Halloween Costume ideas 2015

नाहक हत्त्या भयंकर अपराध आहे

पवित्र कुरआनात नाहक हत्या करण्यास मोठा अपराध ठरवला गेला आहे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला हत्येपासून वाचवणे म्हणजे साऱ्या मानवजातीला जीवदान देण्यासारखे आहे. “जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा वध केला आणि ती हत्या न्याय्य मृत्युदंड नसेल अथवा धरतीवर उपद्रव माजवण्यासाठी नसेल तर अशा व्यक्तीने जणू साऱ्या मानवजातीची हत्या करण्यासारखे आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीने कुणाचा जीव वाचवला तर त्याने साऱ्या मानवजातीला वाचवण्यासारखे आहे.” (पवित्र कुरआन-५:३२) यावरून हे स्पष्ट होते की इस्लामच्या नजरेत नाहक हत्या करणे भयंकर अपराध आहे आणि जर कुण्या व्यक्तीने एखाद्या निष्पाप माणसाला वाचवले तर हे पुण्याचे कर्म आहे. नाहक जीव घेणारा खऱ्या अर्थाने समाजाशी बंड करून मानवतेविरूद्ध पाऊल उचलतो. अशा माणसास मानवी जीवनाची किंमत नसते, तेव्हाच तो असे अत्याचार करण्यास धजावतो. हा असा माणूस सबंध मानवजातीला धोकादायक ठरतो. या उलट जो मनुष्य निष्पाप व्यक्तीला मृत्युच्या दाढोतून वाचवतो तो फक्त एक पुण्यकर्म करतो. इतकेच नव्हे तर तो मानवजातीची आणि मानवी प्राणाची कदर करतो. मानवतेचा हितचिंतक असतो. अशीच माणसे समाजात वावरण्यायोग्य असतात. कारण तो समाजात रक्षक असतो. म्हणूनच कुरआनने असे म्हटले आहे की निष्पाप व्यक्तीला हत्येपासून वाचवणे म्हणजे साऱ्या मानवजातीला जीवदान देण्यासारखे आहे. दुसऱ्या ठिकाणी पवित्र कुरआन असे म्हणतो की नाहक हत्या करणे म्हणजे उपद्रव माजविण्यासारखे आहे आणि उपद्रव माजवणारे लोकच त्यास बळी पडतील असे नाही तर इतरांनाही त्याच्या झळा सोसाव्या लागतील. आपल्या समाजात जर उपद्रव माजविणारे काही लोक असतील तर त्यांच्यावर अंकुष ठेवणे सबंध समाजाचे कर्तव्य ठरते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा अर्थ अशा कृतींना समाजामध्ये थारा देण्यासारखे असेल जे समाजासाठी घातक आहे.

सृष्टीचा आरंभ, विस्तार आणि अंत

“आम्ही आमच्या शक्तीसह हे अंतरिक्ष निर्माण केले आहे आणि आम्ही त्याचा विस्तार करत आहोत.” (५१:४७) पवित्र कुरआनचे हे निवेदन १५०० वर्षांपूर्वीचे आहे. यात असे म्हटले आहे की ही सृष्टी क्षणोक्षणी विस्तारत जात आहे. ती प्रक्रिया थांबलेली नाही. कुठवर चालणार आहे हे माहीत नाही. कुरआनतील हे सत्य आल्यानंतर बराच काळ लोकांना माहीत नव्हते की सृष्टीच्या निर्मितीची ही प्रक्रिया सातत्याने चालूच आहे. गेली १०० वर्षांपूर्वी वैज्ञानिकांनी याचा शोध लावला आणि हे जे कुरआनात म्हटले गेले आहे त्याची सत्यता साऱ्या जगाने जाणून घेतली. आधुनिक खगोलशास्त्रज्ञांनी या संकल्पनेची शास्त्रीय सिद्धता पूर्ण केली आहे. त्यांनी सिद्ध केले आहे की अति प्रचंड घनता आणि तापमान यातून निर्माण झालेल्या एका प्रचंड स्फोटातून हे विश्व निर्माण झाले आहे आणि अति घनदाट तप्त वायूपासून वातावरण निर्माण झाले आहे. ही प्रसरणाची क्रिया जी सुरू झाली होती ती अद्याप चालू आहे. प्रा. एडिंग्टन म्हणतात की, तारे आणि आकाशगंगा म्हणजे एखाद्या रबरी फुग्यावरील खुणांसारखे आहेत. फुगा नेहमी फुगत जातो आणि सर्व आकाशस्थ ग्रहगोल एकमेकांपासून अधिकाधिक दूर जातात.

सुरवातीला आकाश आणि धरती एकमेकांत सामावलेले होते. नंतर आम्ही त्यांना अलग केले आणि प्रत्येक सजीवाची निर्मिती केली. (पवित्र कुरआन) म्हणजे सृष्टीच्या निर्मितीच्या पहिल्या अवस्थेत सर्वत्र फक्त गॅस (वायू) पसरलेले होते. नंतर ते दृष्यरूप झाले व त्यानंतर घनावस्था निर्माण झाली. वैज्ञानिकदृष्ट्‌या ही सगळी प्रक्रिया सत्य सिद्ध झालेली आहे. कुरआनात याचे विवरण इ. स. ६१० ते ६३२ या काळात दिलेले आहे. सृष्टीचा आरंभ नाही की अंत नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. कुरआनात स्पष्टपणे आरंभाची प्रक्रिया मांडलेली आहे. तशी तिच्या अंताचीसुद्धा प्रक्रिया मांडलेली आहे.

“जेव्हा आकाश फाटून जाईल, आपल्या विधात्याची आज्ञापालनात पृथ्वी सपाट होईल. आपल्या उदरात जे काही आहे ते बाहेर काढून टाकील.” (८४:१-५)

“जेव्हा जमीन हादरून जाईल, धरती सारे ओझे बाहेर काढून टाकील, माणूस म्हणेल, हिला काय झाले आहे?” (९९:१-३)

- सय्यद इफ्तिखार अहमद


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget