Halloween Costume ideas 2015

प्रेषित मुहम्मद (सल्ल.) आणि स्त्रिया


1443 वर्षाआधीच इस्लाममध्ये स्त्रीला पुरूषांचा समान दर्जा दिला व जेंडर इ्निवलिटी (लिंग समानता)ची शिकवण दिली. इस्लामने स्त्रीला जगण्याचा अधिकार दिला. मुलांसारखे तिचेही संगोपन करण्याचे निर्देश दिले. कारण समाजामध्ये मुलांचे संगोपन जेवढ्या काळजीने केले जाते तेवढे मुलीचे केले जात नाही. ही तफावत इस्लामला मान्य नाही.

ती खूप आनंदात होती. तिला बाबांसोबत बाहेर जायचे होते ना. आईने तिला छान तयार केले होते. बाबांचा हात धरून बाहेर पडताना तिला व तिच्या आईला कल्पनाही नव्हती की पुढे काय होणार? कदाचित थोडाही संशय आला असता तर तिच्या आईने तिला बाबांसोबत जावू दिले नसते. बाबांसोबत चालता-चालता ती एका सुनसान रानात आली होती. तेथे बाबांनी माती खणायला सुरुवात केली. ते खणत असताना जी माती बाबांच्या कपड्यांवर, तोंडवर लागत होती ते तिला बघवत नव्हते. आपल्या लहानशा हातांनी ती बाबांच्या अंगावरची माती झटकत, तोंडावर लागलेली माती आपल्या चिमुकल्या हातांनी साफ करत. हे करत असताना तिचे प्रश्न चालू होते की बाबा आपण कोठे आलो आहोत ? आपल्याला तर फिरायला जायचे होते ना? ही मध्येच आपण काय काम काढलात? बाबा ! हा खड्डा कशासाठी? बाबा लवकर चला ना कधी जायचंय? पण बाबा काही न सांगता आपल्या कामातच मग्न होते. खड्डा पूर्ण करून झाल्यावर त्यांनी त्या चिमुकलीला खड्ड्याच्या कडेला उभी करून त्यात तिला ढकलून दिले. ती ओरडत होती परंतु, बाबा तिच्या अंगावर सरसर माती टाकत होता, ती रडत होती, ओरडत होती बाबा हे काय करता, मला वाचवा ना!  बाबा असे करू नका म्हणत तिने आपले प्राण सोडले. अशा सत्य घटना प्रेषित सल्ल. जगात येण्याच्या पूर्वी सतत होत असत. 

स्वतःच्या मुलीला खड्डा खणून जिवंत पुरणे किती ही क्रूरता? त्या माणसाला दया नाही का आली? एवढे निर्दयी कसे होऊ शकते कोणी? ही सत्य घटना त्या इसमाने येऊन प्रेषित मुहम्मद  सल्ल. यांना सांगितली. तेव्हा प्रेषित मुहम्मद सलम् यांच्या डोळ्यांत अश्रू आले. आपल्यालाही डोळ्यांत आले असेल अश्रू नसेल आले तर आणण्याचा प्रयत्न करा, तरी येत नसतील तर रडल्यासारखा चेहरा करून आपले संवेदनशीलतेचे पुरावा द्या, स्त्री जातीसाठी. स्त्रीची अवस्था संपूर्ण जगात होती तीच अरब देशात होती. काही कबिले आपल्या मुलींना जिवंत पुरून टाकायचे तर काही प्रसूतीच्या वेळेस एक खड्डा तयार ठेवायचे. मुलगी जन्मल्याबरोबरच तिला पुरून टाकायचे.  आज मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे खंडा खाण्याची गरज नाही नऊ महिने वाट पहायची सुद्धा गरज नाही. चौथा महिना झाला की तपासणी करून स्त्री भ्रून हत्या करण्यात येते.  यावर कायदेशीर प्रतिबंध असले तरी हे कुकर्म थांबत नाही. केवळ आपल्या भारतातच दरवर्षी पाच लाख स्त्रीभ्रूण हत्या होतात आणि जगात याबाबतीत भारत सर्वप्रथम येतो. लग्नाच्यावेळी भली मोठी भीक (हुंडापद्धती) मुळे लोक लेकीला ओझे समजतात व या जगात येण्याचा त्यांचा अधिकार देत नाहीत. भारताच्या मागे चीन आणि पाकिस्तान चा नंबर येतो. भारतातही आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. त्यातही परळी वैजनाथ ते गर्भपात केंद्राचे गाव म्हणून कुख्यात आहे. 

महाराष्ट्रातील सहा वर्षाखालील बालिकांचे दरहजारी प्रमाण 913 मुली असे होते. 2001 साली हे प्रमाण 883 पर्यंत घसरले. गेल्या दहा वर्षात 4 लाख 68 हजार 480 स्त्री भ्रूणहत्या झाल्याचे नमूद केले आहे. 1994 मध्ये गर्भलिंगनिदान करणे हे फौजदारी कृत्य म्हणून घोषित केले गेले. व सोनोग्राफी करतांना लिंग सांगणाऱ्यांना कडक शिक्षा देण्यासाठी तरतूद केली गेली. पीसीपीएनडीटी अ‍ॅ्नट गर्भधारणापूर्वी व प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध करणारा कायदा 1994 असे म्हणतात. केंद्र सरकारचा निर्णय 1 जानेवारी 1996 पासून हा कायदा अस्तित्वात आला तरी आजही स्त्रीला अशक्त तुच्छ समजलं जातं. जावईचे नखरे उचलणे पसंत करत नाही. अरबमध्ये रोजच्या युद्धामध्ये लेकिला कैदी बनविले जायचे. स्त्रीची सुरक्षा करावी लागते आणि ती सुरक्षित नव्हती म्हणून तिला पसंत नाही करायचे. दिव्य कुरआनच्या आदेशामुळे हा प्रकार बंद झाला. कुरआनमध्ये म्हटले आहे की, ’’ आणि स्मरण करा ती वेळ जेव्हा जीवंत गाडलेल्या मुलीस विचारले जाईल की ती कोणत्या अपराधापायी ठार केली गेली.’’ (सुरे अलत्नवीर आयत क्र.9). एकीकडे मुलीसोबत अत्याचार करण्यास नरकाचे यातनामय जीवन तर दूसरीकडे त्या लोकांना आनंदाची वार्ता देण्यात आली ज्यांनी मुलीवर अत्याचार न करता सद्व्यवहार केला आणि मुला-मुली दोघांनाही समान वागणूक दिली. त्यांच्याशी वागतांना कुठलाही भेदभाव केला नाही किंवा करत नाही. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास रजि. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे कथन कथित करतात की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले, ज्या माणसाला मुलगी झाली त्याने न तिला जीवंत पुरावे न गाडावे न तिला अपमानास्पद वागणूक द्यावी न तिच्यावर आपल्या पुत्रास श्रेष्ठत्व द्यावे तेव्हा ईश्वर त्याला जन्नतमध्ये दाखल करेल. (अबु दाऊद)

म्हणजेच 1443 वर्षाआधीच इस्लाममध्ये स्त्रीला पुरूषांचा समान दर्जा दिला व जेंडर इ्निवलिटी (लिंग समानता)ची शिकवण दिली. इस्लामने स्त्रीला जगण्याचा अधिकार दिला. मुलांसारखे तिचेही संगोपन करण्याचे निर्देश दिले. कारण समाजामध्ये मुलांचे संगोपन जेवढ्या काळजीने केले जाते तेवढे मुलीचे केले जात नाही. ही तफावत इस्लामला मान्य नाही. इस्लाममध्ये मुलीच्या पालनपोषणास विशेष प्रोत्साहन दिले आहे व या कामाला एक पवित्र कर्तव्य घोषित केले आहे. बुखारी व मुस्लिमच्या हदीसमध्ये आलेले आहे की, कन्या देऊन जर ईश्वराने एखाद्या माणसाला आजमाविले आणि त्या माणसाने आपल्या मुलीशी सद्व्यवहार केला तर त्याचा हा मुलींप्रती सद्व्यवहार त्याच्या नरकाग्नीपासून बचावाचे साधन होईल.’’ जो माणूस आपल्या दोन मुलींचे संगोपन त्या तरूण होईपर्यंत करील निवाड्याच्या दिवशी मी आणि तो असे असतील हे सांगतांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आपली दोन बोटे जोडली. (मुस्लिम)

ज्ञान नसेल तर जगून काय उपयोग

स्त्री म्हणजे निम्मी मनुष्य जात. मानव समाजाचा अर्धा वाटा तिचाच. स्त्री ज्ञानी तर पुढची पीढिही ज्ञानी. म्हणून इस्लाममध्ये स्त्री शिक्षणावरही जोर देण्यात येतो. स्वतः प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी महिलांना दीन आणि दुनिया दोघांचेही ज्ञान शिकण्यास प्रवृत्त केले. ज्ञानाशिवाय, आचरण अशक्य असते. म्हणून धर्माच्या मुलभूत नियमांचे ज्ञान प्राप्त करणे स्त्री पुरूष दोघांवरही अनिवार्य आहे. ज्ञान प्राप्त करणे स्त्रीचा कायदेशीर हक्क आहे. स्त्री जर अज्ञानी असेल तर लग्नाआधी तिच्या पित्याचे व लग्नानंतर तिच्या पतीचे हे कर्तव्य आहे की, त्यांनी तिला ज्ञान द्यावे. अथवा अशी व्यवस्था करावी की तिला शिक्षण मिळावे. नैतिक मर्यादांचे पालन करून शिक्षण मिळविण्यासाठी ती घराबाहेरही पडू शकते आणि तिच्यावर कोणी बंधनं लादू शकत नाही. प्रेषित सल्ल. यांच्या काळात एकीकडे मुलांना कुरआन तोंडपाठ असायचे तर दूसरीकडे घुडस्वारी, धनुर्विद्या आणि तलवारबाजीतही त्या तज्ञ असायच्या. एवढेच नव्हे तर वैद्यकीय ज्ञानही मुलींना अवगत होते. इलिझाबेथ ब्लॅकवेल ह्या 1847 मध्ये जगातल्या पहिल्या डॉ्नटर म्हणून प्रसिद्ध आहेत आणि आनंदीबाई जोशी कल्याण या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या डॉ्नटर म्हणून 1886 मध्ये पुढे आल्या. हजरत आएशा रजि. यांच्या विवाहावर आक्षेप घेणाऱ्यांना माहीत असायला हवे की, आनंदीबाईचा विवाह ही वयाच्या 9 व्या वर्षी त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे गोपाळरावांशी झाला होता. असो त्या एकच वर्षे डॉ्नटर म्हणून जगल्या. 1887 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 

रूफैदा अल असलमिया या अरब देशातल्या पहिल्या महिला डॉ्नटर. खरं तर जगातल्याच पहिल्या महिला डॉ्नटर म्हटले तरी बरोबर होईल. कारण त्या आजपासून 1400 वर्षापासून मस्जिदे नबवीजवळ आपली वैद्यकीय सेवा देत. शिक्षणाच्या क्षेत्रात माननीय आएशा रजि. माननीय सफिया रजि., माननीय आसमा बिन बिन्ते अबुबकर रजि., माननीय फातेचा बिन कैस रजि., माननीय उम्मे हबीबा रजि., माननीय खौला रजि. यांचे कार्य उल्लेखनीय आहे. 

शिक्षणानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो स्त्रिचा विवाह. अनादी काळापासून स्त्रीला विवाहाच्या बाबतीत तोंड उघडण्याचा अधिकार नव्हता. तिच्या परिवारातील आई-वडिल आणि बुजूर्ग मंडळी ज्या व्यक्तीबरोबर विवाह करवून देतील निमुटपणे तिला तो निर्णय स्वीकारावा लागेल. त्याविरूद्ध एक शब्दही बोलण्यास तिला अधिकार नव्हता. कोणत्याही मुलीचे आईवडिल तिच्यापेक्षा जास्त अनुभवी असतात आणि मुलीचे शत्रू नसतात आणि शुभचिंतक असतात. मुलींपेक्षा मुलीच्या चांगल्या-वाईटाची त्यांना जास्त काळजी असते. म्हणून तिच्या चांगल्या भविष्याचे निर्णय तेच घेऊ शकतात ही धारणा काही प्रमाणात सत्य असली तरी ही गोष्ट कधीच योग्य नाही की स्त्रीवर तिच्या आवडीविरूद्ध विवाहाचा निर्णय थोपवावा. इस्लाममध्ये विवाहाच्या बाबतीत पालकाच्या मर्जीला महत्व जरूर दिलेले आहे परंतु, विवाहासारख्या महत्त्वाच्या घटनेमध्ये मुलींच्या पसंतीचीही नोंद घेण्यास      -(उर्वरित आतील पान 7 वर)

समाजाला बाध्य केलेले आहे. माननीय अबु हुरैरा रजि. प्रेषितांचे कथन करतात की, त्यांनी एकवेळेस सांगितले, ’’ विधवा आणि तलाकपीढित स्त्रीचा विवाह त्यांचे मत माहित होईपर्यंत होणार नाही. तसेच कुमारीकेचा विवाह तिच्या परवानगीशिवाय होवू शकत नाही. (बुखारी व मुस्लिम). यावर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या सोबती (रजि.) यांनी विचारले की कुमारिका तर लाजत असल्यामुळे काहीच बोलणार नाही. मग तीची परवानगी कशी घ्यावी? तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, तीचे मौन धारण करणे हीच तिची परवानगी समजण्यात येईल. जर एखाद्या स्त्रीच्या पालकाने तिचा विवाह केला व त्यास स्त्रीने या विवाहास मान्यता दिली नाही तर हा विवाह रद्दबातल ठरणार. माननीय खन्सा (रजि.) यांचा विवाह त्यांच्या मर्जीविरूद्ध वडिलांनी करून दिला तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी तो रद्दबातल ठरविला.

आपल्याला कोणी भेट वस्तू दिली तर काय होते? खूप आनंद होतो आणि भेट देणाऱ्या व्यक्तीबद्दल मनात आपुलकी निर्माण होते. मग आपणही त्याला काही भेट द्यावी, असे वाटते. महेर एक सुंदर भेट आहे. जी पती आपल्या पत्नीला देतो. नवीन जीवनाची सुरूवात या प्रकारे एका सुंदर पद्धतीने होते. 

’’ आणि स्त्रीयांचे महर (स्त्रीधन) आनंदाने (कर्तव्य समजून) अदा करा. परंतु जर त्यांनी स्वतः  स्वखुषीने स्त्रीधनाचा काही अंश तुम्हाला माफ केला तर तुम्ही तो भाग आनंदाने खाऊ शकता’’ महेर हा केवळ स्त्रीचाच अधिकार आहे. शरियतद्वारे महेर किती असावे याची काही मर्यादा निश्चित केलेली नाही. ती माणसाच्या आर्थीक कुवतीच्या प्रमाणात कमी जास्त असू शकते. इस्लामने महिलांवर पैसा कमाविण्याची जबाबदारी अजिबात टाकली नाही. लग्नाआधी पिता व लग्नानंतर पती यांच्यावर तिच्या खर्चाची जबाबदारी टाकलेली आहे. घराचे काम करणे बंधनकारक नाही. उलट जर कोणती स्त्री ते करत असेल तर तर हे तीचे कुटुंब प्रमुखावर उपकार समजण्यात येईल व तिलाही पुन्य मिळेल. व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य व संपत्ती बाळगण्याचा अधिकार तिला आहे. आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये तिचा वारसा हक्क आहे. हा अधिकार इस्लामने 1443 वर्षापूर्वी दिला. तर भारतात आपल्या घटनेद्वारे 1956 मध्ये तो महिलांना मिळाला. 

स्त्रीच्या अब्रूवर दोन प्रकारे हल्ले होतात. एक तिच्यावर व्याभीचाराचा आरोप लावून तिच्यावर मानसिक हल्ला केला जातो आणि दूसरे म्हणजे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून शारीरिक अत्याचार दिला जातो. आपल्या देशात दररोज साधारणपणे 77 बलात्काराच्या घटना होतात. एखाद्या स्त्रीवर व्याभीचाराचा आरोप सिद्ध झाला तर तिला 80 फटक्यांच्या शिक्षेची तरतूद आहे. जबरी लैंगिक अत्याचार केल्यास बलात्काराला तो अविवाहित असेल तर 100 फटके व विवाहित असेल तर रजम म्हणजे दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा शरियतने दिलेली आहे. जी शिक्षा नैसर्गिक आहे. याचा अंदाज अनेक धर्मनिरपेक्ष लोकांनी याच शिक्षेची मागणी निर्भया, जैनब, डॉ. प्रियंका रेड्डी, आसिफा इत्यादींच्या वेळी केली होती. या शिक्षेची अंमलबजावणी केल्यास बलात्काराचे प्रमाण निश्चित कमी होणार हे एक सत्य आहे. ज्या देशात या शिक्षेची अंमलबजावणी होते त्या देशाचे बलात्काराचे प्रमाण शुन्यवत आहे. प्रेषित सल्ल. यांच्या काळात तर एक महिला अंगभर सोन्याचे दागिने घालून प्रवास करीत होती. तेव्हा तिला जनावराव्यतिरिक्त कोणाची भीती नव्हती. 

प्रेषित सल्ल. यांचे स्त्री जातीवर खूप उपकार आहेत. त्यांना अल्लाहच्या आदेशावरून जे बदल समाजामध्ये घडवून आणले त्याचे दूसरे उदाहरण जगाच्या इतिहासात कुठेच मिळणार नाही. 

घडस्फोटाला भयानक समजणाऱ्या लोकांना हे माहित असायला हवे की, कोणत्याही दाम्पत्याच्या जीवनात अगदी शेवटच्या टोकाचा क्षण येतो. जेव्हा पती व पत्नीच्या स्वभावात अनुकूलता व समन्वय नसल्याने संसाराची गाडी चालविणे अवघड होते. दररोजच्या भांडणामुळे बळजबरीने एकत्र राहून जीवन नरकासारखे होते. तेव्हाच शरियतने घडस्फोटाची परवानगी दिली. जेणेकरून दोघांना वेगळे होवून नवीन जोडीदार निवडून शांतीने जगता यावे. प्रेषित सल्ल. यांच्या जीवनाबद्दल किती जरी लिहिले तरी मन भरत नाही एवढे त्यांचे उपकार आहेत. वाचकांनी त्यांच्या जीवनाबद्दल सखोल अभ्यास केल्याशिवाय, त्यांनी स्त्रीयांवर केलेले उपकार कळू शकत नाहीत. तरी माझी कळकळीची विनंती आहे की वाचकांनी प्रेषित सल्ल. यांच्या चरित्राचा खोल अभ्यास करावा. अल्लाह सर्व पुरूषांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दाखविलेल्या मार्गावर चालून स्त्रीयांचे अधिकार देण्याची सद्बुद्धी देवो, आमीन. 

- डॉ. सीमीन शहापूरे 

8788327935


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget