Halloween Costume ideas 2015

राकेश सिंग टिकैत


जोपर्यंत तीन कृषी कायदे परत होत नाहीत तो पर्यंत इथुन घरवापसी होणार नाही ‘बिल वापसी नहीं तो घर वापसी नहीं’ 40-50 फुट खोल खड्ड्यांमध्ये ह्या आंदोलनाला पुरण्यात येणार होते पण खालून हवेमुळे हे आंदोलन वर आलं पहिल्यापासून अधिक विस्तारले बळकट झाले दिल्लीच्या भोवती काँक्रिटच्या भिंती उभारल्या जात आहेत ह्या भिंती नसून किल्ले आहेत हे लोक स्वत:ला किल्लयांमध्ये बंदिस्त करून घेत आहेत  नीट कान उघडून ऐका ते भारताचे शेवटचे बादशाह आहेत तुम्ही संयमाने ठाम राहा  ह्या लोकांनी आंदोलनास दफन करण्याचे प्रयत्न केले तुम्ही घाबरू नका तेच स्वत: किल्ला बंद झालेले आहेत शेवटचा बादशाह आहे तो.

26 जानेवारीला काय घडले त्याची चौकशी केली जाईल  कुणी तिरंग्याचा अपमान केला त्याला सोडले जाणार नाही  जसे राम मंदीर बांधले तसेच काही करणार की ? आम्ही बोलणीसाठी तयार आहोत पण आमचे 40 गट आहेत त्या सर्वांशी बोलणी करावी लागेल  40 गटाच्या समितीशी बोलणी करावी लागले

कोरोना काळात आम्ही पोलिसांच्या काठ्या खात-खात शेतीचे काम केले सर्व भारतीयांना खाण्यासाठी अन्न मिळावं म्हणून कुणी उपाशी राहू नये यासाठी तुम्ही आम्हाला कधी खलिस्तानी तर कधी आतंकवादी म्हणत राहता तुम्ही उसाला भाव देत नाहीत, म्हणतात उसाचा भाव ठरवला आहे पण सांगत नाहीत आंदोलनस्थळी आमच्या पाण्याचा पुरवठा बंद केला पण  आम्ही खचलो नाही आपले कार्य करत राहिलो आम्ही पाणी आणले स्वत:च आम्ही जाणार नाहीत इथून तुम्हाला जेव्हा आम्हाला हटविण्याचे आदेश दिले जातील तेव्हा तुम्ही तुमचे कार्य करा आम्ही जाणार नाहीत या आंदोलनास संपवण्याचे काम होणार नाही सगळ्या जातीधर्माचे हे आंदोलन आहे प्रत्येक धर्मियांनी येथे लंगरची सोय केली आहे मुस्लिमांनीही लंगरची सोय केली शिख बांधवांचेही लंगर आहेत आम्ही सरकारशी बोलायला तयार आहोत तुम्ही म्हणता एका फोन कॉलच्या अंतरावर आहात आम्हाला बरे ते फोन नंबर द्या आम्ही बोलू ज्यानं तिरंग्याचा अपमान केला त्याची चौकशी करू. इथं सगळ्या ठिकाणांचे शेतकरी आलेले आहेत हरियाणा तर जणू रिकामाच झालेला असेल, पंजाबचे लोक आहेत, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश सगळीकडचे राजस्थानचेही शेतकरी आलेले आहेत कर्नाटकातून 2000 शेतकरी येणार आहेत  त्यांना थंडी सोसत नाही  त्यांची चांगली सोय करा इथं चादरी दिल्या जात आहेत त्याचा सम्मान करा आदरपूर्वक त्या परत करा जाताना आणि घरी गेल्यावर एका चादरी ऐवजी 10 चादरी तुम्ही वाटप करा नाहीतर इथं दिल्या नाहीत तर पुढच्या जन्मी शंभर चादरी द्याव्या लागतील तेव्हा मान, सन्मान ठेवा आणि तुम्ही चादरची वाटप करा दिल्लीला जाणाऱ्यांचा रस्ता रोखू नका, लोकांना ये-जा करू द्या त्यांची कामे त्यांना करू द्या तुम्ही आपले काम करा 

इथं विजय झाल्यावर थेट अमृतसरला जाणार बाकीचा कार्यक्रम नंतर ठरवला जाईल पाहा बजेट जाहीर झाला. जे शेतकरी आधी लाख दोन लाख रूपयांचे कर्जदार आहेत त्यांना अजून 2-3 लाख कर्ज पुरवठ्याची तरतूद केली आहे याचा अर्थ जाणून घ्या हे षडयंत्र आहे तुमच्या जमीनी-शेती बळकावण्याचं कर्ज ऐवजी चांगले भाव देण्याची तरतूद असती तर तुमच्या खर्चाची सोय झाली असती  तुम्हाला आपल्या कमाईस जगू द्यायचा नसून कर्जावर जगण्याचा त्यांचा घाट आहे जेणेकरून कर्ज परत करता येवू नये आणि तुमच्या शेतजमीनी त्यांनी ताब्यात घ्याव्यात, हे सर्व कार्पोरेट जगताचे षडयंत्र आहे त्यांनी मोफत कर्ज वाटपाची योजना चालविली आहे कर्जाची परतफेड होऊ नये आणि या बदल्यात तुमच्या शेतजमीनी त्यांनी बळे काढून घ्याव्या येत्या पंधरा वर्षात साऱ्या शेतजमीनी तुमच्या हातातून जातील त्यांनी दिल्लीची किल्लाबंदी केली  सभोवताली कुंपण लावली  शेतीत कुंपण लावण्यावर बंदी आहे पण त्यांनी दिल्ली भवतीचं कुंपण लावली हे कसे चालते  हरियाणा-पंजाब, यु,पी मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक सगळीकडची तरूण मंडळी आली म्हातारे घरी बसलेत  आंदोलनात ही सहभागी व्हा  शेतीचीही कामे करत रहा

इथून विजय यात्रा काढली जाईल 40 लाख ट्रॅक्टर साऱ्या देशात भ्रमण करतील प्रत्येक जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यात ट्रॅक्टर रॅली काढायची आहे त्यांचा पुढच्या जिल्ह्यात तेथील शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढतील 500 किमीचे     क्षेत्र मजबूत ठेवा दिल्लीला चोहोबाजूंनी बॅरिकेटिंग केली आहे अशी बॅरिकेटींग दोन देशांच्या सीमा दरम्यान केली जाते  याला काय म्हणावे  इतर लोकांना शेतकरी विषयी अडकावणं आमचा डाव आहे  लोकांमध्ये तुमच्या विषयी द्वेश निर्माण व्हावं म्हणून आम्ही येथून जाणार नाही एक तर विजय प्राप्तीचा जल्लोष करत जाऊ किंवा क्रांतीची सुरूवात करू तसे आम्ही जाणार नाही

- संपादक


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget