Halloween Costume ideas 2015

जमाअत - ए - इस्लामीची आवश्यकता का भासली - (भाग-9)

Shahadate Haq
जमाअते इस्लामीच्या अध्यक्षपदी कोणाला नेमले जावे, यासबंधानेही आम्ही कोणतीही आततायी कृती केलेली नाही. आमची ही संघटना कुठल्या व्यक्तीविशेषवर अवलंबून नाही, ज्यामुळे की  कुठल्या एका खास पदासाठी, कुठल्या एका विशिष्ट व्यक्तीने आपला दावा दाखल करावा. ज्यांच्या चमत्कारांची, दिव्य वाणीची आणि पवित्रतेच्या गोष्टींची जाहिरात केली जाते व त्याकडे लोकांना बोलाविले जाते, स्वप्नातील गोष्टी, चमत्कार, गुप्त ज्ञान अशा व्यक्तीगत पावित्र्याच्या गोष्टींकडे बोलाविण्याचा या संघटनेमध्ये प्रश्‍नच उद्भवत नाही. येथे व्यक्तीविशेषकडे लोकांना बोलाविणे हा उद्देश नाही तर त्या उद्देशाकडे बोलाविणे या संघटनेचा उद्देश आहे, जो उद्देश कुरआनने सर्व मुस्लिमांच्या जीवनाचा उद्देश ठरवलेला आहे. आम्ही लोकांना त्या तत्वांकडे बोलावितो ज्यांच्या समुच्चयाचे नाव इस्लाम आहे. जे लोक या उद्देशाच्या प्राप्तीसाठी कुरआनने दिलेल्या तत्वांवर आमच्या सोबत मिळून काम करू इच्छितात तेच बरोबरीच्या दर्जा ने या संघटनेचे सदस्य बनू शकतात. सर्व सदस्य मिळून आपल्यामधील त्या व्यक्तीला अध्यक्ष नेमतात जो त्यांना योग्य वाटतो. म्हणून या संघटनेच्या अध्यक्षपदावर कोणाचा खाजगी अधिकार नाही. उलट संघटित रूपाने काम करण्यासाठी एक जबाबदार व्यक्तीची गरज असल्यामुळे अध्यक्ष नेमल्या जातो व तो योग्यपणे काम करत नसेल तर त्याला या पदावरून काढलेही जावू शकते, त्याच्या ठिकाणी दूसरा अध्यक्ष नेमल्या जावू शकतो. जी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती ही की, या अध्यक्षाला जरी अमीर म्हटले जात असले तरी तो फक्त या संघटनेचा अमीर आहे, संपूर्ण मुस्लिम समाजाचा नाही. त्याचे आज्ञापालन फक्त त्या लोकांसाठीच जरूरी आहे, जे या संघटनेचे सदस्य आहेत. आमच्या मनामध्ये असला विचार सुद्धा नाही की अमीरला एवढे महत्व द्यावे ज्यामुळे लोकांमध्ये असा संदेश जाईल की जे लोक त्याची आज्ञापालन करणार नाही ते अज्ञानी अवस्थेत मरतील.
    आता ईश्‍वराखातर मला सांगा की, जेव्हा आम्ही या पद्धतीने काम करत आहोत तर मग या जमाअतला ’उम्मत में एक नया फिरका’ कसे बरे म्हटले जाईल? तो फिरका कसा बनेल? आश्‍चर्य म्हणजे आमच्यावर या पंथीयतेचा आरोप तेच लोक लावत आहेत जे स्वतः चुका करत आहेत. ज्यांच्यामुळे समाजामध्ये फिरकाबंदी होत आहे. ज्यांच्या स्वप्नांची आणि चमत्कारांची चर्चा होत असते, ज्यांच्याकडे सर्व काम ’हजरत’वरील व्यक्तीगत श्रद्धेपोटी चालत राहते. ज्यांच्याकडे खास पदासाठी खास व्यक्तीचा दावा केला जातो. ज्यांच्याकडे गौण गोष्टींवर आपसात भांडणे आणि तर्कवितर्क केले जातात. जे प्रश्‍न आपसात बसून विचार विमर्श करून सोडविले गेले पाहिजेत, ते सोडविण्यामध्ये गटबाजी केली जाते. हेच लोक आमच्यावर पंथीयतेचा आरोप करण्यामध्ये पुढे-पुढे आहेत. जर कोणाला वाईट वाटणार नसेल तर मी स्पष्ट शब्दांत सांगू इच्छितो की, आमच्या त्या गुन्ह्यावर हे लोक नाराज आहेत तो गुन्हा तो नाही जो की हे त्यांच्या तोंडाने म्हणत आहेत, उलट तो गुन्हा हा आहे की, आम्ही धर्माच्या त्या मूळ कामाकडे लोकांना बोलाविलेले आहे जे त्यांना आवडत नाही आणि या कामासाठी आम्ही तो खरा मार्ग अवलंबविलेला आहे ज्यामुळे त्यांच्या चुका स्पष्टपणे समोर येतांना दिसत आहेत.
    आम्हाला सांगितले जाते, की जर तुम्हाला हेच काम करावयाचे होते तर त्यासाठी वेगळी जमाअत विशिष्ट अशा नावाने का बनविली? अशामुळे     समाजामध्ये फूट पडते. वास्तविक पाहता हा विचित्र आरोप आहे. मला आश्‍चर्य या गोष्टीचे आहे की, जेव्हा निधर्मी, धर्माविरूद्ध राजकारणासाठी, गैरइस्लामी शिक्षणासाठी, धार्मिक गटबाजी केवळ भौतिक फायद्यासाठी केली जाते, पाश्‍चात्य लोकशाहीच्या फॉसिस्ट पद्धतींवर मुस्लिमांच्या संघटना विशिष्ट अशा नावाने बनविल्या जातात, तेव्हा त्यांना शांतपणे सहन केले जाते. परंतु इस्लामचे मूळ काम करण्यासाठी, शुद्ध इस्लामी तत्वांवर जर एक संघटना बनत असेल तर त्यामुळे समाजामध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण होते आणि अशी जमात सहन करण्यापलिकडची होवून जाते. यामुळे मला शंका वाटते की, या लोकांचा आक्षेप मुळात जमाअत बनविण्यावर नाही तर या गोष्टीवर आहे की, एखादी जमात शुद्ध धर्माच्या मूळ कामासाठी बनावी, त्यांना हे सहन होत नाहीये. तरीपण मी अशा लोकांना नम्रपणे सांगू इच्छितो की, नवीन जमाअत बनविण्याचा गुन्हा आम्ही नाईलाजास्तव केलेला आहे, आनंदाने नव्हे.
    देशातील सर्व मुसलमानांना माहित आहे की, जमाअते इस्लामीची स्थापना करण्यापूर्वी मी कित्येक वर्षे एकटा ओरडत होतो की, ’मुस्लिमांनों तुम्ही या कोणत्या मार्गावर जात आहात? आपली शक्ती आणि प्रयत्न पणाला लावत आहात? खरे पाहता तुमचे करावयाचे काम तर हे आहे, या कामासाठी आपली पूर्ण शक्ती लावा. माझे हे म्हणणे सर्व मुस्लिमांनी स्वीकार केले असते तर फारच छान झाले असते. मग मुस्लिमांमध्ये एक जमाअत बनविण्याऐवजी सर्व मुस्लिमांची एक जमाअत बनली असती आणि किमान भारतापूर्ती तरी तिला ’अल-जमाअत’ म्हणता आले असते. म्हणजे ती एक अशी विशिष्ट जमाअत तयार झाली असती जिच्यामध्ये सर्व स्तरातील मुसलमान एकत्र आले असते आणि जे या जमाअतमध्ये आले नसते त्यांना इस्लामच्या बाहेरचे मानले गेले असते.’
    एवढेच नव्हे तर भारतात मुस्लिमांच्या ज्या संघटना काम करत होत्या त्यातली एखाद्या संघटनेने सुद्धा माझे म्हणणे ऐकले असते तरी आम्ही त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी आनंदाने तयार झालो असतो. मात्र जेव्हा ओरडून-ओरडून आम्ही थकलो आणि आमचे म्हणणे कोणीही ऐकले नाही तेव्हा नाविलाजाने हा निर्णय करावा लागला.  व म्हणावे लागले की जे लोक आमच्या संघटनेच्या उद्देशाला आणि कामाच्या पद्धतीला योग्य समजतात व हे काम करणे आपले कर्तव्य समजतात, त्यांनी स्वतःच या जमाअतमध्ये यावे व जमाअतच्या उद्देशप्राप्तीसाठी सामुहिक प्रयत्न करावेत.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget