नागपूर (डॉ. एम.के. रशीद)
निसर्गाचे रक्षण करणे प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. निसर्गातील प्रमुख घटक वृक्ष असून, त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. निसर्गसंवर्धनाचे तत्व प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी 1430 वर्षापूर्वी सांगितले आहे. त्यांनी प्रत्येक व्यक्तीस वृक्ष लावण्याचा उपदेश केला असून, त्याच्या संवर्धनाचे सुत्रही सांगितल्याचा सूर सिरतुन्नबी जलसा कार्यक्रमात निघाला.
जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर महिला विभागाच्या वतीने जाफर नगर, टीचर्स कॉलनीच्या मस्जिद मर्कज़ी इस्लामी सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष डॉ. सबीहा खान होत्या. मंचावर प्रमुख पाहूणे अस्फीया इरफान, अफरोज अंजुम, इरफाना कुलसूम, अजरा परवीन यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. सबीहा खान म्हणाल्या, ग्लोबल वार्मिंग आणि देशातील पर्यावरण प्रदूषण समस्यांचे निदान पैगंबर हजरत मोहम्मद (सल्ल.) यांच्या शिकवणीमध्ये मिळते. प्रेषित (सल्ल.) यांनी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. तसेच छायादार आणि फळदार झाडांना कापणे आणि त्यांच्या खाली प्रात:विधी करण्यास मनाई केली आहे. तसेच युद्ध काळात शेती आणि त्यातील पिकं नष्ट करण्यास सक्त मनाई केली आहे. प्रेषित सल्ल. यांनी सांगितले कि, जर तुमच्या जवळ एखादे छोटे झाड असेल किंवा खजूराचे बीज असेल त्याला जमीनीमध्ये लावा. येथपावेतो की, या काळात भूकंपाचे झटके जरी येत असले तरी वृक्षारोपणाचे काम सोडू नका. त्यांनी निसर्गसंवर्धानाची सांगितलेली ही निकड आजच्या काळात तंतोतंत लागू होते. आज जगावर ग्लोबल वॉर्मिंगचे वादळ घोंगावत असून, त्याला थोपवायचे असेल तर वृक्ष लावणे आणि त्याचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे शहराध्यक्षा डॉ. सबिहा खान यांनी सांगितले.त्यांनी शिक्षणावर विचार व्यक्त करताना उमूमुल मोमीनीन हजरत आयशा ऱिज. यांच्या शैक्षणिक कार्याचे दाखले दिले. ओपन डिस्कशनमध्ये इरफ़ाना कुलसुम म्हणाल्या, आम्हाला सीरत (पैगंबर हज़रत मोहम्मद स.अ.व. यांचे जीवन चरित्र) चांगल्या प्रकारे समजून घेणे गरजेचे आहे. आम्ही पाहतो कि आजची युवा पीढ़ी सीरतच्या माहिती पासून पुष्कळ दूर आहे. सीरतच्या शिक्षणासाठी असे जलसे घेणे आवश्यक आहे.
अज़रा परवीन म्हणाल्या की, सीरतवर जागरूकता निर्माण करणे काळाची गरज आहे. प्रेषित सल्ल. यांच्या जीवनचरित्राचा विविधांगी अभ्यास करून त्यावर अनुकरण केले तर निश्चित आमच्यात अमुलाग्र बदल होवून आमची प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल. प्रारंभी सिरतुन्नबी विषयावर प्रश्नावली तयार करून परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत नफीसा कौसर प्रथम आली. द्वितीय तहूरा अंबर आणि तृतीय क्रमांक इफ्फत अहमद यांनी पटकाविला. विजेत्यांना ट्रॉफी आणि पुस्तके पारितोषिकाच्या स्वरूपात देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अफरोज अंजुम यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. प्रतियोगितामध्ये भाग घेणार्या सर्वांना प्रमाणपत्र आणि प्रशंसा पत्र देण्यात आले. स्थानीय अध्यक्षा जेबा खान यांनी आभार व्यक्त केले. इरफाना कुलसुम यांनी पवित्र कुरआन पठन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. अफरा खान यांनी नात पठण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सबाहत फ़िरदौस यांनी केले. मोठ्या संख्येने मुली, स्त्रीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
निसर्गाचे रक्षण करणे प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. निसर्गातील प्रमुख घटक वृक्ष असून, त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. निसर्गसंवर्धनाचे तत्व प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी 1430 वर्षापूर्वी सांगितले आहे. त्यांनी प्रत्येक व्यक्तीस वृक्ष लावण्याचा उपदेश केला असून, त्याच्या संवर्धनाचे सुत्रही सांगितल्याचा सूर सिरतुन्नबी जलसा कार्यक्रमात निघाला.
जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर महिला विभागाच्या वतीने जाफर नगर, टीचर्स कॉलनीच्या मस्जिद मर्कज़ी इस्लामी सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष डॉ. सबीहा खान होत्या. मंचावर प्रमुख पाहूणे अस्फीया इरफान, अफरोज अंजुम, इरफाना कुलसूम, अजरा परवीन यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. सबीहा खान म्हणाल्या, ग्लोबल वार्मिंग आणि देशातील पर्यावरण प्रदूषण समस्यांचे निदान पैगंबर हजरत मोहम्मद (सल्ल.) यांच्या शिकवणीमध्ये मिळते. प्रेषित (सल्ल.) यांनी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. तसेच छायादार आणि फळदार झाडांना कापणे आणि त्यांच्या खाली प्रात:विधी करण्यास मनाई केली आहे. तसेच युद्ध काळात शेती आणि त्यातील पिकं नष्ट करण्यास सक्त मनाई केली आहे. प्रेषित सल्ल. यांनी सांगितले कि, जर तुमच्या जवळ एखादे छोटे झाड असेल किंवा खजूराचे बीज असेल त्याला जमीनीमध्ये लावा. येथपावेतो की, या काळात भूकंपाचे झटके जरी येत असले तरी वृक्षारोपणाचे काम सोडू नका. त्यांनी निसर्गसंवर्धानाची सांगितलेली ही निकड आजच्या काळात तंतोतंत लागू होते. आज जगावर ग्लोबल वॉर्मिंगचे वादळ घोंगावत असून, त्याला थोपवायचे असेल तर वृक्ष लावणे आणि त्याचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे शहराध्यक्षा डॉ. सबिहा खान यांनी सांगितले.त्यांनी शिक्षणावर विचार व्यक्त करताना उमूमुल मोमीनीन हजरत आयशा ऱिज. यांच्या शैक्षणिक कार्याचे दाखले दिले. ओपन डिस्कशनमध्ये इरफ़ाना कुलसुम म्हणाल्या, आम्हाला सीरत (पैगंबर हज़रत मोहम्मद स.अ.व. यांचे जीवन चरित्र) चांगल्या प्रकारे समजून घेणे गरजेचे आहे. आम्ही पाहतो कि आजची युवा पीढ़ी सीरतच्या माहिती पासून पुष्कळ दूर आहे. सीरतच्या शिक्षणासाठी असे जलसे घेणे आवश्यक आहे.
अज़रा परवीन म्हणाल्या की, सीरतवर जागरूकता निर्माण करणे काळाची गरज आहे. प्रेषित सल्ल. यांच्या जीवनचरित्राचा विविधांगी अभ्यास करून त्यावर अनुकरण केले तर निश्चित आमच्यात अमुलाग्र बदल होवून आमची प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल. प्रारंभी सिरतुन्नबी विषयावर प्रश्नावली तयार करून परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत नफीसा कौसर प्रथम आली. द्वितीय तहूरा अंबर आणि तृतीय क्रमांक इफ्फत अहमद यांनी पटकाविला. विजेत्यांना ट्रॉफी आणि पुस्तके पारितोषिकाच्या स्वरूपात देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अफरोज अंजुम यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. प्रतियोगितामध्ये भाग घेणार्या सर्वांना प्रमाणपत्र आणि प्रशंसा पत्र देण्यात आले. स्थानीय अध्यक्षा जेबा खान यांनी आभार व्यक्त केले. इरफाना कुलसुम यांनी पवित्र कुरआन पठन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. अफरा खान यांनी नात पठण केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सबाहत फ़िरदौस यांनी केले. मोठ्या संख्येने मुली, स्त्रीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Post a Comment