Halloween Costume ideas 2015
May 2018

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक १०४ जागा पटकावत सर्वात मोठा पक्ष बनला. दुसरीकडे सत्तास्थानी  असलेल्या काँग्रेसला मतदारांनी अनपेक्षितपणे धक्का दिला आहे. काँग्रेसला ७८ आणि निधर्मी जनता दलाला (निजद) ३८ जागा  मिळविता आल्या. केपीजेपी आणि एका अपक्ष उमेदवाराला विजय मिळविता आला आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी आवश्यक असणारा  ११३ हा जादुई आकडा पार करणे कोणालाही शक्य झालेले नाही. त्यामुळे राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी  आता सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला असून घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरू  असताना राज्यपाल वजुभाई वाला यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपालाच सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले. या निर्णयामुळे काँग्रेसने संताप व्यक्त   केला. काँग्रेसचे सर्व आमदार अज्ञातस्थळी रवाना झाले, घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने सावधगिरी पाळल्याचे म्हटले जाते. जनता  दल सेक्युलर (जेडीएस) चे नेता एच डी कुमारस्वामी यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना १०० कोटींची आणि मंत्रीपदाची ऑफर देत  असल्याचा भाजपवर आरोप केला. त्यामुळे घोडेबाजाराने किती उच्चांक गाठला आहे याची प्रचिती येते. जेडीएस आणि काँग्रेसमध्ये  युती झाली असू त्याच्याकडे बहुमत आहे. जेडीएसच्या आमदारांना फोडण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. देशात २०१९ साली होऊ  घातलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्या निवडणुकांत सत्तेचा वाटा मिळवण्यासाठी (की लचका तोडण्यासाठी?) आपल्या इथल्या  विविध राजकीय पक्षांचा हिडीस तमाशा सुरू झाला आहे. आपल्या देशात आपण संसदीय लोकशाही राज्यपद्धती स्वीकारून आता ७०  वर्ष झाली किंवा होतील. आपली राज्यपद्धती ब्रिटीशांच्या संसदीय राज्यपद्धतीवर आधारलेली आहे. पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक येते, पुन्हा भावनांना हात घालणारी भाषणे, जात किंवा धर्म धोक्यात आल्याचा बागुलबुवा पक्षाने ठोकल्या, की तेच मतदार पुन्हा तीच  चूक करतात आणि मग हाच खेळ पुन्हा पुढच्या पाच वर्षांसाठी सुरु होतो. राजकारण आणि सत्तेच्या खेळात संधिसाधू राजकारण  करताना मतदारांच्या कौलाचा काहीही विचार केला जात नाही. सोयीचे राजकारण करताना भाजपने नीतिमूल्यांची निर्लज्जपणे थडगी बांधून टाकली आणि या असल्या दळभद्री-सत्तांध राजकारणाचे बेशरमपणे समर्थनही केले आहे. पुरोगामी-प्रतिगामी, लोकशाही  विरोधी, लोकहितवादी, लोकसेवक, विकासाचे राजकारण या साऱ्या शब्दांचा आपल्याला हवा तसा अर्थ लावून जनतेची फसवणूक  करणाऱ्या याच सत्तांधांनी जनतेच्या आशा अपेक्षांचीही कशी होळी केली आहे. हे आपण गेली चार वर्षे उपभोगत आहोत. लोकसभा २०१९च्या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीकडे पाहिले गेल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  देशातील प्रमुख पक्ष असणार्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या दोघांनीही गेले काही दिवस कर्नाटकमध्ये ठाण मांडल्याचे बघायला  मिळाले. या निमित्ताने गेले काही दिवस तापलेले वातावरण, एकमेकांवर केले गेलेले दोषारोप, ओढलेले ताशेरे, या निमित्ताने  वृत्तवाहिन्यांवर झडलेल्या चर्चा यातच मागचे काही दिवस सरले. ही निवडणूक म्हणजे काँग्रेससाठी क्षीण झालेली शक्ती पुन्हा  मिळवण्याचा प्रयत्न होता तर भाजपसाठी विजयाची खंबीर पाश्र्वभूमी तयार करण्याचा कसोशीचा प्रयत्न होता. त्यामुळेच या  राज्याच्या निवडणुकीचा ज्वर देशभर जाणवला. या निवडणुकांच्या निमित्ताने आपणही असा प्रयत्न पाहिला. यावेळी ५६ इंच छाती असणाऱ्यांची जीभही घसरली आणि कारकिर्दीच्या प्रारंभीच्या टप्प्यात असणाऱ्या नेतृत्वाने स्वत:च्या तोंडाने आपल्याला पंतप्रधान  बनण्याची इच्छा असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिल्याचीही चांगलीच चर्चा झाली. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता होती. विधानसभा  निवडणुकीत काँग्रेस विरोधी लाटेचा भाजपला फायदा झाला. कर्नाटकात १९ टक्के मुस्लिम, १८ टक्के एससी, एसटी,१७ टक्के  लिंगायत आणि १२ टक्के वोक्कलिंग समाजाची मते आहेत. ही जातनिहाय आकडेवारीही काँग्रेससाठीच अनुकुल असताना प्रत्यक्षात  भाजप तेथे वरचढ ठरली याचाच अर्थ आता जातनिहाय गणिते मांडून निवडणुकांचे भाकित करण्याचा जमाना गेला आहे. गोवा,  मेघालय अशा ठिकाणी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने जी तत्परता दाखवली, चपळाई दाखवली ती पाहता  कर्नाटकातही त्याचीच पुनरावृत्ती करणे हा बहुमत न मिळाल्यास भाजपचा पर्याय असू शकतो. लोकशाहीबद्दलचा आदर, धर्म आणि  राज्यसंस्थेच्या कार्यकक्षा विभिन्न असल्याबद्दलची श्रद्धा (आपल्याकडे सेक्युलर या संकल्पनेचे वाटेल तसे अर्थ काढले जातात) आणि  परस्परांचा आदर राखत शांततापूर्वक सहजीवनाचे मूल्य न रुजलेला हा समाज पुन्हा गुलामगिरीच्या बेड्यात कसा अडकेल?  याबाबतची चिंता पूर्वीच्या धोरणी हितचिंतकांना होती. दुर्दैवाने त्यांच्या या सावधानतेच्या इशाऱ्याकडे तेंव्हा दुर्लक्ष झाले. ज्याची  फलनिष्पत्ती म्हणून काही मूठभर स्वार्थी धोरणी लोकांनी लोकशाहीच्या प्रारूपाशी केलेला व्यवहार आजच्या पिढ्यांना सोसावा लागत  आहे. 
-शाहजहान मगदुम
(मो. ८९७६५३३४०४  Email: magdumshah@gmail.com)

शिरूर : साहित्य संमेलनासारख्या उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांचे भावीविश्वही समृद्ध बनते असे प्रतिपादन पहिल्या एकता मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूरचे विभागीय सचिव शशिकांत हिंगोणेकर यांनी केले. शिरूरकासार सारख्या गावात एकता विचार मंचने संमेलनाचे यशस्वीरीत्या आयोजन करून एक आदर्श निर्माण केला आहे. या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीच्या माध्यमाने संमेलनाध्यक्ष प्रा. सय्यद अलाउद्दीन यांच्या हस्ते झाली. या वेळी नगराध्यक्ष रोहीदास पाटील, रा. काँ. च्या ज्येष्ठ नेत्या चंपावती काकी पानसंबळ, जि. प. सदस्य शिवाजी पवार, पं. स. सभापती प्रतिनिधी निवृत्ती बेदरे, सुप्रसिद्ध साहित्यिक बाबाराव मुसळे, पत्रकार विजयकुमार गाडेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
    एकता विचार मंचचे अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड यांच्या 'अंदमानचा प्रवास' या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. स्वच्छतादूत कु.योगीता गवळी हीला एकता विचार मंचच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना अनंत कराड यांनी केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.सविताई गोल्हार यांनी गावोगावी अशा साहित्य संमेलनाच्या आयोजनाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
    प्रा. डॉ. भास्कर बडे, राजेंद्र धोंडे, रामदास बडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश टाक, युवाकवी युवराज वायभासे यांची समायोजित भाषणे झाली. संमेलनाध्यक्ष प्रा. सय्यद अलाउद्दीन यांच्या उत्साहपूर्ण भाषणाने उपस्थितांची मने जिंकली.
    संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेला 'लेखक आपल्या भेटीला' हा कार्यक्रम ज्येष्ठ लेखक बाबाराव मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यानंतर नागेश शेलार यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेल्या कविसंमेलनाचे बहारदार सुत्रसंचलन कवी अनंत कराड यांनी केले.
    संमेलनाच्या यशस्वीतेसाठी हरीप्रसाद गाडेकर, शिवलिंग परळकर, बाळासाहेब बोराडे, काशिनाथ शिंदे, राजेश बीडकर, लखुळ मुळे, अ‍ॅड. भाग्यश्री ढाकणे, मनोज कुलकर्णी, सिद्धार्थ सोनवणे, महेश नागरे, ज्ञानेश परदेशी, नितीन कैतके, उद्धव परदेशी, रामेश्वर गोसावी, अस्मिता जावळे, अशोक भांडेकर, बबनराव देशमुख, युवराज सोनवणे, चंद्रकांत राजहंस, मल्हारी आघाव, अनिलसिंह तिवारी, दत्ता शिंदे, संतोष गायके यांनी परिश्रम घेतले.

कोल्हापूर- आपल्या देशात धर्माच्या नावाखाली सुरु असलेले प्रकार गंभीर आहेत, पण  त्यासाठी धर्म संस्काराच्या मूळ पायाला दोष न देता धर्माचे मानदंड आणि त्यातील सत्यनिष्ठा या गोष्टी विवेकाच्या पातळीवर तपासून घेण्याची वेळ आली आहे. आपण जितके मानवतावादी, विश्वात्मक होऊ तितकेच आपले प्रबोधन सत्यनिष्ठ  होईल, असा विश्वास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला. तसेच पुरोगामी चळवळ यशस्वी होण्यासाठी सर्व क्षेत्रातील विचारवंतांनी योगदान दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
     कोल्हापूर येथील शिवाजी पेठेत शिवाजी मंदिरात८व्या प्रबोधनवादी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन गोवा विद्यापीठातील माजी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. आनंद पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी साप्ताहिक करवीर काशी चे संपादक सुनीलकुमार सरनाईक, डॉ. जे. बी.शिंदे, मिरासाहेब मगदूम, हसन देसाई, प्राचार्य दिनकर खाबडे,प्राचार्य जी. पी. माळी, पी. बी. पोवार, प्रा.टी.एस.पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.
    डॉ. सबनीस म्हणाले, हिंदू धर्मात क्रौर्य व हिंसाचाराला स्थान नाही, तर हिंदु धर्म सर्व धर्म समभाव व सहिष्णुता मानतो, पण मनुवादी इतर धर्माचा द्वेष करायला शिकवतात, सानेगुरुजी जगावर प्रेम करायला सांगतात,येशू खिस्त यांनी शत्रूवरही प्रेम करा म्हणून सांगितले, आपल्या संतांनी जातीभेदाचा निषेध केला, पण संताना जातीच्या चौकटीत बंदिस्त केले आहे. महापुरुषांनाही जात चिकटवून मर्यिादत केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून नवे पर्व निर्माण केले पण सयाजीराव गायकवाड महाराज, छत्रपती शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, साने गुरुजी यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यात दिलेल्या योगदानाचे विस्मरण होते, पुरोगामी चळवळीला हे मारक आहे.
     यावेळी संमेलनाचे उदघाटक गोवा विद्यापीठ चे माजी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. आनंद पाटील म्हणाले, मनुवादी संस्कृती ने स्वत:च्या फायद्याचे शिक्षण दिले,केवळ ब्राम्हण आहे म्हणून त्याला महत्त्व देऊन इत्तरांचे शोषण करण्याची संस्कृती निर्माण केली. ग गवतातला शिकवण्याऐवजी ग गणपती असे शिकवले. क करवतातला न म्हणता क कमळातला सांगितले, संपूर्ण शिक्षण पध्दती कुचकामी केली व त्यामुळे बिनकामाच्या,ऐतगब्बू भटजींना बारा महिने बीनकष्टाचे भरपूर पैसा मिळण्याची सोय झाली.
      प्रास्ताविक डॉ. जे.बी.शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन राजेंद्र बळवंत यांनी ,तर आभार प्रदर्शन विशाखा जितकर यांनी केले.
       यावेळी डॉ. जयश्री चव्हाण, बाबुराव शिरसाट, गुलाब अत्तार,अशोक चौगुले व शिवप्रेमी शाहीर मिलिंद सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
     समारोपाच्या सत्रात डॉ. सुभाष देसाई, लक्ष्मण मोहिते यांनी विचार मांडले. तर प्रा.नवनाथ शिंदे यांनी गौतम बुद्ध यांच्या जीवनावर एकपात्री प्रयोग सादर केला.

    माननीय नवास बिन समआन (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अंतिम निवाड्याच्या दिवशी कुरआन आणि कुरआनवर ईमान बाळगणारे जे त्याचे अनुसरण करीत होते अल्लाहपाशी आणले जातील आणि सूरह बकरा व सूरह आलिइमरान संपूर्ण कुरआनचे नेतृत्व करत आपले अनुसरण करणाऱ्यांसाठी अल्लाहपाशी शिफारस करतील की हा मनुष्य आपली कृपा व मोक्षाचा हक्कदार आहे म्हणून त्याच्यावर कृपावर्षाव व्हावा.’’ (हदीस : मुस्लिम)
    माननीय उबैदा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे कुरआनवर ईमान बाळगणाऱ्यांनो! कुरआनला लोड बनवू नका आणि रात्री व दिवसा त्याचे योग्य प्रकारे पठण करा आणि त्याच्या पठण व शिक्षणास प्रथा बनवा आणि त्याच्या शब्दांचे योग्य पद्धतीने वाचन करावे आणि जे काही कुरआनात सांगितले आहे उपदेश प्राप्त करण्याच्या उद्देशाने त्यावर लक्षपूर्वक विचार करावा जेणेकरून तुम्हाला सफलता प्राप्त व्हावी. आणि त्याद्वारे जागतिक परिणामाची इच्छा न बाळगता अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी त्याचे पठण करा.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : कुरआनला लोड न बनविणे म्हणजे त्यापासून गाफील राहू नये आणि शेवटच्या शब्दाचा अर्थ आहे की कुरआनचे ज्ञान प्राप्त करून त्यास जागतिक प्रतिष्ठा व ऐशोआराम आणि धनसंपत्ती प्राप्त करण्याचे साधन बनवू नये. जसे एका हदीसमध्ये सूचना करण्यात आली आहे की काही लोक कुरआनचे ज्ञान प्राप्त करून त्यास भौतिक संपत्ती प्राप्त करण्याचे साधन बनवितील.
    माननीय अबू ़जर गिफारी (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे गेलो. मी म्हणालो, ‘‘काही उपदेश करावा.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहच्या संयमाचा अवलंब करा. ही गोष्ट तुमच्या संपूर्ण ‘दीन’ व सर्व व्यवहारांना योग्य स्थितीत ठेवणारी आहे.’’ मी म्हणालो, ‘‘आणखी काही सांगावे.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘स्वत:ला कुरआनचे पठण आणि अल्लाहची भक्ती व महिमागान निरंतर करीत राहा तेव्हा अल्लाह तुमची आकाशात आठवण करील आणि जीवनातील अंधकारात तुमच्यासाठी प्रकाशाचे काम करील.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : ‘अल्लाह आठवण करील’चा अर्थ आहे की अल्लाह तुम्हाला विसरणार नाही. तुम्हाला आपल्या संरक्षणात ठेवील. अल्लाहचे महिमागान आणि कुरआनच्या पठणाने मोमिनला प्रकाश मिळतो. जीवनातील अंधकारांत मोमिन योग्य मार्ग प्राप्त करतो.
    माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जसा लोखंडाला पाण्यामुळे गंज चढतो तसा हृदयालादेखील गंज चढतो.’’ विचारण्यात आले, ‘‘कोणत्या गोष्टीमुळे हृदयाचा गंज नष्ट केला जाऊ शकतो?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘हृदयाचा गंज अशाप्रकारे नष्ट केला जाऊ शकतो की मनुष्याने मृत्यूची खूप आठवण करावी आणि दुसरे असे की कुरआनचे पठण करावे.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : ‘मृत्यूची आठवण करणे’ म्हणजे मनुष्याचे याचा विचार करावा की जीवनाची अवधी फक्त एकच अवधी आहे. दुसऱ्यांदा अंमलबजावणी करण्यासाठी अवधी मिळणार नाही. ‘तिलावत’ (कुरआन पठण करणे) म्हणजे कुरआनच्या शब्दांचे योग्य पद्धतीने वाचन करणे आणि त्यात जे काही सांगितले आहे ते समजून घेणे आणि त्याचे अनुसरण करणे. पवित्र कुरआन आणि अहादीसमध्ये ज्या ज्या ठिकाणी या शब्दाचा पूर्ण अर्थ सांगितला गेला आहे तेथे हेच सांगितले आहे. तसेच आणखी एकेठिकाणी असा अर्थ सांगितला आहे की कुरआनचा प्रचार करा, त्यास दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा.

ऐच्छिक व मध्यरात्रीनंतरची नमाज
    माननीय अबू ज़र गिफारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की अल्लाह म्हणतो, ‘‘जो मनुष्य माझ्याकडे वीतभर येतो मी त्याच्याकडे हातभर जातो आणि जो माझ्याकडे हातभर सरसावतो मी त्याच्याकडे दोन हात सरसावतो आणि जो माझ्याकडे पायी चालत येतो मी त्याच्याकडे धावत येतो.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : जो मनुष्य आपली आकांक्षा व सामथ्र्याने अल्लाहच्या मार्गावर चालण्याची इच्छा बाळगतो तेव्हा अल्लाह त्याचा तो प्रवास सुलभ करतो. अल्लाहचा दास त्याच्याकडे सरसावतो तेव्हा त्याच्यात दुर्बलता असल्यामुळे अल्लाह त्याच्यावर दया करतो आणि पुढे येऊन त्याला आपल्या जवळ करतो; जसे एखादे बाळ आपल्या पित्याकडे सरसावतो परंतु आपल्या दुर्बलतेमुळे पोहोचू शकत नाही तेव्हा त्याचा पिता त्याच्याकडे धावून येतो आणि त्याला कडेवर घेतो आणि आपल्या कुशीत घेतो.

(२६) सांगा, ‘‘हे अल्लाह समस्त राज्याच्या स्वामी! तू हवे त्याला राज्य देतोस व हवे त्याकडून हिरावून घेतोस. हवे त्याला प्रतिष्ठा प्रदान करतोस व हवे त्याला अपमानित करतोस. कल्याण तुझ्याच अखत्यारित आहे. नि:संशय, तू प्रत्येक गोष्टीला समर्थ आहेस.
(२७) तू रात्रीला दिवसात ओवीत आणतोस आणि दिवसाला रात्रीत, निर्जिवातून सजीवास बाहेर काढतोस व सजीवातून निर्जिवास आणि ज्याला इच्छितोस त्याला उदंड उपजीविका देतोस.२४
(२८) श्रद्धावानांनी, श्रद्धावानांना सोडून अश्रद्धावानांना आपला मित्र-सोबती व साहाय्यक मुळीच बनवू नये. जो असे करील त्याचा अल्लाहशी काही संबंध नाही. होय, त्यांच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी सकृतदर्शनी जर तुम्ही अशी कार्यपद्धती अवलंबिली तर ती क्षम्य आहे.२५ परंतु अल्लाह तुम्हाला आपले स्वत:चे भय दाखवितो आणि तुम्हाला त्याच्याकडेच परत जावयाचे आहे.२६
(२९) हे नबी! लोकांना माहिती करून द्या की, तुमच्या मनात जे काही आहे त्याला गुप्त ठेवा अथवा प्रकट करा प्रत्येक स्थितीत अल्लाह ते जाणतो, पृथ्वी व आकाशामधील कोणतीही वस्तू त्याच्या ज्ञानकक्षेबाहेर नाही आणि त्याची सत्ता प्रत्येक वस्तूवर प्रभावी आहे.
(३०) तो दिवस उगवणार आहे, जेव्हा प्रत्येक सजीवाला आपल्या कृतीचे फळ उपलब्ध असल्याचे आढळेल मग त्याने पुण्य केले असो अथवा पाप. त्या दिवशी मनुष्य अशी कामना करील की, किती छान झाले असते, जर हा दिवस अद्याप त्याच्यापासून फार दूर असता! अल्लाह तुम्हाला आपल्या स्वत:चे भय दाखवतो आणि तो आपल्या दासांचा अत्यंत हितचिंतक आहे.२७

२४)     जेव्हा मनुष्य एकीकडे अवज्ञाकारी आणि नकार देणाऱ्यांकडे पाहतो आणि त्यांच्या या जगातील भरभराटीकडे पाहतो; तसेच दुसरीकडे ईमानवंतांच्या आज्ञापालनाकडे पाहतो आणि त्यांचे या जगातील हालअपेष्टा, दारिद्र्य, निर्धनता आणि अनेक दु:ख आणि अडचणींना पाहतो. ज्यात आदरणीय पैगंबर मुहम्मद (स.), सहाबा (रजि.), हि. सन ०३ आणि निकटच्या काळात ईमानवंत लोक ग्रस्त होते. ही स्थिती पाहून स्वाभाविकच त्यांच्या मनात न्यूनगंडाने अनेक प्रश्न घोळू लागतात. म्हणून अल्लाहने येथे मनुष्याला उत्तर दिले आहे आणि तेसुद्धा अत्यंत सूक्ष्म शैलीत ज्याच्या सूक्ष्मतेपेक्षा अधिक सूक्ष्मतेचा विचारच केला जाऊ शकत नाही.
२५)     म्हणजेच एखादा ईमानवंत एखाद्या इस्लामविरोधी गटात फसला आणि त्याला त्यांच्या अन्याय व अत्याचाराची भीती असेल तर त्याला आपल्या ईमानला लपविण्याची परवानगी आहे. विरोधी लोकांत अशाप्रकारे तो राहू शकतो जसा त्यांच्यापैकीच एक तो आहे. तो मुस्लिम असल्याचे उघड झाले तर आपल्या प्राण रक्षणासाठी अनेकेश्वरवादीशी मैत्रीपूर्ण नीतिप्रदर्शन करू शकतो. अत्यंत बिकट स्थितीत मुस्लिमाला (सहनशक्ती तितकी नसेल तर) धर्मविरोधात बोलण्याचीसुद्धा परवानगी आहे.
२६)     म्हणजे माणसांची भीती तुमच्या मनात एवढे घर करून बसू नये की अल्लाहचे भय मनातून नष्ट व्हावे. माणसं जास्तीतजास्त तुमचे ऐहिक जीवन बिघडवू शकतात, परंतु अल्लाह तुम्हाला शाश्वत कोपग्रस्त करू शकतो. म्हणून आपल्या बचावासाठी मजबुरीच्या स्थितीत विरोधकांशी वाटाघाटी कराव्या लागल्या तर तेसुद्धा इस्लामी चळवळ आणि इस्लामी हित तसेच मुस्लिमांच्या वित्त व जीवाचे रक्षण करून तुम्ही आपल्या वित्त व जीवाचे रक्षण करू शकता. परंतु खबरदार! इस्लामविरोधी आणि धर्मविरोधकांची अशी कोणतीच सेवा तुमच्या हातून घडू नये, ज्यामुळे इस्लाम विरोधात वृद्धी होईल आणि मुस्लिमांवर विरोधक प्रभावी होतील. जाणून असा की आपण स्वत:ला वाचविण्यासाठी तुम्ही अल्लाहच्या दीन (धर्म) ला, अथवा मुस्लिमांना, िंकवा एका मुस्लिमालाही नुकसान पोचविले अथवा अल्लाहच्या विद्रोहींची खरी सेवा केली तर अल्लाहच्या पकडीतून तुम्ही वाचू शकणार नाहीत. तुम्हाला सरतेशेवटी त्याच्याचकडे रुजू व्हायचे आहे.
२७)     म्हणजे तो तुमचा महान हितैषी आहे की तुम्हाला वेळेपूर्वी त्या कर्मापासून सावध करीत आहे जे तुमच्या दुष्परिणामास कारणीभूत ठरू शकतात.

लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीच्या कालावधीत राजकीय पक्षांद्वारे सर्वसामान्यपणे राष्ट्रहित व जनहिताशी संबंधित मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. सन २०१४ ची लोकसभा निवडणूकदेखील मागील यूपीए सरकारच्या तथाकथित निष्क्रियता, त्यांच्या कारकिर्दीतील भ्रष्टाचार, गुन्हे, महिला सुरक्षा, बेरोजगारी आणि महागाई यासारख्या मुद्द्यांवर लक्ष्य केंद्रित करून लढविण्यात आली होती. विरोधी पक्ष एनडीएद्वारा भाजपच्या नेतृत्वाखाली जनतेला अनेकानेक दिवास्वप्ने दाखविण्यात आली होती. जनतेने त्यांच्या आश्वासनांना बळी पडून त्यांच्या हातात सत्ता सोपविली होती. मात्र सत्ताधारी रालोआ सरकारचा चार वर्षांचा कालावधी लोटला तरी जनतेला देण्यात आलेल्या आश्वासनांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. या आश्वासनांबद्दल सरकारला विचारण्यात आले असता संभाषणाची दिशाच बदलण्यात येते. देशातील जनतेला देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे निवडणुकीतील मुद्द्यांना बगल देणे अथवा वास्तविक व जनसमस्यांशी संबंधित मुद्द्यांचे परिवतर्थन भावनात्मक मुद्द्यांमध्ये करणे हे स्वच्छ राजकारण होऊ शकते काय? अथवा अशा प्रकारच्या भावनात्मक व जनसमस्यांशी संबंध नसलेल्या मुद्द्यांमुळे देशातील नागरिकांचे व राष्ट्राचे भले होऊ शकते काय? असा प्रश्न पडतो. गरीब जनता, कामगार अथवा शेतकऱ्यांच्या हितांचा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना अथवा एखाद्या समाजावर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध बोलणाऱ्यांना उत्तर देण्याऐवजी किंवा त्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी व्यवस्थेकडून नक्षलवाद्यांचे अथवा दहशतवाद्यांचे समर्थक ठरविले जाते. जर एखाद्याने देशात वाढत्या असहिष्णुतेची गोष्ट केली, एखाद्या राजकीय पक्षाने अल्पसंख्यकांच्या हिताची गोष्ट केली अथवा त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत आपले विचार व्यक्त केले तर त्याला राष्ट्रविरोधी वा पाकधार्जिणे ठरविले जाते. जर एखाद्या संघटनेने अथवा नेत्याने सर्व धर्म व जातींना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या सेक्युलर विचारधारेला हिंदूविरोधी ठरविण्यात येते. सत्तेत येऊन चार वर्षे लोटली तरी देण्यात आलेल्या आश्वासनांचे काय झाले? असा प्रश्न जर सत्ताधाऱ्यांना विचारण्यात आला तर उत्तर मिळेल की नेहरू-गांधी परिवाराने देशाला बरबाद केले आहे आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष जबाबदार आहे. सन २०१४ च्या निवडणुकीपूर्वी दोन कोटी प्रति वर्ष रोजगारनिर्मिती केली जाईल असे आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना बेरोजगारीच्या बाबतीत प्रश्न विचारण्यात आला तर ते सल्ला देतात की सरकारी वा खासगी वंâपन्यांमध्ये नोकरी मिळविणे हाच फक्त रोजगार नसून तुम्ही भजी-चहा-पान विका, हादेखील रोजगारच आहे. दुसरीकडे त्याचबरोबर साधूसंत, प्रवचनकार, डेरा-आश्रम संचालकांना मंत्री, खासदार व आमदार बनविले जात आहे. उत्तर प्रदेशसारखे सर्वांत मोठे राज्य तर बाबाजींच्या हवाली करण्यात आले आहे. देशाच्या लोकसभेतदेखील सत्ताधारी पक्षाचे अनेक साधूसंत आपल्या धार्मिक वेशभूषेत दिसून येतात. निश्चितच असे वाटू लागले आहे की आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत अशा बुवाबाबांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी पाच बाबांना मंत्रीपदाचा दर्जा व मंत्र्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा देऊन त्यांना सन्मानित केले. घर-कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांना तिलांजली देऊन जे लोक त्यागी, तपस्वी, महात्मा वा धर्मोपदेशक बनतात ते किती शिकलेले असतात अथवा आपल्या जबाबदाऱ्या पार पाण्यात किती सक्षम असतात हे सांगण्याची गरज नाही. सध्या सुरू असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय पक्षांच्या नेत्यांद्वारे जनतेला भूलथापा ऐकवून दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे नेतेगणांचा वाचाळपणा अगदी चव्हाट्यावर आलेला आहे. निवडणुकच्या प्रचारादरम्यान भाषणबाजीचा स्तर दिवसेंदिवस घसरत चालला आहे. नेतागण एकमेकांवर खासगी प्रहार करू लागले आहेत. आपली निष्क्रियता लपविण्यासाठी दुसऱ्यांना अपमानित करणे आणि तुच्छ ठरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आजदेखील काँग्रेसचा विरोध करून आणि नेहरूंना अर्वाच्च बोलून मत मागण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या मोहम्मद अली जिन्ना यांच्या नावावरून विनाकारण वादविवाद सुरू केला जात आहे त्या जिन्नांच्या मजारचे दर्शन घेण्यासाठी भाजपचेच लोहपुरुष लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या लवाजम्यासह पोहोचले होते. त्या वेळी कोणीही अडवाणींच्या विरूद्ध धरना-निरदर्शने केली नव्हती. यांना गांधी, नेहरू, जिन्ना असे सर्व शत्रू वाटतात. त्यांचे संस्कार व त्यांचा आदर्श विभाजनकारी आहे, समाजाला धर्म व जातीच्या आधारावर दुफळी माजविणारा आहे. त्यांचे विचार व आचरण शेतकरी, कामगार व महिलाविरोधी आहेत. आजचे सत्ताधारी जनतेला तोंड दाखविण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत. म्हणून ते जनता व राष्ट्राच्या विकास व प्रगती आणि देशाची एकता व अखंडतेशी संलग्न मुद्द्यांना निवडणूक प्रचारातील मुद्दे न बनविता त्यांचे विकृतीकरण करण्यात मग्न आहेत.
-शाहजहान मगदुम

‘होय काँग्रेसचे हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले आहेत’ असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  सलमान खुर्शीद यांनी गेल्या महिन्यात केलं. खरं पाहिल्यास या विधानात स्फोटक असं काहीच नव्हतं, कारण काँग्रेसने मुस्लिमांचं नुकसान केलंय ही भावना आता प्रबळ झाली आहे. त्यामुळे यावर बोलावं का, नको; हादेखील एक भाग आहे. पण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधणारे हे भाषण होतं. त्यामुळे त्याला गंभीरपणे घेणे गरजेचं वाटतं. आरोप करून संधी गमावण्यापेक्षा मार्ग काढून कल्याण साधता येईल का? याची चाचपणी करण्याची ही वेळ आहे.
अलिगड विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात सलमान खुर्शीदनी वरील दाहक सत्याची अनावधाने कबुली दिली. एका प्रश्नांचं उत्तर देताना त्यांनी उपप्रश्नांला लागूनच ते ‘होय’ म्हणाले. सलमान खुर्शीद यांचं विधान कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आलं आहे, ज्या वेळी काँग्रेस ‘हार्ड’ हिंदुत्वकडे कूच करायला लागलं आहे, त्या वेळी खुर्शीदनी हे भाषण दिलं. साहजिकच या भाषणामुळे काँग्रस अडचणीत येणार होतं, त्यामुळे काँग्रेसने 'पक्षात वेगळा विचार आम्ही पोसतो' म्हणत वाद टाळला. पण खुर्शीद आपल्या विधानावर अजूनही ठाम आहेत. परंतु हा प्रश्न जैसे थेच राहतोय, त्यामुळे टीका करून काही होणार नाहीये.
स्वातंत्र्याच्या गेल्या ७० वर्षांत मुस्लिम समाजाने काँग्रेससोबत इमान राखून वाटचाल केली. फाळणीनंतर ‘मुस्लिम लीग’च्या जमातवादी धोरणामुळे मुस्लिम तुच्छतावाद व भेदभावाच्या परिस्थितीला सामोरं गेला. फाळणीच्या जखमा अंगावर झेलून ‘कुठल्याही परिस्थिती’त इथंच राहायचं, ही भावना अंगी बाळगून दिवस ढकलत आला. मौलाना आझाद यांनी सांगितल्याप्रमाणे या काळात मुस्लिम समुदायाने धार्मिक कर्तव्य म्हणून काँग्रेसची सेवा केली. कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसची पाठ सोडली नाही. महात्मा गांधीनंतर मौलाना आझाद व पंडित नेहरुंचे नेतृत्व स्वीकारून त्याने आपले प्रश्न काँग्रेसकडून सोडवून घेण्याची आशा बाळगली. 
इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या निर्णयातही मुस्लिम खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिला. इव्हन संजय गांधींच्या कुटुंबनियोजनाच्या सक्तीनंतर काही जण नाराज झाले, पण त्यांनीही काँग्रेसचं नेतृत्व अमान्य केलं नाही. आणीबाणीनंतर जनता पक्षाचं सरकार आलं, त्यानंतर काँग्रेसने मुस्लिमविरोधात सूडबुद्धीचं राजकारण केलं हे सर्व ज्ञात आहे. याच द्वेशापोटी इंदिरा गांधींनी उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांच्या विरोधात वक्तवे केली होती. परिणामी आसाममध्ये मुस्लिमांचे हत्याकांड घडले, पुस्तकात दडलेल्या इतिहासातून अशी माहिती मिळते की, या हत्याकांडात तब्बल साडे तीन हजार मुस्लिम मारले गेले. असो. जनता पक्षाकडून पुन्हा सत्ता हस्तगत करण्यासाठी काँग्रेसने थेटपणे हिंदुत्वाची लाईन घेतली. भाजपने स्थापनेनंतर ऐंशीच्या दशकात राम मंदिराचा मुद्दा हिंदू अस्मितेचा प्रश्न म्हणून बळकट केला. तीच लाइन काँग्रेसने मतांच्या राजकारणासाठी स्वीकारली, यात गैर असं काहीच नव्हतं. पण हिंदुत्वाआड मुस्लिमांशी राजकीय व सामाजिक भेदभाव केला गेला.
राजीव गांधी सरकारच्या काळात भाजपने राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला. शाहबानो प्रकरणानंतर भाजपने ‘मुस्लिमांचा अनुनय’ म्हणत काँग्रेसची प्रतिमा मलीन केली. देशभर काँग्रेस व मुस्लिमविरोधात आगपाखड सुरु केली. काँग्रेसला हिंदू मते निसटण्याची भीती वाटली. असं सांगितलं जातं की शाहबानो प्रकरणात मुस्लिमांनी काँग्रेसला अडचणीत आणलं होतं, त्याचा सूड उगवण्यासाठी काँग्रेसने थेटपणे ‘प्रो हिंदुत्व’ आणि ‘अ‍ॅण्टी मुस्लिम’ लाइन स्वीकारली. काँग्रेसने बाबरी मस्जिदीचं कुलूप तातडीने उघडण्याचा आदेश दिला. हा प्रसंग देशभर दूरदर्शनवरुन दाखवण्यात आला. साहजिकच याचे पडसाद मुस्लिम समुदायात उमटले. यातून १९८७ साली बिहारच्या भागलपूर, हाशीमपुरा आणि मलियाना भागात दंगली उसळल्या. दोन महिने चाललेल्या या दंगलीत तब्बल एक हजार मुस्लिम मारले गेले आणि ५० हजारापेक्षा जास्त संख्येने विस्थापित झाले. एकट्य़ा बिहारमध्ये ही अवस्था होती, तर देशभराची काय असेल?
नरसिंह राव सरकारपर्यंत मुस्लिमांची काय स्थिती होती, हे आता वेगळे काही मांडायची गरज नाही. ज्येष्ठ पत्रकार प्रभाष जोशी यांच्या ‘लोक का प्रभाष’ या पुस्तकात काँग्रेसच्या मुस्लिमविरोधी धोरणांचा पर्दाफाश केला आहे. काँग्रेसने राम मंदिर आणि बाबरीचा मुद्दा कसा पेटत ठेवला याचं काळं सत्य प्रभाष जोशींनी मांडलं आहे. असो. नुकतच गुजरात आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा सॉफ्ट हिदुत्वाची लाइन स्वीकारली. भाजपचे मुस्लिमद्वेष व सांप्रदायिक राजकारण सुरु असताना काँग्रेसने ही भूमिका घेणे साहजिकच मुस्लिमांना पचनी पडले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मुस्लिम समुदाय हवालदिल झाला आहे.
बाबरी पतनानंतर प्रथमच मुस्लिम समुदायाने काँग्रेसचे नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. मुंबई दंगल, गुजरातचे हत्याकांड, मुझफ्फरनगर, कोक्राझार इत्यादी दंगली, काँग्रेसच्या कार्यकाळात घडल्या. या दंगलीतील पीडितांना नुकसानभरपाई तर सोडाच पण दंगलीच्या आरोपींना मोकाट सोडलं गेलं. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या विखारी धोरणांचा मुस्लिम बळी ठरला. गुजरात दंगलीनंतर मुस्लिम नेतृत्वाला खूश ठेवण्यासाठी काँग्रेस सरकारने २००४ साली सच्चर समितीची घोषणा केली.
देशभरातील मुस्लिम समुदायाचा वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून न्या. राजेद्र सच्चर समितीने अवघ्या २० महिन्यांत हा रिपोर्ट सरकारच्या टेबलावर ठेवला. कमिटीच्या शिफारसी बाजूला ठेवून सरकारने मुस्लिमांसाठी १५ कलमी कार्यक्रम घोषित केला. या घोषणेनंतर भाजपने काँग्रेसवर ‘मुस्लिम अनुनया’चा आरोप करत मुस्लिमविरोधी वातावरण तयार केलं. या आरोपाला प्रशासकीय पातळीवर काँग्रेस उत्तर देऊ शकलं नाही. तसंच आपल्या १० वर्षांच्या कार्यकाळात सच्चर समितीच्या शिफारशी बासनात गुंडाळून ठेवल्या. दुसरा मह्त्वाचा मुद्दा म्हणजे दहशतवाद काँग्रेसच्याच काळात फोफावला, ज्यात मुस्लिम समुदाय भरडला गेला. दहशतवादाच्या आरोपातून अनेक निष्पाप मुस्लिम तरुण जेलमध्ये टाकण्यात आली. प्रकाश बाळ यांनी नुकताच ‘राईट अँगल्स’ या वेबपोर्टलवर लिहिलेल्या एका लेखात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात कशा पद्धतीने मुस्लिम तरुणांना अडकवलं गेलं याचा खुलासा केला आहे.
हा रक्तरंजीत इतिहास उगाळायचा नव्हता, पण घटनाक्रम सांगणे महत्त्वाचं होतं. स्वातंत्र्याच्या गेल्या सत्तर वर्षांत मुस्लिमांनी काँग्रेससोबत राहून काय गमावलं याचं मोजमाप केलं तर भेदभाव व विश्वासघाताचा पारडा जड होईल. गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेस मुस्लिमविरोधी आहे हा प्रचार राबविला जात आहे. मुस्लिम नेत्यासोबत सामाजिक संघटना, सो कॉल्ड पुरोगामी संस्थानिक यांनी हा प्रचार सतत राबविला. मुस्लिमद्वेषासाठी प्रसिद्ध असलेला भाजपही यात मागे नव्हता. 
काँग्रेसला व्हिलेन ठरवून प्रत्येकांनी आम्ही तुमचे नेतृत्व करू अशी स्वप्नं दाखवली. यात सो कॉल्ड पुरोगामी संघटना सर्वात पुढे होत्या. या संघटनांनी मुस्लिम समाजात नवे नेतृत्व उदयास येऊ दिलं नाही. इतर सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षानेदेखील तेच केलं. परिणामी अंनिस, सेवा दल, डाव्या चळवळी, समाजवादी कंपूत मुस्लिम ओढला गेला. कित्येक वर्षांपासून संधी व नेतृत्वाची वाट पाहात मुस्लिम अजूनही तिकडेच तिष्ठत आहे, म्हणजे तिकडेही त्याच्या पदरी विश्वासघातच आला. दुसरीकडे बामसेफ, रिपब्लिकन, एमआयएम, आप सारख्या तिसऱ्या आघाड्यांच्या मागे लागून त्याने आपली राजकीय कुवत नष्ट करून घेतली आहे. द्रमुक, टीएमसी, राष्ट्रवादी, समाजवादी, जनता दल, राजदमध्ये शिळ्यापाक्यावर गुजराण करून क्षणिक आनंद मिळवू लागला...
एकीकडे काँग्रेसने भाजपला कम्युनल करून त्याची भीती मुस्लिमात बसवली, तर दुसरीकडे भाजपने मुस्लिमविरोधी म्हणून काँग्रेसला हिणवलं. अशा द्विधा मनस्थितीत मुस्लिम गुंतला गेला. इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती मुस्लिम समाजातील झाली आहे. काँग्रेसला हे ठाऊक आहे की मुस्लिम आपल्यशिवाय इतरत्र जाणार नाही. त्यासाठी त्याने पाहिजे त्या अस्त्राचा वापर केला. जुने आरोप-प्रत्यारोप उगाळण्याची ही वेळ नाहीये. कुठलाच राजकीय पक्ष मुस्लिमांसाठी कल्याणकारी धोरण राबवणारा नाहीये. कुठल्याही राजकीय पक्षाला मुस्लिम नको आहेत, पण त्यांची निर्णय बदलणारी मते सर्वांना हवीय. अशा अवस्थेत जुना राग आवळण्यापेक्षा आहे ती परिस्थिती दुरुस्त करण्याची वेळ आहे.
भाजपसोबत मुस्लिम समुदाय जाणार नाही ही ‘पत्थर की लकीर’ आहे. मग तो कुणासोबत जाणार? प्रश्न ग्राह्य आहे. यात दोन गोष्टी आहेत. एकतर मुस्लिमांनी काही काळासाठी राजकारण बाजूला ठेवावं आणि फक्क नि फक्त शिक्षणावर भर द्यावा किंवा दुसरा पर्याय म्हणजे काँग्रेससोबत थेटपणे ‘व्यावसायिक डील’ करावी. अधिकृत समझोता करून लोकसंख्येनुसार मुस्लिमांना प्रतिनिधित्व आणि कल्याणकारी योजना राबविण्याची हमी घेऊन करारपत्र करावं. काहींना हा विचार आदर्शवत किंवा भिकारछाप वाटू शकतो. पण गावातील स्थानिक निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात आठवून बघा. त्या अशाच पद्धतीने डील करून लढविल्या जातात. या निवडणुकात सर्वच जाती-समुदायाकडून सर्रास अशी डील केली जाते. मग लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ती का शक्य नाहीये. केवळ उमेदवारी अर्ज मागे घेऊन भरमसाठ निधी लाटून व्यक्तिगत विकास साधण्यापेक्षा ही समाजहिताची ‘व्यवसायिक डील’ लाख पटीने चांगली.

- कलिम अजीम, अंबाजोगाई
(सौजन्य: नजरिया)

आज भारतीय समाज इतका दूषित, विकृत व द्वेषमूलक झाला आहे की ५-६ वर्षांच्या निरागस, निष्पाप बालिकेपासून ६०-७० वर्षांच्या आजीबाईचीही इज्जत, सन्मान सुरक्षित राहिलेला नाही. कार्यालय, शाळा, महाविद्यालय आणि बिकाऊ सौंदर्यबाजारच नव्हे तर अत्यंत सुरक्षित असे स्वत:च्या घराच्या चार भिंतीही महिलांसाठी सुरक्षित राहिलेल्या नाहीत. हे कटू सत्य आहे. लोकांची मानसिकता इतकी विकृत की ज्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये बलात्कार, विनयभंग वा लैंगिक शोषणाशी संबंधित भडक बातम्या नसतील, तर वर्तमानपत्र वाचण्यात लोकांना मजा येत नाही. ते म्हणतात, आज पेपरमध्ये विशेष काही नाही. याचे मूळ कारण म्हणजे पुरुषांची भोगवादी वृत्ती.
लैंगिक शोषण-
काही गोष्टी अशा आहेत की ज्या लाख प्रतिबंधानंतरही पूर्णत: रोखून धरता येत नाहीत. शरीरसुख ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्यात बिघाड झाल्यास ती विकृत ठरते आणि सभ्य समाजाच्या संस्कृतीस बाधा ठरणारी दाहकता ठरते. आम्ही सर्वांनीच २००२ सालच्या गुजरातच्या जातीय दंगली स्तब्धपणे पाहिल्या. सरकारप्रायोजित या दंगलीत मुस्लिम गर्भार स्त्रीच्या पोटात त्रिशूळ खुपसून झालेल्या पाशवी हिंसा असो वा जातीय उन्माद असो, नुकताच कठुआमध्ये ६ वर्षांच्या आसिफाचे मंदिरात सामुहिक बलात्कार व थंड डोक्याने केलेली हत्या असो, या साऱ्यांचा मक्ता घेतला आहे तथाकथित संस्कृतीरक्षक ठेकेदारांनी. जागतिकीकरणाच्या वरवंटा बाजारपेठेतील विकाऊ वस्तू ठरली आहे. महिलांचा ना स्वत:च्या श्रमावर ताबा ना त्यांच्या शरीरावर. महिलांच्या श्रम, मन, शरीर आणि सन्मानावर फक्त पुरुषांचा ताबा. मग तो जातीचा, धर्माचा, कुटुंबीय, शेजारी वा परका असो. या जागतिकीकरणाच्या जात्यात महिला इतक्या भरडल्या जात आहेत की मानवतेलाच काळिमा फासणाऱ्या घटना सर्रास व बेधडकपणे होत आहेत.
आसाराम आणि रामरहीम सारखे बाबा स्त्रियांना फक्त मादी समजून भोगत आहेत. निश्चितच हा पुरुषसत्तेचाच घेरा आहे. या घेऱ्यात बाई म्हणजे एक भोगवस्तू हा मनुमताचा जयजयकार घुमत आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची आजीवन कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या आसारामच्या बातम्या आश्रमाबाहेर आल्या आणि त्याने व त्याच्या आंधळ्या भक्तगणांनी काय समर्थन केले? आसाराम म्हणजे कृष्णाचा अवतार, प्रतिकृष्णच? म्हणून तो अशा रासक्रीडा करणारच. त्यात गैर काय आहे?
कठुआ, उन्नाव, सूरत अशा विविध ठिकाणी बलात्काराच्या घृणास्पद घटना घडल्यानंतर भारतीय समाजाच्या सर्व स्तरांतून संतापाची तीव्र प्रतिक्रिया उमटली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कामगार व रोजगारमंत्री संतोष गंगबार यांनी अकलेचे तारे तोडताना सांगितले की भारतासारख्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक-दोन घटना घडल्या म्हणून इतका गदारोळ कशासाठी माजविता?
भारत जगात तीन नंबरी बलात्कारी देश-
भारत जागतिकीकरणाच्या विळख्यात गेला आणि देशातील सब कुछ बदलून गेले. भौतिक समृद्धीसह येथे जीवनाचा वेग भयानकपणे वाढला. त्याने नातेसंबंध उद्ध्वस्त केले. मानसामाणसांत वैर निर्माण झाले. त्यात महिला, दलित व मुस्लिमांच्या अत्याचारात बेसुमार वाढ झाली. संयुक्त राष्ट्र, यू.एन.ओ., क्राइम ट्रेंडस् सर्वे २०१० च्या अहवालानुसार, भारत बलात्कार प्रकरणांत जगात तिसऱ्या स्थानावर असल्याचे स्पष्ट झाले. अमेरिकेत ८५ हजार ५९३ बलात्कारांची नोंद झाली, ब्राझीलमध्ये ४१ हजार १८० प्रकरणे नोंदविली गेली. भारतात २२ हजार १७२ प्रकरणे नोंदविण्यात आली.
स्त्री-स्वातंत्र्य : पाश्चात्य कल्पना-
पाश्चात्य भांडवलदारांनी स्त्री-स्वातंत्र्याचा सिद्धान्त मांडून तो सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात पुरुषापेक्षा किंचितही कमी नाही. ती प्रत्येक बाबतीत स्वतंत्र व स्वावलंबी आहे. ही कल्पनाच मुळात स्त्री-हृदयास भुरळ पाडणारी आहे. स्त्रीने झपाट्याने ही कल्पना हृदयाशी कवटाळली. हळूहळू ती आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात पुरुषांबरोबर सामील होत गेली. तिचे अस्तित्व प्रत्येक जीवनक्षेत्रात आवश्यक समजले गेले. तिच्या या स्वैर स्वातंत्र्यामुळे पाश्चात्यांचे संपूर्ण जीवन चुकीच्या मार्गी लागले. कुटुंबसंस्था, विवाहसंस्था उद्ध्वस्त झाल्या.
लैंगिक स्वैराचार-
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री-पुरुषाच्या स्वैर व स्वतंत्र देवाणघेवाणीमुळे लैंगिक स्वैराचाराची मानसिकता बळावली आहे. या स्वैराचाराने सार्वजनिक रूप धारण केले. यामुळे एक निर्लज्ज संस्कृतीने जन्म घेतला. हिच्या विषारी प्रभावाने नैतिकतेची पुâलबाग जळून भस्म झाली. आज लाजलज्जा, नैतिकता टाहो फोडत राहिली आहे.
इतिहास साक्ष आहे, जेव्हा जेव्हा स्त्रीने आपले घर सोडून चारचौघांत आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन केले, तेव्हा स्वैराचाराने उग्र रूप धारण केले. कला व संस्कृतीतून लैिंगक भावना व्यक्त होऊ लागल्या. विवस्त्र छायाचित्रे, मूर्ती तयार होत गेल्या. नाचगाण्यांतून स्त्रीदेहाचे हिडीस अवडंबर सुरू झाले. कथा, नाटक, गाणी, चित्रपट आदी माध्यमांतून लैंगिकतेच उदात्तीकरण झाले. पोर्नोग्राफी जगातील सर्वांत फायदेशीर उद्योग ठरू लागला. राहिली कसर इंटरनेटने पूर्ण केली. दारू, व्याज आणि शरीरसुखाचा खुबीने वापर करून स्त्री ही पुरुषाच्या हातातील खेळणे झाली. या उचापतीचा एकच उद्देश... पुरुषाची लैंगिक तृष्णा भागविणे. 
इस्लामी मार्गदर्शन-
अशा नाजूक व कठीण परिस्थितीमध्ये इस्लाम आपले मार्गदर्शन करतो. तो स्त्रीचे मूलभूत अधिकारही प्रदान करतो आणि तिच्या विकासाची जबाबदारीही घेतो. इस्लाम स्थिर परिवारास समाजाच्या अस्तित्वासाठी आवश्यक समजतो कारण परिवाराच्या मुळावरच समाज उभारलेला आहे. ‘परिवाराचे स्थैर्य म्हणजेच समाजाचे स्थैर्य आणि परिवाराचे विघटन म्हणजेच समाजाचे विघटन’ असे समीकरण इस्लामने मांडले आहे. सुसंस्कृत आणि सत्शील जीवन हे समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.
ला तकरबुज्जिनाह-
‘व्यभिचाराच्या जवळ जाऊ नका. ही उघड निर्लज्जता आहे व अतिशय वाईट मार्ग आहे.’’ (दिव्य कुरआन, १७:३२)
पवित्र कुरआनमधील ही आयत चारित्र्यसंपन्नतेचे महत्त्व विषद करते. या आदेशामध्ये व्यभिचार करू नका असे सांगितले नाही तर व्यभिचाराच्या जवळही जाऊ नका, अशी सक्त ताकीद करण्यात आली आहे. व्यभिचार ही एक अत्यंत निर्लज्जपणाची कृती आहे. निर्लज्जपणासंबंधी कुरआनचा आदेश आहे-
‘‘निर्लज्जतेच्या गोष्टीजवळ जाऊ नका.’’ (दिव्य कुरआन, ६:१५१)
निर्लज्जता अध:पतनाकडे नेणारी पहिली पायरी आहे. व्यभिचार मानवी समाजास व मानवास सर्वनाशाकडे नेतो. समाजाच्या स्वास्थ्याचा पाया कुटुंबच असतो. नैतिक समाजाच्या उभारणीसाठी कुरआनने सर्वप्रथम पुरुषांना आदेश दिला आहे,
‘‘हे पैगंबर (स.)! श्रद्धावंत पुरुषांना सांगा की त्यांनी आपल्या नजरा खाली ठेवाव्यात. (आपल्या दृष्टीची जपणूक करावी) व आपल्या लज्जास्थानाचे संरक्षण करावे. ही त्यांच्यासाठी अधिक पवित्र पद्धत आहे.’’ (दिव्य कुरआन, अन्नूर-३०)
यात पुरुषांना आज्ञा दिली आहे की त्यांनी इतर स्त्रियांचे चेहरे न्याहाळू नयेत. नजरा या कामवासनेस प्रेरक असतात व कामवासना निर्लज्जतेस प्रवृत्त करते. इस्लाममध्ये स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणे, स्त्रियांकडे डोकावून पाहणे निषिद्ध ठरविले आहे. म्हणून स्वच्छ, शुद्ध व नैतिक आचरणासाठी प्रत्येकाने आपल्या नजरेवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. भिरभिरणारी नजर कुलक्षणी मानली जाते. कामवासनेने स्त्रियांडे पाहणे म्हणजे डोळ्यांचा व्यभिचार होय. लज्जारक्षणाचे संरक्षण करणे म्हणजे अनैतिक कामापासून दूर राहणे.
यानंतर स्त्रियांना आदेश देण्यात आला,
‘‘हे पैगंबर (स.) श्रद्धावंत स्त्रियांना सांगा की त्यांनी आपल्या नजरा झुकलेल्या ठेवाव्यात. (आपल्या दृष्टीची जपणूक करावी) आपल्या लज्जास्थानांचे संरक्षण करावे, आपला साजशृंगार दर्शवू नये. याशिवाय जो सहजासहजी प्रकट होईल आणि आपल्या छातीवर दुपट्ट्याचे पदर टाकावेत, त्यांनी आपला शृंगार प्रकट करू नये. त्यांनी आपले पाय जमिनीवर आपटत चालू नये की जेणेकरून त्यांनी जो आपला शृंगार लपविलेला आहे त्याचे ज्ञान लोकांना होईल.’’ (दिव्य कुरआन, अन्नूर-३न्नजरा खाली ठेवाव्यात याचा अर्थ परपुरुषाकडे रोखून पाहू नये, आपली लज्जास्थाने दिसतील अथवा रेखांकित होतील अशा रितीने कपडे वापरू नयेत. शरीराची कमनीयता दृगोचर होऊ नये. आपल्या पोषाखामुळे तिच्या शालीनतेला धक्का पोहोचता उपयोगी नाही. पती, वडील, भाऊ, जवळचे नातेवाईक सोडून परपुरुष ज्यांच्या बाबतीत मर्यादाभंग होणार नाही याची काळजी घ्यावी.
व्यभिचाऱ्यांना शिक्षा-
पवित्र कुरआनमध्ये सूरह अन् नूर या अध्यायाच्या पहिल्याच आयतीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे,
‘‘हा एक अद्याय आहे जो आम्ही अवतरला आहे आणि याला आम्ही अनिवार्य ठरविला आहे आणि यात आम्ही सुस्पष्ट उपदेशपर वचने अवतरली आहेत. कदाचित तुम्ही बोध घ्यावा.’’
म्हणजे सदरच्या अध्यायात ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या केवळ शिफारसी म्हणून नव्हे. मनात आले तर मानव्यात अन्यथा वाटेल ते करीत राहावे. असे नाही तर या निश्चितस्वरूपी व त्याचे पालन अनिवार्य आहे. जर तुम्ही ईमानधारक असाल तर त्यांचे अनुकरण करणे तुमचे कर्तव्य ठरते.
व्यभिचारासारखी अमानवी कृती घडू नये म्हणून कुरआनने या अध्यायात अत्यंत कठोर शिक्षेचे आदेश दिलेले आहेत.
‘‘व्यभिचारी पुरुष आणि व्यभिचारी स्त्री, दोघांनाही प्रत्येकी शंभर फटके मारा. आणि त्यांची कीव करू नका. अल्लाहच्या धर्णाच्या बाबतीत जर तुम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाह आणि अंतिम दिनावर श्रद्धा बाळगत असाल. आणि त्यांना शिक्षा देतेवेळेस श्रद्धावंतांचा एक समूह उपस्थित राहावा.’’
म्हणजे शिक्षा उघडपणे सर्वांसमक्ष दिली जावी जेणेकरून गुन्हेगारांची फटफजीती आणि इतर लोकांसाठी धडा आणि बोधप्रद ठरावी तसेच या गुन्ह्याचा मानवी समाजावर फैलाव होऊ नये.
सामूहिक उत्पाताचा निर्मूलन-
‘‘आणि सावध राहा त्या उपद्रवापासून ज्याचा दुष्परिणाम फक्त त्याच लोकांपर्यंत मर्यादित राहणार नाही, ज्यांनी तुम्हांपैकी पाप केलेले असेल, आणि जाणून असा की अल्लाह कठोर शिक्षा देणारा आहे.’’ (दिव्य कुरआन, अनफाल-२५)
आपण ज्या समाजात राहतो त्यातील काही लोक जर काही उपद्रव निर्माण करीत असतील तर ते मुळातच दाबले पाहिजेत. त्यासाठी सर्व समाजाने अतिशय जागरूक राहिले पाहिजे. आपला काय त्याच्याशी संबंध? असे म्हणून डोळेझाक करता उपयोगी नाही. नाहीतर कदाचित त्या उपद्रवापासून मोठा विघातक उद्रेक होऊन उपद्रव निर्माण करणाऱ्यालाच नव्हे तर समस्त समाजालाच जबरदस्त झळ बसू शकते. थोडक्यात, समाजातील सर्वांनीच आपले कान व डोळे उघडे ठेवून वावरले पाहिजे. म्हणजे उपद्रवी लोकांची उपद्रव निर्माण करण्याची हिंमतच होणारन नाही आणि सर्व समौजास सुरक्षितता लाभेल.
कुरआनचा बोध-
संस्कार-सुसंस्कार, आचारविचार, चारित्र्यसंपन्नता, मानसिक-आध्यात्मिक विकास आणि नैतिकता-मानवता, ही आपण शिक्षणाची उद्दिष्टे मानतो. याच सर्व गोष्टींवर कुरआनात भर दिलेला आहे. मानवाला खरोखरीच जर ऐहिक व पारमार्थिक जीवनात सफल व्हायचे असेल तर त्याने अंधश्रद्धेने कुरआनचे केवळ पठण करणे उपयोगाचे नाही तर त्याने जिज्ञासू वृत्तीने ही ईशवाणी अभ्यासली पाहिजे आणि आत्मसात केली पाहिजे. तेव्हाच तो उत्तम कुटुंबप्रमुख, तिपात, भाऊ, पुत्र, उत्तम शेजारी, जबाबदार नागरिक बनू शकतो. या शिकवणीवर चालणारी स्त्री अथवा पुरुष ऐहिक व पारलौकिक सफल जीवनासाठी प्रशिक्षित होऊ शकतो यात शंका नाही. यात कोणतेही अवघड असे तत्त्वज्ञान नाही तर अत्यंत साध्या, सोप्या व सुलभ भाषेत, अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला सहज समजेल व आकलन होईल असे मार्गदर्शन आहे. खुद्द कुरआन याची साक्ष देतो.
‘‘आम्ही कुरआनास उपदेश मानण्याकरिता सोपे बनविले आहे. तर आहे कोणी उपदेश प्राप्त करणारा.’’ (दिव्य कुरआन, ५४:२२)
कुरआनचा बोध मानवी जीवनाशी सर्वार्थाने निगडीत आहे. सर्वस्पर्शी आहे. मानवी जीवनाची एकही बाब अशी नाही जिला याने स्पर्श केलेला नाही. ईशमार्गदर्शन समजून त्यानुसार आचरण करण्याची सद्बुद्धी ईश्वर आम्ही सर्वांना देवो, हीच प्रार्थना!

- वकार अहमद अलीम

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तो मनुष्य ज्याला अल्लाहने मोठे आयुष्य प्रदान केले, इतकेच काय तो ६० वर्षांच्या वयापर्यंत पोहोचला (आणि तरीही तो सदाचारी बनू शकला नाही) तेव्हा अल्लाहपाशी त्या मनुष्याकडे काही बोलायला बाकी उरणार नाही.’’ (हदीस : बुखारी)
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी लोकांना संबोधित करताना सांगितले, ‘‘अल्लाहपासून पूर्णत: लज्जित व्हा.’’ आम्ही विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! अल्लाहची कृपा आहे की आम्ही अल्लाहपासून लज्जित होतो.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहशी लज्जित होण्याचा अर्थ एवढाच नसून अल्लाहपासून पूर्णत: लज्जित होण्याचा अर्थ आहे की तू आपले मष्तिष्क आणि मष्तिष्कात येणाऱ्या विचारांवर देखरेख ठेवावी आणि पोटात जाणाऱ्या अन्नाची देखरेख करीत राहावे आणि मृत्यूच्या परिणामस्वरूप सडण्याची व नष्ट होण्याची आठवण ठेवावी.’’ (त्यानंतर पैगंबर म्हणाले,) ‘‘आणि जो मनुष्य परलोकाला पसंत करणारा असेल तो जगातील सजावट व शृंगार सोडून देतो आणि प्रत्येक क्षणी परलोकाला जगाऐवजी प्राधान्य देतो, तोच मनुष्य खऱ्या अर्थाने अल्लाहपासून लज्जित होतो.’’ (हदीस : तिर्मिजी)
माननीय अबू अय्यूब अंसारी (रजि.) यांच्या कथनानुसार, एक मनुष्य पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! मला अत्यल्प व परिपूर्ण उपदेश करावा.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘जेव्हा तुम्ही आपली नमाज अदा करण्यासाठी उभे राहाल तेव्हा त्या मनुष्यासारखी नमाज अदा करा जो जग सोडून जाणार आहे आणि आपल्या तोंडाने असे शब्द बोला जर अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याचा हिशोब घेण्यात आला तर तुमच्यापाशी काही सांगण्यास उरणार नाही आणि लोकांजवळ जी काही संपत्ती व मालमत्ता आहे त्यापासून तुम्ही पूर्णत: बेपर्वा राहा.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : जो मनुष्य या जगातून जात असेल आणि तो जीवंत राहू शकणार नाही याची त्याला खात्री पटली असेल तो मनुष्य अतिशय नम्रपणे नमाज अदा करील. त्याचे लक्ष पूर्णत: अल्लाहकडे असेल आणि नमाज अदा करताना जगाच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये त्याचे मन भटकत राहणार नाही.
मनुष्याचे बोलणे जर सत्याविरूद्ध असेल आणि मनुष्याने आपल्या या जगातील जीवनात त्याबद्दल क्षमा मागितली नाही तर हिशोबाच्या वेळी त्याच्याजवळ काही बोलण्यास आणि विवशता सादर करण्यास काहीही उरणार नाही हे उघड आहे. शेवटच्या शब्दाचा अर्थ आहे की लोकांची धनसंपत्तीच्या आधिक्क्यावर ईष्र्या करू नका कारण ती संपुष्टात येणार आहे. जोपर्यंत जगाबद्दल मनुष्यामध्ये निस्पृहता निर्माण होत नाही तोपर्यंत परलोकाच्या शिखरांपर्यंत त्याची दृष्टी जाऊ शकत नाही.
माननीय अबू बऱजा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अंतिम निवाड्याच्या दिवशी मनुष्याकडून जोपर्यंत पाच गोष्टीचा हिशोब घेतला जात नाही तोपर्यंत तो अल्लाहच्या न्यायालयातून बाहेर पडू शकणार नाही. त्याला विचारले जाईल की आयुष्य कोणत्या गोष्टींमध्ये व्यतीत केले? ‘दीन’चे ज्ञान प्राप्त केले असेल तर त्याचे किती प्रमाणात अनुसरण केले? धन कोठून कमविले? आणि कोठे खर्च केले? शरीराला कोणत्या कामात झिजविले? (हदीस : तिर्मिजी)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्या प्रवाशाला आपण वाटेतच राहू आणि निश्चितस्थळी वेळेवर पोहोचू शकणार नाही याचे भय वाटत असेल, तो रात्री न झोपता रात्रीच्या सुरूवातीलाच आपला प्रवास सुरू करतो. असे करणारा निश्चितस्थळी वेळेवर सुखरूप पोहोचतो. ऐका! अल्लाहची संपत्ती मोठ्या प्रमाणात लाभेल. ऐका! अल्लाहचा माल नंदनवन (जन्नत) आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : आपल्या मूळ हकीगतीच्या दृष्टिकोनातून मानव प्रवासी आहे आणि परलोक त्याची खरी मातृभूमी आहे, येथे तो कमाई करण्यासाठी आला आहे. आता ज्यांना आपली खरी मातृभूमी आठवते, ते जर सुखरूपपणे आपल्या मातृभूमीस पोहोचू इच्छित असतील आणि मार्गातील अडथळे पार करून पोहोचले तर त्यांनी बेपर्वा न राहता आपला प्रवास सुरू करावा अन्यथा जर ते झोपत राहिले तर त्यांना पश्चात्ताप होईल. मग ज्याने अल्लाहची प्रसन्नता व बक्षिसाचे घर ‘जन्नत’ प्राप्त करण्याचे निश्चित केले असेल तर त्याला ज्ञात असावे की तो व्यापाऱ्याने फेकून दिलेला माल जो क्षुल्लक किमतीला विकला असावा आणि एखाद्याने तो घ्यावा. अल्लाहचा माल प्राप्त करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल, मोठ्या कसोटीला सामोरे जावे लागेल. तो माल प्राप्त करण्यासाठी आपल्या काळ व मालाचे, शरीर व प्राणाचे बलिदान द्यावे लागेल. तेव्हाच ती गोष्ट प्राप्त होईल जी मिळाल्यामुळे मनुष्य आपला सर्व प्रकारचा त्रास विसरून जाईल.

(२०) आता हे पैगंबर (स.)! हे लोक जर तुमच्याशी भांडण करतील तर त्यांना सांगा, ‘‘मी आणि माझ्या अनुयायांनी तर अल्लाहसमोर मान तुकविली आहे.’’ मग ग्रंथधारक व बिगर ग्रंथधारी दोघांना विचारा, ‘‘काय तुम्हीही त्याची आज्ञाधारकता व दास्यत्व स्वीकारले?’’१८ जर त्यांनी स्वीकारले तर त्यांना सरळमार्ग प्राप्त झाला. जर त्यापासून पराङ्मुख झाले तर, तुमच्यावर फक्त संदेश पोहचविण्याची जबाबदारी होती. पुढे तर अल्लाह स्वत:च आपल्या सर्व दासांचे व्यवहार पाहणारा आहे. 
(२१) जे लोक अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचना मान्य करण्यास नकार देतात आणि त्याच्या पैगंबरांना हकनाक ठार करतात आणि अशा लोकांच्या जीवावर उठतात जे मानवमात्रापैकी न्यायनीती व रास्तपणाचा आदेश देण्याकरिता पुढे येतात, त्यांना दु:खदायक शिक्षेची शुभवार्ता ऐकवा.१९/
(२२) हेच ते लोक होत ज्यांची कर्मे इहलोकात व परलोकात, दोहोंमध्ये वाया गेली२० आणि त्यांचा साहाय्यक कोणी नाही.२१
(२३) तुम्ही पाहिले नाही की, ज्या लोकांना ग्रंथाच्या ज्ञानातून काही भाग मिळाला आहे, त्यांची अवस्था काय आहे? जेव्हा त्यांना अल्लाहच्या ग्रंथाकडे बोलाविले जाते, याकरिता की त्याने त्यांच्या दरम्यान निर्णय द्यावा,२२ तेव्हा त्यांच्यापैकी एक गट त्याला बगल देतो व त्या निर्णयाकडे येण्यापासून विमुख होतो.
(२४) त्यांची ही वर्तणूक या कारणास्तव आहे की, ते म्हणतात नरकाग्नी तर आम्हाला स्पर्शदेखील करणार नाही. आणि नरकाची शिक्षा मिळालीच, तर फक्त काही दिवस.२३ त्यांच्या मनघडत श्रद्धांनी त्यांना त्यांच्या धर्माच्या बाबतीत भयंकर चुकीच्या समजुतीत गुंतविले आहे.
(२५) मग काय ओढवेल त्यांच्यावर, जेव्हा आम्ही त्यांना त्या दिवशी एकत्र करू, ज्या दिवसाचे आगमन निश्चित आहे? त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीला तिच्या कमाईचा बदला पुरेपूर दिला जाईल व कोणावरही अत्याचार होणार नाही.


१८) दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास ``मी आणि माझे अनुयायांनी तर अल्लाहसमोर मान तुकविली आहे.'' म्हणजे इस्लामला मान्य केले आहे जो अल्लाहचा मूळ धर्म ईशप्रदत्त आहे. आता तुम्ही दाखवून द्या की तुम्ही आपल्या स्वत:च्या आणि पूर्वजांच्या मनगढंत विचारसरणी आणि आस्थांवर चालण्याऐवजी या सत्य आणि मूळ जीवनप्रणाली (इस्लाम) कडे येणार आहात का?
१९) ही व्यंगपूर्ण वर्णनशैली आहे. ते आज आपल्या कर्मावर अतिप्रसन्न आहेत आणि समजून आहेत की स्वत: फार चांगले काम करत आहेत. त्यांना दाखवा की तुमच्या कर्माचे हे फलित आहे.
२०) म्हणजे त्यांनी आपले प्रयत्न आणि सामथ्र्य अशा मार्गात खर्च केले ज्याचे फळ याजगात आणि पारलौकिक दोन्ही जीवनात वाईटच आहे.
२१) म्हणजेच कोणतीच शक्ती अशी नाही जी यांच्या चुकीच्या आणि वाईट प्रयत्नांना सफल बनवू शकेल. किंवा कमीतकमी वाईट परिणामांपासून त्यांना वाचवू शकेल. ज्या ज्या शक्तींवर हे लोक विश्वास व श्रद्धा ठेवतात की ते सर्व या जगात आणि परलोकात अथवा दोन्ही ठिकाणी त्यांच्या मदतीला येतील, खरे त्यांच्यापैकी कोणीच यांची मदत करू शकणार नाही.
२२) म्हणजे त्यांना सांगितले जात आहे की अल्लाहच्या ग्रंथाला अंतिम प्रमाण मान्य करा. त्याच्या निर्णयापुढे नतमस्तक व्हा. जे काही त्यानुसार सत्य आहे ते सत्य माना आणि त्यानुसार जे असत्य आहे त्यास असत्य माना. स्पष्ट आहे की येथे अल्लाहचे ग्रंथ म्हणजे तौरात आणि इंजिल आहेत. `ग्रंथाच्या ज्ञानातून काही भाग प्राप्त् करणारे' म्हणजे खिश्चन आणि यहुदी धार्मिक विद्वान लोक आहेत.
२३) म्हणजे हे लोक स्वत:ला अल्लाहचे प्रिय लोक (प्रियजन) समजतात. ते या भ्रमात आहेत की आम्ही काहीही केले व कसेही वागलो तरी स्वर्ग आमच्याचसाठी आहे. आम्ही ईमानवंत आहोत, अमक्याचे वंशज, अमक्याला मानणारे आणि आमक्याचे मुरीद (भक्त) आहोत. अमक्या अमक्याचे आश्रित आम्ही असल्यामुळे नरकाची काय हिंमत की आम्हाला स्पर्श करून दाखवावा. मान्य केले की नरकात टाकले जावू तरी अगदी थोड्या दिवसांसाठी तिथे ठेवले जाऊ जेणेकरून पापांच्या घाणीपासून स्वच्छ होऊन सरळ स्वर्गात जाऊ. या प्रकारच्या विचारसरणीमुळे ते अगदी उद्दाम आणि निडर बनले होते. परिणामत: ते लोक मोठमोठे अपराध सहज करीत आणि अत्यंत हीन पाप करीत होते. उघडपणे सत्याला सार्वजनिकरीत्या फेटाळीत असत. अल्लाहचे भय काडीमात्रसुद्धा त्यांच्या मनात नव्हते.

माननीय बुरीदा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी तुला अगोदर कब्रस्तानात येण्यापासून रोखले  होते (जेणेकरून एकेश्वरत्वाची धर्मनिष्ठा पूर्णत: हृदयात सामावली जावी.) आता तू दृढत्वाचा अवलंब कर.’’ मुस्लिमच्या दुसऱ्या हदीसमध्ये म्हटले आहे, ‘‘आता तू हवे तर जा कारण कबरी पारलौकिक जीवनाच्या स्मृती जागृत करतात.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय बुरीदा (रजि.) यांच्या कथनानुसार, जे लोक कब्रस्तानात जातात त्यांना पैगंबर मुहम्मद (स.) सांगतात, ‘‘तेथे पोहोचून  म्हणा की ‘अस्सलामु अलैकुम...’ (अर्थात) तुम्हाला शांतता लाभो, हे वस्तीतील ईशपरायण आज्ञाधारकांनो! आम्हीदेखील अल्लाहने  इच्छिले तर तुम्हाला भेटणार आहोत, आम्ही स्वत:साठी आणि तुमच्यासाठी अल्लाहच्या शिक्षा व क्रोधापासून वाचण्याची प्रार्थना  करीत आहोत.’’ (हदीस : मुस्लिम)
माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जेव्हा त्यांना यमनचे न्यायाधीश अथवा गव्हर्नर  बनवून पाठविले तेव्हा म्हणाले, ‘‘हे मुआ़ज! स्वत:ला विलासीपणापासून अलिप्त ठेवा कारण अल्लाहचे दास विलासी नसतात.’’  (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : तुम्ही एका मोठ्या पदावर जात आहात. तेथे जीवनाच्या स्वादापासून लाभ घेण्याची आणि हात साफ करण्याची खूप  संधी मिळू शकते. परंतु तुम्ही जगाच्या प्रेमात अडकू नका आणि जगाला पसंत करणाऱ्या शासकांसारखा स्वत:चा स्वभाव  बनवू नका कारण तो अल्लाहच्या दासत्वाशी मेळ खात नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या अनुयायींना सांगितले, ‘‘माझ्या  जनसमुदायावर ती वेळ येणार आहे जेव्हा दुसरे जनसमुदाय त्याच्यावर अशाप्रकारे तुटून पडतील जसे खाणारे लोक वाढलेल्या  अन्नावर तुटून पडतात.’’ मग एका विचारणाऱ्याने म्हटले, ‘‘ज्या कालखंडाचे आपण वक्तव्य करीत आहात त्या काळात आम्ही  मुस्लिम लोक इतक्या कमी संख्येत असू की आम्हाला गिळंकृत करण्यासाठी इतर जनसमुदाय एकत्रितपणे तुटून पडतील?’’ पैगंबर  म्हणाले, ‘‘नाही, त्या काळात तुमची संख्या कमी असणार नाही तर तुमची संख्या मोठी असेल, परंतु तुम्ही महापुरातील लाटेसारखे  व्हाल आणि तुमच्या शत्रूंच्या उरातील तुमची भीती नष्ट होईल आणि तुमच्या हृदयात भित्रेपणा घर करील.’’ मग एका मनुष्याने  विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! हा भित्रेपणा कोणत्या कारणामुळे येईल?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘त्याचे कारण असे असेल की तुम्ही (परलोकावर प्रेम करण्याऐवजी) जगावर प्रेम करू लागाल आणि (अल्लाहच्या मार्गात प्राण देण्याच्या इच्छेऐवजी) मृत्यूपासून पळ  काढू आणि द्वेष करू लागाल.’’ (हदीस : अबू दाऊद) 
माननीय अबू मूसा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जगावर प्रेम करणारा मनुष्य आपले  पारलौकिक जीवन उद्ध्वस्त करील आणि पारलौकिक जीवनावर प्रेम करणारा मनुष्य या जगातील आपल्या जीवनाचे नुकसान करून  घेईल. हे लोकहो! तुम्ही मागे उरणाऱ्या जीवनाला नष्ट होणाऱ्या जीवनावर प्राधान्य द्या.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : हे जग आणि परलोक यापैकी एकाची निवड करणे आवश्यक आहे. एकतर जगाला आपले ध्येय बनवा अथवा  परलोकाला. जर जगाला आपला आपले ध्येय निश्चित करीत असाल तर पारलौकिक सुख व खुशी लाभणार नाही आणि परलोकाला 
आपले ध्येय बनविले तर त्याच्या परिणामस्वरूप कदाचित तुमचे जग नष्ट होऊ शकते, परंतु त्याच्या बदल्यात पारलौकिक बक्षीस  मिळेल जे निरंतर राहणारे आहे. जी गोष्ट परलोकाच्या मार्गावर चालण्याने नष्ट होईल ती समाप्त होणारी आहे आणि जीवनदेखील  नष्ट होणारे आहे. या नष्ट होणाऱ्या गोष्टीचे बलिदान देण्याने जर निरंतर राहणारे बक्षीस मिळाले तर हा तोट्याचा सौदा नाही,  पुरेपूर नफ्याचा सौदा आहे. माननीय शद्दाद बिन औस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘खरा  विद्वान तो आहे ज्याने आपल्या वासनेवर नियंत्रण ठेवले आणि मृत्यूनंतर येणारे जीवन अलंकृत करू लागला. मूर्ख तो आहे ज्याने  स्वत:ला वासनेच्या अवैध इच्छांच्या मागे लावले आणि अल्लाहकडून चुकीची अपेक्षा बाळगली.’’ (हदीस : तिर्मिजी) 
स्पष्टीकरण : म्हणजे सत्याला सोडून आपल्या मनाचे म्हणणे ऐकतो आणि अपेक्षा करतो की अल्लाह त्याला नंदनवनात  (जन्नतमध्ये) स्थान देईल. अशाप्रकारच्या चुकीच्या आकांक्षांमध्ये कुरआन अवतरणकाळातील ज्यू आणि खिस्ती पडलेले होते आणि  आज आमचे अनेक मुस्लिम बंधुदेखील अशाच चुकीच्या आकांक्षांवर जीवन व्यतीत करीत आहेत. 

-शाहजहान मगदुम
देशाचे भवितव्य असलेल्या सुशिक्षित तरुणांचे भवितव्य सध्या अंधारात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशात  बेरोजगारीने अगदी कळस गाठला आहे. साधारणत: १०० शिपाईपदासाठी दोन लाखांहून अधिक अर्ज येतात. त्यात डॉक्टर्स, इंजिनीयर्स  यासारखे उच्चशिक्षितांचाही समावेश असल्याचे पाहता बेरोजगारीची दाहकता किती भयानक आहे याची प्रचिती येते. गेल्या  लोकसभा  निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी एक कोटी रोजगार निर्माण करू असे आश्वासन दिले होते, तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी  विधानसभा निवडणुकीपूर्वी २० लाख रोजगार उपलब्ध करून देण्याचे दिवास्वप्न तरुणांना दाखविले होते. मात्र सत्ता हाती येऊन चार  वर्षे पूर्ण होता आली तरी या आश्वासनाची कसलीच पूर्तता झाल्याचे दिसून येत नाही आणि बेरोजगार तरुण नोकरीसाठी वणवण  भटकत आहे. दुसरीकडे अकुशल व अल्पशिक्षित युवकांना रोजगारासाठी आटापिटा करावा लागत आहे. हे बेरोजगारीचे भीषण वास्तव आहे. गेल्या ५०-६० वर्षांत शिक्षणानुसार रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळेल अशी व्यवस्थाच निर्माण झाली नाही. सुशिक्षित  तरुणांच्या तुलनेत रोजगारनिर्मिती हा तर आपल्याकडे न सुटणाराच प्रश्न आहे. देशात दरमहा दहा लाख तरुण नोकरीच्या रांगेत उभे  असतात. त्या तुलनेत रोजगारनिर्मितीचा दर मात्र वर्षाला २० लाख असा आहे. रोजगाराची गरज आणि निर्मिती यात एवढी प्रचंड दरी वाढताना दिसत आहे. लेबर ब्यूरोने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे मोदी सरकारच्या मोठमोठ्या आश्वासनांचे पितळ उघडे  पाडले आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची तीव्रता स्पष्ट केली आहे. विकास दरात भारत जगात साठाव्या  स्थानावर असताना ‘भारत हा जगातील सर्वाधिक बेरोजगार असलेला देश’ असा बहुमान प्राप्त झाला आहे. या आकडेवारीनुसार  देशातील रोजगारांमध्ये एकसारखी घट होत आहे तर स्वयंरोजगारांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक-आर्थिक असमानतेत एकसारखी वाढ होत आहे. दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेला जगातील सर्वांत वेगवान असल्याचे म्हटले जात आहे. देशातील श्रीमंत व  गरिबांमधील दरी वाढत आहे. एकूण लोकसंख्येचा एकतृतियांश भाग आजही दारिद्र्यरेषेखालील जीवन व्यतीत करीत आहे. सन  २०१७ च्या उपासमारीच्या निर्देशांकात भारत १०० व्या स्थानावर घसरला आहे (२०१६ मध्ये आपण ९७व्या स्थानावर होतो).  बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार आणि अनेक आप्रिâकन देशदेखील या बाबतीत भारतापेक्षा चांगल्या स्थितीत आहेत. ‘वाढती दरी :  भारत असमानतेचा अहवाल २०१८’ या ‘ऑक्सफेम’च्या अहवालानुसार जागतिक पातळीवर फक्त एक टक्का लोकांच्या हातात  जगातील एकूण संपत्तीपैकी ५० टक्के संपत्ती आहे तर भारतात एक टक्का लोकांच्या हातात देशातील ५८ टक्के संपत्ती आहे (काही  अहवालांनुसार यापेक्षाही अधिक आकडेवारी उपलब्ध होते.) आणि केवळ ५७ अब्जाधीशांकडे देशातील ७० टक्के लोकसंख्येच्या एकूण  संपत्तीएवढी मालमत्ता आहे. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जगातील दुसरा सर्वांत मोठा देश असलेल्या भारतातील ६५ टक्के  लोकसंख्येचे सरासरी वय ३५ वर्षांपेक्षा कमी आहे. कोणत्याही देशासाठी एवढी मोठी तरुण लोकसंख्या फार मोठी शक्ती असते. परंतु  भारतातील या लोकसंख्येचा फार मोठा भाग बेरोजगार आहे. आर्थिक सहकार आणि विकास संघटनेच्या आकडेवारीनुसार देशातील  रोजगारांपासून वंचित तरुणांची संख्या फार मोठी असल्यामुळे समाजात असंतोष वाढत आहे. मागील काही वर्षांपासून स्किल इंडिया,  मेक इन इंडिया, पंतप्रधान रोजगार सृजन कार्यक्रम, पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजना, पंतप्रधान कौशल विकास योजना  यासारख्या वेगवेगळ्या योजना आखण्यात आल्या. परंतु या योजनांचे कार्यालय व प्रचारयंत्रणा पाहणाऱ्या लोकांना रोजगार  देण्याव्यतिरिक्त देशात बेरोजगारीवर मात करण्याच्या दिशेने कसलीही प्रगती झालेली नाही. अधिकांश योजना फक्त निवडणुकीतील  घोषणांप्रमाणे कसल्याही पूर्वतयारीशिवाय सुरू करण्यात आल्या आहेत. उद्योगांच्या गरजा आणि तरुणांना देण्यात येणारे शिक्षणाच्या दरम्यान कसलाही ताळमेळ आढळून येत नाही. हे प्रशिक्षण इतके कनिष्ठ पातळीचे आहे की त्याद्वारे कसलाही  रोजगार मिळू शकत नाही. ज्या उद्योगांमध्ये सर्वाधिक रोजगार उपलब्ध होत होते त्यांची स्थिती अतिशय बिकट आहे. ‘लाइव मिंट’  या वृत्तपत्रानुसार या वंâपन्यांची निर्यातीची स्थिती फक्त बिकटच नसून श्रमकेंद्रित औद्योगिक उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात  घट झाली आहे. इतकेच नव्हे तर श्रमकेंद्रित उत्पादकांच्या आयातीत वाढ होत आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीची स्थिती आणखीनच  वाईट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी जुलैमध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर ही स्थिती आणखीन खालावली आहे.  त्याअगोदर नोटाबंदीच्या काळात अनेक कामागारांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. निरव मोदी आणि मेहुल चौकसी यासारख्या महारथींच्या कर्तुत्वानंतर श्रमकेंद्रित उद्योगांना बँकांमधून कर्ज मिळणे बंद होण्याची शक्यता आहे, याचा वाईट परिणाम  रोजगारनिर्मितीबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होणार आहे. 

 (मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@gmail.com)

- एम.आय. शेख
9764000737
खष्त-ए-अव्वल चूं रेवद मेअमार-ए-कज
ता सुरैय्या मी रवद दीवार-ए-कज
वर उल्लेखित फारसी भाषेतील या ओळींचा अर्थ असा आहे की, समजा एखाद्या गवंड्याने बांधकाम करतांना पहिलीच वीट जर का वाकडी लावली तर मग त्याने त्यावर ता-सुरैय्या म्हणजे तारांगणा पर्यंत जरी उंच भिंत बांधली, तरी ती वाकडीच जाणार. बलात्काराच्या बाबतीत आपल्या देशात ही म्हण तंतोतंत लागू पडते. ती कशी यावर या आठवड्यात चर्चा करूया. 
जागतिक पातळीवरील सर्व व्यवस्थांमध्ये स्त्रीचे समाजातील स्थान निश्चित करतानाच वीट वाकडी लागलेली आहे. आपल्या देशातही जेव्हा स्त्रीला तिच्या परंपरागत भूमिकेतून काढून पाश्चिमात्यांनी प्रदान केलेल्या भूमिकेत ठेवण्याचा जेव्हा निर्णय घेतला गेला तेव्हापासूनच देशात व्याभिचार आणि बलात्कार दोन्ही वाढलेले आहेत. व्याभिचार आणि बलात्कार दोघांना वेगवेगळे करून विचार करण्याची जी पद्धत आधुनिक लोकशाहीमध्ये रूढ झालेली आहे. तीच मुदलात चुकीची आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज देशात अल्पवयीन मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक लोक बलात्कार सारख्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गुन्ह्यांमध्ये अडकतांना दिसत आहेत. या लिंगपिसाटांच्या तावडीतून सहा महिन्याच्या मुलीपासून ते स्वत:ला जन्म दिलेल्या आईपर्यंतच्या महिला सुद्धा सुटलेल्या नाहीत. 
बलात्काराचे बिजारोपन अगदी बाल्याअवस्थेतच मुलांमध्ये होते. सहशिक्षणातून मुलं-मुली नको तितक्या जवळ येतात. नोट्सच्या देवाणघेवाणीपासून सुरू झालेली ओळख वार्षिक स्नेहसंमेलातून भिकार चित्रपट गीतांच्या  तालावर केल्या जाणाऱ्या तथाकथित ’परफॉर्मन्स’ पर्यंत येता-येता त्यांच्यामध्ये परस्परांविषयी नको तेवढी जवळीक झालेली असते. पुण्यातील यशदामध्ये मागे महाराष्ट्राच्या निवडक मुख्याध्यापकांचे एक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या दरम्यान, अनेक मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिकांनी तक्रार केली होती की, त्यांच्या शाळेतील आठव्या, नववी वर्गातील मुलं-मुली मोबाईल फोनवर अश्लिल क्लिप्स पाहतात. 
पूर्वी योग्य वयात लग्न होत होती. आता उच्च शिक्षण आणि करिअरच्या नावाखाली लग्नाचे वय 30 ते 35 वर्षांपर्यंत पुढे ढकलले गेले आहे. त्यात उच्च शिक्षणाच्या सोयी शहरांमध्ये जास्त असल्यामुळे ग्रामीण भागातील तरूण-तरूणी शहराकडे वळतात. तेथे त्यांना निरंकुश स्वातंत्र्य मिळते. निरंकुश स्वातंत्र्याचा दुरूपयोग करण्याकडे बहुतेक माणसांचा कल असतो. त्यातूनच महाविद्यालय व विद्यापीठे हे स्वैराचाराच्या केंद्रस्थानी आल्याचे जरा डोळसपणे पाहिल्यास लक्षात येते. मग यातून प्रेम, ब्रेकअप, तणाव, चिडचिड, राग, द्वेष, मत्सर, वैफल्यासारखे मनोविकार वाढिस लागतात. एकतर्फी प्रेमातून मुलींवर ऍसिड अटॅक, ब्लेड अटॅक आणि खुनासारखे प्रकार वाढतात. 
तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं
तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी
ही प्रवृत्ती वाढीस लागते. अगदी अलिकडेच औरंगाबादसारख्या सभ्य शहरात, अजय तिडके व संकेत कुलकर्णी नावाच्या दोन तरूण विद्यार्थ्यांच्या हत्या एकाच मुलीवर दोघांनी प्रेम केल्यावरून करण्यात आल्या. झाड जसे मुळापासून दूर झाले तर सुकून जाते तसेच तरूण मुलं-मुली परिवारापासून दूर झाले की (अपवाद खेरीज करून) स्वैराचारी बनत जातात. याच प्रक्रियेतून काही तरूण बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त होतात. आश्चर्य तर या गोष्टीचे आहे की, जवळ-जवळ प्रत्येक शहरात वेश्या उपलब्ध आहेत. तसेच संमत्तीने संबंध करण्यासाठी हॉटेल/ लॉजेस उपलब्ध आहेत तर ही परिस्थिती आहे. कल्पना करा वेश्या व्यवसाय आणि व्याभिचारावर बंदी असती तर आपल्या देशातील महिलांची काय अवस्था झाली असती? 
महिलांना पुन्हा-पुन्हा आई होण्याच्या त्यांच्या अधिकारापासून वंचित करून व पुन्हा-पुन्हा आई होणे किती मागासलेपणाचे व अन्यायकारक आहे, हे त्यांच्या मनावर बिंबवून पाश्चात्य पुरूषांनी महिलांना प्रगतीच्या नावावर अनावश्यकरित्या घराबाहेर काढलेले आहे. तसेच त्यांची निकड कार्पोरेट कंपन्यांमध्ये, मालिका, सिनेमा, संगीत, नृत्य, फॅशन, पॉर्न, लष्कर, उद्योग इत्यादी क्षेत्रामध्ये किती गरजेची आहे हे त्यांना पटवून देण्यात पाश्चिमात्य पुरूषप्रधान व्यवस्थेला यश आलेले आहे. त्यातूनच मग जागतिक स्तरावर अनेक अनुत्पादक उद्योगांमध्ये महिलांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. त्यात अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. जगातील सर्व महिला फक्त गृहिणी बनून राहिल्या तर या सर्व गुंतवणुकीचे काय होणार? या विचाराणेच अशा उद्योगपतींच्या पोटात भितीचा गोळा उत्पन्न होतो व आपली गुंतवणूक बुडू नये म्हणून ते महिलांना सातत्याने गृहिणी पदाच्या जबाबदारीतून मुक्त करून मुक्त बाजारपेठेत आणण्यासाठी प्रयत्नशील असतात. 
याच भितीतून ते इस्लामसारख्या नीति अधिष्ठीत धर्माची बदनामी करतात. इस्लाममध्ये महिलांना कसे डांबून ठेवले जाते, याचे कपोलकल्पीत किस्से जनतेच्या मनावर बिंबविले जातात. कारण की त्यांना माहित आहे की, इस्लामच त्यांच्या या ढोंगीपणाचा पर्दाफाश करू शकतो. इस्लाममध्ये महिलेचे कार्यक्षेत्र मुख्यत्वेकरून घरापर्यंत सीमित केलेले आहे. इस्लामच्या मते गृहिणी हीच तिची प्रमुख भूमिका आहे. देशासाठी उत्कृष्ट संस्कारी नागरिक घडविणे ही तिची प्रमुख जबाबदारी आहे व ही जबाबदारी सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. एकाग्र चित्ताने ही जबाबदारी पार पडण्यासाठी तिला अर्थप्राप्तीच्या संकटातून मुक्त करून घरातील सुरक्षित वातावरण प्रदान करण्यात आलेले आहे. असे असतांनाही प्रत्येक काळामध्ये समाजातील काही महिलांना काम करणे गरजेचे असते. त्याची व्यवस्था त्यांच्या स्त्रीत्त्वाच्या आदर राखला जाईल अशा पद्धतीने करण्याचे निर्देष इस्लाम शासनाला देतो.
बलात्कार होण्याच्या मोठ्या कारणांपैकी एक कारण पॉर्न (अश्लिल चित्रफिती) आहे. इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर पॉर्न साईट्स सर्च करण्यासाठी केला जातो. इंटरनेटरची सर्वाधिक कमाई ही याच वेबसाईटच्या माध्यमातून होते. लाखो स्त्री-पुरूष या व्यवसायात गुंतलेले आहेत. अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक यात केलेली आहे. कोट्यावधी लोक नियमितपणे ह्या क्लिप्स पाहतात. भूकेनंतर सर्वाधिक प्रबळ गरज ही लैंगिक गरज असते. याची कल्पना या व्यवसायात गुंतलेल्या लोकांना आहे. म्हणून तर याचा प्रचार जास्तीत जास्त व्हावा यासाठी सर्वजन प्रयत्नशील आहेत, असा माझा दावा आहे. यास पुरावा असा की, प्रत्येक वस्तू महाग होत असतांना, ” डेटा” कसा काय स्वस्त होत आहे? याचे उत्तर अश्लिलता सार्वजनिक करणे हे आहे. 
जेव्हा कोणतीही वस्तू आपल्याला मोफत मिळते तेव्हा त्याचा अर्थ विकणारे लोक आपली खरेदी करीत असतात एवढे निश्चित. मोफत/स्वस्त डेटाच्या मोबदल्यात जनतेचा बहुमुल्य वेळ व नैतिकतेची खरेदी या कंपन्या करीत आहेत. मोबाईल फोनच्या स्क्रीनवर एक क्लिक करण्याचा उशीर, अश्लिल चित्रफितींची गटार तात्काळ वहायला लागते व त्यात भले-भले लोक वाहून जातात. मग ते सरकारी कार्यालयात काम करणारे असोत, कार्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे असोत, महिला असोत, पुरूष असोत किंवा कोणतेही क्षेत्र असो. विधानसभेमध्ये सुद्धा पॉर्न पाहिल्या गेल्याचा इतिहास ताजा आहे. काही लोक तर स्मार्ट फोनचा उपयोग फक्त अश्लिल क्लिप्स पाहण्यासाठी करतात, बाकी ऑप्शनन्स त्यांना वापरताच येत नाहीत. अशा क्लिप्स सतत पाहिल्याने त्याचे त्यांना व्यसन जडते. माणूस ज्या गोष्टीत रमतो त्याची मानसिकता त्याच गोष्टीसारखी होत जाते. पॉर्न ऍडिक्ट व्यक्तिंची मानसिकता विकृत व्हायला वेळ लागत नाही. अशा लोकांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोण पार बदलून जातो. पॉर्नमधील महिला जशा लैंगिक संबंधासाठी सहज तयार होतात तशा समाजातील महिलाही तयार होतील, असा त्यांच्यापैकी काहींचा समज होवून जातो. यातूनसुद्धा बलात्कार होतात. घर विस्कटून जाते, समाज नासून जातो, स्त्रीया आणि मुली असुरक्षित होऊन जातात, पुरूषांकडून विकृत लैंगिक संबंधांची मागणी वाढते, नैतिकदृष्ट्या समाज दिवाळखोर होवून जातो, इतका की जवळच्या रक्ताच्या नात्याच्या संबंधानांही बऱ्याच वेळेस काळीमा फासली जाते. गेल्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रात पंधरा हजारहून अधिक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार घडले. (संदर्भ : लोकसत्ता 28 एप्रिल 2018 पान क्र. 1) महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी हे भूषणावह नाही. आश्चर्य म्हणजे यापैकी बहुतेक अपराध करणारे लोक ओळखीचे/जवळचे होते. 
इंदौरचे एक वकील कमलेश वासवाणी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये पॉर्न साईटवर बंधी घालावी म्हणून एक जनहित याचिका दाखल केली होती. मात्र केंद्र सरकारने शपथपत्र देवून सर्वोच्च न्यायालयाला सदरच्या वेबसाईटवर बंदी घालण्यास आपण असमर्थ असल्याचे कळविले आहे. यावरून या व्यवसायातील लोकांच्या ताकदीचा अंदाज येतो. सतत पॉर्न पाहिल्यामुळे भावनात्मक विकृती येते. विशेषकरून मुलांच्या मनोविज्ञानावर याचा अतिशय वाईट परिणाम होतो. 
एकंदरित या वातावरणातूनच लोक अनेकवेळा बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त होतात. यात खरे तर पुरूष सुद्धा पीडित आहेत. कारण की, बलात्कार करणारे सर्वसाधारण लोक असतात. ते काही व्यावसायिक अपराधी नसतात. मालिका, चित्रपट, पॉर्न सातत्याने पाहून त्यातून आलेल्या उत्तेजनेला आवर न घालता आल्यामुळे असे लोक बलात्कार करून, एक तर फाशीला जात आहेत किंवा जन्मठेप भोगत आहेत. 2012 साली निर्भयाची घटना झाल्यानंतर 2013 मध्ये या संदर्भात कायद्यात सुधारणा करून बलात्काऱ्यांना फाशीची तरतूद करण्यात आलेली आहे. 
कठुआच्या घटनेनंतर राज ठाकरेंनी परत शरई कायद्यासारख्या कठोर कायद्याची मागणी केलेली आहे. देशभर प्रदर्शन झालेले आहे. शेकडो टन कागद या विषयावर लिहून व शेकडो तास या विषयावर चर्चा करून वाहिन्यांनी खर्ची घातलेली आहेत. अनेकांनी डिपीचा रंग काळा केला, मात्र पंधरा दिवसांनी सर्वकाही सुरळीत झाले. डीप्या पुन्हा बहरल्या, भंपक शायरी आणि एकमेकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांचा कृत्रीम वर्षाव समाजमाध्यमांवर पुन्हा सुरू झाला. 
जगातील प्रत्येक व्यवस्था लोकांना कायद्यात पकडते मात्र इस्लाम नैतिकतेत पकडतो. म्हणून अनैतिक गोष्टींसाठी प्रवृत्त करणाऱ्या तसेच पती आणि पत्नी यांच्यातील नात्याला कमकुवत करणाऱ्या प्रत्येक लहान-सहान गोष्टी उदा. संगीत, दारू, नाच, गाणे, अश्लिल मालिका, चित्रपट, स्त्री-पुरूषांचा संयुक्त वावर, सहशिक्षा या सर्व गोष्टी तो प्रतिबंधित करतो. परद्याची व्यवस्था लागू करतो. एवढेच नव्हे तर पाच वेळेसच्या नमाज व वर्षाला 30 दिवसांच्या रोजाच्या माध्यमातून घरा-घरात व समाजात पवित्र वातावरण तयार करतो. अशा वातावरणात बलात्कार तर दूर विनयभंगाचा सुद्धा विचार नागरिकांच्या मनामध्ये उत्पन्न होणार नाही, याची अगोदर पक्की व्यवस्था करतो. एवढी प्रतिबंधक उपाययोजना करूनही एखादा दुराचारी जेव्हा बलात्कार करतो तेव्हा त्याचे ते कृत्य ज्या महिलेच्या विरूद्ध झाले असे गृहित न धरता त्या कृत्याला व्यवस्थेविरूद्ध बंड मानतो आणि मग मात्र त्याच्या चुकीला माफी नाही. त्याला भर चौकात असा मृत्यू दंड देण्यात येतो की, पाहणाऱ्यांच्या जीवाचा थरकाप उडावा. आपल्याकडे अशी कुठलीही प्रतिबंधक उपाययोजना न करता फक्त फाशीची मागणी केली जाते, जी की, बलात्काऱ्यांना कधीही रोखू शकत नाही. 
आपल्याकडे बलात्कार/ व्याभिचाऱ्याकडे नेणाऱ्या सर्व गोष्टी नुसत्या खुल्याच नाहीत तर त्यांना सरकारी संरक्षणसुद्धा प्राप्त आहे. एकीकडे वाम मार्गाची दारे सताड उघडी ठेवायची, लोकांना वाम मार्गाकडे जाण्यासाठी पोषक असे वातावरण तयार करायचे व पुन्हा त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायची की त्यांनी बलात्कार करू नये, ही अशक्य बाब आहे. सरकारने अगोदर या सर्व वाईट गोष्टींवर प्रतिबंध लावावा मग फाशीची तरतूद करावी. केवळ फाशी दिल्याने बलात्कार थांबणार नाहीत त्यासाठी व्यवस्था बदलावी लागेल. 
सरकारवर नमूद बाबी बंद करणार नाही, कारण तेच तर सरकारच्या प्रमुख उत्पादनाचे स्त्रोत आहेत. म्हणून आपल्या व्यवस्थेमध्ये बलात्कार होत राहतील व लोक फाशीवर जात राहतील हे असेच सुरू राहणार आहे. आशेची एकमेव किरण शऊरी मुस्लिम आहेत. मात्र मुस्लिमांमधील हा गट फार छोटा आहे. दुर्देवाने काही मुस्लिमसुद्धा वाम मार्गाला लागलेले आहेत. याचा पुरावा रमजानमध्ये पॉर्न पाहणाऱ्यांची कमी होते व रमजाननंतर ती पूर्ववत होते हा गुगलच्या मागच्याच वर्षाचा अहवाल आहे. दर्शकांमधील हा उतार-चढाव कोणाचा आहे, हे सुजान वाचकांना समजून सांगण्याची गरज नाही. 
ज्याप्रमाणे काट्यांमध्ये राहून सुद्धा गुलाब फुलतो त्याच प्रमाणे वाईट वातावरणात राहूनसुद्धा शरिया आधारित जीवन जगून नैतिकतेचे गुलाब फुलविता येते. हे प्रत्यक्षात दाखवून देण्याचे मोठे आवाहन प्रत्येक सुजान हिंदू-मुस्लिम नागरिकांवर आहे. विशेषत: ही जबाबदारी कुरआनने मुस्लिमांवर टाकलेली आहे. आता कोणीही प्रेषित येणार नाहीत. समाजाच्या सुधारणेचे काम आपल्यालाच करावे लागणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी तरूणांनी एस.आय.ओ. तर स्त्री-पुरूषांनी जमाअते इस्लामीच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधून तणावरहित स्वच्छ व नैतिक जीवन जगण्याचा मूलमंत्र प्राप्त करावा. स्वत:ला व आपल्या पुढच्या पीढिला बलात्कारासारख्या कलंकापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की आपल्या सर्वांना सद्बुद्धी मिळो. आमीन.

परभणी (शोधन सेवा) - सहाय्यक पोलीस निरीक्षक उस्मान चाँदसाब शेख यांना 1 मे 2018 रोजी जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे मानचिन्ह प्रदान करण्यात आले. उस्मान शेख हे सध्या परभणी येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचे वाचक म्हणून सेवारत आहेत. ते 2005 च्या बॅच क्रमांक 96 चे पोलीस उपनिरिक्षक असून, प्रशिक्षण पूर्ण होताच त्यांना गडचिरोली येथे पहिली नेमणूक मिळाली. तेथे त्यांनी सव्वा तीन वर्षे उत्कृष्ट सेवा बजावली. दरम्यान, अनेक नक्षलविरोधी मोहिमांमध्ये त्यांनी हिरहिरीने सहभाग घेतला. त्यांच्या धैर्याची आणि कार्याची दखल घेऊन त्यांना खडतर सेवा पदक आणि आंतरिक सेवा सुरक्षा पदक अशा दोन पदकांनी शासनाने त्यांचा गौरव केला. उस्मान शेख यांचे प्रथमिक शिक्षण जि.प. हायस्कूल व गणपतराव मोरे हायस्कूल कंधार येथून झाले. त्यांनी शिवाजी कॉलेज कंधार येथून बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्सची पदवी प्राप्त केली. गडचिरोली व्यतिरिक्त त्यांनी अकलूज, सोलापूर तालुका पोलीस ठाणे तसेच परभणी येथील बोरी आणि जिंतूर, तसेच लातूर येथील भादा आणि कासारशिरसी येथे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणून उत्कृष्ट से काम केलेले आहे. एक अभ्यासू, सभ्य, कुशल संधटक आणि शिस्तबद्ध अधिकारी म्हणून ते परिचित आहेत.

- अबरार मोहसीन 
शहराध्यक्ष जमाअते इस्लामी हिंद, लातूर

वेळेचे व्यवस्थापन म्हणजे जीवनाचे व्यवस्थापन. ज्याला हे जमले तो यशस्वी आणि ज्याला हे जमले नाही तो अयशस्वी! प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैहि व सल्लम यांनी वेळेच्या व्यवस्थापनासंबंधी अनेकवेळेस मार्गदर्शन केलेले आहे. 
प्रेषित सल्ल. यांनी निर्देष दिला की पाच गोष्टींपूर्वी त्यांचा लाभ उठवा. 1. वृद्धत्व येण्यापूर्वी तारूण्याचा, 2. मरण्यापूर्वी जगण्याचा, 3. व्यस्त होण्यापूर्वी रिकामेपणाचा, 4. आजारपणापूर्वी आरोग्याचा, 5. दारिद्रय येण्यापूर्वी श्रीमंतीचा. (तिर्मिजी)
या पाचही निर्देशांमध्ये वेळेचे महत्व अधोरेखित केलेले आहे. साधारणपणे तारूण्य हे मनोरंजनासारख्या निरूपयोगी गोष्टींमध्ये तरूण वाया घालवतात. वास्तविकपणे तारूण्यामध्ये जी ऊर्जा असते त्या ऊर्जेचा उपयोग वेळेवर केल्यास अनेक असाध्य गोष्टी साध्य करता येतात. ज्या की, प्रयत्न करूनही वृद्ध झाल्यानंतर करता येत नाहीत. व्यस्त होण्यापूर्वी जो रिकामा वेळ माणसाकडे असतो त्या वेळेच्या एकेका क्षणाचा उपयोग करण्याकडे माणसाचा कल असायला हवा. याची जाणीव ज्यांना असते तेच मोठमोठे कार्य करू शकतात. ज्यांना याची जाणीव नसते ते लोक आयुष्यात फार काही करू शकत नाहीत. 
एक दूसरी हदीस आहे ज्यात प्रेषित सल्ल. यांनी सांगितले आहे की, कयामतच्या दिवशी कुठल्याही माणसाची पावले अल्लाह समोरून हटूच शकार नाहीत जोपर्यंत त्याच्याकडून पाच प्रश्नांची उत्तरे घेतली जाणार नाहीत. ती पाच प्रश्न खालीलप्रमाणे -1.जीवन कुठे व्यतीत केले? 2. तारूण्य कुठे खर्चि घातले? 3. संपत्ती कोठून मिळविली? 4. संपत्ती कोठे खर्च केली? 5. हस्तगत केलेल्या ज्ञानावर किती प्रमाणात अंमल केला? 
यात पहिले दोन प्रश्न वेळेच्या व्यवस्थापनासंबंधीचेच आहेत. जीवन कुठे व्यतीत केले? त्यातही तारूण कुठे खर्ची घातले? हे दोन प्रश्न असे आहेत की, वेळेचे कुशल व्यवस्थापन करू शकणाऱ्या इसमालाच या प्रश्नाची नीट उत्तरे देता येतील. अन्यथा या प्रश्नाची उत्तरे देणेच शक्य नाही. खरे तर ही हदीस आय ओपनिंग (डोळे उघडणारी) हदीस आहे. या हदीसला नीट समजून घेतल्यानंतर कोणताही सश्रद्ध मुस्लिम वेळेचा अपव्यय करण्याचे धाडस करणार नाही. 
प्रेषित सल्ल. यांचे जीवन आमच्यासाठी आदर्श आहे. त्यांचे प्रेषित्वाच्या आधीचे जीवन असो का प्रेषित्व मिळाल्यानंतरचे जीवन असो. दोन्हीमध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्यांना मिळालेल्या वेळेच्या एकेका क्षणाचा सदुपयोग केलेला आहे. म्हणूनच कमी अवधीमध्ये इस्लामची सत्यता ते लाखो लोकांच्या मनामध्ये बिंबवण्यामध्ये यशस्वी झाले.
आजच्या आधुनिक जगामध्ये वेळेला प्रोडक्टीव्ह (उत्पादक) करण्याकडे सर्वांचा कल असतो. मुस्लिमांनी तर जगातच नव्हे तर मृत्यूनंतरचे जीवन सुद्धा सुखमय व्हावे, याचा विचार करायला हवा. त्यांच्या लेखी तर वेळेचे दुहेरी महत्व आहे. म्हणून आपल्याला मिळालेल्या वेळेचे उत्पादक मुल्य कसे वाढविता येईल, याकडे लक्ष देण्याची मोठी जबाबदारी प्रत्येक मुस्लिमावर आहे. 
अल्लाहने प्रत्येक मुस्लिमावर पाच वेळेसची नमाज त्या-त्या नमाजच्या वेळेच्या बंधनात अदा करण्याची सक्ती केलेली आहे. जरा डोळसपणे पाहिल्यास, आयुष्यातल्या प्रत्येक दिवशी नमाजच्या माध्यमातून उत्कृष्ट असे वेळेचे व्यवस्थापन करण्याची संधी अल्लाहने आपल्याला दिलेली आहे. रमजानच्या रोजांची अनिवार्यता सहर आणि इफ्तारीच्या वेळेसह प्रत्येक मुस्लिमांवर अनिवार्य करण्यात आलेली आहे. यातूनसुद्धा आपल्याला वेळेचे व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे याची कल्पना येईल. अनेक मुस्लिम स्वत:ला स्वतंत्र समजतात. कुठलेही वेळेचे बंधन पाळणे त्यांना जमत नाही. मनात आले तर नमाज अदा करतात, नाही आले तर करत नाहीत. मात्र त्यांना कळत नाही की, आखिरतच्या दिवशी प्रत्येक व्यक्तिला त्याला प्रदान करण्यात आलेल्या वेळेचा कसा उपयोग केला, याचा हिशोब द्यावाच लागणार आहे. त्यातून कोणालाच सूट नाही. म्हणून आपल्याला वेळेचे महत्व ओळखायला हवे. 
सैतान माणसांच्या पाठिमागे लागलेला आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने माणसाच्या मनावर ताबा मिळवून त्याला अल्लाहच्या निर्देशाविरूद्ध चालण्यासाठी प्रोत्साहित करीत असतो. जो व्यक्ती सैतानाच्या कचाट्यात सापडून अनुशासनहीन जीवन जगतो त्याच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होतो, हे आपण सर्व जाणून आहोत. माणसांनी वेळेवर दिलेले काम पूर्ण केले तर त्याच्यावर तणाव येत नाही. नमाजी माणसाला वेळेत दिलेले काम पूर्ण करण्याची सवय जडते. त्याच्यामुळे त्याचे जीवन तणावविरहित होते. 
आधुनिक व्यवस्थापन शास्त्रामध्ये सुद्धा दिलेले काम (टार्गेट) वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आलेला आहे. नमाजचेच उदाहरण घ्या. अजान झाल्याबरोबर माणूस जर नमाजच्या तयारीला लागला तर वेळेवर नमाज अदा करू शकतो. तेच अजान झाल्यावरसुद्धा तो इकडे-तिकडे रमत राहिला आणि शेवटच्या दोन मिनिटात नमाज अदा करण्याचा प्रयत्न करू लागला तर ती अदा करण्यासाठी त्याला किती धावपळ करावी लागते व त्यातून कसा स्ट्रेस निर्माण होतो, याचा अनुभव आपल्यापैकी बहुतेकांना आलेलाच असावा. वेळेत काम करण्याची सवय नसेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या तणावामुळे माणसाचे आरोग्यसुद्धा प्रभावित होते. 
रिकाम्या वेळाची कुठलीच संकल्पना इस्लाममध्ये नाही. उदा. फन (एन्जॉयमेंट), रिकामटेकडेपणा याला इस्लाममध्ये थारा नाही. सुरे अलमनशराहमध्ये प्रेषित सल्ल. यांना निर्देश देण्यात आले आहे की, ’फ-इजा फरगता-फअनसब व-इला रब्बिका फऱगब’ (जेव्हा तुमच्याकडे फारीग म्हणजे मोकळा वेळ असेल तेव्हा अल्लाहच्या इबादतीमध्ये व्यस्त होवून जा.) प्रेषित सल्ल. यांना जेव्हा एवढी सक्त ताकीद देण्यात आली तेव्हा आपली काय बिशात? म्हणून फावल्या वेळी फालताड मालिका, क्रिकेट वगैरे पाहण्याचा व वेळ वाया घालवण्याचा एक श्रद्धावंत मुस्लिम विचार सुद्धा करू शकत नाही. माणसाकडे जस-जसे नवीन उपकरण येत आहेत तसा-तसा तो अधिक व्यस्त होत आहे. म्हणून प्रत्येक श्रद्धावंत माणसाला आपल्या वेळेची समिक्षा करावी लागेल. त्याला विचार करावा लागेल की आपला वेळ कुठे जास्त चाललाय? झोपेत जास्त चाललाये? की टी.व्ही. पाहण्यामध्ये जास्त चाललाय? की सोशल मीडियावर जास्त चाललाय? 
एखाद्या माणसाचे पंचाहत्तर वर्षे आयुष्य गृहित धरले आणि तो सरासरी दररोज सात तास झोपत असेल असे गृहित धरले तर 22 वर्षे नुसती झोपण्यात जातात. जर कोणी सात तासापेक्षा जास्त झोपेत असेल तर त्याचे दोन नुकसान आहेत. एक तर त्या अतिरिक्त झोपेचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. दूसरा बहुमुल्य वेळ झोपण्यामध्ये जातो. कामाचे दहा तास जरी गृहित धरले तर तो 32 वर्षे सतत काम करत राहतो. तयार होण्यासाठी रोज 45 मिनिट जरी गृहित धरली तरी यात सव्वा दोन वर्षे निघून जातात. दैनंदिन जेवण वगैरे करण्यासाठी दीड तास गृहित धरला तरी तो साडे चार वर्षे व परिवारासाठी रोज एक तास देत असेल तर 75 वर्षात तीन वर्षे तो वेळ खर्ची घालतो. मित्र परिवारासाठी रोज एक तास देत असेल तर त्यातही तीन वर्षे निघून जातात. 
याशिवाय, उरलेला अन डिफाईन्ड जो वेळ असतो तो साधारणत: रोज तीन ते चार तास असतो. तर ह्या मोकळ्या वेळेचे योग्य नियोजन केले व त्याला उत्पादक मुल्य कसे मिळवून देता येईल याचा विचार केला तर वेळेचे व्यवस्थापन केले असे म्हणता येईल. जर हे व्यवस्थापन करता आले नाही तर त्या वेळेचा सदुपयोग करता येणार नाही व त्या काळात माणसाची उत्पादकता कमी होईल, हाच वेळ वाचवून जर त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला तर तो माणूस समाजासाठी हिताचा होवून जाईल, त्याच्या हातून मोठ-मोठी चांगली कामे होतील. 
अल्लाहने आपल्यावर फर्ज (अनिवार्य)  काय-काय केले आहे, याला केंद्रस्थानी ठेवून आपण वेळेचे व्यवस्थापन केले पाहिजे. याउलट आपण पाहतो की, अनेक लोक आपल्या इतर कामांना केंद्रस्थानी ठेवून वेळ मिळाल्यास फर्ज गोष्टींकडे लक्ष देत असतात. हेच ते लोक आहेत ज्यांना अल्लाहच्या आदेशांची व वेळेच्या व्यवस्थापनाची पर्वा नाही. 
वेळेच्या बाबतीत चार गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट वेळ वाया घालविणे. दूसरी वेळ खर्ची घालणे, तीसरी वेळ वाचविणे, चौथी वेळेची गुंतवणूक करणे. वेळ वाया घालविण्याचे सगळयात मोठे मार्ग टी.व्ही. आणि मोबाईल फोन आहेत. आज अनेक व्यक्ति रिमोट हातात घेवून सारखे चैनल बदलत असतात. त्यांना कोणत्याच चॅनलवर समाधान मिळत नाही. अनेक लोक मोबाईल फोनवर अनावश्यक सामुग्री खात्री न करता इकडची तिकडे पाठवित असतात. त्यांची बोटं सारखी स्क्रीनवर चालत असतात. त्यांनाही कोणत्याच समाज माध्यमांवर समाधान मिळत नाही. अशा लोकांचा वेळ वाया जातो, मोठी कामे तर सोडा कधी-कधी स्वत:च्या घरगुती गरजांसुद्धा पूर्ण करण्यासाठी अशी माणसे कमी पडतात. 
दूसरी गोष्ट वेळ खर्ची घालणे, म्हणजे प्रत्येक माणसाला दरदिवशी चोवीस तास मिळत असतात. ते तास प्रत्येक माणूस कसा खर्ची घालतो, यावर प्रत्येक माणसाचे भविष्य अवलंबून असते. कोणतीही गोष्ट खर्च केल्याने संपून जाते. वेळ अमूल्य आहे. त्याला खर्च करतांना कोणत्या कारणासाठी आपण खर्च करीत आहोत, याची जाणीव जोपर्यंत प्रत्येकाला होणार नाही, तोपर्यंत रूपया जसा बेकार गोष्टींमध्ये खर्च होवू शकतो तसाच वेळ सुद्धा बेकार गोष्टींमध्ये खर्च होवू शकतो. वेळेला भांडवल समजून त्याची जर गुंतवणूक केली तर भविष्यात त्या गुंतवणुकीचा चांगला परतावा आपल्याला मिळू शकतो. याची जाणीव प्रत्येक श्रद्धावंत मुस्लिमांने ठेवणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ जर कोणी कुरआन समजून वाचण्यात वेळ खर्च करीत असेल तर नक्कीच त्याचा परतावा त्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाच्या रूपाने मिळेल. या उलट जर कोणी आपला वेळ हॉटेलमध्ये बेकारच्या गप्पा मारण्यात खर्च करत असेल तर त्याचा परतावा त्याला नकारात्मक रूपात मिळेल. रूपयांच्या गुंतवणुकीतून कधी-कधी नुकसान होण्याची शक्यता असते. परंतु, वेळेच्या गुंतवणुकीतून कधीच नुकसान होत नाही. 
शेवटची गोष्ट म्हणजे वेळ कसा वाचविता येईल, याचाही विचार करणे. म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन करणे होय. याचे उदाहरण असे की, समजा आपल्याला कोणाला भेटणे आवश्यक आहे, तर अगोदर दूरध्वनी करून त्यांची वेळ मागून घेणे व नंतर वेळेवर त्यांना जाऊन भेटणे म्हणजे वेळ वाचविणे. या उलट भेटीची वेळ न मागता, ते आहेत का नाहीत याचीसुद्धा  खात्री न करता गेल्यास इच्छित व्यक्ति हजर नसल्यास अगर इतर कामात व्यस्त असल्यास आपला जो वेळ वाट पाहण्यात जातो तो व्यर्थ जातो. तसेच रात्री तासन्तास गप्पा मारण्यात काही लोकांना मोठा आनंद होतो. वास्तविक पाहता इशाच्या नमाजनंतर अत्यावश्यक असल्याशिवाय जागरण करण्याची परवानगी नाही. दहाच्या आसपास झोपल्यास फजरच्या नमाजला बरोबर जाग येते. परंतु, आपण पाहतो की अनेक लोक विनाकारण रात्री उशिरापर्यंत जागत असतात. विज्ञानाने ही गोष्ट सिद्ध केलेली आहे की, लवकर झोपणारे आणि लवकर उठणारे लोकच स्वस्थ असतात. आजकाल रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र करण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. रात्रीतून जागरण केल्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो. सुरूवातीच्या काही तासाची झोप शरिरासाठी अत्यंत पोषक असते. प्रेषित सल्ल. लवकर झोपून तिसऱ्या प्रहरी उठत होते.  
अनेक लोक आपल्या भूतकाळाच्या आठवणीमध्ये तासनतास रमतात. आपण कसे होतो आणि कसे झालो. याचा विचार करीत राहतात. त्यात किती वेळ खर्ची जातो याचा त्यांना अंदाजच येत नाही. म्हणून आपण भूतकाळात जास्त रमू नये याची जाणीव निर्माण होणे व त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे वेळेचे व्यवस्थापनच होय.
शेवटी वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी जीवनामध्ये शिस्त असणे आवश्यक आहे. अनावश्यक सुस्ती आणि निष्काळजीपणामुळे माणसाचा वेळ वाया जातो. याशिवाय, वेळेचे व्यवस्थापन करण्यामध्ये योजनेचे फार महत्त्व आहे. कोणत्याही कामाची अगोदर योजना तयार करून नंतर ते काम करणे गरजेचे असते. कुठलीही योजना नसतांना काम सुरू केल्यास वेळ अनावश्यकरित्या खर्ची होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून प्रत्येक माणसाने भौतिक तसेच आखिरतचे जीवन सफल व्हावे,  असे वाटत असेल तर त्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget