Halloween Costume ideas 2015

सूरह अल् आअराफ : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(७६) त्या मोठेपणाच्या वल्गना करणाऱ्यांनी सांगितले, ``जी गोष्ट तुम्ही मान्य केली आहे आम्ही तिला नाकारणारे आहोत.'' 

(७७) मग त्यांनी त्या सांडणीला ठार मारले६१ आणि अत्यंत उद्धटपणे आपल्या पालनकर्त्याची आज्ञा भंग केली. आणि सॉलेह (अ.) ना सांगितले, ``जर तू पैगंबर आहेस तर तू सांगतोस त्या यातना आमच्यावर घेऊन ये.''

(७८) सरतेशेवटी एका हादरून सोडणाऱ्या६२ संकटाने त्यांना गाठले आणि ते आपल्या घरांत पालथेच्या पालथेच पडून राहिले.

(७९) आणि सॉलेह (अ.) हे सांगत त्यांच्या वस्तीतून बाहेर निघून गेला, ``हे माझ्या देशबांधवांनो! मी आपल्या पालनकर्त्याचा संदेश तुम्हाला पोहोचविला आणि मी तुमचे खूप हित चिंतिले परंतु मी काय करू तुम्हाला आपला हितचिंतक पसंतच नाहीत.''

(८०) आणि लूत (अ.) ला आम्ही पैगंबर बनवून पाठविले. मग आठवा जेव्हा त्याने आपल्या लोकांना सांगितले,६३ ``तुम्ही इतके निर्लज्ज झाला आहात की ती अश्लील कृत्ये करता जी तुमच्या अगोदर जगात कोणी केली नाहीत?

(८१) तुम्ही स्त्रियांना सोडून पुरुषाकडून आपली कामवासना भागविता?६४ वस्तुस्थिती अशी आहे, तुम्ही सर्वस्वी मर्यादेचे उल्लंघन करणारे लोक आहात.''

(८२) परंतु त्याच्या लोकांचे उत्तर याव्यतिरिक्त काही नव्हते की, ``हाकलून द्या या लोकांना आपल्या वस्त्यांतून, मोठे आले हे पवित्र व सोवळे बनून''६५

(८३) सरतेशेवटी आम्ही लूत (अ.) व त्याच्या परिवाराला - फक्त त्याच्या पत्नीला वगळून जी मागे राहणाऱ्यांपैकी होती६६ - वाचवून बाहेर काढले.

(८४) आणि  त्या  जनसमुदायावर  वर्षाव  केला  एका वृष्टीचा,६७ तेव्हा पाहा त्या अपराध्यांचा शेवट काय झाला?६८

(८५) आणि मदयनवासियांकडे६९ आम्ही त्यांचे बंधु शुऐब (अ.) याला पाठविले. त्याने सांगितले, ``हे देशबांधवांनो! अल्लाहची भक्ती करा, त्याच्याशिवाय तुमचा कोणी ईश्वर नाही. तुमच्यापाशी तुमच्या पालनकर्त्याचे स्पष्ट मार्गदर्शन आले आहे, म्हणून वजन व मापे प्रामाणिकपणे करा, लोकांनंा त्यांच्या वस्तूत कमी देऊ नका७०



६१) एका व्यक्तीनेच मारले होते जसे कुरआन अध्याय ९१ (अश्शम्स) आणि अध्याय ५४ (अल्कमर) मध्ये उल्लेख आला आहे. परंतु सर्व राष्ट्र त्या दुष्ट अपराधाने लिप्त् होते. तो मनुष्य वास्तविकपणे या अपराधासाठी त्या लोकांच्या इच्छापूर्तीच्या प्रतिनिधी स्वरुपात होता. म्हणून आरोप पूर्ण समाजावर लावण्यात आला. प्रत्येक तो अपराध जो समाजइच्छेनुसार केला जातो किंवा समाजप्रसन्नतेसाठी केला जातो की ज्याच्या अनुसरणास राष्ट्राची अनुमती व पसंती प्राप्त् असेल तो एक राष्ट्रीय अपराध आहे. मग त्याला एक व्यक्तीने का केलेला असेना. कुरआन सांगतो की जो अपराध राष्ट्रात जाहीररित्या केला जातो आणि राष्ट्र त्याला मान्यता देते तर तो अपराध राष्ट्रीय अपराध ठरतो.

६२) या संकटाला येथे `रज़फा' (भयंकर धक्का देणारी) म्हटले आहे. दुसऱ्या ठिकाणी यासाठी `सैहा' (ओरडणे) `साईखा' (तडाखा) आणि `तागिया' (मोठा आवाज) हे शब्द वापरले गेले आहेत.

६३) पैगंबर लूत (अ.) पैगंबर इब्राहीम (अ.) यांचे पुतणे होते आणि ते राष्ट्र ज्याच्या मार्गदर्शनासाठी त्यांना अल्लाहने पाठविले होते त्या क्षेत्राला ट्रान्स जॉर्डन म्हणतात. ते क्षेत्र इराक आणि पॅलेस्टाईनच्या मध्यभागी आहे. बायबलमध्ये या राष्ट्राच्या मुख्यालयाचे नाव `सदूम' सांगितले गेले आहे. ते डेड सी (मृतसमुद्र) जवळ होते किंवा आज त्यात बुडलेले असावेत. पैगंबर लूत (अ.) आपल्या चुलत्यासह (इब्राहीम (अ.)) इराकहून निघाले आणि काही काळ सीरिया आणि पॅलेस्टाईन तसेच इजिप्त्मध्ये गस्त करून धर्म प्रचारकार्याचा अनुभव घेत होते. नंतर पैगंबरत्वाच्या पदावर आसनस्थ झाल्यावर त्या बिघाड झालेल्या लोकसमूहात सुधारकार्य करू लागले होते. `सदूमवाल्यांना' त्यांचे राष्ट्र यासाठी म्हटले गेले आहे की शक्यतो त्यांच्याशी संबंधित नाते असतील. यहुदींच्या परिवर्तीत बायबलमध्ये पैगंबर लूत (अ.) यांच्या आचरणावरच लांच्छन लावले गेले. त्यापैकी एक म्हणजे ते पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्याशी भांडण करून सदूमच्या क्षेत्रात निघून गेले होते (उत्पत्ति १३ : १-१२) परंतु कुरआन या चुकीच्या गोष्टींचे खंडन करतो. कुरआनोक्ती आहे की अल्लाहने लूत (अ.) यांना पैगंबर बनवून त्या लोकसमूहाकडे पाठविले होते.

६४) दुसऱ्या ठिकाणी या लोकसमूहाच्या (राष्ट्र) नैतिक अपराधांचा उल्लेख आला आहे. परंतु येथे त्याच्या सर्वात  मोठ्या  अपराधाच्या  वर्णनाला  पर्याप्त्  समजले  गेले  आहे  ज्यामुळे  अल्लाहचा  कोप   त्यांच्यावर झाला होता. घृणा करण्यायोग्य काम या लोकसमुदायाने केल्याने मानवी इतिहासात ते कुविख्यात आहेत. या कुकृत्याने दुष्ट लोक कधीही थांबले नाहीत. परंतु युनानच्या तत्त्वज्ञांनी या घृणास्पद अपराधाला नैतिक गुणांत समावेश करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी जी उणिव बाकी राहिली होती तिला आजच्या पाश्चात्य देशांनी पूर्ण केली आहे. समलिंगी संभोग निश्चितच नैसर्गिक पद्धतीविरुद्ध आहे. अल्लाहने सर्व सजीवांमध्ये नर आणि मादी निर्माण करून वंश वाढविण्याची व्यवस्था केली आहे. मनुष्यजातीत याचा एक आणखीन उद्देश दोन्ही लिंग (स्त्री व पुरुष) मिलनाने एक कुटुंब अस्तित्वात यावे आणि त्यामुळे सुसंस्कृत समाजनिर्मिती व्हावी असा आहे. कुटुंब व्यवस्थेतच सभ्यतेचे व नैतिकतेचे बाळकडु पाजले जाते. याच उद्देशासाठी स्त्री आणि पुरुष असे दोन वेगळया जाती बनविल्या आणि त्यात एकदुसऱ्यासाठी आकर्षण ठेवले गेले. यांची शारीरिक रचना आणि मानसिकता दांपत्य उद्देशाला पुढे ठेवून केली गेली. त्या दोघांच्या मिलापमध्ये आणि समरस होण्यामध्ये अत्यानंद ठेवला गेला. नैसर्गिक उद्देशाला प्राप्त् करण्यासाठी हे सान्निध्य निर्माण करणारे आणि प्रेरित करणारे आहे आणि त्या सेवेचा बदलासुद्धा आहे. परंतु मनुष्य निसर्गाविरुद्ध कार्य करून समलिंगी संभोग करतो तेव्हा तो एकाच वेळी अनेक अपराध करणारा ठरतो. 

१) तो स्वत: आणि ती व्यक्ती ज्याच्याशी तो समलिंगी संभोग करतो नैसर्गिक व्यवस्था आणि मानसिक स्थितीशी संघर्ष करतो आणि त्यात मोठे विघ्न निर्माण करतो, ज्यामुळे दोघांच्या शरीरावर, मनावर आणि चारित्र्यावर अत्यंत वाईट परिणाम होतात. 

२) तो निसर्गाच्या विरुद्ध द्रोह आणि फसवेगिरीचा अपराध करतो. निसर्गाने ज्या आनंदाला जाती आणि संस्कृतीसेवेचा मोबदला बनविले होते आणि त्याला प्राप्त् करण्यास कर्तव्य, दायित्व आणि सत्यासह जोडले होते. तो या सर्वांना म्हणजे कर्तव्य, दायित्व आणि सत्याविना चोरीचे कृत्य करतो.

३) मानवसमूहाशी असा मनुष्य उघड विश्वासघात करतो. समाजाच्या संस्थापासून लाभ घेतो परंतु जेव्हा त्याची पाळी येते तेव्हा सत्य, कर्तव्य आणि दायित्वाचे ओझे उचलण्याऐवजी आपल्या सर्व शक्तींना स्वार्थप्राप्तीसाठी पूर्ण अशा पद्धतीने वापरतो जे समाजासाठी हानिकारक आहे. तो स्वत:ला वंशवृद्धी आणि कुटुंबपद्धतीसाठी अयोग्य बनवितो. आपल्याबरोबर दुसऱ्यालासुद्धा वाईट मार्गावर लावतो. आपल्याबरोबर आपल्याचसारख्या एका पुरुषाला अनैसर्गिकरित्या स्त्रीत्वात ओढतो आणि समाजातील दोन स्त्रियांसाठीसुद्धा नैतिक पतनाचे दार उघडे ठेवतो. 

६५) याने माहीत होते की नैतिक पतनाच्या आणि दुष्टतेच्या सर्व सीमा या लोकांनी पार केल्या होत्या त्यामुळे सुधारणा करण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनात येत नव्हता. पावित्र्याच्या त्या लहान तत्त्वालासुद्धा ते नष्ट करू पाहात होते जे त्यांच्या या घृणास्पद वातावरणात शिल्लक राहिले होते. याच सीमेला पोहचल्यानंतर अल्लाहकडून त्यांना समूळ नष्ट करण्याचा निर्णय झाला होता. ज्या समाजाच्या सामूहिक जीवनात पावित्र्याचा लवलेशही शिल्लक राहात नाही तेव्हा त्या समाजास जमिनीवर जीवित ठेवण्याचे कारण राहात नाही. 

६६) दुसऱ्याठिकाणी दाखविण्यात आलेले आहे की पैगंबर लूत (अ.) यांची ही पत्नी जी त्याच देशाची संभवत: मुलगी होती, ती ईशद्रोही नातेवाईक लोकांची समर्थक होती. ती शेवटपर्यंत त्या अनेकेश्वरवादी लोकांबरोबरच राहिली म्हणून कोप होण्याअगोदर अल्लाहने पैगंबर लूत (अ.) आणि त्यांच्या ईमानदार साथीदारांना ती वस्ती सोडून जाण्याचा आदेश दिला आणि सांगितले की त्या स्त्रीला बरोबर घेऊ नये.

६७) वर्षा म्हणजे येथे पाऊस अपेक्षित नाही तर दगडांचा पाऊस (वर्षाव) आहे. कुरआनमध्ये दुसरीकडे उल्लेखित आहे. येथेसुद्धा कुरआनमध्ये उल्लेख केला गेला आहे की त्यांच्या वस्त्या उलटून टाकल्या आणि सर्वांना नष्ट केले.

६८) येथे आणि दुसऱ्या ठिकाणी कुरआनमध्ये केवळ हेच सांगितले गेले आहे की लुतच्या लोकसमूहाचे (राष्ट्राचे) कुकर्म समालिंगी संभोग अत्यंत घृणास्पद पाप आहे. त्यामुळे ते राष्ट्र अल्लाहच्या कोपला सामोरे गेले. यानंतर पुढे आम्हाला याविषयी सविस्तर वृत्त पैगंबर मुहम्मद (स.) यांनी दिले. हा एक असा अपराध आहे ज्यापासून समाजाला पवित्र ठेवण्याचे दायित्व इस्लामी शासनाचे अनिवार्य कर्तव्य आहे. तसेच हा अपराध करणाऱ्याला कडक शिक्षा दिली गेली पाहिजे. हदीसकथने आहेत, ``भोगी आणि भोग्य दोन्हींना ठार करावे.'' काही कथनांद्वारे कळते, `ते विवाहित असोत की अविवाहित' तसेच `वरचा आणि खालचा' दोघांनाही दगडांनी ठेचून ठार केले जावे. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या काळात असा दावा कोणी पेश केला नाही म्हणून पूर्णत: याविषयी शिक्षा कशी दिली जाते हे कळू शकले नाही. माननीय अली (रजि.) यांच्या मतानुसार अपराध्यांना तलवारीने ठार केले जावे व त्यांचे प्रेत जाळून टाकावे. याच मताला माननीय अबू बकर (रजि.) यांनी सहमती दर्शविली होती. माननीय उमर आणि उस्मान (रजि.) यांच्या मतानुसार जुन्या पडक्या इमारतीच्या खाली त्यांना उभे करून त्यांच्यावर ती इमारत पाडून टाकावी. माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांच्या मते अपराध्यांना उंच इमारतीवरून खाली डोके करून फेकून दिले जावे आणि वरून दगडे मारली जावीत. धर्मशास्त्रींपैकी इमाम शाफई (रह.) यांच्या मतानुसार भोगी आणि भोग्य दोघांना ठार केले जाणे आवश्यक आहे, मग ते विवाहित असोत की अविवाहित. शाबी, जोहरी, मालिक आणि अहमद (रह.) यांच्या मतानुसार त्यांची शिक्षा दगडाने ठेचून मारणे आहे (रजम). सईद बिन मुसयिब, अता, हसन बसरी, इब्राहीम नखई, सुफियान सौरी आणि औजाई (रह.) यांच्या मतानुसार या अपराधासाठी तीच शिक्षा दिली जावी जी व्यभिचारासाठी दिली जाते. म्हणजे अविवाहितांना शंभर कोडे मारले जावेत आणि तडीपार केले जावे आणि विवाहितांना दगडं मारून (रजम) ठार केले जावेत. इमाम अबू हनीफा यांच्या मतानुसार,  या  विषयी निश्चित अशी शिक्षा नाही तर हे कृत्य दंडनीय आहे. जशी परिस्थिती आणि आवश्यकता असेल त्यानुसार शिक्षा दिली जाऊ शकते. या समर्थनार्थ इमाम शाफई (रह.) यांचे याविषयी कथन आहे, ``जाणून असा की मनुष्यासाठी हे अगदी अवैध (हराम) आहे की त्याने आपल्या पत्नींशी स्वत:लुत लोकांसारखा व्यवहार करावा.'' हदीससंग्रह अबू दाऊदमध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांचे कथन आहे, ``जो आपल्या पत्नीशी अशाप्रकारे कर्म करील त्यावर धिक्कार आहे.'' इब्ने माजा आणि अहमद या हदीससंग्रहात पैगंबर मुहम्मद (स.) यांचा आदेश आहे, ``अल्लाह त्या पुरुषावर आपली कृपादृष्टी करणार नाही जो आपल्या पत्नीशी असे कुकर्म करतो.'' तिर्मिजी हदीससंग्रहात पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला आहे, ``ज्याने मासिक पाळी आलेल्या पत्नीशी संभोग केला किंवा पत्नीशी लूत लोकांसारखे कुकर्म केले किंवा भविष्य सांगणाऱ्याकडे गेला आणि त्याच्या भविष्यवाणीची पुष्टी केली तर अशा माणसाने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित शिकवणींना नाकारले आहे.'' 

६९) मदयनचा मूळ क्षेत्र हिजाजच्या उत्तर-पश्चिम आणि पॅलेस्टाईनच्या दक्षिणेत लाल सागर आणि अकबार खाडीच्या किनाऱ्याला स्थित आहे. परंतु सीना प्रायद्वीपच्या पूर्वी किनाऱ्यावरसुद्धा हा प्रदेश फैलावलेला होता. हे एक मोठे व्यापारी राष्ट्र होते. प्राचीन काळात जो व्यापारीमार्ग लाल सागराच्या किनाऱ्याने यमनपासून मक्का आणि यम्बुअ मार्गे सीरियापर्यंत जातो आणि एक दुसरा व्यापारी राजमार्ग जो इराकहून इजिप्त्कडे जात होता त्याच्या ठीक चौफुलीवर हा लोकसमूह राहात होता. याच आधारावर अरबांची लहान लहान मुले मदयनविषयी जाणत होते. त्याच्या विनाशानंतरसुद्धा अरबांत त्याची प्रसिद्धी होती. कारण अरबांचे व्यापारी काफिले इजिप्त् आणि सीरियामध्ये जातांना रात्रंदिवस त्याच्या भग्नावशेषामधून जात असत.

मदयनवाल्यांचे एक वैशिष्ट्य ज्यास मनात ठेवले पाहिजे ते म्हणजे हे लोक पैगंबर इब्राहीम (अ.) यांचे पुत्र मिदयान यांचे वंशज होते. ते त्यांची तिसरी पत्नी कुतुरापासून होते. प्राचीन रूढी-परंपरेने जे लोक एखाद्या मोठ्या मनुष्याशी संबंधित असताना हळूहळू त्याच्याच घराण्याशी जोडले जात. याच परंपरेनुसार अरबच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा बनीइस्माईल म्हणून ओळखला जाऊ लागला आणि याकूबच्या संततीच्या हातावर इस्लाम स्वीकारणाऱ्या लोकांना बनीइस्राईलच्या व्यापक नावाने ओळखले जाऊ लागले. याचप्रमाणे मदयनच्या क्षेत्रातील सर्व लोकसंख्या  जी मिदयान बिन इब्राहीम यांच्या प्रभावाखाली होती ते बनीमिदयान म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यांच्या देशाचे नावसुद्धा मदयन प्रसिद्ध झाले.

या ऐतिहासिक तथ्याला जाणून घेतल्यानंतर हा अनुमान काढण्यासाठी एकही कारण शिल्लक राहात नाही की या राष्ट्राला सत्य धर्माची  हाक प्रथमत:  पैगंबर  शुऐब (अ.)  यांनी  दिली  होती. वास्तवता  बनीइस्राईलप्रमाणे  प्रारंभी  तेसुद्धा मुस्लिमच होते. पैगंबर शुऐब (अ.) यांच्या काळात या  लोकांची  स्थिती  बिघाड  निर्माण  झालेल्या  मुस्लिम  समुदायासारखी  होती, ज्याप्रमाणे  पैगंबर मूसा (अ.) यांच्या काळात बनीइस्राईल लोकांची होती. पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या  नंतर सहाशे-सातशे वर्षांपर्यंत अनेकेश्वरवादी आणि दुष्चरित्र लोकांमध्ये राहाताना हे लोक अनेकेश्वरत्वाला अंगीकारू लागले आणि दुष्टतेचे शिकार बनले होते. परंतु यानंतरसुद्धा ते ईमानचा दावा करीत होते आणि त्यावर गर्व करीत होते.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget