Halloween Costume ideas 2015

दहशतवाद

Terrorism
दहशतवाद एखादे धार्मिक प्रकरण नाही. दहशतवाद, राजकीय आर्थिक आणि सामाजिक कारणांनी जन्मास येतो. लिब्रेशन टायगर्स ऑफ तमिल ईलम, आयरिश रिपब्लिकन आर्मी, उल्फा, साध्वी प्रज्ञा, दयानंद पांडे आणि त्यांचे सहकारी या सर्वांवरून हे सिद्ध होते की दहशतवादी सर्वच धर्मातून येतात. ज्याअर्थी मागील काही वर्षात मीडियाचा एक विशिष्ट वर्ग याचा संबंध इस्लाम धर्माशी जोडत राहिला, म्हणून दहशतवादाला मुसलमानांशी जोडणे एक फॅशन बनली आहे. वस्तुतः इस्लाम या कारवायांचे स्त्रोत असण्याची सुतराम शक्यता नाही.
    जेव्हा अन्याय आणि लोकांच्या स्वातंत्र्याची गळचेपी होते. दडपशाहीचे वर्चस्व वाढते, तेव्हा हिंसाचाराचा उद्रेक होतो, जो नेहमी दहशतवादीचे रूप धारण करतो आणि जर याचा संबंध दुर्दैवाने एखाद्या विशिष्ट धर्माशी असेल तर जेथपर्यंत प्रेरणांच्या स्त्रोतांचा संबंध आहे, त्यांच्या अंगी धर्माचा रंग चढविण्याची प्रवृत्ती असते. हे पूर्णतः स्पष्ट आहे की लिब्रेशन टायगर्स ऑफ तमिल ईलमचे कार्यकर्ते व बंडखोर सर्वच्या सर्व हिंदू होते, परंतु, मीडियाने त्यांना कधीही अशा प्रकारे सादर केले नाही, जहालमतवादी संघटना अभिनव भारतने बॉम्ब स्फोट केले, ज्याचा संबंध स्पष्टतः हिंदुत्वाशी होता. परतु, मीडियात फार कमी पत्रकार असे दिसून येतात, ज्यांना अशा घटनांमध्ये भगवा रंग दिसतो.
    कट्टरपंथी लोकांद्वारे जिहादचा चुकीचा वापर करण्यामुळे समस्या आणखी जास्त बिकट झाली आहे. भरकटलेल्या तत्त्वांनी केलेल्या एकट्या दुकट्या हिंसक घटनादेखील जिहाद म्हणविल्या जात आहेत आणि काही लोक या घटनांना याच स्वरूपात प्रस्तुत करीत आहेत. एकीकडे अल कायदा आणि त्यासारख्या संघटना आहेत, ज्या जिहादच्या नावाने दहशत पसरवित आहेत. जिहादच्या नावाने होणारी ही कृत्ये संपूर्ण मुस्लिम समुदायाचे सर्वात मोठे वैरी आहेत. कधी-कधी असे जाणवते की जेव्हा काही दहशतवादी असल्या कृत्यांमध्ये सामील होऊन मुसलमान होण्याचा दावा करतात तेव्हा मुसलमानांना इतर शत्रूंची गरजच नाही. ही असामाजिक तत्वे शत्रूंचे काम सर्वोत्तम पद्धतीने करीत आहेत, ज्यामुळे घडणार्‍या प्रत्येक अप्रिय घटनेनंतर संपूर्ण मुस्लिम समुदायाची प्रतिमा डागाळली जात आहे. हे नादान व विवेकहीन लोक आपल्या कारवायांनी  इस्लामची जी प्रतिमा सादर करीत आहेत, इस्लामचे कट्टर वैरीदेखील त्याहून अधिक चांगले काम करू शकत नाहीत. आपल्या आततायी कृत्यांनी ते दुसर्‍यांच्या मनात मुस्लिम समुदायाविरूद्ध घृणा निर्माण करीत आहेत आणि प्रत्येक अशा कृत्यानंतर मुसलमानांची व इस्लामची प्रतिमा डागाळली जाण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होत आहे.
    इस्लाम धर्माच्या ग्रंथांमध्ये स्पष्ट सांगितले गेले आहे की जिहाद कोणत्याही माध्यमान्वये घडू शकतो, उदा. लेखणीच्याद्वारे, आपल्या स्वार्थाविरूद्ध संघर्षाद्वारे अथवा एखाद्या पवित्र शब्दाने किंवा पवित्र कर्माद्वारे होऊ शकतो. परंतु, मीडियाला यापैकी कोणताही भावार्थ माहीत नाही. जेव्हा मामला मुसलमानांचा येतो, तेव्हा काही तत्त्वांनी केलेल्या हिंसाचाराला जिहादचे लेबल लावले जाते.
    सामान्यतः हे अवलोकनात येते की काही मुस्लिम देशांमध्ये छळवाद व दडपशाहीविरूद्ध अशासकीय गट उभे राहिले आहेत. निःसंशय मध्यपूर्वेकडील देशांचे समाज अनेक पैलूंनी कमी प्रमाणात विकसित आहेत. काही तेल निर्यात करणारे देश आणि खाडी देशातील लहानशा श्रीमंत लोकसंख्येला वगळता बहुसंख्य नागरिकांना शिक्षणस्तर, जीवनस्तर आणि नोकरी व्यवसायाच्या संधी कमी आहेत. भावी काळाकरिता संभावनांची अपेक्षा मर्यादित समजली जात आहे.
    अनेक मुस्लिम देश जे राजांच्या, हुकूमशहांच्या आणि निरंकुश शासकांच्या अधीन आहेत. लोकशाहीसाठी उठणार्‍या चळवळींचा तिथे कठोरपणे बिमोड केला जातो. नागरिक जीवन नर्कतुल्य बनविण्याकरिता मुलभूत हक्क हिरावून घेतले जातात आणि नागरी स्वातंत्र्य दिले जात नाही. सत्तारूढ पक्षांमध्ये पारदर्शिता नाही. भ्रष्टाचार पसरलेला आहे. हे हुकूमशाहा आपल्या शासन सत्तेकरिता आपल्या नैसर्गिक साधनांवर उदा. तेल आणि नैसर्गिक गॅस वगैरेवर स्वायतत्ता प्राप्तीच्या बदल्यात पाश्‍चिमात्य शक्तींकडून वैधता मिळवितात तेव्हा आश्‍चर्य करण्यासारखी गोष्ट नाही की काही प्रतिकारात्मक आंदोलने या वातारणातून उत्पन्न झाली असावीत. ही आपल्या देशाच्या शासकांविरूद्ध प्रतिक्रिया आहे. हे लोक शस्त्रांचा वापर करू शकतात परंतु या असे करण्यात ते पाश्‍चिमात्यांच्या दुटप्पी नीतींचे पितळही उघडे करतात.
    एक विख्यात अमेरिकन राजनीतिक तत्त्वज्ञानी आणि लोकप्रिय विचारवंत, बुद्धिजीवी मीकाईल वाल्जर ही समस्या खूप सामंजस्याने संक्षिप्तपणे सादर करतो, ”प्रथम छळवाद, दडपशाहीला दहशतवादासाठी निमित्त बनविले जाते, मग दहशतवादाला दडपशाहीकरिता निमित्त बनविले जाते. पहिले निमित्त अतिवामपंथी लोकांसाठी आहे आणि दुसरे निमित्त उजव्या नव पुराणमतवादी लोकांसाठी आहे.”
    प्रत्येक जण या गोष्टीशी सहमत होईल की कोणत्याही समाजात राजकीय हिंसाचार अप्रिय आहे. दहशतवाद राजकीय हिंसाचाराचेच एक रूप आहे. परंतु, जगातील अधिकांश देशांमध्ये राजनीतिक हिंसेचा वापर, छळवादी शासक स्वतः आपल्या जनतेविरूद्ध आणि आपल्या घरगुती विरोधकांविरूद्ध नियमितपणे करीत असतात. अवैध शासकांना खचितच राजकीय हिंसाचाराला तोंड द्यावे लागेल.
    पॅलेस्टीयन लोकांनी दीर्घकाळापर्यंत इस्त्रायली रॉकेटांचा आणि क्षेपणास्त्रांचा मुकाबला केवळ दगडांनी आणि गोफणांनी केला. परंतु, आता असे नाही. इस्त्रायली शासनातर्फे सतत वाढत्या हिंसेने हमास आणि हिज्बुल्लाहला अधिक सहयोगपूर्ण आणि सशक्त प्रतिक्रियेसाठी विवश केले. इराक आणि अफगानिस्तान यांच्यात एक दशकांपासून चालत राहणार्‍या युद्धांनीही शंका दृढ केली आहे की पाश्‍चिमात्य, पॅलेस्टीनची समस्या सोडविण्याऐवजी आपल्या नविन शस्त्रांच्या परीक्षणासाठी युद्ध क्षेत्रांचा विस्तार करीत आहेत आणि नव्या रणभूमींचा शोध घेत आहेत. सद्दाम हुसैनच्या इराक मधील विध्वंसक हत्यारांच्या संदर्भात पाश्‍चिमात्यांचा खोटेपणा उघडकीस आल्याने या विश्‍वासाला अधिक मजबूत केले आहे की पाश्‍चिमात्यांच्या युद्ध, हिंसा, रक्तपात आणि अमर्याद राष्ट्रीय गर्वाच्या लालसेची कोणतीही सीमा नाही. नैराश्य आणि निरूत्साहाचे हेच वातावरण होय, ज्याने काही लोकांना पाश्‍चिमात्यांविरूद्ध संघटित प्रयत्न सुरू करण्यास बाध्य केले आहे. या सर्वांच्या शेवटी पाश्‍चिमात्य त्याच तालिबानांसमोर गुडघे टेकताना दिसत आहे. ज्यावर त्याने दहशतवादाचा आरोप लावला होता.
    घटनांच्या परिणामस्वरूपी आलेल्या शहाणपणानंतर इस्लाम किंवा मुसलमानांच्या शब्दात दहशतवादाचा प्रत्यय लावणे या मागच्या खर्‍या हेतू किंवा इराद्याला अनावृत्त करतो.
    जगात सध्या जे काही होत आहे, त्याच्या प्रकाशात इस्लाम किंवा मुसलमानांविषयी त्वरित एखादा निर्णय घेणे. न्यायसंगत ठरणार नाही. संयोगवश याला बळी पडणारे मुसलमान आहेत. तथापित त्यांचा क्रोध, दमन आणि प्रतिकार अपेक्षेला अनुसरून आहे. कारण आम्ही श्रीलंका, उत्तर आयर्लेंड किंवा कांगोमध्ये पाहतो की छळ, दडपशाहीला बळी पडलेले लोक याचा प्रतिकार करीत आहेत. इस्लाम जगात शांती, सहअस्तित्व आणि जीवन, स्वातंत्र्य, संपत्ती आणि सर्व मानवांच्या आदर-सन्मानचे रक्षण इच्छितो. या संदर्भात पवित्र कुरआन घोषणा करतो ः ” ज्याने एखाद्या माणसाला, एखाद्याच्या हत्येचा सूड घेण्यासाठी किंवा जमिनीवर उत्पात पसरविण्याव्यतिरिक्त अन्य एखाद्या कारणाने ठार मारले तर समजा त्याने सर्व मानवांची हत्या केली आणि ज्याने एकाही माणसाचा जीव वाचविला, समजा त्याने समस्त मानवजातीला जीवनदान दिले.” (कुरआन - 5 ः 32).
    ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता ही गोष्ट मान्य करणे चुकीचे ठरेल की दहशतवाद एक इस्लामी दृश्य घटना आहे. निराकरण, काही धर्मांना बदनाम करण्यात दडलेले नाही, किंबहुना ते मानवतेतून अन्याय आणि छळवादाचा समूळ नाश करण्यात दडलेले आहे.

- सय्यद हामीद मोहसीन
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget