Halloween Costume ideas 2015

संपूर्ण जगातील महाप्रलयाला कारणीभूत फक्त मानवच!

chamoli

जलप्रकोप हे सांगत आहे की निसर्गावरील ज अत्याचार थांबविला पाहिजे.

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून जो हाहाकार निर्माण झाला तो अंगावर शहारे येणारा आहे. या जलप्रकोपामध्ये ऋषी-गंगा जलविद्युत प्रकल्प पूर्णतः वाहून गेला. उत्तराखंड महाप्रलयाने २०१३ मध्ये केदा-रनाथला आलेल्या जलप्रलयामुळे ५६०० ल ोकांचा मृत्यू झाला होता. आशियाई देशात जी-वाश्म इंधन आणि बायोमास यांचा अतीवापर झाल्याने त्यातून निघणाऱ्या धुरामुळे सर्वाधिक परिणाम हिमकड्यावर होत आहे. त्यामुळे त्या-ंच्या वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. १९७५ ते २००० या कालावधीत किरकोळ उष्णतेमुळे ०.२५ मीटर हिमकड्यांचे नुकसान झाले आहे. २००० सालानंतर या प्रमाणात दुप्पट वेगाने वाढ झाली. यामुळे दरवर्षी साधारणतः अर्धा-मीटर बर्फ वितळून लागला आहे. त्याचप्रमाणे उत्तराखंड भूकंपाच्या बाबतीत डेंजर झोनमध्ये आहे.

उत्तराखंडमध्ये १५०० हिमकडे आहेत. त्यातील फक्त ४०० हिमकड्यांवर स-रकारची देखरेख आहे. उत्तराखंडमध्ये ढगफुटी-चे जे प्रकार दिसून येतात त्यांचे मुख्य कारण म्हणजे हिमकडे वितळने होय. यामुळे उत्त-राखंडच्या नागरिकांना कठीण समस्यांना नेहमीच तोंड द्यावे लागते. तेथील रहीवाशांनी ऋगंगा जलविद्युत प्रकल्पाचा विरोध केला होता. परंतु सरकारने हा प्रकल्प सुरूच ठेवला.

१९७३ मध्ये उत्तराखंडमध्ये गौरी-देवी यांच्या नेतृत्वाखाली निसर्ग वाचविण्यासाठी चीपकु आंदोलनसुध्दा करण्यात आले. माजी केंद्रिय मंत्री उमाभारती यांनी सुध्दा देवभुमित प्रकल्प उभारण्यास विरोध केला होता. परंतु स-रकारने निसर्गाचा ह्रास करून ऋषीगंगा जल विद्युत प्रकल्प सुरू केला. त्यामुळेच हिमकडा वितळायला लागली. २०१३ मध्ये ढगफुटल्याने आणि हिमकडा वितळल्याने केदारनाथ, रूद्रप्रयाग, चमोली, उत्तरकाशी, बागेश्वर, आल्मोडा, पिथौरागड इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात तबाही झाली होती व यात ५६०० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

मानवाच्या अतिरेकाचा बदला निसर्ग केव्हा घेईल हे सांगणे कठीण आहे. परंतु को-णताही महाप्रलय, तबायी, विनाशकारी आपदा असो निसर्ग आपले संकेत सर्वप्रथम देत असते. ज्याप्रमाणे जंगलात हिंसक पशुंची चाहूल लागते. त्याच क्षणी पक्षी व इतर प्राणी हिंसक पशू येण्याची सूचना सर्वांना देतात. त्याचप्रमाणे निसर्ग सुध्दा आपल्याला धोक्याची सूचना देत असते. परंतु आपण याचा कानाडोळा करतो व त्याचा परीणाम विनाशामध्ये रूपांतरीत होते. परंतु मानवजाती स्वत:च्या स्वार्थासाठी निसर्गाने दिलेली धोक्याच्या संकेताला कानाडोळा करून पुढील कार्य सुरूच ठेवतो. अशा परिस्थितीत निसर्ग विक्राळरूप धारण करून महाप्रलयात आणि सुनामीत रूपांतर होते व यांचे रूपांतरण मोठ्या प्रमाणात जिवीत हानीमध्ये होतांना आ-पण पहातो.

२०१३ चा महाप्रलय आणि २०२१ चा देवभूमिचा महाप्रलय मानवांच्या चुकांमुळे निर्माण झालेले मृत्यू तांडव आहे. ही घटना भारताच नाही तर संपूर्ण जगात आपल्याला पहायला मिळत आहे. गेल्या १० वर्षात महा-प्रलय, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, ढगफुटी, सुनामी, अती उष्णता, अती पाऊस, अती थंडी अशा पध्दतीचे विक्राळ रूप संपूर्ण जग पहात आहे. आपण म्हणतो की जंगलातील प्राणी शह-रात येत आहे. परंतु हा समज चुकीचा आहे. आपणच जंगलाकडे प्रवेश करून वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात टाकत आहोत.

त्याचप्रमाणे (पृथ्वीचे) भूमीचे खनन यामुळेसुध्दा पृथ्वीचे 

संतुलन डगमगतांना दिसत आहे. ही बाब - भारताचीच नाही तर संपूर्ण जगाची सत्य कथा आहे याला कोणीही नाकारू शकत नाही. मानवाने स्वत:च्या स्वार्थासाठी जीतक्या सुखसुविधा निर्माण केल्या त्याच्या हजार पटीने निसर्गाने आपल्यांसाठी खायी खोदून ठेवल्या आहेत. केदारनाथचा महाप्रलय असो वा देवभूमितील महाप्रलय असो यामुळे जीवीत हानी व वित्तीय हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे व होत आहे. महाप्रलय पाण्याचा लोंढा घेऊन येतो तर मानव आपल्या डोळ्यातून तेवढेच अश्रृ वाहून दु:खाचा डोंगर उभा होतो. शेवटी हिमकड्याचे अश्रृ म्हणा किंवा आभाळाचे अश्रृ यांच्या तुलनेत मानवाच्या एका अश्रृने मोठा दु:खाचा डोंगर उभा होतो. याचे  प्रायचीत्य दुर्घटनेच्या रूपात सर्वांनाच भोगावे लागते.

केदारनाथमधील दुर्घटनेच्या आठ वर्षांनंतर हिमकडा कोसळून धौलीगंगा नदीला आलेल्या सुनामी पुरामुळे जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. आता हे सिध्द झाले आहे की तापमानवाढीमुळे हिमकड्यांचा पाया ढासळत आहे. चामोलीसारख्या घटना त्याची साक्ष आहे. जवळपास ८० कोटी लोकसंख्या सिंचन, वीज आणि पाणी यासाठी हिमालयातील हिमकड्यावर अवलंबून आहे. मात्र हिमकडे कोसळण्याचे प्रमाण तापमानामुळे वाढू लागले असून येणाऱ्या काही दशकात हिमकडे नामशेष होतील अशी भीती वर्तवीली जात आहे. हिमालयातील असंख्य प्रकल्पांना स्थानीकांचा विरोध होता आणि आहे तरीही विरोधाला डावलून अनेक प्रकल्प उभारल्या जात आहे. यामुळे या परिसरातील संपूर्ण रचना बदलतांना आपल्याला दिसते. याचाच फटका २०१३ मध्ये व आता ७ फेब्रुवारी २०२१ बसला. यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तीय हानी झाली.

या भूमिला केवळ आपल्या सोयीन-ुसार वापरणे योग्य नाही. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कारण स्वत:च्या सुखसुविधांसाठी भारतच नाही तर संपूर्ण जग विनाशाकडे वाटचाल करतांना  दिसत आहे. याला कुठेतरी थांबवायला पाहिजे. अन्यथा २०१३ व ७ फेब्रुवारी सारख्या घटना ओढावू शकतात याला नाकारता येत नाही. ७ फेब्रुवारीला सकाळी दहाच्या सुमारास चमोली जिल्ह्यातील लेणी गावात कर्णभेदी आवाज आला आणि मिनिटांत ऋषीगंगा नदीने उग्ररूप धारण करून महाप्रलयात रूपांतर झाले व देवभुमित हाहाकार निर्माण झाला. उत्तराखंड आणि हिमालय ही खरोखरच देवभुमी आहे जंगल, नद्या, पशु-पक्षी, हिंसकपशु यांचे याठिकाणी वास्तव्य आहे. अशा ठिकाणी जर मानव आक्रमन करीत असेल तर निसर्गाचे कोपने वावडे ठरणार नाही. आज निसर्ग साबुत आहे म्हणूनच या पृथ्वीतलावर मानव, पशु-पक्षी, जीवजंतू आपल्याला दिसत्-ाात. त्यामुळे नैसर्गिक आपदा रोखण्यासाठी निसर्गाचा ह्रास थांबवीलाच पाहिजे व निसर्गाचे जतन करून पर्यावरणाला वाचवीले पाहिजे.

असे सांगण्यात येते की भारतातील ५० पेक्षा अधिक बांध खस्ता हालतमध्ये आहे किंवा त्याचे दीवस पूर्ण झाले आहे. ही परीस्थिती भारतातीलच नसुन संपूर्ण जगाची आहे. म्हणजे मानव हळूहळू धोक्याच्या पातळी ओलांडतांना दिसत आहे. याला रोखले पाहिजे. आतापर्यंत या विनाशकारी प्रलयामध्ये ३१ लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे व अजून शेकडो लोक लापता असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीत जवान, एनडीआरफ सह संपूर्ण जवान ताकदीने मदत कार्य करीत आहे त्यांना मी सलाम करतो. देवभूमित मानवाच्या अत्याचारामुळेच आज निसर्ग कोपत आहे. सरकारने पर्यावरणाव-रील विकासाचे ओझे कमी केले पाहिजे. यातच सर्वांचे सुख-समाधान आहे.

उत्तराखंडची दुर्घटना हेच सांगत आहे की आतातरी सावध झाले पाहिजे. अन्यथा दु:-खाचा डोंगर उभा होऊ शकतो. सरकारला मी आग्रह करतो की अशा विनाशकारी प्रलयांपासुन वाचण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. मृतांच्या प्रती आदरांजली व्यक्त करतो व जे लापता आहेत ते ताबडतोब मिळावे व त्यांची घरवापसी व्हावी अशी ईश्वरापाशी प्रार्थना करतो.

रमेश कृष्णराव लांजेवार

नागपूर, मो.नं.९३२५१०५७७९

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget