सध्या जगातील अनेक देशांत जसे इराक, सीरिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सोमालिया, पॅलेस्टाईन, तसेच काही आप्रिâकी व लॅटीन अमेरिकी खंडातील देशांत वांशिक, धार्मिक आणि प्रादेशिक संघर्ष माजला आहे. त्यांच्या तुलनेत भारतामध्ये जम्मू-काश्मीर, इशान्येकडील राज्ये आणि नक्षलग्रस्त राज्ये वगळता कमालीचे स्थैर्य आणि सुरळीत जनजीवन आहे. याचे श्रेय भारतीय मुत्सद्दी राजकारणींना जाते ज्यांनी लोकशाही व धर्मनिरपेक्षतेची नीट सांगड घालून संविधानाचे पालन केले. परंतु सध्या सत्ताधाNयांपैकी काही जातीयवादी आणि भाजपशी संलग्न असलेल्या धर्मवेड्या वाचाळविरांनी हिंदू समाज, हिंदुत्व आणि राममंदिर बाबरी मुद्द्यावर अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसत आहे. त्यांना शांतता, सुव्यवस्था, प्रगती आणि एकदा सहन होत नसावी असे वाटते. काँग्रेसच्या शासनकाळात जातियवादी व धर्मांध संस्थांविरूद्ध शाब्दिक हल्ले होत असत. थेट धर्म आणि जात आदींना लक्ष केले जात नसे. परंतु सध्याचे सरकार आपल्या अभूतपूर्व यशानंतरही धर्म व जातीय भावनांचा आधार घेत आहे, याचे शल्य वाटते. नुकतेच पश्चिम बंगालमध्ये झालेला जातीय हिंसाचार याचा ढळढळीत पुरावा आहे की त्यात भाजपचे पुढारी गुंतले आहेत. ईशान्येकडील राज्य हस्तगत करण्यासाठी भाजप व त्याचे मित्रपक्ष हा प्रदेश पेटवित आहेत, ज्याचा फायदा चीनला होईल, यात शंका नाही. भाजपला सत्तेसाठी धार्मिक भावनांच्या कुबड्या कशाला घ्याव्या लागतात, हा कलंक त्यांना पचतो कसा? सुज्ञ मतदारांनी याची दखल घ्यावी. भूतपूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या सल्ल्याप्रमाणे सत्ताधाNयांनी राजधर्माचे पालन करावयास हवे. विविधतेतून एकतेसाठी तेच अपेक्षित नाही काय?
- निसार मोमीन, पुणे.
Post a Comment