Halloween Costume ideas 2015

काँग्रेस एक मुस्लिम पक्ष आहे का?

- राम पुनियानी 
आजकाल भाजपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांद्वारे एका गोष्टीचा एकसारखा प्रचार केला जात आहे की, काँग्रेस हा हिंदू विरोधी पक्ष आहे. प्रत्येक वेळी शक्य तेथे असे म्हटले जात आहे की, काँग्रेस ही सतत हिंदूचा अपमान करत आलेली आहे. मक्का मस्जिदच्या बॉम्बस्फोटाच्या घटनेमध्ये कोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष सोडल्यानंतर भाजपाच्या प्रवक्त्यांनी काँग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवत क्षमा मागण्याची मागणी केली. लगेच होऊ घातलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या संबंधाने भाजपाने त्या राज्यात काँग्रेसच्या कथित हिंदू विरोधी नितीचा भांडाफोड करण्यासाठी एक यात्रा काढण्याची घोषणा केली.काँग्रेस विरोधी दुष्प्रचार इतका शिगेला पोहोचलेला आहे की, सोनिया गांधी यांना काही दिवसांपूर्वी म्हणणे भाग पडले की, ’काँग्रेसला मुस्लिमांचा पक्ष म्हणून पाहिलं जात आहे.’
कुठल्याही विशिष्ट धार्मिक समुदायाच्या संदर्भात कुठल्याही पक्षाच्या धोरणाला आपण कशाप्रकारे पाहू शकतो? भाजपाने नियमित पद्धतीने हा प्रचार केला आहे की, तो हिंदू हितांचा रक्षक आहे. हे खरे आहे का? भाजपाने राममंदिर, पवित्र गाय, अनुच्छेद 370, लव जिहाद सारखे मुद्दे उचलले. सामान्य हिंदू माणसाला या मुद्यांपासून काही लाभ झाला का? या मुद्यांमुळे हिंदू शेतकरी, मजूर व दलितांची स्थिती सुधरली काय? यामुळे हिंदू महिलांवर होणारे अत्याचार कमी झाले काय? भावनात्मक मुद्दे उचलल्यामुळे हिंदूंना लाभ होतो हा दावा पोकळ आहे. उलट या मुद्यांमुळे जातीय ध्रुवीकरण वाढीस लागलेले आहे. समाजामध्ये घृणेचे विष कालवले जात आहे. हिंसा भडकविली जात आहे. या ध्रुवीकरण आणि हिंसेमुळे मुसलमानांबरोबर हिंदूचेही नुकसान झाले आहे. 
काँग्रेस हिंदू विरोधी असल्याच्या दाव्यामध्ये किती सत्यता आहे? हे पाहू. आपण मक्का मस्जिद स्फोटाचे उदाहरण घेऊ. याच घटनेसोबत मालेगाव स्फोटाची सुरूवातीला झालेली चौकशी जी हेमंत करकरेंनी केली होती आणि जे 26/11 च्या हल्ल्यात मारले गेले. स्वामी असिमानंद जो की, अनेक स्फोटांमध्ये प्रमुख आरोपी होता व त्याने न्यायाधिशासमोर आपला कबुलीजबाब स्वेच्छेने दिलेला होता आणि कायद्याच्या नजरेमध्ये पूर्णत: वैध होता. चौकशीमध्ये असे आढळून आले होते की, असिमानंद, साध्वी प्रज्ञा, लेफ्टनंट कर्नल पुरोहित इत्यादी या स्फोटांच्या मागे होते. भाजपा सरकारच्या मागच्या चार वर्षाच्या कार्यकाळात संबंधित संस्थांनी या प्रकरणांचा पाठपुरावा अशा प्रकारे केला की, हे सर्व आरोपी दोषमुक्त घोषित करण्यात आले आणि महाराष्ट्र एटीएसवर चुकीचा तपास केल्याचा आरोप लावण्यात आला. जेव्हा करकरे मालेगाव स्फोटाचा तपास करीत होते, त्यावेळेस ते इतक्या दबाखाली होते की, त्यांनी आपले एक भूतपूर्व वरिष्ठ अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्याकडे या दबावाचा सामना कसा करावा, यासंबंधी सल्ला मागितला होता. तेव्हा रिबेरो यांनी त्यांना सल्ला दिला होता की, दबावाकडे दुर्लक्ष करून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करा. 
जिथे काँग्रेसची प्रतिमा हिंदू विरोधी बनविण्यासाठी या प्रकारच्या मुद्दयांचा उपयोग केला गेला तिथे काँग्रेस ही मुस्लिम समर्थक आहे, अशी प्रतिमा तयार करण्यासाठी शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयांने दिलेल्या निर्णयाला काँग्रेसनी फिरवल्याचा दाखला दिला गेला. हा निर्णय बदलने निश्चित रूपाने चूक होती. तेव्हा काँग्रेसने मुस्लिमांच्या पुराणमतवादी आणि कट्टर गटासमोर समर्पण केले होते. यातही सामान्य मुसलमानांचा काही लाभ झाला नाही. भाजपने पुन्हा डॉ. मनमोहनसिंह यांच्या त्या वाक्याचीही पुनरूक्ती करून काँग्रेस ही मुस्लिमांची समर्थक असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. ज्यात मनमोहनसिंगांनी म्हटले होते, ”राष्ट्रीय संसाधनों पर मुसलमानों का पहिला अधिकार है” वास्तविक पाहता हे वाक्य सच्चर समितीच्या रिपोर्टच्या अनुषंगाने उच्चारले गेले होते. खरे पाहिले तर सच्चर समितीने मुस्लिमांच्या तुष्टीकरणाच्या धारणेला चुकीचे सिद्ध केले होते. समिती या निष्कर्षापर्यंत पोहोचली होती की, स्वातंत्र्यांनंतर मुस्लिमांच्या आर्थिक स्थितीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते आणि जातीय दंगलींमध्ये सर्वात जास्त त्यांचेच नुकसान झाले होते. समितीने हे ही म्हटलेले होते, एकमात्र स्थान जेथे मुस्लिम त्यांच्या लोकसंख्येच्या सरासरीपेक्षा जास्त होते ते स्थान म्हणजे तुरूंग होते. 
आपल्या देशात इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा ही नीति अवलंबविली होती. त्यामुळे देशाला बरेच काही भोगावे लागले होते. या देशाला धर्मनिरपेक्षतेच्या मार्गावर पुढे नेणे कधीच सोपे काम नव्हते. भारतात जनजागरणासोबत राष्ट्रवादाचा उदय झाला आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जन्माला आली. जी भारतातील सर्व धार्मिक समुहांचे प्रतिनिधीत्व करीत होती. काँग्रेसने 1887 च्या अधिवेशनात अध्यक्षपद बद्रुद्दीन तय्यबजींना दिलेले होते. काँग्रेसच्या अध्यक्षांमध्ये फारसी, ख्रिश्चन आणि हिंदूही सामील होते. त्या काळात काही मुस्लिम जातीयवादी काँग्रेसवर हिंदू समर्थक पक्ष होण्याचा आरोप लावत होते. दूसरीकडे हिंदू सांप्रदायिक तत्व काँग्रेस हिंदू हितांची किंमत चुकवून मुस्लिमांचे तुष्टीकरण करीत आहे, असा आरोप काँग्रेसवर लावत होते. काँग्रेसला नेहमी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायाच्या सांप्रदायिक तत्त्वांकडून हल्ले सहन करावे लागले. कारण ती भारतीय राष्ट्रवादाची समर्थक होती. काही त्रुटी वगळता सर्वसाधारणपणे काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेच्या नीतिचे पालन केले. मुस्लिम सांप्रदायिक पक्ष ज्यात मुस्लिम लीग सामिल होती ने काँग्रेसवर केेलेल्या सांप्रदायिकतेच्या आरोपाची परिनिती पाकिस्तानच्या निर्मितीमध्ये झाली. हिंदू सांप्रदायिक संगठन उदा. हिंदू महासभा आणि संघ दावा करीत होते की, गांधीनी मुस्लिमांचे तुष्टीकरण केले म्हणून मुस्लिम आपले डोके वर काढू शकले आणि पाकिस्तानची निर्मिती शक्य झाली. याच विचाराचा परिणाम म्हणून नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली. नथुराम गोडसे 1936 मध्ये हिंदू महासभेच्या पुणे शाखेचा सचिव नियुक्त केला गेला होता. कोर्टात आपल्या संबोधनात त्याने गांधींना पाकिस्तानच्या निर्मितीला जबाबदार ठरविले होते आणि म्हटले होते की, त्यांनी हिंदू हितांचा बळी देवून मुस्लिमांना डोक्यावर चढवून ठेवले होते. 
आज काँग्रेसला मुस्लिम पक्ष संबोधित करून त्यावर हल्ले केले जात आहेत. ते त्याच घटनाक्रमाची एक कडी आहे. जी हिंदू सांप्रदायिकवाद्यांनी सुरू केली होती. हिंदू महासभा, संघ आणि गोडसेचा विचार मागच्या काही दशकात अजून मजबूत झालेले आहेत. तसेच यातही कुठली शंका नाही की, स्वातंत्र्यानंतर मुस्लिमांची आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक स्थिती वाईट झालेली आहे आणि मागच्या चार दशकात तर आणखीन जास्त वेगाने त्यात भर पडलेली आहे. सत्ताधारी पक्ष केवळ भावनात्मक मुद्दे उचलत आहेत. ज्यामुळे अन्य समुदायांसोबत हिंदूचेही नुकसान होत आहे.
भारतात धर्मनिरपेक्षतेच्या मार्गावर चालणे अधिकाधिक कठिण होत आहे. गांधींना आपल्या धर्मनिरपेक्षतेचे मुल्य आपले प्राण देवून चुकवावे लागले. त्यांचे समर्पित शिष्य पंडित नेहरूंना धर्मनिरपेक्षतेच्या मार्गावर चालल्याच्या कारणावरून आज बदनाम केले जात आहे. मुस्लिम सांप्रदायवाद्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीचा आनंद साजरा केला होता. परंतु, आज त्या देशात न विकास आहे ना शांती. नेहरू, काँग्रेस आणि गांधींच्या नेतृत्वात भारत काही अंशी का होईना बंधुत्त्वाची स्थापना करण्यामध्ये यशस्वी झाला आहे आणि प्रगतीपथावर पुढे गेला आहे. काँग्रेसला मुस्लिम पार्टी आणि हिंदू विरोधी म्हणणारे लोक हे जातीयवादी आहेत. ज्यांना असे करण्यामध्ये स्वत:चा फायदा दिसतो आहे. आपल्या साऱ्या मर्यादा आणि त्रुटींचा विचार करून सुद्धा काँग्रेस धर्मनिरपेक्ष मुल्यांची रक्षा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे लक्षात आले आहे. (भाषांतर : इंग्रजीतून अमरिश हरदेनिया यांनी हिंदीत व हिंदीतून मराठीत एम.आय.शेख, बशीर शेख)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget