भारतीय माध्यमांवर आजकाल गुजरातचे वर्चस्व आहे. देशाच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घरासमोर एका बेवारस गाडीमध्ये काही विस्फोटक सामग्री ठेवलेली नुकतीच आढळली होती. नंतर माहित झाले की ही गाडी हिरेन मनसुख या दुसऱ्या गुजराती व्यक्तीच्या नावावर होती. हिरेन मन्सुखचे नाव ऐकल्यावर कित्येक लोकांना हिरेन पंड्याचे नाव लक्षात आले असेल. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना ते गुजरात राज्याचे गृहमंत्री होते.
त्यांनी मोदींच्या विरूद्ध तोंड उघडण्याचे प्रयत्न केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते फिरायला निघाले असता त्यांची हत्या झाली. ज्या कथित मुस्लिम आतंकवादींनी त्यांची हत्या केली त्यांना गुजरातमध्ये बाबु बजरंगी सारखी उघड-उघड हत्या आणि हिसेंचा गर्व करणारी व्यक्ती का मिळाली नसेल? हिरेन पंड्या यांच्या वडिलांनी मोदीजींच्या बरोबर व्यासपीठावर बसण्यास नकार दिला होता, हे विसरून चालणार नाही.
हिरेन पंड्या सारखेच हिरेन मनसुख यांचा मृतदेह देखील संशयास्पद स्थितीत आढळला होता. आपल्या हत्येपूर्वी मनसुख हिरेन यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री समवेतच मुंबई आणि ठाणेच्या पोलीस आयुक्तांकडे काही लोक त्यांना भीती दाखवत असल्याने आपल्या सुरक्षेची मागणी केली होती. आपल्या पत्रात त्यांनी तीन व्यक्तींकडे बोट दाखवले होते. त्यातील एक सचिन वाझे दूसरे पोलीस सहआयुक्त आणि तिसरे मिड डे या मुंबईतल्या इंग्रजी दैनिकाचे पत्रकार फैजान खान यांचे नाव होते. न्यूज लॉन्ड्रीच्या बातमीनुसार 17 फेब्रुवारी रोजी ते मुंबईसाठी निघाले असता त्यांच्या गाडीत बिघाड झाला म्हणून त्यांनी ती गाडी नायरपुलाजवळ सोडून दिली. पण जेव्हा 18 फेब्रुवारीला ती गाडी परत घेण्यासाठी ते तिथे आल्यावर त्यांची गाडी बेपत्ता झाली होती. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पण कोणतीच कार्यवाही करण्यात आली नव्हती. 25 फेब्रुवारी रोजी ती गाडी मुकेश अंबानी यांच्या ’अॅन्टेलिया’ बंगल्यासमोर आढळली आणि त्यात काही विस्फोटकही आढळली. तेव्हापासूनच पोलिसांकडून त्यांना भीती दाखविण्याची सुरूवात झाली आणि पुढे जावून माध्यमे देखील यामध्ये सामील झाली. 4 मार्च रोजी रात्री तेे कोणा पोलीस अधिकाऱ्यांशी भेटायला गेले पण परत घरी पोहोचलाच नाही. 5 मार्चला त्यांच्या हिरेन मनसुख यांच्या पुत्राने ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली. पण त्याच दिवशी संध्याकाळी हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदरला आढळला. या प्रकरणाला महत्त्वाचे वळण लागले ते हिरेनच्या पत्नीने नोंदविलेल्या एफआयआरमुळे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, ती गाडी पीटर न्यूटन या व्यक्तीच्या नावावर 2016 पासून होती आणि गेल्या वर्षी नोव्हेंबर ते 5 फेब्रुवारीपर्यंत ती गाडी सचिन वाझे यांच्याकडे होती. अशा प्रकारे या गाडीशी सचिन वाझे यांचा संबंध जुळला. हिरेनच्या पत्नी विमला यांनी सांगितले की, 27, 28 फेब्रुवारी आणि 2 मार्चला त्यांचे पती वाझे यांच्याबरोबर होते. विमल यांच्या म्हणण्यानुसार सचिन वाझे यांनी हिरेन याला वचन दिले होते की तो जर अटक व्हायला तयार झाला तर 2-4 दिवसात त्यांना सोडविण्यात येईल. विमल यांनी आपल्या वकीलाला अटकपूर्व जामीना विषयी विचारले असता वकीलाने असे म्हटले होते की, त्यांचे पती आरोपी नसल्याने त्यांना जामीन मिळणार नाही. 4 मार्च रोजी हिरेन गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांशी भेटायला गेले आणि दुसऱ्या दिवशी त्याचां मृतदेह आढळला. विमल यांनी पोलिसांना सांगितले होते की, त्यांच्या पतीला पोहायला येत होते म्हणून ते पाण्यात बुडू शकत नाही. हिरेन यांचा पर्स, मोबाईल आणि गळ्यातली चेन मिळाली नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांना ही शंका येते की त्यांच्या पतीची हत्या झालेली असावी.
विमल यांच्या या जबाबीने महाराष्ट्राच्या विधानसभेत बजेट सेशन चालू असताना विपक्षाला जणू एक सुवर्ण संधीच मिळाली. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका तासापूर्वीच या सभेत सरकारवर या प्रकरणाद्वारे हल्ला केलेलाच होता. त्यांनी हिरेन आणि वाझे यांच्यातील संबंध आणि संबंधीत हद्दीतील पोलिसांपूर्वी सचिन वाझे हे कसे घटनास्थळावर पोहोचले यावर आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, मनसुख यांचे हात बांधलेले होते. अशा प्रकारे कोणी आत्महत्या करत नसतो. फडणविसांनी विमल यांचे पत्र विधानसभेत वाचून दाखविले. वाझे यांच्यावर हत्या करून मृतदेह खाडीत टाकून देण्याचा आरोप लावला.
या देशात कुणाची संशयास्पद हत्या व्हावी आणि कुठे स्फोट घडला तर त्यात मुस्लिमांची चर्चा होवू नये असे होत नाही. या प्रकरणात जैशुल हिन्द नावाच्या एका संघटनेचा उल्लेख झालाच. त्या गाडीत एक पत्र सापडले. यात लिहिले होते की नीता भाभी आणि मुकेश भैय्या हे तर फक्त एक ट्रेलर आहे. पुढच्या वेळी संबंध सामग्री तुमच्याकडे पोहोचेल. गंमतीची गोष्ट अशी की ज्या बॅगमध्ये हे पत्र सापडले त्या बॅगेवर मुकेश अंबानी यांच्या आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचे नाव होते. दुसऱ्या दिवशी जैशुल हिन्द याने मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळणाऱ्या गाडीशी आपला कसलाच संबंध नसल्याचे जाहीर केले. दुसरी गंमतीची गोष्ट अशी की जरी या गाडीत ठेवलेल्या जेलेटिन कांड्या नागपूरच्या एका कंपनीत बनविल्या असताना कुणाचे लक्ष संघाकडे गेले नाही. गांधीजींच्या हत्येनंतर हे संघ अंहिसेचे पालन करत आले आहे. कोणत्याही हिंसक घटनेशी त्यांचा संबंध नसतो. कपिल शर्मांनी जगजाहीर धमकी दिली तरी त्यास अटक करण्याची कुणालाच हिंमत झाली नाही. कारण त्यांना आपली कामगीरी दाखविण्यासाठी निर्दोष मुस्लिम आणि त्यांना साथ देणाऱ्या प्रामाणिक हिंदूंची कमतरता आहे कोठे?
30 जानेवारी 2021 अगोदर जैशुल हिंदचे नाव कुणीही ऐकले नव्हते. पण दिल्ली येथील इस्त्राईल वकिलात समोर झालेल्या विस्फोटामुळे त्या संघटनेचे साऱ्या माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वळवले. मॅसेजिंग अॅप टेलिग्रामद्वारे त्या संघटनेचे त्या विस्फोटाशी संबंध असल्याचे उघड झाले. त्यात असे म्हटले गेले होते की, ही घटना पुढील विस्फोटांच्या मालिकेची सुरूवात आहे. त्यावेळी शेतकऱ्यांचे आंदोलन जोरात होते म्हणून समजूतदार व्यक्तींनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांना कळून चुकले होते की, शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडून लक्ष इतरत्र विचलित करण्यासाठीची ही सोय होती. तालिबान आणि आयएसआयचे नावही गोवण्यात आले. भारत सरकारने इस्त्राईलला अचुक सुरक्षा प्रदान करण्याचे वचन दिले. याद्वारे इस्त्राईलला खुश करण्याची नामी संधीही भारताच्या सत्ताधाऱ्यांना मिळाली. पुढे जावून मुंबई पोलिसांनी जाहीर केले की त्यांच्याकडे जैशुल हिंद नावाच्या कोणत्याही संघटनेची माहिती नाही. आता या प्रकरणात नवीन वळण आले आहे. गुप्तचर संस्थांचे असे म्हणणे आहे की, जैशुल हिंद याने ही योजना दिल्लीतील तिहाड जेलमध्ये बसून टेलीग्राम चैनलद्वारे बनविली होती. गुप्तचर संस्थांच्या म्हणण्यानुसार तिहाड जेलमधील तीन चार कैद्यावर पाळत ठेवली जात आहे. आता या प्रकरणात इंडियन मुजाहीदीनच्या तसनीम यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, देशाच्या सर्वात मोठ्या जेलमध्ये बसून असे षडयंत्र रचले जात आहेत. ज्या जेलमधील रौनी विल्सन यांच्या संगणकात वायरसद्वारे त्यांना अडकवले जात आहे. त्या जेलमधील एखाद्या कैद्याच्या मोबाईलद्वारे एक गट बनवणे कोणते अवघड काम आहे. हे सगळं कारस्थान मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी तर नव्हे ना? आश्चर्य या गोष्टीचे आहे की, मुंबईत भाजपावाले पोलिसांवर वाझेला वाचविण्याचा आरोप लावत आहेत. त्याच सचिन वाझे यांना केंद्रीय गुप्तचर संस्था तिहाड जेलमध्ये पाठवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशा परिस्थितीत हिरेन मनसुख यांच्या पत्नीला न्याय कसा मिळणार?
- डॉ. सलीम खान
Post a Comment