जगभरातल्या सर्व वाईट गोष्टी, दुराचार, अत्याचार व सर्व मानवी समस्यांचा जो अंधार पसरलेला आहे तो सदाचाराच्या प्रकाशानेच दूर होऊ शकतो. पण सदाचारामागील आपला भाव कोणता आहे, तेही महत्वाचं आहे. उदात्त भावनेने केलेल्या एका सदाचाराच्या प्रकाशानेच मानवाच्या समस्यांचा अंधार कायमचा मिटू शकतो. जसं आजपासून चौदाशे वर्षांपूर्वी प्रेषित मुहम्मद (त्यांना शांती लाभो) यांनी प्रबोधनाचा प्रकाश पसरवून जगाचा अंधार दूर केला होता. तौहिद (सर्वांचा सृष्टीकर्ता एकच आहे) आणि आखिरत (सृष्टीकर्त्याकडे एक दिवस केल्या सवरल्याचा जाब द्यायची जाणीव) या तत्वांची शिकवण देणारा अंतिम ईश्वरी ग्रंथ कुरआनाचं अवतरण अल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद (त्यांना शांती लाभो) यांच्यावर सृष्टीकर्त्याकडून झाले अन् याच ग्रंथाचा क्रांतीकारी प्रकाश पैगंबर (त्यांना शांती लाभो) व त्यांच्या अनुयायींनी घराघरात देऊन एका आदर्श समाजाची उभारणी केली होती. तीच क्रांती आजही जगात शक्य आहे. आजही तीच शिकवण प्रत्येकाच्या अंधारलेल्या जीवनात पुन्हा प्रकाश आणू शकते. याच उदात्त हेतूने जमाअत ए इस्लामी हिंदच्या संदेश विभागाद्वारे ‘अंधाराकडून प्रकाशाकडे’ या शिर्षकाने दि. 15 जानेवारी ते 24 जानेवारी 2021 दरम्यान राज्यभरात एक अभियान राबविले जाणार आहे.
याच अंतर्गत साप्ताहिक शोधन तर्फे अभियानाच्या शिर्षकानेच इन्शा अल्लाह एक विशेषांक प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यासाठी कृपया लेखकांनी आपण आपले साहित्य दि. 15 डिसेंबर 2020 पर्यंत खालील ई-मेलवर पाठवावे.
-Email -
shodhan.weekly@yahoo.co.in
magdumshah@gmail.com
bashirshaikh12@gmail.com
- संपादक
अधिक माहिसाठी संपर्क
9820121207, 8976533404, 9923715373.
Post a Comment