Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१९) ...त्यांच्याशी चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करा, जर त्या तुम्हाला नापसंत असतील तर शक्य आहे की एखादी गोष्ट तुम्हाला पसंत नसेल परंतु अल्लाहने त्यांच्यातच बरेचसे भले  ठेवले असेल.३०
(२०) आणि जर तुम्ही एका पत्नीच्या जागी दुसरी पत्नी आणण्याचा इरादाच केला असेल तर तुम्ही जरी तिला ढीगभर संपत्ती दिली असली तरी त्यातील किंचितही परत घेऊ नका. मग काय तुम्ही तिच्यावर आळ घेऊन आणि उघड अन्याय करून तो माल परत घ्याल?
(२१) तुम्ही ते कसे घ्याल जेव्हा तुम्ही एक दुसऱ्यापासून सुखोपभोग घेतला आहे आणि त्यांनी तुमच्याकडून दृढ वचन घेतले आहे?३१
(२२) आणि ज्या स्त्रीयांशी तुमच्या वडिलांनी विवाह केला असेल त्यांच्याशी कदापि विवाह करू नका, परंतु जे पूर्वी घडले ते घडले.३२ खरे पाहता ही एक निर्लज्जपणाची कृती आहे,  अप्रिय आहे व वाईट रूढी आहे.३३
(२३) तुमच्यासाठी निषिद्ध केल्या गेल्या आहेत तुमच्या माता,३४....



३०) स्त्री जर सुंदर नसेल आणि तिच्यात एखादी अशी उणिव असेल ज्यामुळे ती पतीला पसंत पडत नसेल. अशावेळी हे उचित नाही की पतीने खिन्नावस्थेत तिला त्वरित सोडचिट्ठी  देण्यास तयार व्हावे. पतीला शक्यतो धैर्याने काम घेतले पाहिजे. कधी कधी असे घडते की एक स्त्री सुंदर नसते परंतु तिच्यात दुसरे गुण असे असतात जे दांपत्य जीवनात सुंदरतेहून  जास्त महत्त्वाचे असतात. तिला जर तिच्या या गुणांना प्रकट करण्याची संधी प्राप्त् झाली तर तिच्या कुरूपतेमुळे घृणा करणारा तिचा पती तिच्या सतचरीत्राने व आचरणाने तिच्याकडे संमोहित होतो. याचप्रकारे कधी कधी दांपत्य जीवनाच्या आरंभी पत्नीच्या काही गोष्टी पतीला आवडत नाही म्हणून तो तिच्याशी नाराज होतो. परंतु पतीने धैर्य दाखविले व संयम  राखला आणि पत्नीच्या सर्व गुणांना प्रकट होण्याची संधी दिली तर त्याला कळून चुकते की पत्नी जवळ वाईटापेक्षा चांगल्या गोष्टी अधिक प्रमाणात आहेत. म्हणून हे अगदी अप्रिय  आहे की दांपत्य जीवनसंबंधांना मनुष्याने तडकाफडकी तोडावे. तलाक तर शेवटचे टोक आहे ज्याला फक्त निरूपाय स्थितीतच उपयोगात आणले जाऊ शकते. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे  कथन आहे, `तलाक जरी वैध आहे तरी सर्व वैध कामात अल्लाहला सर्वात नापसंत जर एखादी गोष्ट असेल तर ती तलाक आहे.''
३१) `दृढ वचन' म्हणजे लग्न (निकाह) आहे कारण हे खरोखरीच दृढ वचनबद्धता आहे आणि याच दृढतेवर विश्वास ठेवून एक स्त्री आपल्या स्वत:ला पुरुषाच्या स्वाधीन करते. पुरुष जर  आपल्या इच्छिने त्याला (दृढ बंधनाला) तोडत आहे तर करार करते वेळीचा मोबदला (मेहर इ.) परत घेण्याचा हक्क नाही. (पाहा, सूरह २, टीप २५१)
३२) याचा अर्थ असा नाही की अज्ञानकाळात ज्यांनी आपल्या सावत्र आईशी लग्न केले होते तो हा आदेश आल्यानंतरसुद्धा आपली पत्नी बनवून ठेवू शकतो आणि लग्न बंधनातच राहू  शकतात. तर अर्थ हा आहे की त्यांच्यापासून जन्माला आलेली मुले हरामी (अवैध) आता हा आदेश आल्याने समजली जाणार नाहीत आणि वडीलांच्या संपत्तीत त्यांना हक्क मिळेल.  संस्कृती आणि सामाजिक विषयात अज्ञानकाळातील वाईट प्रथांना हराम (अवैध) जाहीर करताना सर्वसाधारणत: कुरआन म्हणतो, ``जे झाले ते झाले.'' याचे दोन अर्थ आहेत म्हणजे  अज्ञानकाळात ज्या चुका आणि अपराध तुमच्या हातून घडलेत त्याची पकड होणार नाही. अट ही आहे की आता आदेश आल्यानंतर मात्र आपल्या वर्तनामध्ये सुधार करावा आणि  चूकीचा मार्ग सोडा व वाईटांपासून दूर राहा. दुसरा अर्थ म्हणजे गतकाळातील एखाद्या पद्धतीला हराम (अवैध) ठरविले गेले तर त्याने असे तात्पर्य काढणे योग्य नाही की गतकाळातील  नियम व चालीरीतीनुसार जी कामे पूर्वी केली गेली त्यांना समाप्त् आणि त्यांच्या परिणामांना अयोग्य आणि जबाबदाऱ्यांना अनिवार्यरूपाने समाप्त् करण्यात येत आहे.
३३) इस्लामी कायद्यात हा गुन्हा शिक्षा पात्र आहे. अबू दाऊद, नसई आणि मुसनद अहमद यांचे हदीस कथन आहेत की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी हे अपराध करणाऱ्यांना मृत्यूदंड  आणि संपत्ती जप्त् करण्याची शिक्षा दिली. इब्ने माजाने इब्ने अब्बास (रजि.) यांचे हदीसकथन (रिवायत) आहे, त्याद्वारे माहीत होते की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मूलभूत नियम  सांगितला होता, ``जो मनुष्य महरम (ज्याच्यांशी विवाह होऊ शकत नाही) स्त्रीयांशी व्यभिचार (ज़िना) करतो त्याला ठार मारले जावे.'' फिकाह शास्त्रींच्या मतांत या विषयी भिन्नता  आहे. इमाम अहमद तर याच गोष्टींचे समर्थक आहेत की अशा माणसाला ठार केले जावे आणि त्याची संपत्ती जप्त केली जावी (इतर तीन्ही इमामांजवळ अशा माणसावर ज़िना  (व्यभिचार) ची शिक्षा लागू होईल.)
३४) माता (आई) म्हणजे सख्खी आणि सावत्र दोन्ही आहेत. म्हणून दोन्ही हराम (अवैध) आहेत. याच आदेशात वडिलांची आई आणि आईची आईचासुद्धा समावेश होतो. याविषयी  धर्मविद्वानात मतभेद आहेत की ज्या स्त्रीशी वडिलांचा शारीरिक संबंध आला किंवा तिला त्याने (कामातुरतेने स्पर्श केला असेल) ती स्त्रीसुद्धा मुलासाठी हराम (अवैध) आहे किंवा नाही.  याचप्रमाणे पूर्वीच्या इस्लामी विद्वानांत यातसुद्धा मतभेद आहेत की ज्या स्त्रीशी मुलाचा अवैध संबंध आला ती स्त्री वडिलांसाठी हराम आहे किंवा नाही. ज्या पुरुषाशी आई किंवा मुलीचा  अवैध संबंध राहिला किंवा नंतर झाला तर त्याच्याशी आई आणि मुलीचा निकाह (लग्न) दोन्हीसाठी हराम आहे किंवा नाही. परंतु वास्तविकता ही आहे की अल्लाहच्या शरीयतीचा  स्वभाव या मामल्यांमध्ये कीस काढण्याविरुद्ध आहे. ज्यांच्यासाठी लग्न आणि अलग्न (गैरनिकाह) आणि लग्नापूर्वी आणि लग्नानंतर तसेच स्पर्श करण्यात आणि पाहण्यात अंतर (भेद) केला जातो. स्पष्ट आहे की एकाच कुटुंबात एकाच स्त्रीशी वडील आणि पुत्राचे किंवा एका पुरुषाबरोबर आई आणि मुलीचे कामभावना स्थापित होणे मोठमोठ्या अपराधांचे कारण बनते. शरीयत यांना कदापि सहन करीत नाही. (जसे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या अनेक कथनांवरुन स्पष्ट होते)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget