Halloween Costume ideas 2015

अशा परीस्थितीत मुस्लिमांनी काय करावे?

एम.आय. शेख
हमने हर गम खुशी में ढाला है, अपना हर एक चलन निराला है , लोग जिन हादसों से मरते हैं, हमको उन हादसों ने पाला है
 
जगात कुठेही कोणतेही महत्वपूर्ण काम विशेष लोक करत असतात. उदा. आपण आजारी पडलो तरी डॉक्टरकडे जातो, सामान्य माणसाकडे नाही. घर बांधावयाचे असल्यास अभियंत्यांकडे जातो, सामान्य माणसाकडे नाही. मग सरकार चालविण्यासाखे महत्वपूर्ण काम सामान्य माणसे कसे काय करू शकतात? हा सामान्य प्रश्न माणसाला पडावयास हवा पण पडत नाही. कुरआनमध्ये स्पष्ट म्हंटलेले आहे की ज्ञानी व अज्ञानी दोघे कधीच सारखे नसतात. इस्लाममध्ये शासन चालविण्यासाठी सामान्य नाही तर विशेष लोकांची निवड केली जाते. त्याला शुराई निजाम असे म्हणतात. या व्यवस्थेअंतर्गत खलीफा (राष्ट्रप्रमुखास) विशेष चारित्र्यवान व इस्लामी राज्यव्यवस्थेचे ज्ञान असलेले लोक सल्ला देतात. याचे छोटेसे उदाहरण इराणमध्ये आहे. निवडून आलेल्या राष्ट्रपती हसन रोहाणी यांना धार्मिक गुरू आयतुल्लाह खामनाई व त्यांचे सहकारी सल्ला देतात. भांडवलशाही लोकशाही  व्यवस्थेशिवाय विकास होऊच शकत नाही, अशी काही लोकांची धारणा आहे. ती किती चुकीची आहे हे भांडवलशाही  लोकशाही असलेल्या देशांच्या परिस्थितीकडे पाहून सहज लक्षात येते. भ्रष्टाचार व गुन्हेगारी हे भांडवलशाही लोकशाहीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. आपल्या देशात गेल्या 69 वर्षापासून आपण हीच लोकशाही राबवित आहोत.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget