Halloween Costume ideas 2015

आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण प्रत्येकाने घेणे गरजेचे : डॉ. सलीम खान

आयडीएल रिलीफ वर्कचे प्रशिक्षण शिबीर

कनवाड (अशफाक पठाण)
आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना सामोरे जायचे असेल तर प्रशिक्षित स्वयंसेवकच यात महत्त्वाची भूमिका बजावून जीवित व वित्त हानी रोखू शकतात. आयडीएल रिलीफ वर्कने पूरग्रस्त भागात प्रशिक्षण शिबीर घेऊन स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला. त्यांना घटनास्थळाचे अनुभव घेता आल्याचे प्रतिपादन डॉ. सलीम खान यांनी केले.
    कोल्हापूर जिल्ह्यातील कुनवाड येथे 29 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत आयडिएल रिलीफ वर्क आणि जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानेे प्रशिक्षण शिबीर पार पडले. समारोप कार्यक्रमात डॉ. खान बोलत होते. मंचावर आयडिएलचे सचिव मजहर फारूक, जिल्हा आपत्तीनिवारण अधिकारी प्रसाद शंकपाळ, युथविंगचे राज्य संयोजक इम्रान खान, सरपंच बाबासाहेब आरसगोंडा उपस्थित होते. यावेळी शिबीराचा प्रारंभ कुरआन पठणाने झाला. तीन दिवस चाललेल्या प्रशिक्षणात विविध मार्गदर्शकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी कशा बांधतात व त्यांचा आपत्तीच्या वेळी कसा उपयोग केला जातो? आपत्तीत जखमी झालेल्या लोकांना बँडेज कशा बांधाव्या? ऐन वेळेस स्ट्रेचर कसे बनवावे, याचेे प्रात्यक्षिक करवून घेतले. जखमींवर प्रथमोपचार कसा करावा, यासंबंधी सीपीआरच्या प्रशिक्षकांनी कृत्रिम शरिरावर प्रात्यक्षिक करून दाखविले. आपत्तीग्रस्त घरातून जखमींना कशा पद्धतीने बाहेर काढून सुरक्षित स्थळी कसे हलवावे? तसेच समुह व्यवस्थापना अंतर्गत कार्यकर्त्यांना छोटे-छोटे गट कसे तयार करावेत व त्या समुहांचा कसा उपयोग करावा? याचे प्रशिक्षण दिले. पूरसदृश्य -(उर्वरित पान 8 वर)
परिस्थितीत मदतीसाठी छोट्या-छोट्या होड्या कशा बनवाव्यात? हे दाखविले. कृष्णा नदीमध्ये मोटर आणि पॅडल बोट चालविण्याची कला शिकविली. ऐनवेळी आजूबाजूला उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून पाण्यामध्ये बुडत असलेल्या लोकांना कसे वाचविता येईल, याच्या युक्त्याही सांगितल्या. तसेच सापांच्या विविध प्रजातींबद्दल माहिती देण्यात आली. शेवटच्या सत्रामध्ये आपत्ती निवारण कोल्हापूर आणि आयडीएल रिलीफ विंग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. परीक्षा आणि स्पर्धेमध्ये उत्तीर्ण होणार्‍या कार्यकर्त्यांना बक्षीसेही प्रदान करण्यात आली. कुनवाड गावाचे सरपंच बाबासाहेब आरसगोंडा यांनी या कार्यशाळेत केलेल्या सर्व कामांचे कौतूक केले. मजहर फारूख यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली व त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे, याबद्दलही शेवटच्या सत्रात सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच रऊफ पटेल, अल्ताफ मुल्ला आणि सागर सर यांनी कार्यकर्त्यांना मोलाचे प्रशिक्षण दिले. कार्यशाळेचे व्यवस्थापन अमोल बिरादार, शहराध्यक्ष एसआयओ कोल्हापूर अशफाक पठाण यांनी पाहिले. यावेळी महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून 51 कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.
    तीन दिवस चाललेल्या प्रशिक्षणात विविध मार्गदर्शकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले. तसेच प्रात्यक्षिके करून घेतल्याने प्रशिक्षणार्थ्यांत उत्साह दिसून आला.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget