Halloween Costume ideas 2015

ईशनिर्मितीत बदल करणाऱ्यांचा ऱ्हास

एका गौरच्यामुळे चार कोटी लोक मारले गेले!


आजपासून जवळपास साठ वर्षांपूर्वी १९५८ ते १९६१ च्या दरम्यान इतर देशांप्रमाणेच चीनसुद्धा एक गरीब देश होता. पण तत्कालीन चीनी अध्यक्ष माओत्झेडाँग यांनी एक आपल्या राष्ट्राला अमेरिका आणि युरोपप्रमाणे प्रगती आणि समृद्ध देश बनवण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यांना चीनच्या लोकांची साथ मिळाली. कोणता कार्यक्रम या मोहिमेसाठी हाती घ्यावा हा प्रश्न समोर आला. त्या वेळेस माओ यांना असे सुचले की हे जे पक्षी आहेत त्यांच्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. उदाहरणार्थ एक गौरच्या वर्षभरात ४-५ किलो अन्नाचे सेवन करते. म्हणून जर आपण सर्व पक्ष्यांना मारले तर तितके धान्य आपल्याकडे शिल्लक राहील आणि त्याची निर्यात करून आपण पैसे कमवू शकते आणि म्हणून असे ठरवण्यात आले की पक्षी, उंदिर, डास आणि माश्या यांना पूर्णपणे नष्ट केले जावे. शासकीय यंत्रणेसहित या मोहिमेत तिथल्या सैनिकांनीही आपली जबाबदारी उचलली आणि सर्व पक्ष्यांना मारण्याची साऱ्या देशभरात सुरुवात झाली. इतर पक्ष्यांपेक्षा लोकांनी गौरच्याला जास्त लक्ष्य बनवले. जो तो गौरच्याच्या मागे पडला. त्यांना कुठेच बसू द्यायचे नाही यासाठी थाळ्या आणि इतर वाद्ये वाजजवण्यात आली. पक्षी जास्त काळ आकाशात उडू शकत नसल्याने ते खाली जमिनीवर पडून तडफडत मरत होते. लोक त्यांचे हार बनवून गळ्यात बांधत होते. या मोहिमेचा परिणाम काय होणार याची त्यांना कल्पना आली नाही. निसर्गाचा नियम आहे की एक प्राणी दुसऱ्या प्राणांचा आहार असतो. याला फूड चेन (अन्नसाखळी) म्हणतात. पक्षी नुसते धान्यच खात नव्हते तर किडेदेखील खात होते. एकदा पक्षी मारले गेल्यावर किड्यांची संख्या भरमसाठ वाढली. त्याचबरोबर असे करूनच पिकांचा नाश होत राहिला तर लोकांना खायला अन्न मिळायला कठीण झाले. दुष्काळाची परिस्थिती ओढवली. सतत चार वर्षे हा दुष्काळ पडला ज्यात चार कोटी लोक भुकेने तडफडून मृत्युमुखी पडले. इथे एक प्रश्न असाही उपस्थित होतो की खरेच चार कोटींची लोकसंख्या कमी करायची होती? काहीही असो, एका गौरच्याला मारण्याची शिक्षा या जगाच्या निर्मात्यैने चार कोटी माणसांचे प्राण घेतले. त्यांचा गुन्हादेखील तसाच गंभीर होता. त्यानंतर चीनची लोकसंख्या वाढत गेली म्हणून तिथल्या शासनाने फक्त एका मुलाचा जन्म असा कायदा केला. याचा परिणाम असा झाला की जगभरात सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश दुसऱ्या क्रमांकावर आला. भारताने बाजी मारली. पुन्हा चीनला तोच प्रश्न पडला. कामासाठी तरुण पिढी नाही, आता लोकांनी जास्त संतती जन्माला घालावी, त्याचबरोबर दुसरा एक पर्याय असा काढला की आता कृत्रिम पद्धतीने गर्भधारणा केली जावी. कारण तरुण मुले कमी आहेत आणि मुली जास्त. टेस्टट्यूब बेबीद्वारे संख्या वाढवायची. या कृत्रिम संततीचा कोण पिता आणि कोण माता? मोठे झाल्यावर कौटुंबिक, सांस्कृतिक आणि मानसिक समस्या निर्माण होतील त्या वेळी कोणते संकट चीनवर कोसळेल माहीत नाही. जपानमध्ये सगळी पिढी म्हातारी झालेली. लहान मुले दिसायला सुद्धा सापडत नाहीत. हजारो शाळा बंद पडल्या आहेत. भावी पिढीचा प्रश्न समोर भेडसावत आहे. वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाची प्रगती या देशाने पाहिली, आता त्याचे परिणाम समोर येतील, कारण त्यांनी कुठे न कुठे निसर्गाचे नियम मोडले आहेत आणि अशा समूहांना ईश्वर क्षमा करत नाही. समलैंगिक विवाहांना साऱ्या जगात मान्यता दिली जात आहे. यावर कडी म्हणजे अशा जोडप्यांना संतती सुद्धा हवी आहे. त्यासाठी सरोगेट प्रेग्नन्सीचा उपाय शोधला जातो. अशा पद्धतीने येणारी संतती कोणत्या संस्काराची असेल, त्यांना माणूस, मानवता, चारित्र्य, प्रामाणिकपणा हे कळणार आहेत का? जगभरातल्या मानवतेसमोर सध्या समलैगिकतेचा भयंकर धोका आहे आणि यामुळेच मानता नष्ट होणार की काय असा प्रश्न पडतो. आपल्या देशात विकासाच्या नावाखाली समृद्धीसारखे महामार्ग बांधले जात आहेत. या रस्त्यांमुळे अडवले जाणारे पावसाचे पाणी शेतांमध्ये घुसून शेतीचे अतोनात नुकसान होत आहे हे आपण पाहतो आहोतच. या रस्त्यांसाठी जे नियम केले गेले आहेत त्यामध्ये असे म्हटले आहे की या रस्त्याच्या दोन्ही बाजुंना लहनसहान उद्योग, हॉटेल्स उभारू देणार नाहीत. जे सध्या अस्तित्वात आहेत त्यांनादेखील पाडले जाईल आणि या ठिकाणी पंचतारांकित कल्चरचे हॉटेल्स वगैरे श्रीमंतांच्या सोयी उभारल्या जातील. याचा फटका किती कोटी गोरगरीब धंदेवाल्यांना, शेतमजुरांना बसेल याचा विचारच केलेला बरा. 

पवित्र कुरआनात अल्लाहने म्हटले आहे की "मी (म्हणजे सैतान) त्यांची दिशाभूल करणार, त्यांच्यात मोह निर्माण करीन. मी त्यांना आदेश देईन ते पशूंचे कान कापतील. माझ्या आदेशानुसारच ते अल्लाहच्या निर्मितीमध्ये बदल घडवून आणतील, मग ज्यांनी अल्लाहला सोडून सैतानाला आपला वाली बनवला त्यांनी उघड स्वतःचा ऱ्लास करून घेतला." (४:११९-१२०)

वरील सर्व उदाहरणे याच श्लोकाचा परिपाक आहेत असे वाटते.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, मो.: ९८२०१२१२०७


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget