Halloween Costume ideas 2015

अल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(२९) मी इच्छितो की माझा आणि तुझा गुन्हा तूच संचित करशील५० आणि नरकवासी बनून राहशील. अत्याचारींच्या अत्याचाराचा हाच खरा योग्य मोबदला आहे.’’
(३०) सरतेशेवटी त्याच्या मोहाने आपल्या भावाची हत्या करणे त्याच्यासाठी सोपे केले आणि तो त्याला ठार मारून त्या लोकांत सामील झाला जे नुकसान सोसणारे आहेत.
(३१) मग अल्लाहने एक कावळा पाठविला जो जमीन खणू लागला जेणेकरून त्याला दाखवावे की आपल्या भावाचे प्रेत कसे लपवावे. हे पाहून तो उद्गारला, ‘‘खेद आहे मजवर! मी या  कावळ्यासारखासुद्धा बनू शकलो नाही की आपल्या भावाचे प्रेत लपविण्याची युक्ती काढली असती.’’५१ यानंतर त्याने आपल्या कृत्यावर फार पश्चात्ताप केला.५२
(३२) याच कारणास्तव बनीइस्राईलकरिता आम्ही हे फर्मान लिहिले होते५३ की, ‘‘ज्याने एखाद्या माणसाला खुनाबद्दल अथवा पृथ्वीतलावर उपद्रव पसरविण्याव्यतिरिक्त अन्य कारणाने  ठार केले तर त्याने जणू काही सर्व मानवांना ठार केले. आणि ज्याने कोणाला जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले.’’५४ परंतु त्यांची अवस्था अशी   आहे की आमचे पैगंबर वरचेवर त्यांच्यापाशी उघड उघड आदेश घेऊन आले तरीसुद्धा त्यांच्यात मोठ्या संख्येने पृथ्वीवर अतिरेक करणारे लोक आहेत.
(३३) जे लोक अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांच्याशी युद्ध करतात आणि भूमीवर याकरिता धावपळ करतात की हिंसाचार माजवावा,५५ त्यांची शिक्षा ही आहे की ते ठार मारले जातील   अथवा सुळावर चढविले जातील अथवा परस्परविरूद्ध दिशेने त्यांचे हातपाय कापले जातील, अथवा त्यांना देशांतर करावयास लावले जाईल.५६ हा अपमान व नामुष्की तर त्यांच्यासाठी दुनियेत आहे आणि मरणोत्तर जीवनामध्ये त्यांच्याकरिता याहून मोठी शिक्षा आहे.


५०) म्हणजे याऐवजी की एकदुसऱ्याला ठार करण्याच्या गुन्ह्यात आम्ही पडावे, मी हे उत्तम समजतो की दोघांचे गुन्हे तुझ्या एकट्याच्याच डोक्यावर यावे. तुझा ठार करण्याचा गुन्हा   आणि त्या क्षतीचा गुन्हा जो मी तुला केली, जेव्हा मी स्वत:चा जीव वाचविण्याचा प्रयत्न करत होतो.
५१) अशाप्रकारे अल्लाहने एका कावळ्याच्या द्वारा आदम (अ.) यांच्या त्या दुराचारी पुत्राला त्याच्या मुर्खपणावर व अज्ञानतेवर  सचेत केले. त्याला आपल्या मनात डोकावण्याचा अवधी  मिळाला तेव्हा तो अतिलज्जित झाला. कारण भावाचे प्रेत कसे लपवावे हेसुद्धा त्याला माहीत नव्हते. तो याविषयी कावळयापेक्षासुद्धा निर्बुद्ध निघाला. त्याला आता कळून चुकले की  आपल्या भावाला ठार करणे हे अतिमूर्खतापूर्ण आणि अज्ञानतापूर्ण कृत्य होते. नंतरचे वाक्य ``तो आपल्या करनीवर पश्चात्ताप करू लागला.'' याच अर्थाला प्रमाणित करीत आहे.
५२) येथे या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख करण्याचा मूळ उद्देश यहुदींच्या त्या कटकारस्थानांवर सूक्ष्म दृष्टीने निंदा करणे आहे. जे त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या प्रतिष्ठित  सहाबा यांना ठार मारण्यासाठी केले होते. (पाहा या सूरहची टीप क्रं. ३०) दोन्ही घटनांमध्ये स्पष्ट समानता दिसून येते. त्यांनी आपल्या या अपमानित स्थितीच्या कारणांवर विचार केला  असता आणि आपल्या उणिवा दूर करण्यास तयार झाले असते ज्या कारणांनी त्यांना अल्लाहने रद्द केले होते. त्या लोकांवर (ग्रंथधारकांवर) अज्ञानतेचा तोच प्रभाव पडला होता ज्यात  आदम (अ.) यांचा दुसरा दुराचारी मुलगा ग्रस्त अल्लाहने अरबांच्या या (उम्मी) अशिक्षितांना स्वीकृत करून सन्मानित केले आणि त्या जुन्या ग्रंथाधारकांना रद्द केले. एकीकडे   धर्मपरायणता होती आणि दुसरीकडे धर्मपरायणता नव्हती. परंतु तरीही ज्यांना रद्द केले होते (ग्रंथधारक) झाला होता. त्याच्याचप्रमाणे द्वेष आणि तिरस्काराच्या अग्नीत होरपळून अल्लाहच्या पार्टीच्या लोकांना ठार करण्यास तयार झाले होते. अशा व्रूâर व अज्ञानतापूर्ण कारवायांनी ते अल्लाहचे प्रिय तर होणारच नव्हते. या घृणित कारवाया त्यांना अधिकच धिक्कारित करणार होत्या याची त्यांना चांगली कल्पना होती.
५३) म्हणजे बनीइस्राईल त्या दुर्गुणांचे बळी पडले होते ज्या दुर्गुणांचे प्रदर्शन आदम (अ.) यांच्या त्या दुष्ट पुत्राने केले होते. म्हणून कुणालाही ठार करू नये असा कडक आदेश अल्लाहने  दिला होता आणि आपल्या फर्मानात हे शब्द लिहिले होते. खेदाने म्हणावे लागते की आजच्या बायबलमध्ये या ईशआदेशाच्या अनमोल शब्दांना स्थान नाही. तलमुदमध्ये असा आदेश  मिळतो, ``ज्याने एका इस्राईलीची हत्या केली, अल्लाहच्या ग्रंथानुसार त्याने जणुकाही जगातील सर्वमानवांची हत्या केली. ज्याने एका इस्राईलीचा जीव वाचवला तर जणूकाही त्याने  संपूर्ण मानवांचे रक्षण केले.'' त्याचप्रकारे तलमुदमध्ये उल्लेख आहे की हत्या करण्याच्या दाव्यात बनीइस्राईली न्यायाधीश साक्षीदारांना सांगत, ``ज्याने एखाद्याची हत्या केली तर त्याची  अशा प्रकारे चौकशी केली जाईल जणूकाही त्याने जगभराच्या लोकांची हत्या केली आहे.''
५४) म्हणजे जगात मानव-वंश टिकून राहाण्यासाठी एकदुसऱ्याच्या प्राणाचा आदर प्रत्येकाच्या मनात असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने एकदुसऱ्याचे जीवनरक्षण करण्याची भावना बाळगणे  आवश्यक आहे. जो कोणी अकारण एखाद्याची हत्या करतो तेव्हा तो फक्त एकावरच अत्याचार करीत नाही. तो खुनी दुसऱ्याची हत्या करून सिद्ध करतो की मानवी जीवनाच्या आदर  सन्मानांने त्याचे मन खाली आहे. त्याला मानवी सहानुभूती नाही म्हणून तो संपूर्ण मानवतेचा शत्रू आहे. अशा व्यक्तीमध्ये तो दुर्गुण सापडतो जो इतर सर्व मानवात असेल तर पूर्ण   मानवजातच नष्ट होऊन जाईल. याविरुद्ध जो मनुष्य मानवी जीवनाचे रक्षण व आदर करतो तो खरेतर मानवतेचा आदर करणारा आहे आणि समर्थक आहे कारण त्यात ते वैशिष्ट्य  सापडते ज्यावर मानवता टिकून आहे.
५५) धरतीने (भूमी) अपेक्षित तो देश किंवा प्रदेश आहे ज्यामध्ये शांती व्यवस्था स्थापित करण्याची जबाबदारी इस्लामी राज्याची आहे. अल्लाह आणि अल्लाहच्या पैगंबरांशी लढण्याचा  अर्थ त्या कल्याणकारी व्यवस्थेविरुद्ध लढणे जी इस्लामी राज्याने स्थापित केली आहे. इस्लामी धर्मशास्त्रींच्या मतानुसार याने अभिप्रेत ते लोक आहेत जे सशस्त्र आणि सुसज्ज बनून डाका टाकतात.
५६) या वेगवेगळया शिक्षा संक्षिप्त् रूपात सांगितल्या आहेत. याच्या आधाराने न्यायाधीश (काझी) किंवा शासनाध्यक्ष आपल्या विवेकबुद्धीने अपराधीला त्याच्या अपराधानुसार योग्य शिक्षा  देतील. मुख्य उद्देश आहे की एखाद्या माणसाने इस्लामी राज्यात राहून इस्लामी व्यवस्थेला उलटण्याचा कट करणे जघन्य अपराध आहे आणि त्याला या कडक शिक्षांपैकी एखादी कडक  शिक्षा दिली जाऊ शकते

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget