Halloween Costume ideas 2015

आलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१५) सांगा, यापेक्षा अधिक चांगली वस्तू काय आहे, ते मी सांगू? जे लोक अल्लाहचे भय बाळगून वागतील, त्यांच्यासाठी त्यांच्या पालनकर्त्याजवळ उद्याने आहेत ज्यांच्याखालून कालवे वाहत असतील, तेथे त्यांना चिरकालीन जीवन प्राप्त होईल. पवित्र पत्नीं त्यांच्या सोबती असतील११ आणि ते अल्लाहच्या प्रसन्नतेने मान्यवर होतील. अल्लाह आपल्या दासांच्या वागणुकीवर कडक देखरेख ठेवतो.१२
(१६) हे ते लोक आहेत जे म्हणतात, ‘‘हे स्वामी, आम्ही श्रद्धा ठेवतो. आमच्या अपराधांबद्दल क्षमा कर आणि आम्हाला नरकाग्नीपासून वाचव.’’
(१७) हे लोक संयमी आहेत,१३ सत्यनिष्ठ आहेत, आज्ञाधारक व दानशूर आहेत, आणि रात्रीच्या अंतिम प्रहरी अल्लाहजवळ क्षमायाचना करीत असतात.
(१८) अल्लाहने स्वत: या गोष्टीची ग्वाही दिली आहे की त्याच्याशिवाय कोणीही ईश्वर नाही,१४ आणि फरिश्ते व सर्व ज्ञान राखणारेसुद्धा रास्त व न्यायनीतीने याची ग्वाही देतात की,१५ त्या प्रभावशाली बुद्धीमंताशिवाय खरे पाहता कोणीही ईश्वर नाही.
(१९) अल्लाहजवळ दीन (धर्म) केवळ इस्लामच१६ आहे. या ‘दीन’पासून दूर जाऊन जे विभिन्न मार्ग अशा लोकांनी अवलंबिले, ज्यांना ग्रंथ दिले गेले होते, त्यांच्या आचरणाचे कारण याशिवाय अन्य काही नव्हते, की त्यांनी ज्ञान पोहचल्यानंतर, आपापसात एकमेकांशी अतिरेक करण्यासाठी असे केले१७ आणि जो कोणी अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचनांचे पालन करण्यास नकार देईल, त्याचा हिशेब घेण्यास अल्लाहला विलंब लागत नाही.
११) तपशीलासाठी पाहा सूरह २ (अल्बकरा) टीप - २७
१२) अल्लाह अनुचित बक्षीस देणारा नाही आणि वरकरनी न्याय करणारा नाही. तो दासांच्या कर्मांना आणि संकल्पांना पूर्ण ओळखून आहे. अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो की दासांपैकी कोण बक्षिसपात्र आहे व कोण नाही.
१३) म्हणजे हे सत्यमार्गात पूर्ण दृढता दाखविणारे आहेत. हे एखाद्या संकटाने अथवा नुकसानीमुळे हिंमत सोडून देणारे नाहीत. अपयशाने यांचे मन कधीच खचत नाही की लालसेत पडून त्यांचे पाय डगमगत नाही. सफलतेची शक्यता वरकरनी दिसत नसतांनाही ते सत्यावर दृढ राहतात. (पाहा सूरह २ (अल्बकरा) टीप. ६०)
१४) म्हणजे अल्लाह जो सृष्टीच्या सर्व तथ्यांचे पूर्ण ज्ञान ठेवून आहे. त्याची ही साक्ष आहे. त्याच्या साक्षीपेक्षा विश्वसनीय व चश्मदीद (उघड) साक्ष कोणाची असू शकते की पूर्ण सृष्टीत अल्लाहशिवाय दुसरी अशी कोणतीच शक्ती अशी नाही की सत्ता नाही जी ईशत्वाच्या गुणांनी संपन्न असावी, जी ईशसत्तेचा मालक असावी आणि ईशाधिकारांसाठी पात्र असावी.
१५) अल्लाहनंतर सर्वाधिक विश्वसनीय साक्ष फरिश्त्यांची आहे. कारण ते सर्व सृष्टी व्यवस्थापनाचे कार्यकर्ते आहेत आणि ते आपल्या स्वत:च्या ज्ञानावरून ग्वाही देत आहेत की सृष्टी साम्राज्यात अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणाचाच आदेश चालत नाही आणि त्याच्याशिवाय दुसरे कोणतेच अस्तित्व असे नाही ज्याच्याशी धरती व आकाशांच्या व्यवस्थापनासंबंधी ते रूजू करतात. यानंतर निर्मितीपैकी ज्या कुणाला तथ्याचे कमी अधिक ज्ञान प्राप्त् आहे, त्या सर्वांची प्रारंभापासून ते आजतागायत सर्वसंमत साक्ष आहे की एकमेव अल्लाह या सृष्टीचा मालक, पालक व शासक आहे.
१६) म्हणजे अल्लाहजवळ मनुष्यासाठी केवळ एकच जीवनप्रणाली आहे आणि हीच एकमेव जीवनपद्धती योग्य आणि सत्य आहे. या जीवनप्रणालीचा मूळाधार एकेश्वरत्व आहे. एकमेव अल्लाहची भक्ती उपासना केली जावी व त्याच्या दास्यत्वात आणि आज्ञापालनात मनुष्याने स्वत:ला पूर्णत: समर्पित करावे. अल्लाहच्या उपासनेच्या आणि आज्ञापालनाच्या पद्धतीला स्वत:च्या मनाने शोधून काढू नये. अल्लाहने आपल्या पैगंबरांकरवी जे मार्गदर्शन पाठविले आहे, त्याला तसुभर कमीजास्त न करता अनुसरण करावे. याच चिंतन व कार्यप्रणालीचे नाव `इस्लाम'आहे. हे अगदी उचित आहे की सृष्टीनिर्माता अल्लाह आपल्या सृष्टीतील निर्मित मानवांसाठी `इस्लाम'व्यतिरिक्त दुसरी एखादी जीवनप्रणाली रद्दबातल ठरवितो. मनुष्य आपल्या मूर्खपणामुळे आपल्या स्वत:ला नास्तिकतेपासून ते अनेकेश्वरवादी तसेच मूर्तीपूजकांपर्यंत प्रत्येक विचारसरणीला आणि अनेक धारणांवर आचरण करण्यास वैध समजतो, परंतु सृष्टीसम्राट अल्लाहच्या दृष्टीने हा स्पष्ट विद्रोह आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget