दिल्लीत ऑल इंडिया मिल्ली काउन्सिलची विशाल सभा संपन्न, 11 प्रस्ताव पारित
नवी दिल्ली (बशीर शेख) - गेल्या काही दिवसांपासून भारतीय घटनेच्या मुलभूत तत्त्वांनाच आव्हान दिले जात आहे. अल्पसंख्यांक आणि दलितांच्या विरूद्ध जो हिंसेचा वापर केला जात आहे आणि त्याला सरकारचे
मुकसमर्थन प्राप्त आहे. यामुळे चिंतीत होऊन देशातल्या सर्व जबाबदार समाज घटकांनी एकत्र येवून 30 जुलै 2017 रोजी ऑल इंडिया मुस्लिम काऊन्सिलच्या बॅनरखाली दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर एक भव्य सभेचे आयोजन केले होते.भारताच्या घटनेमध्ये बहुलतावाद, अनेकतेतून एकता, समानता, न्याय, सहिष्णुता, जगण्यासाठी आवश्यक त्या मुलभूत अधिकारांची हमी देण्यात आलेली आहे. परंतु, मागील काही दिवसांमध्ये घटलेल्या घटनेमधून घटनेच्या या मुलभूत तत्वानांच आवाहन दिले जात असल्याचे दिसून आलेले आहे.
30 जुलैला झालेल्या या सभेत जेडीयूचे खासदार शरद यादव यांनी बोलतांना सांगितले, फक्त 31 टक्के लोक सध्याच्या सरकारचे समर्थक आहेत. बाकी 69 टक्के लोक या सरकारच्या ध्येय धोरणाच्या विरोधात आहेत. ही बाब विसरता येणार नाही. येत्या काळामध्ये या 69 टक्के लोकांना एकत्रित करून भाजप समोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न अल्पसंख्यांक आणि दलितांवर जे हल्ले झाले त्या संदर्भात आणि राज्यसभेमध्ये यथोचित चर्चा घडवून आणलेली आहे. ती चर्चा संसदेच्या रेकॉर्डवर आहे. त्यामुळे भविष्यात त्याची दखल सरकारला घ्यावीच लागेल.
Post a Comment