Halloween Costume ideas 2015

अंधार आहे कोठे?

candle light

मी एक कुरआनचा अभ्यासक व उपासक आहे. मला कुरआनबद्दल जी आवड निर्माण झाली त्यामध्ये माझ्या बालपणाचे मित्र उस्मान बिन सईद चाऊस यांचा मोलाचा वाटा आहे. आम्ही दोघे समवयस्क आणि एकाच गल्लीत राहणारे. मी त्यांचे जीवन जवळून पाहत होतो. आम्ही दोघेही साक्षर होतो. त्यांचे क्षेत्र अध्यात्माचे क्षेत्र होते आणि माझ्या जीवनाचे सुत्र खाओ-पीओ-मौज करो असे होतो. आम्ही रोज एकमेकांना भेटत होतो. पण फक्त नमस्कारापुरता संबंध होता. पुढे चालून मला थोडी समज आल्यावर त्यांची जीवनपद्धती पाहून मला आश्‍चर्य वाटायचे की फारशी भौतिक संसाधने नसताना त्यांची जीवनशैली अतिशय चांगल्या दर्जाची होती. सातत्याने हे पाहून मी एक दिवशी त्यांना विचारले की,  चाऊस साहेब आपली जीवनशैली अतिशय चांगली आहे. त्याग, श्रम, प्रेमळ आचरण यांचा त्यात समावेश आहे. या सर्वांसाठी तुम्हाला ऊर्जा कोठून मिळते? तेव्हा त्यांनी सांगितले की, मला ही ऊर्जा कुरआनमधून मिळते. त्यावर आश्‍चर्यचकित होवून मी त्यांना असे म्हणालो की, कुरआनबद्दल समाजाची तर वेगळीच भावना आहे. जशी की कुरआन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करते, हिंसाचार शिकविते, महिलांवर अत्याचार करण्याची शिकवण देते इत्यादी. त्यावर त्यांनी अगदी शांतपणे उत्तर दिले की, पाटील साहेब आज कुरआनचे भाषांतर जवळ-जवळ प्रत्येक भाषेत उपलब्ध आहे. आपल्याला जी भाषा येते त्यात कुरआन वाचा आणि आपणच ठरवा की कुरआन काय म्हणते ते? आणि तेव्हापासून मी कुरआन वाचण्यास सुरूवात केली व आजतागायत वाचतच आहे. 

कुरआनबद्दल थोडक्यात सांगायचे म्हणजे, कुरआनामध्ये असे म्हटलेले आहे की, जो कोणी माणूस अज्ञानकाळामध्ये असतांना ज्या काही चुका, पाप करतो त्याला क्षमा करण्यात येते. माझ्या मते ही सोय अन्य कुठल्याही जीवन पद्धतीमध्ये नाही. 

कुरआनच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्ये असे की, सुरे अलबकराच्या आयत क्र. 153 मध्ये असे म्हटलेले आहे की,  हे श्रद्धावंतांनों ! सहनशिलता आणि भक्तीच्या माध्यमातून  मदत प्राप्त करा. निश्‍चितपणे ईश्‍वर सहनशिलता ठेवणार्यांच्या सोबत आहे. ही शिकवण आजपासून 1442 वर्षांपूर्वी दिली गेली,  जी की अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा माणसाला आशेचा किरण दाखवते व माणसाच्या मनामध्ये प्रकाश निर्माण करते व तग धरून राहण्यास प्रेरित करते. मी जेव्हा समग्र कुरआनवर दृष्टी टाकतो तेव्हा वाटते की, या दिव्य ग्रंथामुळे जगातील सर्व मानवजातीसाठी 1442 वर्षापूर्वीच प्रकाश निर्माण झालेला आहे. मग अंधार आहे कुठे? आज जर अंधार असेल तर त्याचा अर्थ आपण कुरआनच्या शिकवणीकडे डोळेझाक केल्यामुळे तो निर्माण झालेला आहे. हे माझे स्पष्ट मत आहे आणि यावर मी ठाम आहे. तरी समस्त ईश्‍वर भक्तांनी यावर आत्मचिंतन करणे आवश्यक आहे.


- किशन जयवंतराव पाटील 

मो.9175793247


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget