Halloween Costume ideas 2015

आलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(१४६) ज्यांच्यासह मिळून असंख्य ईशभक्तांनी युद्ध केले. अल्लाहच्या मार्गात जी संकटे त्यांच्यावर कोसळली त्यामुळे ते हताश झाले नाहीत, त्यांनी दुबळेपणा दाखविला नाही. ते  (असत्यापुढे) नतमस्तक झाले नाहीत.१०७ अशाच संयमी लोकांना अल्लाह पसंत करतो.
(१४७) त्यांची प्रार्थना केवळ हीच होती, ‘‘हे आमच्या पालनकर्त्या, आमच्या चुका आणि उणिवांबद्दल क्षमा कर, आमच्या कार्यात तुझ्या मर्यादांचे जे काही उल्लंघन झाले असेल ते माफ  कर, आमचे पाय स्थिर कर आणि काफिर (विरोधक)विरूद्ध आम्हाला मदत कर.’’
(१४८) सरतेशेवटी अल्लाहने त्यांना जगातील लाभदेखील दिले व त्याहून श्रेष्ठतर, परलोकांतील लाभदेखील प्रदान केले. अल्लाहला असेच सत्कर्मी लोक पसंत आहेत.
(१४९) हे ईमानधारकांनो, जर तुम्ही त्या लोकांच्या इशाऱ्यावर चालू लागला ज्यांनी कुफ्र (अधर्म)च्या मार्गाचा अवलंब केला आहे तर ते तुम्हाला परत मागे नेतील१०८ आणि तुम्ही  असफल व्हाल.
(१५०) (त्यांच्या गोष्टी चूक आहेत) सत्य असे आहे की अल्लाह तुमचा पाठीराखा व साहाय्यक आहे आणि तो सर्वोत्तम साहाय्य करणारा आहे.
(१५१) लवकरच ती वेळ येणार आहे जेव्हा आम्ही सत्याचा इन्कार करणाऱ्यांच्या मनावर दरारा बसवू यासाठी की त्यांनी अल्लाहबरोबर अशांना ईशत्वात भागीदार ठरविले आहे ज्यांच्या  भागीदार असण्यासंबंधी अल्लाहने कोणतीही सनद उतरविली नाही. त्यांचे शेवटचे ठिकाण जहन्नम (नरक) आहे आणि फारच वाईट आहे ते ठिकाण जे त्या अत्याचाऱ्यांच्या नशिबी येणार  आहे.
(१५२) अल्लाहने (समर्थन व साहाय्याचे)जे वचन तुम्हाला दिले होते ते तर त्याने पूर्ण केले. सुरवातीला त्याच्या हुकुमाने तुम्हीच त्यांना ठार करीत होता. पण जेव्हा तुम्ही दुबळेपणा  दाखविला व आपल्या कार्यात आपापसांत मतभेद दाखविले, आणि ज्या क्षणी ती वस्तू अल्लाहने तुम्हाला दाखविली जिच्या प्रेमात तुम्ही गुरफटला होता (म्हणजे युद्धातील लुटीचा माल)  तेव्हा तुम्ही आपल्या सरदाराच्या आज्ञेविरूद्ध गेला. - कारण की तुम्हापैकी काहीजण  इहलोकाचे इच्छुक होते आणि काहीजण मरणोत्तर जीवनाची इच्छा बाळगून होते. - तेव्हा  अल्लाहने तुम्हाला अधर्मियांच्या विरोधांत पराभूत केले की ज्यायोगे तुमची परीक्षा घ्यावी आणि सत्य असे आहे की असे असूनसुद्धा अल्लाहने तुम्हाला माफच केले१०९ कारण  ईमानधारकांवर अल्लाह फार कृपादृष्टी ठेवतो.
(१५३) आठवा तो प्रसंग जेव्हा तुम्ही पळ काढीत होता, कोणाकडे वळून पाहण्याचे भानदेखील तुम्हाला राहिले नव्हते, आणि पैगंबर तुमच्या पाठीमागून तुम्हाला हाक मारीत होता.११०  तेव्हा तुमच्या त्या वागणुकीचा बदला अल्लाहने असा दिला की तुम्हाला दु:खापाठोपाठ दु:ख दिले१११ म्हणजे भविष्यकाळांत तुम्हाला हा धडा मिळावा की जे काही तुमच्या हातातून  निघून जाईल अथवा जे संकट तुमच्यावर कोसळेल त्याच्यामुळे निराश होऊ नये, अल्लाह तुमच्या सर्व कृत्यांची खबर राखणारा आहे.


१०७) म्हणजे आपश्या संख्येतील कमी व युद्ध सामग्रीची कमतरता आणि दुसरीकडे शत्रुची अधिक संख्या आणि शक्ती पाहून यांनी असत्यवादीपुढे आपले हात टेकले नाहीत.
१०९) म्हणजे तुम्ही चुक अशी केली होती की अल्लाहने तुम्हाला क्षमा केली नसती तर तुमचे उन्मूलन निश्चित झाले असते. ही अल्लाहची कृपा व त्याचे समर्थन होते आणि त्याची  मदतच होती ज्यामुळे तुमचे शत्रू तुमच्यावर काबू प्राप्त् केल्यानंतर बेहोश बनले आणि अकारण स्वत: परास्त होऊन निघून गेले.
१०८) म्हणजे ज्या द्रोही स्थितीतून (सत्य नाकारण्याच्या) तुम्ही बाहेर निघून आलात त्याच स्थितीत हे तुम्हाला पुन्हा नेतील. दांभिक आणि यहुदी, उहुद युद्धातील पराजयानंतर मुस्लिम  लोकांत हा विचार पसरविण्याचा प्रयत्न करीत होते की मुहम्मद (स.) खरोखरच अल्लाहचे पैगंबर असते तर ते पराजित झालेच नसते. हा तर एक सर्व सामान्य आपल्यासारखा माणूस  आहे. हे सामान्य माणूसच आहेत, आज जय तर उद्या पराजय! अल्लाहच्या ज्या समर्थनाचा व मदतीचा त्यानी तुम्हाला विश्वास दाखवला आहे, ते केवळ एक ढोंग आहे.
११०) उहुद युद्धात मुस्लिमांवर अचानक जेव्हा दोन्ही बाजूने हल्ला झाला आणि ते विखुरले गेले तर काहीजण मदीनाकडे पळत सुटले आणि काही उहुद पर्वतावर चढले परंतु पैगंबर  मुहम्मद (स.) एक इंचसुद्धा आपल्या जागेवरून हलले नाहीत. शत्रुंची चोहोबाजूने गर्दी होती, दहाबारा माणसांची मूठभर जमात (समुदाय) जवळ होती; तरीसुद्धा अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) या नाजुक स्थितीत पर्वताप्रमाणे आपल्या जागी अडिग राहिले आणि पळणाऱ्यांना आवाज देत होते, ``इलैया इबादल्लाही, इलैया इबादल्लाह'' (अल्लाहच्या दासांनो माझ्याकडे या, अल्लाहच्या दासांनो, माझ्याकडे या.'')
१११) दु:ख पराजित होण्याचा, दु:ख या बातमीचे (अफवा) पसरविण्याचा की पैगंबर मुहम्मद (स.) शहीद झाले, दु:ख आपले सैन्य मोठ्या प्रमाणात ठार केले जाण्याचा आणि जखमींच!  दु:ख याचे की आता तर घरसुद्धा सुरक्षित नाही. तीन हजार शत्रू ज्यांची संख्या मदीना शहराच्या लोकसंख्येपेक्षासुद्धा जास्त आहे. शत्रुचे सैन्य पराजित सैन्याला पायदळी तुडवित वस्तीत  घुसतील आणि सर्वांना ठार मारतील.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget