Halloween Costume ideas 2015

मजबूत कुटुंबाच्या बांधणीमध्ये महिलांचे योगदान

family

हल्ली कोविडमध्ये शाळा जरी बंद असल्या तरी मुलांना प्रोजेक्ट बनवावेच लागतात. ऑनलाईन्नलासेसमध्ये मुलांना गृहपाठ आणि प्रोजेक्टस पाठविण्यात येतात. गृहकार्य तर मुले कसेबसे उरकून घेतात मात्र प्रोजेक्ट करताना त्यांना खूप त्रास होतो. हे चिटकवा ते बनवा, असे करत-करत मुले रडकुंडीला येतात. पूर्वी ‘ये फेविकाल का मजबूत जोड है टूटेगा नहीं’ म्हणून जाहिरात येत होती. प्रोजेक्ट करताना मात्र हा जोड तुटतच राहतो. ‘चुटकी में चिपकाए, वाला फेव्हिकाल’ही अयशस्वी होतो, मग मैदानात येते ती, हॉट ग्लू गन. तिच्याही मर्यादा समोर येतात. मजबूतीसाठी प्रसिद्ध फेव्हिकॉल काही ठिकाणी का अशस्वी होतो, त्याचे कारण शोधायचा प्रयत्न करूया. 

सायनशास्त्राचा ज्यांनी अभ्यास केला त्यांना माहित आहे की, कोणत्याही दोन वस्तूंना जवळ आणणारे रसायन हे एक बाँड असते. ते जेवढे ताकदवान असेल तेवढा घट्टपणा आणि मजबूती त्यांच्यात निर्माण होते. किंबहुना बाँड कमजोर झाल्यामुळे वरील प्रोजेक्टमधील नमूद वस्तू चिटकत नाहीत. माणसाच्या नात्यांचेही असेच आहे. ते ही स्ट्राँग बाँडशिवाय टिकून राहत नाहीत. आपले कुटुंब मजबूत बनवायचे असेल तर कुटुंबांच्या सदस्यांत आपसात मजबूत बाँडिंग पाहिजेच. 

मजबूत बाँडिंगसाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे. 1. एकमेकांचा आदर. 2. एकमेकांची काळजी.

कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांनी एकमेकांचा आदर केला आणि एकमेकांच्या बारीक-सारीक गोष्टींची काळजी घेतली तर कुटुंब मजबूत होईल. उदा. आई-वडिल एकमेकांची काळजी घेत असतील आणि एकमेकांना आदर देत असतील तर त्यांच्या मुलातही आपसुकच तो गुण येतो. घरातील वयस्कर व्यक्तींना ओझं न समजता त्यांना मान-सन्मान दिला गेला पाहिजे. वय झाल्यानंतर माणसाला पैशा पेक्षाही नाती जास्त गरजेची असतात. रसायन शास्त्रामध्ये आपल्याला आठवत असेल एक कॅटलिस्ट असते. जी की कमजोर क्रिएशन्सला गती प्रदान करते. तसेच जेथे नात्यामधील मजबुती कमजोर होत आहे असे वाटेल तेथे एक महिलाच कॅटलिस्टचे रूप धारण करू शकते. पुरूष ही कॅटलिस्ट होवू शकतो. थोडक्यात प्रत्येक घरात एक कॅटलिस्ट हवाच. 

एक मुलगा आणि एक मुलगी विवाहाच्या पवित्र बंधनात बांधले गेले की, ’एका नव्या कुटुंबांची सुरूवात होते. वेल बिगिनिंग इज हाफ डन’ या म्हणीप्रमाणे ही सुरूवात चांगली झाली तर मजबूत कुटुंबाची पायाभरणी आपोआपच होते. 

आपल्या घरात येणारी सून म्हणून ज्या मुलीची निवड आपण करतो तेव्हा फक्त तिच्या सौंदर्य किंवा तिची शैक्षणिक पात्रता, नोकरी, पगार, तिच्या वडिलांची सांपत्तिक स्थिती या आधारावर न करता तिची वागणूक, चारित्र्य आणि संस्कारही बघितले पाहिजे. हीच प्रक्रिया जावयाची निवड करताना अवलंबायला हवी. परंतु असा अनुभव आहे की, वधूची निवड करतांना जेवढे चोखंदळपणे पाहिले जाते, वराची निवड करताना पाहिले जात नाही.  त्याच्या उत्पन्नाकडेच लक्ष दिले जाते. त्याच्या चारित्र्याकडे लक्ष न देवून त्याचा स्वीकार केल्यास त्याची हानी नवीन कुटुंबाच्या पायाभरणीपासूनच होवू लागते. चार चौघात जरी ’कमाईवाला जावाई’ आहे असे म्हणून मोठेपणा गाजवता येत असला तरी प्रत्यक्षात नवीन बंधनातून निर्माण झालेल्या कुटुंबाची हानीच होते. 

अलिकडे विशेष शाखेतील विशेष शिक्षण आणि त्यानंतर कमाईपर्यंतची वाट पाहण्यामुळे मुला-मुलींचे लग्न लवकर होत नाहीत त्यामुळे अनैतिक संबंधामध्ये वाढ होत चाललेली आहे. 24 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षण अहवालामध्ये असे नमूद आहे की, पुण्यातील 75 ट्नक्याहून अधिक मुले आणि मुली वयाची 16 वर्षे पूर्ण होण्याआधीच अनैतिक संबंधांमध्ये गुरफटलेली आहेत. ’प्रयास’ या संस्थेने केलेले हे सर्व्हेक्षण आहे. या सर्व्हेक्षणामध्ये ’रिलेशनशिप’  असे जरी आकर्षक नाव दिले असले तरी हे नाते तिरस्करनीय असे अनैतिक नातेच आहे. जी स्थिती पुण्याची तीच स्थिती  कमी अधिक प्रमाणात इतर शहरांची असेल यात शंका नाही. 35 आणि 40 वर्षे वयापर्यंत जर तरूण-तरूणी लग्नाला नकार देत असतील तर हा प्रकार अधिकच वाढत जाणार यातही शंका नाही, हे ओघानेच आले. कायदेशीररित्या वयात आल्यानंतर मुला-मुलींचे लग्न लावले गेले तर त्यांच्याकडे तेव्हा भौतिक वस्तू कमी जरी असल्या तरी मानसिक चैतन्य न्नकीच निर्माण होईल आणि ते जोडपे यशस्वी होईल. कारण त्या वयात त्यांना जे हवे ते कायदेशीररित्या मिळाले तर बाकीच्या भौतिक गोष्टी मिळविण्याची जिद्द त्यांच्यात नैसर्गिकरित्या निर्माण होते. 

अलिकडे घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले असून, भारतीय समाजमनासाठी ही नवीन बाब आहे. पूर्वी लेकीला सासरी पाठविताना ताकीद करण्यात येत असे की, ‘उभी चालली आहेस आडवी बाहेर नीघ’ ही जरी टोकाची भूमिका असली तरीही सासरी नांदण्यामध्ये मुलीला मदत व्हायची. छोट्या-मोठ्या गोष्टी सहन करण्याची तिच्यात शक्ती उत्पन्न व्हायची. आज मुलीला अडचणीमध्ये नांदण्याचा सल्ला देण्याऐवजी घटस्फोट घेवून मोकळी हो, असा सल्ला देणाऱ्या माहेरच्या मंडळींची संख्या वाढलेली आहे. उच्चशिक्षित लोकांमध्ये असे प्रकार वाढतांना दिसत आहेत. ज्यांचा परिणाम घटस्फोटांची संख्या वाढण्यात होत आहे. मानलं तर आई नाहीतर सासुबाई. मानलं तर वडील नाहीतर सासरे बुवा, मानलं तर बहीण नाही तर नणंद, मानलं तर भाऊ नाहीतर दीर. आईच्या घरातील सुरक्षित वातावरणातून सासरी जाताना नवीन लोक, नवीन नाती, यामध्ये कोणीच सहजासहजी रमत जात नाही. थोडाफार त्रास तर प्रत्येक स्त्रीला होतच असतो. परंतु मनातून आईच्या ठिकाणी सासूला, बहिणीच्या ठिकाणी नणंदेला, भाावच्या ठिकाणी दीराला आणि वडिलाच्या ठिकाणी सासऱ्याला मानल्यास सासरी स्थिर होण्यास मुलीला मदत मिळते. मनाची ही उदारता ही फक्त महिलाच दाखवू शकते. पुरूष सर्वसाधारणपणे असे करू शकत नाहीत. ते सासूला नेहमी सासूच मानतात. ‘तुझी आई’ म्हणूनच संबोधतात. सासूही साधारणपणे सुनेला लेकीसारखी वागवत नाही. सासऱ्याला तर आपली माया दाखवायला वेळच नसतो. नणंदबाई आपल्या वहिणीकडे सोयीपुरतेच पाहतात. दिराला मित्रांशी मेजवाणी करायची असेल तर वहिणीची आठवण येते. थोडक्यात सून ही एक बिनपगारी फुलटाईम 365 दिवस काम करणारी मोलकरीन असल्यासारखी असते. जर ती नोकरी करणारी असेल तर तिची भूमिका दुहेरी मोलकरणीसारखी होवून जाते. 

आम्ही महिला कुठल्याही अडचणींना जुमानत नाही. आम्ही खूप सक्षम आहोत. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतो. फक्त आमच्याकडे मानव म्हणून पाहिले पाहिजे. प्रेम, आदर, आपुलकी देऊन आमची काळजी घेतली पाहिजे. 

         इस्लाममध्ये गृहिणीला राणीचे स्थान दिलेले आहे. कमावण्याच्या जबाबदारीतून मुक्त करून संपूर्ण लक्ष घरावर केंद्रीत करण्यास सांगितले आहे. प्रेषित सल्ल. यांनी सांगितले आहे की, आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. स्त्री घराला स्वर्ग किंवा नर्क बनवू शकते. म्हणजे सांगण्याचा हेतू असा की, स्त्री घराला स्वर्गासमान किंवा नर्कासमान बनवू शकते. हा केवढा मोठा दर्जा आहे हे चाणाक्ष्य लोकांच्या लक्षात येईलच. घराला स्वर्ग बनविण्याच्या काही यु्नत्या सांगणे या ठिकाणी चुकीचे होणार नाही. 

1. सून सासुला आई, दिराला भाऊ आणि नणंदेला बहिण माणून त्यांच्याकडून तशाच आदराची अपेक्षा करते. जेव्हा ते अशा अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत तेव्हा सुनेला त्रास होतो. म्हणून माझे तर असे मत आहे की, सासूला सासूच माना, दीराला दीरच माना, नणंदेला नणंदच माना, सासऱ्याला सासराच माना पण त्यांची काळजी घ्या. बदल्यात त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवू नका. 

2. सासरवाडीच्याच नव्हे तर सर्वच लोकांशी एकतर्फी प्रेम करायला शिका. बदल्यात त्यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा करू नका. लोक आपल्याशी नीट वागत नसले तरी ते त्यांच्या वागण्याने स्वकर्माच्या रजिस्टरमध्ये स्वतःविरूद्धच नोंद घेण्यासाठी ईशदुतांना भाग पाडत आहेत. याचेच समाधान ठेवा. ईश्वर तुम्हाला तुमच्याच कर्माचा जाब विचारणार आहे, लोकांच्या नाही. तू लोकांशी कशी वागलीस याचीच विचारपूस केली जाईल. लोक तुझ्याशी कसे वागले याच्याशी तुझे काहीच देणेघेणे नाही. त्याची शिक्षा त्यांना तुमच्यातर्फे ईश्वर नक्कीच देईल, याची खात्री बाळगा. 

3. आपले मन स्वच्छ ठेवा. आपण स्वतःच्या आणि घराच्या स्वच्छतेकडे जेवढे लक्ष देतो तेवढे मनाच्या स्वच्छतेकडे देत नाही, हे वास्तव आहे. त्याचा स्वीकार करा. मनात कोणत्याच वाईट गोष्टींना किंवा विचारांना थारा देऊ नका. आपले मन आणि लोकांच्या वाईट टोमण्यांमध्ये एक बॅरियर (अडथळा) असला पाहिजे जो की त्यांना आपल्या मनात प्रवेशच करू देणार नाही. जेव्हा आपण लोकांचे बोलणे मनाला लावून घेतो तेव्हा नाती टिकत नाहीत. म्हणून लोकांची वाईट बोलणी एका कानाने ऐकूण दुसऱ्या कानाने सोडून द्या. 

         (उर्वरित आतील पान 7 वर)

4. लोकांना क्षमा करणे हा फार महत्त्वाचा गुण आहे. तो जाणूनबुजून जोपासा. कारण कोणतेही नाते मजबूत करताना या गुणाचा तुम्हाला मोठा उपयोग होतो. नेहमी आपणच माफ करायचे का? कुठवर माफ करायचे? तर त्याचे उत्तर आहे, हो! आपणच माफ करायचे व मरेपर्यंत माफ करत राहायचे. असं करणं अनिवार्य आहे. ईश्वरही आपल्याला असंख्य वेळा माफ करतच असतो ना. ईश्वराला माफ करणारे लोक पसंत असतात. म्हणून आपला स्वभाव क्षमाशील होईल, याकडे लक्ष द्या. 

5. तसे पाहता स्त्री सहनशीलच असते. परंतु काही महिला आक्रस्ताळेपणा करत असतात. सहनशीलतेमुळे कुटुंबात शांतता पसरते. आपल्या घरातीलच नव्हे तर शेजाऱ्यांशी व इतर धर्मियांशी सुद्धा वागताना सहनशिलतेने वागता आले पाहिजे. जसे आपले पुर्वज वागत होते. त्यांना ते सहज जमत होते मग आपल्याला का जमणार नाही? लक्षात ठेवा ! सहनशिलतेमुळेच देश प्रगती करू शकेल. 

6. स्वतःच्या अंगी सकारात्मकता बाणवा आणि सकारात्मक महिलांशीच मैत्री करा. 

6. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. एक महिला शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या भक्कम असेल तरच ती कुटुंबाचा आधार बनू शकते. 

कोविडच्या नवीन स्ट्रेनला घाबरून जायची गरज नाही. आपल्याला त्याला सामोरे जायचे आहे. सुरक्षेचे सर्व उपाय आतापर्यंत स्पष्ट झाले आहेत. त्यांचा उपयोग करत संतुलित आहार घेत हलकासा व्यायाम केल्यास आपण कोविडला सहज परास्त करू शकतो, हे लक्षात असू द्या. मजबूत कुटुंब आणि मजबूत समाज बनविण्यासाठी सर्वांना माझे आवाहन आहे की, घरीच रहा आणि आपल्या सकारात्मक वागण्याने कुटुंब आणि समाजाला मजबूत बनवा. जमाअते इस्लामी हिंदच्या 19 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या मजबूत कुटुंब मजबूत समाज मोहिमेमध्ये सामील व्हा आणि समाजाला मजबूत बनवा.


- डॉ. सीमीन शहापूरे 

8788327935


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget