Halloween Costume ideas 2015

समाज जागेल याची शाश्वती

आजच्या समाजजीवनावर राजकारणाचा पगडा असून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विस्कळीतपणा, अस्थिरता व बेचैनी पसरलेली आहे. कोणत्याही क्षेत्रात सत्याचे, नैतिकतेचे अधिष्ठान दृष्टीस पडत नाही. यावर समाजसेवकांनी सखोल मनन चिंतन करणे आवश्यक आहे. माणूस अद्याप जीवंत आहे. अजून आशा आहे. परिस्थिती गंभीर आहे. पण आटोक्याबाहेर नाही. सत्याची चाड व नीतीमत्तेची चाड बाळगणारी व समाजाची उभारणी या तत्त्वावर व्हावी म्हणून अशी धडपडणारी माणसे अजून हयात आहेत. रोग्यांच्या मानाने वैद्यांची संख्या अल्प आहे. परवंतु वैद्य आहेत, पण वेळ लागेल. रीगी बरे होतील. समाजात सुधारणा होईल.

धार्मिक आचारविचारांमध्ये राजकीय लोक राजकारणाच्या स्वार्थासाठी हस्तक्षेप करत असतात. इतिहास हा राजकीय हेतूने रंगविला जात आहे आणि उलटपक्षी पाहता राजकारणात धर्म नको असा कांगावा केला जात असला तरी सुधारणेच्या नावाखाली चिरंतन नीतीमूल्ये सत्यता पायदळी तुडविली जात आहे. प्रथम नव्या औषधांचा प्रयोग उंदीर व प्राण्यांवर करून मानवी आरोग्यावर कितपत लागू पडते याची शहानिशा पाहिली जाते, परंतु नवविचारसरणीच्या माणसांचा वापर करून समाज बिघडवला जात आहे. अंधाधुंदी माजविली जात आहे. समाजजीवनाचे खोबरे केले जात आहे. याला समाजसुधारण नव देऊन दहशत निर्माण केली जात आहे.

परंतु मानव क्षुद्र नाही आणि मृत नाही. आजचे राजकारण, राजनीती, हुकूमशाही व वचकाने चालत आहे. जातीयता निर्माण करून देशात अराजकता माजविली जात आहे. परंतु नीतीमूल्ये साध्य करणारी माणसे आहेत, ते हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाहीत.

भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नहीं।

मानव आहे जागरुक

बसेल हिसका मानवाचा

तेव्हा भगवंतही तुम्हाला तारु शकणार नाही

अतिवृत्ती घातक वृत्ती

वेळ आहे सुधरा।

- नजीर अहमद एम. अत्तार

पुणे.


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget