Halloween Costume ideas 2015

भारताचे पर्झिवरन्स

farmer

आपल्या जीवनात माणसांना संकटांना-आव्हानांना सामोरे जावे लागत असते. अशा वेळी कोणतेही संकट कोसळले तरी माणसे आपला धीर सोडत नसतात. संकटांना-आव्हानांना तोंड देत असतात. हीच माणसांची जगण्याची कला आहे. जगण्याची धडपड आहे. कोणतेही आव्हान असो, आपत्ती कोसळलेली असो, संकटे येऊ द्यात माणूस त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याचा, कमीतकमी त्यांच्यावर मात करण्याच्या प्रयत्नात असतो. यातच त्याचे उभे जीवन संपते. मरण येईपर्यंत मात्र तो आपल्या जगण्याचा बाणा सोडत नाही. कोणत्याही अडचणी आल्या, कसलेही भयंकर संकटाला सामोरे जावे लागले तरी तो संयम ढळू 

देत नाही. प्रत्येक समस्येशी झुंज देत राहणे भारतीय सामान्य माणसाचा गुणधर्म आहे की त्याच्या भाग्यात ईश्वराने हेच लिहून ठेवले आहे, हे माहीत नाही. या सगळ्या गुणधर्मांचा ज्यांचा उल्लेख वर केला गेला आहे, याला इंग्रजी भाषेतल्या एकाच शब्दानं सांगितलं जाऊ शकते, तो शब्द म्हणजे 'पर्झिवरन्स' होय. मंगळ ग्रहावरील ज्या ज्या अडचणी आव्हाने येतील त्या सर्वांचा मुकाबला करत आपले कार्य करत राहण्यासाठी अमेरिकेने जे यान मंगळावर उतरवलेले आहे त्याला 'पर्झिवरन्स' हे नाव दिले आहे.

आपण गरीबातले गरीब भारतीय कुणी वाली ना वारस, सरकार दरबारी आपल्या नशिबी मंगळावरील यानाचे नाव तरी आहे, याचे समाधान!

शेतकरीवर्गाची परिस्थिती तर इतर मोलमजुरी करणाऱ्यांपेक्षाही बिकट. त्यांना आपली शेती पिकवण्यासाठी काय काय करावे लागते, किती आणि कशा भयंकर यातना सहन कराव्या लागतात याचे गणितच न केलेले बरे. शेकतऱ्याला सुलतानी बरोबरच आसमानी आव्हानांनाही तोंड द्यावे लागते. शेतीचा हंगाम सुरू झाला की डोळे आकाशाकडे, पावसाची लक्षणे आहेत की नाहीत, या वर्षी भरपूर 

पडणार की कमी पडणार, जर कमी पडला तर पिके येणार कशी?  आणि झाल्यावर पिके राहणार कशी? नाही पडला तर पिके हाताला येणार कशी, अति पडला तर हातातली पिके जाणार. जर पाऊस पडलाच तर बी-बियाणांचे काय? पैसा तर सामान्य शेतकऱ्याकडे दुर्मिळच. कुणाकडून तरी कर्ज घ्यावे, कुणी दिले नाही तर मग सावकाराला गाठायचे, इथपासून चक्रव्यूहाला सुरुवात झाली, ज्याचा शेवट आत्महत्येपलीकडे दुसरा पर्याय त्यांना दिसत नाही. तरी दरवर्षी भारतात एक लाखाहून अधिक शेतकरी सावकारी कर्ज घेऊन पिके काढल्यानंतर ते पीक काढण्यासाठी केलेला खर्चसुद्धा परत मिळत नसल्याने आत्महत्या करतात. किती विशेष दर्जा त्यांचा. १३० कोटी जनतेमधून मिळालेल्या निवडलेल्या लाखामधून एक लोक म्हणतात. गेल्या तीनपेक्षा अधिक महिन्यांपासून शेतकरी आंदोलनात बसले आहेत. या तीन महिन्यांत २००च्या वर शेतकरी मरण पावले. सरकार म्हणते दरवर्षी एक लाखाच्या तुलनेत तीन महिन्यांमध्ये २००-३०० शेतकरी मरण पावले तर यात नवल काय? कुठे एक लाख आणि कुठे २००. असो.

शेतमजुरांची व्यथा तर यापेक्षा भयंकर. जळगाव जिल्ह्यातील रावेर ताल ुक्याच्या एका गाबातील काही शेतमजूर पपईच्या ट्रकवर बसून विक्रीसाठी मोठ्या शहराकडे निघाले असता ट्रक उलटून 

पपईखाली दबून १५ मजूर ठार झाले. किती ाâूर या मजुरांचा शेवट! दिवसाचा / रात्रीचा मिळून रोजगार तर १०० रुपये (फक्त रुपये शंभर) चोवीस तासांचा रोजगार. पपई किंवा केळ्यांनी भरलेल्या ट्रकवर बसून रात्रीचा प्रवास करायचा. तिथं ट्रक रिकामा करून परत गावी यायचे, यासाठी त्यांना पगार मिळतो. दिवसागणिक फक्त शंभर रुपये. म्हणजे या शंभर रुपयांत काय खायचे, कसे जगायचे. आजारी पडल्यास एक तर रोजागर बुडणार आणि दुसरीकडे औषधाचा खर्च. आपल्या मुलाबाळांना शिकवायचे, वयात आल्यावर त्यांचे लग्न लावून द्यायचे कसे! हे त्यांना जमत असेल रोजच्या शंभर रुपयांत? जगातले हे आठवे आश्चर्य म्हणावे लागेल. दुसरीकडे मुकेश अंबानींची दर तासाला ६ कोटींची कमाई. कोरोनाकाळात तर ही कमाई दुप्पट तिप्पट झाली होती. सगळे जग महामारीशी झुंज देत असताना या भांडवलदारांच्या खिशात अब्जावधी रुपये कसे आणि कुठून येत असावेत, हे जगातले नववे आश्चर्य! देशाच्या पंतप्रधानांच्या एका दिवसाच्या जेवणावर ४० ते ५० हजार रुपये खर्च होतात. तर त्यांचा दररोजचा खर्च एक कोटी ६२ लाख आहे. कुठे तिसरीकडे धर्माची श्रीमंती, एका सर्वेक्षणानुसार धार्मिक संस्था जगातील चौथी अर्थव्यवस्था असून जगातील १० टक्के जमीन त्यांच्या ताब्यात आहे. पपईखाली दबून मरणाऱ्यांच्या दान-दक्षिणेतून उत्पन्न झालेली ही धार्मिक श्रीमंती पपईवाल्याचे प्रतिदिन शंभर रुपये. याला म्हणतात पर्झिवरन्स.

भारताचे चालतेफिरते पर्झिवरन्स कोट्यवधींच्या संख्येने. किती छान हे नाव दिले आहे अमेरिकेने आपल्या मंगळयानाला. पण भारतातल्या कोट्यवधी यानांना हे नाव आणखीनच शोभून दिसते. इतकी तफावत देशाच्या श्रीमंत आणि सत्ताधारी व्यक्ती आणि गोरगरीब जनतेच्या कमाईमध्ये. हे जगात कुठे असेल नसेल पण भारतात आहे. का तर आमचा देश गरीब आहे. विकसित नाही. विकसनशील आहे, पण एकदाचा हा देश विकसित झाला तर पपईवाल्या मजुरांच्या आणि श्रीमंतांच्या कमाईत आणखीन किती भर पडेल हे एकदाचा विकास झाल्यावर पाहू.

आता गोष्ट शेतकरी आंदोलनाच्या पर्झिवरन्सची. तीन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत घरदार, व्यवसाय, कारभार सोडून रस्त्यावर बसले आहेत आणि जोपर्यंत सरकार ते तीन कृषिकायदे परत घेत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी केलेला आहे. दुसरीकडे सरकार या शेतकऱ्यांना प्रसन्न होऊन ल सतमुखाने घरी परतण्याची संधी देणार की नाही याबाबत काहीही सांगता येत नाही. कुणाचा पर्झिवरन्स किती काळ टिकतो हे पाहायचे आहे.

एक महत्त्वाची गोष्ट, सरकारच्या लक्षात तर येत नाही आणि येणारही नाही जे शेतकरीवर्गाचे नाही. शेती एका शेतकऱ्यासाठी एका व्यवसायापलीकडची गोष्ट आहे. 

शेती म्हणजे एक संस्कृती आहे. आपल्या शेतजमिनीशी शेतकऱ्याचे नाते एखाद्या मानवी नात्यासारखे असते. शेती त्यांचा ऐहिक जगण्याचाच आधार नसून तो त्यांचा सांस्कृतिक सामाजिक आधार आहे. एकदा का हा आधार नष्ट झाला की शेतकरी हवालदिल होतो. त्याला जगातून उठल्यासारखे वाटते. हा सांस्कृतिक वारसा पिढ्यान्पिढ्या चालत आलेला, साकारलेला, जिवंत ठेवलेला वारसा आहे.

ज्याला गावात शेतजमीन नाही त्याला समाजात स्थान नाही. फक्त ज्यांच्याकडे शेतजमिनी असतात त्यांनाच वतनदार म्हटले जाते. म्हणजे भूमीशी जोडणारा दुवा म्हणजे शेतकजमीन. नातं अबाधित ठेवण्यासाठी शेतकरी वाटेल ते करायला तयार असतात. भूमीहीन गावकऱ्यांना खालच्या दर्जाचे समजले जाते. म्हणजे त्यांचे नाते या भूमीशी नाही. मग ती व्यक्ती गावातली असो की शहरातली की देशातली. हे संस्कार भारतीय सभ्यतेमध्ये फार खोलवर रुजलेले आहेत. सरकारने जे कायदे केलेले आहेत, त्याचा रास्त परिणाम शेतकरी संस्कृतीवर होणार आणि म्हणून ते या कायद्यांचा कडाडून विरोध करत आहेत. या कायद्यांमुळे त्यांच्या जमिनी त्यांच्या ताब्यातून जाणार आहेत आणि श्रीमंत उद्योपती त्यांचे मालक होणार आहेत. एकदा असे झाले की शेतकऱ्यांसमोर यापुढे जगायचे कसे, ज्या भूमीशी आपले नाते होते तेच नाते तुटल्यावर कशासाठी जगायचे, असा प्रश्न आहे. पण या संवेदनेच्या बाबी आहेत. असंवेदनशील सरकारला हे कधीच समजणार नाही. म्हणून आंदोलनकत्र्यांच्या पर्झिवरन्सला सीमा उरलेली नाही. त्यांना पक्के माहीत आहे की त्यांचा सांस्कृतिक वारसा हिरावून घेतला तर ते कोणत्या सांस्कृतिक आधारावर जगू शकतील, त्यांना मानसिक रोग जडणार आहेत. आज च्या संख्येने दरवर्षी आत्महत्या होतात, जर हे कायदे लागू झालेच तर दहा पटींनी जास्त संख्येने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील, हे निश्चित! पर्झिवरन्स त्यांची साथ देणार नाही. या धरतीवरील यान नष्ट होईल.

-  सय्यद इफ्तिखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget