Halloween Costume ideas 2015

आधुनिक तंत्रज्ञान आणि भूतकाळातील सोनेरी क्षण

दुर्दैवाने आजकाल मुलांमध्ये मैदानी खेळामधील रस संपत चाललेला आहे, जो कधीकाळी तरूणांना वेड लावणारा होता. आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहे की, उन्हाळ्याच्या  सुट्टीमध्ये मैदानात आणि गल्लोगल्ली मुलं आपापली गट करून प्रत्येक खेळ खेळत होती. ज्यामुळे त्यांचे शरीर सुदृढ राहत होते. निर्विवादपणे खेळण्याची ती संधी अल्लाह सुबहानहू तआला ने त्यांना दिलेली होती. कबड्डी, क्रिकेट, खो-खो, व्हॉलीबॉल इत्यादी खेळांतून मुलांची आरोग्यदायी वाढ होत होती. हे सर्व खेळप्रकार आता मागे पडलेले असून, तंत्रज्ञानावर  आधारित मोबाईल गेमवर येऊन तरूण पिढी विसावली आहे. या खेळाने खरे पाहता मुलांचं लहानपण हिरावून घेतलेले आहे. आपल्या छोट्याश्या वयामध्ये ते एकटे पडलेले आहेत. त्यांचे  मित्र तुटलेले आहेत. प्रत्येकजण स्वतंत्र राहू इच्छितो.
आता मुलं एकत्रित खेळ खेळत नाहीत की, खळखळून हसत नाहीत. मस्तीसुद्धा करीत नाहीत. आजकाल बुद्धीबळ, कॅरम, लुडो आणि सापशिडी सारखे खेळही त्यांना आवडेनासे झालेले  आहेत. मित्रांबरोबर गप्पा मारण्यातही त्यांना रस उरलेला नाही. आज मुलं पूर्णपणे एकांतात रमतात. त्यांचा सारखा शोध सुरू असतो कधी आणि कुठे त्यांना एखादा रिकामा कोपरा  मिळेल आणि ते तिथे निवांत बसून आपल्या प्रिय मित्र म्हणजेच स्मार्टफोनमध्ये मग्न होऊन जातील.
असेही ऐकण्यात आले आहे की, दज्जाल एका डोळ्यांनी आंधळा असेल आणि लोकांना पथभ्रष्ट करेल. लक्षपूर्वक पाहता मोबाईल फोनलाही एकच डोळा (कॅमेरा) असतो. या मोबाईल फोनमध्ये लहान, मोठे, स्त्री, पुरूष सर्वच एवढे गुंग होत आहेत की, त्यात त्यांचे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे आरोग्य उध्वस्त होत आहे, हे ही त्यांना कळेनासे झाले आहे.  इतपत या फोनचा वापर वाढलेला आहे. मोबाईल फोन कधीचाच मैदानी खेळांचा पर्याय म्हणून लोकांच्या जीवनात आलेला आहे. एका अंदाजाप्रमाणे 50 ट्न्नयापेक्षा जास्त लोक या  फोनच्या मायाजालात अडकलेले आहेत.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी एकदा एक अंगठी बनविली आणि आपल्या बोटात घातली व फर्माविले की, ’ इसने आज मेरी तवज्जोह तुम्हारी तरफ से हटा दी है, एक नजर इसे देखता  हूं और एक नजर तुम्हे’ आणि त्यानंतर प्रेषित सल्ल. यांनी ती अंगठी काढून टाकली. (संदर्भ : नसाई 5301).
यावरून स्पष्ट होते की, प्रेषित सल्ल. यांना अंगठी बोटात घातल्यावर त्यांचे लक्ष वारंवार त्या अंगठीकडे जात होते. प्रेषित जेव्हा आपल्या सोबत्यांसोबत बसले असले तरी त्यांचे लक्ष  बोटाकडेच जात होते. आपल्यामध्ये होत असलेला हा बदल त्यांनी तात्काळ अनुभवला. त्यांच्या लक्षात आले की, आपले लक्ष या अंगठीमुळे विचलित होत आहे. आपल्या महान  उद्देशापासून ही अंगठी काही प्रमाणात का होईना आपल्याला दूर घेऊन जात आहे. म्हणून तात्काळ त्यांनी ती अंगी काढून टाकली.
ज्याप्रमाणे आज लोकांनी स्वतःला मोबाईल फोनशी जोडून घेतलेले आहे. हे मोबाईल तर इतके लक्षवेधी आहे की, पाहणाऱ्याचे नुसते लक्षच विचलित होत नसून, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही त्याचा विपरित परिणाम होत आहे. आपल्या महान प्रेषितांच्या या कृतीचा गांभीर्याने विचार करून आपण निर्णय घेतला पाहिजे की, मोबाईल फोनमध्ये एवढा  जीव गुंतविणे योग्य नाही. जो की तुम्हाला तुमच्या आप्तस्वकीयांपासून सुद्धा दूर घेउन जात आहे. मुलांमध्ये खोटे बोलण्याची सवय, खोट्या सबबी सांगण्याची सवय ही केवळ मोबाईलफोनमुळे वाढत आहे. मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या इंटरनेटवर ते काय- काय पाहत असतील, कोणत्या गोष्टी आणि गीत ऐकत असतील, कोणते फोटो पाहत असतील, हे  त्यांचे त्यांनाच माहित. एवढे मात्र नक्की की मोबाईलवर पाहिल्या जाणाऱ्या सामुग्रीमुळे मुलं वाममार्गाकडे वेगाने जात आहेत. आज इंटरनेट हेच लहान मुलांपासून त्यांचे बालपण हिसकावून घेत आहे आणि तारूण्यामध्ये प्रवेश करणाऱ्या मुलां-मुलींना वाममार्गाला लावत आहेत. मुलां-मुलींना फॅशनच्या नावाखाली अर्धनग्नतेला प्रोत्साहित करत आहेत. त्यामुळे नवीन  पिढी निर्लज्जपणे वागत आहे.
मोबाईलने आज नवीन पिढीच्या त्या सर्व गोड आठवणी हिरावून घेतल्या आहेत. ज्याचा अनुभव मागच्या पिढीने काही वर्षापूर्वीच घेतला होता. किती चांगले झाले असते जर आपण व आपल्या मुलांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर नमूद हदीसचा विचार करून मोबाईल फोनचा चुकीच्या वापर करून आपण स्वतःला रोखू शकलो असतो. मोबाईलशी एवढे प्रेम करू  नये की, ज्यामुळे आपण आपले आरोग्य, मित्र, शिष्टाचार, संस्कृती, आणि धार्मिक आचरणापासून दूर होऊन जावू.

- फेरोजा तस्बीह
मिरजोळी, 9764210789

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget