Halloween Costume ideas 2015

प्रविणकुमारच्या इस्लाम प्रवेशानंतर सुरू झालेले नाट्य


या आठवड्यात सहारनपूर आणि दिल्लीच्या दरम्यान असलेल्या महामार्गावर एक 32 वर्षीय युवक ज्याचे नाव प्रवीणकुमार होते व त्याने स्वतःच्या मर्जीने इस्लामचा स्वीकार करून स्वतःचे नाव अब्दुस्स समद असे धारण केले आहे, हातात एक तिरंगा झेंडा घेऊन पदयात्रा करत होता. त्याची पदयात्रा नुकतीच संपलेली आहे. 

प्रेसमध्ये आलेल्या रिपोर्टींगनुसार प्रविणकुमार यांनी स्वतःच्या मर्जीने इस्लाम स्विकारल्यामुळे त्यांच्यासोबत अन्याय सुरू झालेला आहे. त्यांच्या घराच्या भींतीवर पेंटने ते आतंकवादी असून पाकिस्तानला निघून जा, असे लिहिलेले आहे. सहारनपूर पोलीस आणि साक्षात एनआयए ने त्यांची सविस्तर चौकशी करून त्यांना्निलनचिट दिलेली आहे, असे असतानाही त्यांच्याविरूद्ध अत्याचार सुरू आहेत. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जेव्हा दिल्ली येथील उमर गौतम आणि जहांगीर आलम यांच्या द्वारे चाललेल्या दावा सेंटरवर छापा मारला होता तेव्हा त्या ठिकाणी एक धर्मांतराचे प्रमाणपत्र सापडले होते, जे की प्रविणकुमार यांचे होते. त्यावर प्रविणकुमारचे छायाचित्रसुद्धा लावलेले होते. त्यावरून एटीएसने प्रविणकुमार यांना उचलले. सविस्तर चौकशी दरम्यान प्रविणकुमार याने स्पष्ट शब्दात सांगितले की, 2019 मध्ये मी अत्यंत डिप्रेशनमध्ये जगत होतो. मला मनःशांती हवी होती. त्यामुळे आई-वडिल आणि पत्नी कोणालाही न सांगता 19 नोव्हेंबर 2019 रोजी घर सोडून निघून गेलो होतो. मी माझे मोबाईलसुद्धा बंद केले होते. इंटरनेट सर्च करत असतांना मला दिल्लीच्या इस्लामीक दावा सेंटरचा पत्ता मिळाला. मी त्या ठिकाणी स्वतःच्या मर्जीने गेलो व उमर गौतम यांच्याशी संपर्क साधला. त्या ठिकाणी राहिलो. त्या ठिकाणी कुरआन आणि वेदसहीत अनेक पुस्तके होती. उमर गौतम आणि जहांगीर आलम यांनी भेटीमध्ये मला काही पुस्तकं दिली. त्या पुस्तकांच्या वाचनाने मला मनःशांती मिळाली आणि मी स्वतःच्या मर्जीने मुस्लिम झालो. मला कुठल्याही प्रकारची कोणी लालूच दिलेली नसून कुठल्याही प्रकारचा दबाव सुद्धा टाकलेला नाही. 

व्यवसायाने शिक्षक आणि युजीसीची नेट परीक्षा उत्तीर्ण असलेले प्रविणकुमार यांनी सुप्रिम कोर्टासमोर आपल्या पदयात्रेची सांगता करतांना 27 जुलै रोजी मागणी केली की, कोर्टाने त्यांना न्याय मिळवून द्यावा. ते म्हणाले की, एटीएसने 21 जूनला माझ्या राहत्या घरीच चौकशी केली होती. 29 जूनला मला लखनऊला बोलावून चौकशी केली त्या दरम्यान कित्येक तास विदेशी फंडींग, आतंकवादी कारवायांमध्ये माझा काही सहभाग आहे का, या विषयीची सखोल चौकशी केली. पण मी सर्व प्रश्नांची ठामपणे उत्तरे दिली. खरे पाहता या धर्मांतराच्या मागे कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याने नाविलाजाने त्यांना मला्निलनचिट दिली. मी एक शिक्षक, कवी आणि लेखक असून, राष्ट्रवादी विचारांचा माणूस आहे. 12 जुलैला जेव्हा माझ्या घराच्या भिंतीवर आतंकवादी लिहून मला पाकिस्तानला जाण्याची धमकी देणाऱ्या चिठ्या फेकल्या गेल्या. तेव्हा मी खूप रडलो. माझ्या मनात आत्महत्येचासुद्धा विचार आला. पण मी खूप विचारपूर्वक निर्णय केला की मी न्याय प्राप्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि हाच विचार करून 27 जुलैपासून मी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी सूचना देवून दुपारी 12.30 वाजता 200 किलोमीटर लांबीची सर्वोच्च न्यायालयापर्यंतची पदयात्रा सुरू केली व संपविली. त्यांनी आपल्या धर्मांतराचा निर्णय कोणाशी लपविला नाही. धर्मांतराच्या पूर्वी ते जेव्हा घरून निघाले तेव्हा अत्यंत व्याकूळ होते. त्यांनी काही दिवस काशीमध्येही वास्तव्य केलं. शेवटी त्यांना इस्लामी दावासेंटरमध्ये मनःशांती मिळाल्याने त्यांनी इस्लाम स्विकारल्याचे घरच्यांना स्पष्ट शब्दात सांगितले. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तरीही त्याची पर्वा न करता त्यांनी सांगितले की, इस्लाममध्ये मला मनःशांती मिळते आहे. नसता मी आतापर्यंत तुम्हाला जीवंत दिसलो नसतो. मला माझ्या निर्णयापासून फिरण्याची कोणी सक्ती करू शकत नाही. कारण मला जेव्हाही व्याकूळता वाटते तेव्हा इस्लामी इबादतींमधून मला शांती प्राप्त होते. त्यांच्या गावातील काही लोकांनी त्यांच्या भावावरही संशय केला. त्यांच्या कुटुंबाचे रेशनकार्डही प्रशासनाने रद्द करून टाकले. एवढेच नव्हे तर त्यांचे आणि त्यांच्या परिवाराच्या सदस्यांविरूद्ध पोलीस ठाण्यात रिपोर्टसुद्धा दाखल करण्यात आली. 

प्रविणकुमार उर्फ अब्दुस्स समद यांनी सांगितले की, 2015 साली त्यांच्या भावाची सरकारी राशनची दुकान होती. सरकारतर्फे अपात्र लोकांचे राशनकार्ड रद्द केले जात होते. गावातील लोकांनी माझ्या भावावर रेशन कमी तोलण्याचा खोटा आरोप लावला. चौकशी अधिकाऱ्यासमोर माझ्या भावाचे आणि गावातील लोकांचे भांडण झाले. त्या दरम्यान, मी हरिद्वारमध्ये एका स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये होतो. एवढे असतानासुद्धा माझ्याविरूद्ध तक्रार करण्यात आली. नेट्नवालिफाय झाल्यावरसुद्धा ती तक्रार माझ्यावर असल्यामुळे मला कुठलीही नोकरी मिळत नाहीये. नरेंद्र तारांचद नावाच्या व्यक्तीने तक्रार देण्यामध्ये पुढाकार घेतला होता. त्या खोट्या आरोपानंतरच माझी मनःस्थिती बिघडली व मला वाटले की, मी कितीही परिश्रम केले तरी मला नोकरी लागणार नाही आणि मी जीवनात यशस्वी होणार नाही. तेव्हापासून माझा जीव कासावीस होत होता आणि मनःस्थिती बिघडत होती. 2020 साली नेटची परीक्षा पास केल्यानंतर सध्या ते पीएचडीची तयारी करत आहेत. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, माझ्या रक्तात राष्ट्रीयता ठासून भरलेली आहे. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्तुतीमध्ये 2016 मध्ये ’’ नमो गाथा मोदी’’ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ती दोन्ही पुस्तकं प्रकाशित सुद्धा झालेली आहेत आणि आणखी दोन पुस्तकं लिहिली आहेत मात्र ती प्रकाशित झाली नाहीत. सद्यस्थिती प्रविणकुमार उर्फ अब्दुस्स समद एका साखर कारखान्यात विकास अधिकारी म्हणून काम करत आहेत. त्यांच्या गावातील अनेक लोक आणि त्यांचे मित्र त्यांच्याबद्दल अत्यंत चांगली भावना ठेवतात आणि त्यांच्या पदयात्रेला उचित ठरवितात. आता कोर्ट आणि सरकार त्यांना कशा प्रकारे न्याय देते याकडे त्या भागातील लोकांचे लक्ष आहे. या सामाजिक प्रताडनेविरूद्ध न्याय मिळविण्यासाठी लवकरच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून असाच निर्णय घेणाऱ्यांना सामाजिक प्रताडनेपासून कोर्टाचे संरक्षण प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहेत, असे त्यांनी सांगितले. 

 (साभार : बीबीसी हिंदी, 4 ऑगस्ट 2021)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget