Halloween Costume ideas 2015

सूरह इब्रहिम : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(२७) श्रद्धावंतांना अल्लाह एका दृढ वचनाच्या आधारावर या जगातील जीवन व परलोक जीवन दोन्हींमध्ये स्थैर्य प्रदान करतो३९ आणि अत्याचाऱ्यांना अल्लाह पथभ्रष्ट करतो,४० अल्लाहला अधिकार आहे जे हवे ते करतो. (२८) तुम्ही पाहिले त्या लोकांना ज्यांना अल्लाहची देणगी लाभली आणि तिला त्यांनी कृतघ्नतेने बदलून टाकले (आणि आपल्यासोबत) आपल्या लोकसमूहालासुद्धा विनाशाच्या खाईत झोकून दिले. 

(२९) अर्थात नरक ज्यात ते होरपळले जातील आणि ते अत्यंत वाईट ठिकाण आहे. 

(३०) आणि अल्लाहचे काही समकक्ष (दावेदार) तजवीज केले आहे की, त्यांना अल्लाहच्या मार्गापासून पथभ्रष्ट करावे. यांना सांगा, बरे तर, मौज करा, सरतेशेवटी तुम्हाला परत नरकातच जावयाचे आहे. 

(३१) हे पैगंबर (स.), माझ्या ज्या दासांनी श्रद्धा ठेवली आहे त्यांना सांगा की नमाज कायम करावी आणि जे काही आम्ही त्यांना दिले आहे त्याच्यातून जाहीर आणि गुप्तपणे (सन्मार्गात) खर्च करावे४१ तो दिवस येण्यापूर्वी ज्यात खरेदी-विक्रीही होणार नाही आणि मित्रत्वाचा व्यवहारही होणार नाही.४२ 

(३२) अल्लाह तोच तर आहे४३ ज्याने पृथ्वी व आकाशांना निर्माण केले आणि आकाशातून जल वर्षाव केला मग त्याच्याद्वारे तुम्हाला उपजीविका उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकारची फळे निर्माण केली. ज्याने नावेला तुमच्यासाठी अंकीत केले की समुद्रात त्याच्या आज्ञेने चालावे आणि नद्यांना तुमच्यासाठी वशीभूत केले.


३९) म्हणजे जगात या वचनामुळे एक सदृढ दृष्टिकोन, एक मजबूत चिंतन व्यवस्था आणि एक सर्वव्यापी सिद्धान्त प्राप्त् होते. जीवनाचा प्रत्येक पेच आणि समस्या सोडविण्यासाठी गुरुकिल्लीची योग्यता या वचनाला प्राप्त् आहे. आचरणाची दृढता आणि चारित्र्याची पावनता प्राप्त् आहे ज्यांना परिस्थितजन्य संकटे डगमगवू शकत नाहीत. यामुळे जीवनाचे ठोस नियम मिळतात ज्याने एकीकडे आत्मशांती आणि बुद्धीसामर्थ्य प्राप्त् होते तर दुसरीकडे त्यांना आचरणांच्या मैदानात आणि मार्गात भटकण्यासाठी, ठोकरा खाण्यासाठी आणि स्वभावचंचलतेचा शिकारी होऊ देत नाही. जेव्हा ते मृत्यू-सीमा पार करून परलोक जीवनात पदार्पण करतात तेव्हा तेथे कोणत्याही प्रकारचे कष्ट होत नाहीत. तेथे सर्वकाही त्यांच्या आशानुरुप घडते. परलोक जीवनात अशाप्रकारे प्रवेश करतात जणुकाही या मार्गाला आणि जीवनाला ते पूर्वीपासूनच ओळखत होते. अनोळखीशी घटना पुढे येत नाही कारण त्याच्यासाठी त्यांनी पूर्वीच तयारी केलेली होती. म्हणून तेथे प्रत्येक स्थानापासून ते आत्मविश्वासपूर्वक प्रस्थान करतात. यांची स्थिती येथे अवज्ञाकारींपेक्षा अगदी वेगळी असते. अवज्ञाकारींना तर मृत्युनंतर त्वरित एका विपरीत स्थितीला अचानक तोंड द्यावे लागते.

४०) म्हणजे अत्याचारी मनुष्य पवित्र महावचनाला (कलमा तय्यबा) सोडून एखाद्या अपवित्र वचनाचे पालन  करतो  तर  अल्लाह  त्याची  बुद्धी  विचलीत  करतो  आणि  प्रयत्न  निष्फळ  ठरवितो. ते  कशा प्रकारेही चिंतन आणि व्यवहाराचा सत्यमार्ग प्राप्त् करू शकत नाही आणि त्यांचा नेम कधीही निशाण्यावर लागत नाही.

४१) म्हणजे ईमानधारकांची पद्धत अवज्ञाकारींच्या पद्धतीपेक्षा अगदी वेगळी असते. अवज्ञाकारी तर कृतघ्न असतात. ईमानधारकांना कृतज्ञ होणे आवश्यक आहे आणि या कृतज्ञतेचे व्यावहारिक रुप म्हणजे नमाज स्थापित करणे आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करणे आहे.

४२) म्हणजे तिथे काही देवाणघेवाण करून मुक्ती विकत घेतली जाऊ शकणार नाही. तसेच कोणाची मैत्रीसुद्धा कामी येणार नाही. आणि तो मित्र तुम्हाला अल्लाहच्या पकडीपासून वाचवू शकणार नाही.

४३) म्हणजे त्याच अल्लाहच्या देणग्यांप्रती कृतघ्नता दाखविली जात आहे. ज्याच्या भक्ती व आज्ञापालनापासून पळ काढला जात आहे आणि अल्लाहबरोबर जबरदस्तीने दुसऱ्याला भागीदार ठरविले जात आहेत. तोच तर अल्लाह आहे ज्याचे असे असे अगणित उपकार आहेत.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget