Halloween Costume ideas 2015

सूरह हूद :ईशवाणी (सुबोध कुरआन)


(८७) ....अथवा असे की आम्हाला आमच्या मालाचा आमच्या इच्छेनुरूप विनियोग करण्याचा अधिकार नाही?९७ केवळ तूच का एक उदारवृत्ती आणि सत्यवादी मनुष्य उरला आहेस!’’

(८८) शुऐब (अ.) ने सांगितले, ‘‘बंधुंनो! तुम्ही स्वत:च विचार करा की जर मी आपल्या पालनकत्र्याकडून एका स्पष्ट साक्षीवर होतो आणि मग त्याने मला आपल्याकडून चांगली उपजीविकादेखील दिली.९८ (तर त्यानंतर मी तुमच्या पथभ्रष्टतेत आणि हरामखोरीत तुमचा सहभागी कसा होऊ शकेन?) आणि मी हे मुळीच इच्छित नाही की ज्या गोष्टींपासून मी तुम्हाला रोखतो त्या गोष्टी मी स्वत: कराव्यात.९९ मी तर सुधारणा घडवून आणू इच्छितो जितके मला शक्य आहे आणि हे जे काही मी करू इच्छितो ते सर्व अल्लाहप्रणीत सद्बुद्धीवर अवलंबून आहे, त्याच्यावरच मी भिस्त ठेवली आणि प्रत्येक बाबतीत मी त्याच्याकडेच रूजू होतो.

(८९) आणि हे देशबंधुंनो, माझ्याविरूद्ध तुमच्या अट्टाहासाने एखादे वेळी अशी पाळी आणू नये की सरतेशेवटी तुमच्यावरदेखील तोच प्रकोप कोसळावा जो नूह (अ.) अथवा हूद (अ.) अथवा सॉलेह (अ.) यांच्या लोकांवर कोसळला होता. आणि लूत (अ.) चे लोक तर तुमच्यापासून काही दूरही नाहीत.१००



९७) ही इस्लामच्या मुकाबल्यात अज्ञानतेच्या दृष्टिकोनाची पूर्ण अभिव्यक्ती आहे. इस्लामचा दृष्टिकोन म्हणजे अल्लाहच्या उपासनेशिवाय ज्या इतर उपासनेच्या पद्धती आहेत, त्या सर्व चुकीच्या आहेत आणि त्यांचे अनुसरण केले जाऊ नये. कारण दुसऱ्या पद्धतींसाठी बुद्धी, ज्ञान आणि ईशग्रंथात कोणताच पुरावा नाही. अल्लाहची उपासना फक्त सीमित धामिर्क क्षेत्रापुरतीच मर्यादित नाही तर सभ्यता, सामाजिकता, अर्थकारण, राजकारण म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात होणे आवश्यक आहे, कारण जगात माणसाकडे जे काही आहे ते सर्व अल्लाहचेच आहे. मनुष्य जगातील कोणत्याच वस्तूवर अल्लाहपासून निरपेक्ष होऊन त्याचा वापर करण्याचा अधिकारी नाही. याविरुद्ध अज्ञानतेचा दृष्टिकोन असा आहे की पूर्वजांपासून जी जीवनपद्धती चालत आली आहे, तिचेच पालन मनुष्याने केले पाहिजे. या जीवनपद्धतीवर चालण्यासाठीचा एकमेव पुरावा म्हणजे ती पूर्वजांपासून चालत आली आहे. दुसरा दृष्टिकोन म्हणजे धर्माचा संबंध फक्त पूजापाठाशीच आहे आणि मनुष्य जीवनव्यवहारांशी त्याचा अजिबात संबंध येत नाही. मनुष्याने कोणत्या पद्धतीने जीवन जगावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, प्रत्येकाला याचे स्वातंत्र्य आहे.

९८) 'रिज्क' म्हणजे रोजी (उपजीविका) येथे दोन अर्थात आला आहे. एक अर्थ सत्यज्ञान जे अल्लाहकडून दिलेले आहे आणि दुसरा अर्थ तोच आहे जो सामान्यत: समजला जातो. म्हणजे ती साधनसामुग्री जी अल्लाह मनुष्याला जीवन जगण्यासाठी देतो. पहिल्या अर्थाच्या दृष्टीने ही आयत याच विषयाला स्पष्ट करीत आहे जो या सूरहमध्ये मुहम्मद (स.) नूह (अ.) आणि सॉलेह (अ.) यांच्या मुखाने प्रस्तुत होत आला आहे. ते म्हणजे पैगंबरत्वापूर्वीसुद्धा मी आपल्या पालनकर्ता स्वामीकडून सत्याची स्पष्ट निशाणी आपल्या स्वत:मध्ये आणि सृष्टीच्या निशाण्यात पाहात होतो. यानंतर माझ्या निर्माणर्कत्या प्रभुने प्रत्यक्ष रूपात सत्यज्ञान मला प्रदान केले आहे. आता माझ्यासाठी हे असंभव आहे की समजून उमजून तुमच्या भ्रष्टाचारात आणि दुष्टतेच्या कामात मी तुमची साथ द्यावी. दुसऱ्या अर्थाच्या दृष्टीने ही आयत त्या व्यंगाचे उत्तर आहे जे त्या लोकांनी आदरणीय शुऐब (अ) यांना केले होते की तुम्हीच एक विशालहृदयी आणि सत्यनिष्ट व्यक्ती शिल्लक आहात. या तीव्र आणि कटु आक्रमणाचे हे थंड उत्तर दिले आहे. "बंधुनो! माझ्या पालनर्कत्या प्रभुने मला सत्य ओळखण्याचे ज्ञान दिले आणि हलाल (वैध) उपजीविका (रोजी) दिली तर तुमच्या या व्यंगामुळे ही कृपा अवकृपा कशी बनेल ? शेवटी माझ्यासाठी हे वैध कसे होऊ शकते की जेव्हा अल्लाहने माझ्यावर ही कृपा केली आहे तर मी तुमच्या मार्गभ्रष्टतेला आणि हरामखोरीला सत्य आणि हलाल (वैध) सांगू आणि अल्लहशी कृतघ्न बनू ?"

९९) म्हणजे माझ्या सत्यतेचा तुम्ही याने अंदाज लावू शकता की मी जे दुसऱ्यांना सांगतो त्यावर स्वत: आचरण करतो. मी तुम्हाला अल्लाहशिवाय इतर अस्तान्यांकडे (वेदी) जाण्यास रोखतो आणि मी एखाद्या पीराच्या स्थानाचा मुजावर (पुजारी) असतो तर नि:संदेह तुम्ही आक्षेप घेतला असता की हा स्वत:ची मुजावरी चमकवण्यासाठी दुसऱ्यांच्या दुकानांना बंद करतो आहे. मी तुम्हाला हराम (अवैध) माल खाण्यापासून  व्यवसाय चमकविण्यासाठी मी ईमानदारीची टिमकी पिटत आहे. परंतु तुम्ही पाहाता की मी या दुष्टतेपासून अलिप्त आहे आणि म्हणूनच तुम्हालासुद्धा रोखत आहे. माझे स्वत:चे जीवन या दृष्टतेपासून पवित्र आहे आणि मी तुम्हा सर्वांना या दुष्टतेपासून पवित्र पाहू इच्छितो. मी स्वत:साठी तीच जीवनपद्धती निवडली आहे ज्याकडे मी तुम्हा सर्वांना बोलवित आहे. हे याच्या ग्वाहीसाठी पर्याप्त आहे की मी या आवाहनात सत्यवादी आहे. 

१००) म्हणजे लूत (अ.) यांच्या राष्ट्राची घटना आता ताजी आहे आणि तुमच्या जवळच्याच क्षेत्रात घडली आहे. त्या वेळी लूत (अ.) यांच्या राष्ट्राच्या विनाशावर सहाशे-सातशे वषेर् लोटले असतील. भौगोलिक स्थितीला पाहता शुऐब (अ.) यांचे राष्ट्र त्या क्षेत्राच्या जवळच होते जेथे लूत (अ.) यांचे राष्ट्र वसले होते.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget