Halloween Costume ideas 2015

नमाजचे महत्त्व : प्रेषितवाणी (हदीस)

शदाद बिन औस यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याने दाखविण्यासाठी नमाज अदा केली त्याने ‘शिर्क’ केले (अनेकेश्वरत्व अवलंबिले) आणि ज्याने  दाखविण्यासाठी रोजा ठेवला त्याने ‘शिर्क’ केले आणि ज्याने दाखविण्यासाठी ‘सदका’ (दानधर्म) केले त्याने ‘शिर्क’ केले.’’ (हदीस : मुस्नद अहमद)

स्पष्टीकरण
या शिकवणीद्वारे पैगंबर मुहम्मद (स.) हे सांगू इच्छितात की प्रत्येक पुण्याईचे कार्य अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी असावे. असे कार्य करण्यापूवी असा संकल्प (नियत) असावा की ‘‘हा माझ्या स्वामीचा आदेश आहे आणि मला त्याच्याच प्रसन्नतेची काळजी आहे.’’ दुसऱ्यांच्या दृष्टीने सदाचारी बनण्यासाठी आणि त्यांना खूश करण्यासाठी जे पुण्याचे काम  केले जाईल त्यास कसलेही मूल्य नसते. अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठीच्या संकल्पासह करण्यात आलेल्या कार्यालाच किंमत असते.

सामूहिक नमाज
माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांचे कथन आहे. मूळ हदीसमध्ये ‘फ़ज्ज’ हा शब्द आला आहे, याचा अर्थ आहे ‘अलिप्त राहणे’. सामूहिक (जमाअतसह) नमाजमध्ये सर्व प्रकारचे  मुस्लिम सहभागी असतात. श्रीमंत, गरीब, चांगले कपडे परिधान करणारे आणि फाटके कपडे परिधान करणारेदेखील. ज्या लोकांमध्ये मोठेपणाची घमेंड असते आणि संपत्तीच्या नशेत   धुंद असतात त्यांना त्यांच्याबरोबर दुसरा कोणी उभे राहणे आवडत नाही, म्हणून ते नमाज आपल्या घरात अदा करतात. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या रोगाचा इलास असा सांगितला   आहे, ‘‘सामूहिक नमाज अदा करा, आपल्या घरात अथवा मस्जिदमध्ये एकट्याने नमाज अदा करू नका.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
त्याचप्रमाणे सामान्यत: सामूहिक नमाज अदा करताना ‘शैतानी’ (वाईट) विचार कमी निर्माण होतात आणि मनुष्याचा अल्लाहशी संबंध दृढ होतो. म्हणूनच पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यानुसार सामूहिक नमाज अदा करण्याचा दर्जा २७ पटींनी अधिक असतो. हीच हकीकत पुढील हदीस (५३) मध्ये उद्धृत करण्यात आली आहे.

माननीय अबी बिन कअब यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दुसऱ्या मनुष्याबरोबर अदा करणाऱ्या मनुष्याची नमाज, त्याने एकट्याने अदा केलेल्या नमाजच्या  तुलनेत अधिक ईमान विकसित होण्याचे कारण बनते. दोन मनुष्यांबरोबर अदा केलेली नमाज, एका मनुष्याबरोबर अदा केलेल्या नमाजच्या तुलनेत अधिक ईमान विकसित होण्याची  सबब बनते. तसेच अधिक संख्येत असलेल्या लोकांसह अदा केलेली नमाज अल्लाहला अधिक पसंत आहे. (तितका अधिक अल्लाहशी संबंध दृढ होईल.)’’ (हदीस : अबू दाऊद)

माननीय अबू दरदा (रजि.) यांच्या कथनानुसार, ज्या वस्तीत अथवा गावात तीन मुस्लिम असतील आणि तेथे सामूहिक (जमाअतसह) नमाज अदा केली जात नसेल तर त्यांच्यावर  शैतान प्रभुत्व प्राप्त करतो. तेव्हा सामुस्रfयक नमाज अदा करण्याची स्वत:वर सक्ती करा कारण कोल्हा फक्त त्या शेळीला खातो जी आपल्या चरण्याच्या ठिकाणापासून आणि आपल्या  
कळपापासून वेगळी झालेली असते. (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
या हदीसमध्ये ही हकीकत व्यक्त करण्यात आली आहे की सामूहिक नमाज अदा करणाऱ्यांवर अल्लाहची कृपावृष्टी होते आणि तो त्यांचे रक्षण करतो, परंतु जेथे ‘जमाअत’सह नमाजचे  आयोजन केले जात नाही तेव्हा अल्लाह आपला रक्षण आणि देखरेखीचा हात काढून घेतो आणि ते लोक शैतानाच्या ताब्यात जातात. मग ते शैतानाला पाहिजे तसे बळी पडतात आणि  हव्या त्या मार्गाने नेतो. जसे- शेळ्यांचा कळप आपल्या कुरणाजवळ असतात तेव्हा दोन प्रकारच्या संरक्षणात असतात, एक मालकाच्या संरक्षणातमुळे आणि दुसरे त्या शेळ्या एकत्रित  असल्याकारणाने (एकता). या दोन्ही कारणांमुळे कोल्हा त्यांची शिकार करू शकत नाही. परंतु जर एखादी मूख शेळी आपल्या मालकाच्या इच्छेविरूद्ध कुरणातून बाहेर पडून मागे राहिली  अथवा पुढे गेली तर अतिशय सहजतेने कोल्हा तिची शिकार करतो, कारण आता ती दुर्बलही आहे आणि मालकाच्या संरक्षणापासूनही स्वत:ला वंचित करून घेतले आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget