणीही करू नये व अर्नबला राजकारणाचा मोहरा बनवू नये. सध्याच्या परिस्थितीत अर्नब प्रकरण भाजप विरुद्ध महाराष्ट्र सरकार असे सुरू असल्याचे दिसून येते. परंतु अर्नबला सरकारने अटक केलेली नसुन कायद्याने अटक केलेली आहे ही बाब राजकीय पुढाऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. कायद्यापेक्षा देशात कोणीही मोठा नाही हे सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत अर्नब पत्रकार नसुन गुन्हेगार आहे. अर्नब यांच्यावर कारवाई केव्हाही होवो "देर आये दुरूस्त आए" असे मी समजतो. कारण महाराष्ट्र पोलिसांनी जी कारवाई केली आहे ती पुराव्यांच्या आधारेच केली असावी असे मला ठामपणे वाटते. राजकीय पुढाऱ्यांनो यादराखा मुंबई पोलीसांवर जो कोनी ताशेरे ओढेल तोही गुन्हेगार समजल्या जाईल. त्यामुळे मुंबई पोलीसांना आपले काम करू द्यावे त्यात कोणत्याही प्रकारचा राजकीय रांडा आनु नये.

अर्नब गोस्वामीच्या अटकेला राजकीय पुढारी पत्रकारितेसाठी काळा दिवस असल्याचे सांगत आहे. परंतु यात काहीच तथ्य नाही. मी तर म्हणतो की अर्नब गोस्वामीनेच पत्रकारितेची पायमल्ली केली आहे. कोणताही व्यक्ती असो तो न्यायपालीका किंवा तपास यंत्रणा नाही.या संपूर्ण गोष्टी कायद्याच्या चाकोरीतून होत असतात.भारतात प्रसारमाध्यमांना जितकं स्वतंत्र आहे तीतक स्वतंत्र जगातील कोणत्याही देशात नाही हेही तेवढेच सत्य आहे. त्यामुळे स्वतंत्र आहे म्हणून कोणी जर प्रसारमाध्यमांना किंवा पत्रकारितेला बदनाम करण्याचे काम करीत असेल तर भारतीय संविधानाचा कायदा त्याला त्याची जागा अवश्य दाखवीत असते. त्यामुळे अर्नबच्या विरोधात जी कारवाई सुरू आहे ती कायद्याच्या माध्यमातून सुरू आहे याची जाणीव राजकीय पुढाऱ्यांनी ठेवली पाहिजे. अर्नब गोस्वामी यांच्या अटकेने कार्यपालीका, विधायिका, पत्रकारिता, मिडीया या चौथास्तंभ ला कुठलाही आघात झालेला नाही असे मी समजतो.आज मीडिया व वृत्तपत्रांमुळेच देशातील व जगातील घडामोडी आणि हालचाली कळुन येतात.यामुळेच याला चौथा स्तंभ म्हणतात. त्यामुळे मीडियाला व वृत्तपत्र समूहाला मी सलाम करतो.

-रमेश कृष्णराव लांजेवार

नागपूर,

मो.नं.९३२५१०५७७९

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget