Halloween Costume ideas 2015

व्यसनमुक्त समाज काळाची गरज

विश्‍व स्पर्धेत उतरणारा आमचा भारत देश लोकसंख्येत अग्र्रगण्य देश, तरूण देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. असे असले तरीही आज अनेक समस्यांनी वेढला जात आहे. मग ती समस्या सामाजिक असो, राजकीय असो, आर्थिक असो की शैक्षणिक. त्याला कारणेही अनेक आहेत. उदा. भ्रष्टाचार, गरीबी, कुपोषण, व्यसनाधिनता. आज व्यसनाच्या आधीन युवावर्ग जात आहे. तो बुलेट ट्रेनच्या गतीने, व्यसन मग ते दारूचे असो, चरस, गांजा, तंबाखू, गुटखा, ड्रग्स, धुम्रपान या व्यसनामध्ये भरडला जात आहे. त्याला वेळीच थांबविले नाही तर आपला समाज उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. याची अनेक उदाहरणे असून, रेव्हपार्टीज याचे जीवंत उदाहरण आहे.     
    राजधानी मुंबई ते लहान-लहान खेड्यात (ग्रामीण भत्तगात) हे नशेचे वादळ उग्ररूप धारण करत आहे. अनेक कुटुंबाची राखरांगोळी होत आहे.
    दारू सर्व दुष्कृत्यांची जननी असून, ती शासनाची परवानगी असल्याशिवाय व्यवहारात आणता येत नाही. सिगारेट शरीराला धोकादायक आहे, असे पाकीटावर लिहिलेले असले तरी आज तरूण पिढी, किशोरवयीन मुले या व्यसनाच्या आहारी जात आहेत. अनेकांना जीवनात यश मिळवता आलेले नाही किंवा अपयश पचवता आले नाही. जीवनात सुख-समाधान नाही, अपेक्षा भंग, जीवनाचा झालेला गुंता, प्रयत्न न करता यशाच्या मागे मृगजळासारखा धावणारा जेव्हा आयुष्याच्या लढाइत हरतो व नशेच्या आधीन होऊन आयुष्याची अल्पावधीत वाट लावायला तयार होतो. नशेच्या आहारी गेल्यावर त्याला संस्कार व मानवतेची ओळखच राहत नाही. नातीगोती तो विसरतो. मग हे सागरात उसळणार्‍या लाटेला सामोरे जाण्याइतपत कठीण होते. मौजे खातीर मित्राच्या आग्रहास्तव, केलेल्या कृत्याच्या दलदलीत तो फसला जातो. त्याला कारणे पण आहेत. घरातील मोठ्याचे अनुकरण, आई-वडिलांचे भांडण-तंटे, पॉकेटमनीतून मिळणारा अमाप पैसा, व्यवसायात तोटा, मनासारखे यश न मिळणे अशा अनेक समस्यांना सामोरे जाण्यासाठी तो अवैध मार्गाचा अवलंब करतो. यातून तो व्यसनात कसा अडकला हे त्याचे त्यालाच कळत नाही. मग ती दारू असो की नशेचे इंजेक्शन असो की धुम्रमापन असो! ’गुटखा’ प्रकार इतर देशात पाहायला ही मिळत नाही.
    आपण तंबाखूचे वाईट परिणाम पाहतो. तंबाखू सेवनाने दरवर्षी लाखोंचे बळी जातात. कर्करोगाच्या आहारी युवावर्ग जात आहे. तरूण पिढी संपूर्ण पोखरली जात आहे. नशेची ही ज्वलंत समस्या आज भयंकर गंभीर रूप धारण करत आहे. दारू ही पाश्‍चात्यांच्या अनुकरण  आणि फॅशनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सेवन केली जात आहे. मोठ-मोठ्या पार्टीज मध्ये तरूण मद्यधुंद होतात. पण भविष्याचा कधी विचार केलेला नसतो.
    आज नशेच्या वस्तू मिळण्याची सुविधा इतकी सुलभ झाली आहे की अनेक सोयी हाकेच्या अंतरावर उपलब्ध झालेल्या आहेत. याचे दुष्परिणाम कळत असले तरी युवा पिढी नशेच्या आधीन जात आहे. 90 टक्के बलात्काराच्या घटना या नशेत केेलेल्या पाहावयास मिळतात. तरूण-तरूणी अती झाल्यानंतर आत्महत्या सारखी टोकाची भूमिका घेत आहेत. अल्कोहोल मिश्रित द्रव्य पिऊन अनेक लोक वाहन चालवून नाहक अनेकांचे प्राण घेत असल्याच्या घटना नित्याच्या झालेल्या आहेत. 
    याशिवाय, एक वेगळच व्यसन आजच्या युवा पिढीला जडले आहे. ते म्हणजे मोबाईलचा अतीवापर.त्यामुळेे निद्रानाशावर उपाय म्हणून युवावर्ग नशेच्या आहारी जात आहे. चित्रपटातील अश्‍लिल दृश्ये पाहून आलेल्या उत्तेजनेवर उपाय तो नशेतूनच शोधतो. तेंव्हा तो त्याच्या दुष्परिणामाला विसरतो. क्षणिक सुखासाठी आयुष्याची राख करतो, दारू व्यसनासाठी आग्रह करणारे, दुःखात कोणीच साथ देत नसल्यामुळे तो एकांकी जीवनाचा नाश करायला धजतो. खरच यावर गंभीरतेने विचार करायची वेळ आली आहे.
    मनात ईशभय असेल तर माणूस वाईटापासून अलिप्त राहतो. तरूण वर्गात मानसिक बळ निर्माण करून आत्मनिर्भयतेने निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. आपले पाल्य शाळेत कोणत्या सवयींच्या मित्रासोबत आहेत यावर पाल्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
    ज्वलंत नशेची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. त्यासाठीच जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राने ’नशेचा नाश देशाचा विकास’ ही नशा विरोधी मोहिम 2 ते 8 ऑक्टोबर पर्यंत नुकतीच राबवून समाजाचे लक्ष या महत्वाच्या प्रश्‍नाकडे वेधलेले आहे. यातून झालेल्या जनजागृतीतून अनेक लोकांचे भले होईल, यात शंका नाही. मोहीम जरी संपली तरी प्रश्‍न संपलेला नाही याची  सर्वांनी मिळून जाण ठेवण्याची गरज आहे. आणि नशेच्या या अजगर रूपी विळख्याला नष्ट करायचे आहे.
 
- डॉ.आयेशा पठाण
9158805927 (नांदेड)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget