Halloween Costume ideas 2015

नियतच (उद्देश) महत्त्वाची : प्रेषितवाणी (हदीस)

आदरणीय उमर बिन खत्ताब (रजि.) म्हणतात की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ‘‘कर्मांचा दारोमदार फक्त निय्यत (उद्दिष्ट) वर आहे. म्हणून माणसाला तेच फळ मिळेल ज्याची  त्याने निय्यत केली असेल. उदा. ज्या व्यक्तीने फक्त अल्लाह आणि पैगंबरांसाठी हिजरत (स्थलांतर) केली असेल त्याचीच हिजरत खरी हिजरत आहे. ज्याने रुपया-पैशांसाठी अथवा  स्त्रीशी विवाह करण्यासाठी हिजरत केली असेल तर त्याची हिजरत धनसंपत्तीसाठी अथवा स्त्रीसाठी गणली जाईल.’’ (बुखारी, मुस्लिम)
निरुपण
कोणत्याही सत्कृत्याचा मोबदला त्या सत्कृत्यामागे उद्देश (निय्यत) काय आहे, हे पाहूनच दिला जाईल. म्हणूनच उद्देशाला असाधारण महत्त्व आहे. खरे तर अल्लाहजवळ कर्माचा उद्देशच  महत्त्वाचा आहे. इस्लाममध्ये हिजरत (स्थलांतर) हे खूप मोठे सत्कर्म आहे. एखाद्या ठिकाणी सन्मार्गावर जगणे अशक्यप्राय झाले असेल तर ते ठिकाण सोडावे, हिजरत करावी; पण  सत्याची कास सोडू नये असा संकेत इस्लामी शास्त्रात आहे. मात्र हे एवढे महान सत्कर्मसुद्धा जर अल्लाहऐवजी संपत्तीसाठी अथवा स्त्रीसाठी असेल तर अल्लाहजवळ त्याची काही एक  किंमत नाही. एखादे सत्कर्म कितीही मोठे असू द्या, ते जर फक्त अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी नसेल, नावलौकिकासाठी असेल, स्वार्थासाठी, संपत्तीसाठी अथवा स्त्रीसाठी असेल तर  न्यायनिवाड्याच्या दिवशी त्याची काहीच किंमत होणार नाही. त्याची गत खो्या पैशासमान होईल.
आपण दैनंदिन जीवनात अनेक सत्कर्मे करतो. नमाज, रोजा, जकात, हज असेल किंवा गोरगरीबांची सेवा, मातापित्यांची सेवा इ., ही सर्व सत्कर्मे आपल्या उपयोगी पडतील, जर ती  फक्त अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी असली तरच! अन्यथा जर ती ‘शो’साठी असतील तर सपशेल व्यर्थ आहेत, असे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे स्पष्ट म्हणणे आहे. माझे एखादे  सत्कर्म फक्त माझ्या अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी असेल तर पेपरला फोटो, बातमी येवो अगर न येवो, समाजात त्याची चर्चा होवो वा न होवो, मला काय फरक पडणार? हा आहे  खरा नि:स्वार्थीपणा! पैगंबरांच्या एका हदीसचा आशय असा आहे की न्यायदानाच्या दिवशी अल्लाह कोणाची नमाज, रोजे, हज, दानधर्म त्याच्या तोंडावर फेकून देईल आणि त्याला कठोर शिक्षा करील. कारण त्याची नमाज अल्लाहसाठी नव्हती, जगाला दाखविण्यासाठी होती! त्याचे रोडे, दानधर्म आणि हज अल्लाहसाठी नव्हते तर समाजात त्याचे कौतुक व्हावे म्हणून होते. हीच गत प्रत्येक शो-पीस कर्माची होईल.
पैगंबरांचा उपरोक्त उपदेश समस्त मानवजातीला सावधान करत आहे की प्रत्येक सत्कर्म हे फक्त अल्लाहला राजी करण्यासाठी करा! वाहवा व्हावी, नावलौकिक व्हावे यासाठी कदापि  करू नका!

- संकलन : डॉ. सय्यद रफीक

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget