Halloween Costume ideas 2015

आएशा जग सोडून गेली मात्र मनात अनेक प्रश्न निर्माण करून !

ayesha

’’घर के आंगन को महकाती है बेटियां

माँ बाप को दुःख हो तो सह नही पाती है बेटियाँ

धन दौलत नही सिर्फ

घर का सुख ही चाहती है बेटियाँ’’

मला सुद्धा मुली आहेत त्यांच्या सोबत तर असे होणार नाहीना प्रत्येक पालकांच्या मनात निर्माण होणारा प्रश्न त्याचे उत्तर कोण देणार?

गुजरातमधील अहेमदाबाद येथील शिकलेली सवरलेली एक 23 वर्षीर्य लग्न झालेली आयेशा नावाच्या युवतीने साबरमती नदीत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडिओ बनवला. ज्यात सरळ दिसते की तीचे पतीवर जीवापाड प्रेम तर वडिलांसाठी मनात असणारा आदर अन् आत्महत्या केल्यानंतर अल्लाहच्या जवळ स्थान मिळणार की नाही अशी मनात शंका दिसते. त्यापेक्षा जास्त चिंता आपल्या आत्महत्येनंतर दोन्ही परिवाराची होणारी फरपट व त्यातून निघणारी अब्रूची लक्तरे. सर्व समजून घेऊन मुस्लिम समाजालाच नव्हेतर देशभरातील महिलांची व्यथा आत्महत्ये अगोदरच्या चित्रफीतीमध्ये मांडली. आपल्या गावात, समाजात, शेजारी आणि घरात तर आयेशा सारखी कोणाची फरफट होत नसेलना. कारण कित्येक सासुरवाशीण मुली घरच्यांची आर्थिक परिस्थिती, मानसिकता आणि कधी माहेरी निघून आली तर भावजयीचे टोमणे यामुळे घुसमटत आपले जीवन व्यतीत करीत असतात. तेव्हा अश्या आयेशाला आपण इस्लामने दिलेल्या शिकवणी नुसार वागवायला हवे. तिचे हक्क,तिचा सन्मान,तिचे घरातील स्थान अबाधित राहायला हवे. काळजी घ्यावी की, आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे समाजाची अन् इस्लामची बदनामी होवू नये.  

प्रेषित मुहम्मद (सल्ल.) आपल्या सर्वांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत. ज्यांनी आपल्या आचरणाने इस्लाममधील महिलांचे स्थान निश्चित करून दिले. महिला एक शोभेची वस्तू नसून ती समाज घडविते. हे प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगितले. विधवा महिलेसोबत लग्न करून विधवेला समाजात स्थान मिळवून दिले तर सुंदरता पाहून नव्हेतर गुण पाहून नाते संबंध करण्याचे आदेश दिले. यासाठी एक उदाहरण हजरत बिलाल यांच्या विवाहाचे पाहूया. हजरत बिलाल (रजि.) हे गुलाम होते तर आफ्रिकन असल्याने कुरूप होते मात्र  त्यांच्या मधील गुण पाहून त्यांचे लग्न चांगल्या घरातील मुली सोबत लावून दिले गेले. लग्न साधे आणि सरळ करावे ज्याने लग्न करणे सोपे होईल. याचे एक उदाहरण द्यायचे म्हंटले तर हजरत अब्दुर रहमान बिन औफ यांचे लग्न. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी अब्दुर रहेमान बिन औफ अन्सारी यांच्या कपड्यावर लागलेल्या जाफरान सुगंधाचा (इत्रच्या)डागावरून ओळखले की त्यांचे लग्न झाले. तेव्हा विचारले की, ’’तुझे लग्न झाले का?’’ आणि हजरत अब्दुर रहमान बिन औफ यांनी होकार दिला. यावरून एक शिकवण मिळते की प्रेषित मुहम्मद पैगंबर (सल्ल.) हजर असताना देखील मुलींच्या घरची आर्थिक परिस्थिती साधारण असल्या कारणाने  लग्न साधे व सरळ केले. तसेच लग्न साधे सरळ बडेजाव न मिरवता करावे. ज्याने मुलीच्या आई वडिलांवर लग्नाचे ओझे होणार नाही. एकीकडे सध्या मोठ्या प्रमाणावर वरात आणली जाते आणि त्यांची सरबराई करण्यात मुलीच्या घरच्यांचे कंबरडे मोडते. अश्यात लग्न हे साधे आणि सरळ व्हायला हवे. इस्लामच्या शिकवणी नुसार हुंडा आणि दहेजचा इस्लाम धिक्कार करतो. जर मुलीच्या पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर घरातील वस्तू ते स्वतःच्या मर्जीनुसार देऊ शकतात. मात्र जर ठरवून किंवा मागून किंवा आजकाल सर्वच द्यायला लागले तेव्हा तुम्ही सुद्धा द्या असे म्हणून हुंडा घेतला जात असेल तर इस्लाम त्याचा धिक्कार करतो.

कित्येकवेळी मुलीची बाजू समजून घेणारा कोणी नसतो. ज्याने त्यांची फरफट होते. इस्लाम मध्ये जेव्हा निकाह होतो तेव्हा एक वकील आणि दोन साक्षीदार असतात. ते परिचित असायला हवेत. ज्यामुळे कधी काळी कोणतीही अडचण निर्माण झाल्यास वाद, विवाद विकोपाला गेल्यावर या लोकांना बोलावून मध्यस्थी करून ते वाद सोडविले पाहिजेत. वेळ प्रसंगी जर जमतच नसेल तर घसटस्फोट घेऊन आयेशा सारखे प्रकरण घडण्यापासून वाचायला हवे. यासाठी प्रत्येक मोहल्यात इस्लाम मधील ज्ञानी विद्वान ज्यांना इस्लाम शरियत आणि आजची परिस्थिती या सर्वांची जाण आहे, अश्या लोकांची एक टीम बनवून असे विवाद त्यांच्यासमोर मांडून त्यातून मार्ग काढले जाणे आवश्यक आहे. ज्याने येणाऱ्या काळात आयेशा सारखे प्रकरण पुन्हा घडू नये. लग्नात मांडल्या जाणाऱ्या दहेजची प्रथा सुद्धा बंद व्हायला हवी. ज्याने इतर लोकांच्या मनात हुंड्याची लालसा निर्माण होणार नाही.

सब ने पूछा बहन दहेज़ में क्या-क्या ले आई,

किसी ने ना पूछा बेटी क्या-क्या छोड़ आई.

आयेशा तू चुकलीस. तू हसत हसत आत्महत्येस सामोरे गेली त्या ऐवजी तू सासरच्या लोकांच्या विरुद्ध बंड पुकारायला हवे होते. घटस्फोट घेऊन नवीन सुरवात करायला हवी होती. पण तू चुकलीस आणि आपल्या वडिलांच्या मनावर खूप मोठे ओझे ठेवून जगाचा निरोप घेतलास. तोही खूप असे भावनिक आव्हान करून. मृत्यूनंतर त्याचे भांडवल करू नका, असे बोलून गेली. हसत हसत तिने आत्महत्या केली जी करायला नको होती. प्रत्येक बापाला वाटते आपल्या मुलीसाठी काही तरी करावे पण तो मजबूर असतो.

सारे जहां की खुशियाँ मैं तुझ पर लुटा दूं,

जिस राह से तूं गुज़रे वहां फूल बिछा दूं,

होगी विदा तूं जब भी मेरे आँगन से बेटी,

ख्वाहिश है यही ज़मीं से लेकर पूरा आसमां सजा दूं. 


- जमीर शाह

9960608555


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget