Halloween Costume ideas 2015

महिलांच्या खर्‍या प्रगतीसाठी पुढाकाराची गरज

वजूदे ज़न से है तस्वीर-ए-कायनात मे रंग
इसी के साज से है जिंदगी का सोज-ए-दरूं
पा श्‍चिमात्य पुरूष फार चलाखअसतात, त्यांना ज्यांच्यावर वर्षभर अत्याचार करावयाचे असतात त्यांचा वर्षातून एक दिवस साजरा करतात. 8 मार्च त्याच दिवसांपैकी एक दिवस. हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी काही पोलीस स्टेशन, काही उड्डाने आणि काही कार्पोरेट कार्यालये संपूर्णपणे महिलांद्वारे संचलित केले जातात, त्यांना शुभेच्छा दिल्या जातात, महिलांच्या कामाचे गोडवे गायले जाते, त्यातही कॉमर्स पाहिले जाते, महिला दिनाचे महात्म्य सांगणार्‍या सुविचारांची कार्ड विकली जातात, कर्तृत्वान महिलांना बक्षीसे दिली जातात आणि महिला दिवस साजरा केल्याचे समाधान मानले जाते.
    या सर्व उत्साही वातावरणात एक कटू सत्य विसरले जाते ते म्हणजे महिला कितीही कष्टाळू का असेनात, बुद्धीमान, धाडसी, संयमी, दयावान, त्यागी का असेनात शेवटी त्यांचे मुल्यांकन त्यांच्या सौंदर्यावरूनच केले जाते. एकीकडे त्यांना देवी म्हणून महिमामंडित केले जाते तर दुसरीकडे त्या जन्मालाच येऊ नये, याचीही दक्षता घेतली जाते. समाज प्रतिगामी असो का आधुनिक, दोन्हीमध्ये महिलांचे शोषण केले जाते. महिला स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा लादला जातो, पुन्हा-पुन्हा आई बनण्याच्या त्यांच्या नैसर्गिक अधिकारापासून त्यांना वंचित केले जाते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 8 मार्चला मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला. याच निमित्ताने समाजात महिलांचे नक्की स्थान कोणते? आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण फक्त इस्लामी व्यवस्थेमध्येच कसे शक्य आहे? या संबंधी थोडेसे विवेचन या आठवड्यात केल्यास ते अनाठायी ठरणार नाही, अशी खात्री असल्याने हा लेखन प्रपंच.
    समाजातील महिलांचे स्थान
    समाजात महिलांचे नक्की स्थान ठरविताना इस्लामखेरीज सर्व मानवी सभ्यतांचा गोंधळ उडालेला दिसून येतो. प्राचीन ग्रीक सभ्यतेमध्ये महिलेला ’पेंडोरा’ म्हणजेच वाईट गोष्टींची जननी समजले गेले तर रोमन संस्कृतीमध्ये त्यांना पतीची मिळकत समजण्याचा प्रघात होता. विशिष्ट अशा चुका केल्यास पतीला प्रसंगी आपल्या पत्नीची हत्या करण्याचा सुद्धा कायदेशीर अधिकार होता. सुरूवातीला ख्रिश्‍चन संस्कृतीमध्ये सुद्धा महिलांसंबंधी अतिशय नकारात्मक विचार प्रचलित होते. टुट्रिलियन नावाच्या ख्रिश्‍चन धर्मगुरूचे स्त्रियांसंंबंधी मत पुढील प्रमाणे होते, ”ती सैतानाचे प्रवेशद्वार आहे. ती वर्जित वृक्षाकडे घेऊन जाणारी आहे. ईश्‍वराचा कायदा मोडणारी आहे. ईश्‍वराच्या संकल्पनेपासून पुरूषाला दूर घेऊन जाणारी आहे.” या ठिकाणी वर्जित वृक्ष म्हणजे स्वर्गातील ते वृक्ष ज्याच्या जवळ सुद्धा फटकू नका, असा आदेश अल्लाहने आदम अलै. आणि हव्वा अलै. यांना दिला होता. आणि सैतानाने आई हव्वा अलै. यांना अमरत्वाचे आमिष दाखवून त्या झाडाची फळं चाखण्यासाठी आदम अलै. यांना प्रेरित केले होते. हा प्रसंग बायबल आणि कुरआन या दोन्ही ईश्‍वरीय ग्रंथांमध्ये आलेला आहे.           
    महिलांविषयी क्राईसोस्टम हा ख्रिश्‍चन धर्मगुरू म्हणतो की, ”एक आवश्यक अशी वाईट बाब, एक जन्मजात अस्वस्थता, एक आवडणारे संकट, एक कौटुंबिक संकट, एक उध्वस्त करणारे प्रेम, एक नटलेली आफत” महिलांबाबतचे हे दोन दृष्टीकोन ख्रिश्‍चन धर्माला मानणार्‍यांमध्ये सुरूवातीच्या काळात होते. मात्र औद्योगिक क्रांती व विज्ञानाच्या प्रगतीबरोबर चर्चची सत्ता कमी-कमी होत गेली व आज अशी परिस्थिती आहे की, आधुनिकतेच्या नावाखाली स्त्रियांना फक्त एक लैंगिक वस्तू समजले जात आहे. पॉर्न  सारख्या समाजघातक उद्योगाला इतकी समाजमान्यता मिळालेली आहे की, डायनासोर व आधारित ’ज्युरासिक पार्क’ चित्रपटांची निर्मिती करणारा हॉलीवुडचा जागतिक किर्तीचा दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग याची मुलगी निकोला हिने मागच्याच आठवड्यात पॉर्न स्टार म्हणून करिअर करण्याची घोषणा केलेली आहे. एकूणच महिलांचे स्थान समाजामध्ये काय असावे, हे आज 21 व्या शतकातसुद्धा जगाला ठरविता आलेले नाही, याला अपवाद फक्त इस्लामचा. 

इस्लाममध्ये महिलांना दिलेले अधिकार
    इस्लाममध्ये महिलांचे समाजामधील स्थान नक्की कसे असावे? याबद्दल कुरआनमध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. विस्तार भयामुळे त्या संदर्भात एवढेच नमूद करणे पुरेसे आहे की, मुळात त्यांच्यावर घराचे व्यवस्थापन, मानव वंश वृद्धी आणि संस्कारिक नागरिकांचा देशाला अखंड पुरवठा करण्याची जबाबदारी दिलेली आहे व ही जबाबदारी जगातील सर्वश्रेष्ठ जबाबदारी आहे.
    इस्लाममध्ये महिलांना मिळालेल्या अधिकारांचे ढोबळ वर्गीकरण दोन भागांमध्ये करता येईल. एक-आर्थिक अधिकार, दोन- सामाजिक अधिकार. इस्लाम वगळता बाकी सर्व सामाजिक व्यवस्थांमध्ये एकतर महिलांना आर्थिक अधिकार दिलेले नाहीत जे अधिकार दिलेले आहेत ते कायद्याने दिलेले आहेत व्यवस्थेने नव्हे. त्यातही प्रत्यक्षात त्या अधिकारांचा त्यांना स्वत:साठी उपयोग करता येणार नाही, अशी व्यवस्था पुरूषांनी जागतिक पातळीवर करून ठेवलेली आहे. आजच्या आधुनिक काळातही अनेक कामकाजी महिलांचे एटीएम त्यांच्या नवर्‍याच्या ताब्यात असतात. महिन्याला मोजून मापून नवरा त्यांना स्वत:च्या खर्चासाठी पैसे देत असतो. महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र करण्याची चळवळ 18 व्या शतकात युरोपमधून सुरू झाली आणि आजमितीला ती सर्वत्र पसरलेली आहे. या चळवळीचा परिणाम असा झालेला आहे की, आता महिलांचे कमविणार्‍या जीवशास्त्रीय यंत्रामध्ये रूपांतर झालेले आहे. धर्माने जरी नाकारले असले तरी आज कायद्याने महिलांना वारसा हक्काचे व्यापक अधिकार मिळालेले आहेत. परंतु प्रत्यक्षात त्यांना हे अधिकार एक तर मिळत नाहीत किंवा मिळाले तरी त्यांचा त्यांना उपभोग घेऊ दिला जात नाही. या उलट इस्लाममध्ये महिलांवर थोडीशी बंधने घालून कुरआनने त्यांना अर्थप्राप्ती करण्याची परवानगी तर दिलेलीच आहे व त्या मिळकतीवर पतीचा कुठलाही अधिकार नाही, असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. पत्नी कितीही कमाविणारी असो तिच्या आणि घराच्या खर्चाची जबाबदारी पतीवर टाकलेली आहे. याशिवाय, महेर आणि वारसा हक्काने संपत्ती मिळविण्याचा अधिकार 1441 वर्षापूर्वी बहाल केलेला आहे.
    सामाजिक अधिकारांचा जेव्हा संबंध येतो तेव्हा प्रत्येक मुस्लिम मुलीला आपला पती निवडण्याचा संपूर्ण अधिकार दिलेला आहे. तिच्या मर्जीविरूद्ध तिचा विवाह तिच्या आई-वडिलांना सुद्धा करता येत नाही. एवढेच नव्हे तर तिला विशिष्ट परिस्थितीमध्ये पतीपासून घटस्फोट (खुला) घेण्याचा अधिकारही इस्लामने दिलेला आहे. महिलांचे समाजामध्ये स्थान निश्‍चित करतांना कुरआनने खालीलप्रमाणे निर्देश दिलेले आहेत.
    ”1. पत्नीबरोबर उत्तम व्यवहार करा.” (सुने निसा आयत क्र. 19). 2. ”एकमेकांच्या संंबंधांमध्ये उदारतेला विसरू नका.” (सुरे बकरा आयत नं. 237).
    यात पतीला विशेष करून उदारतेचे पालन करण्यासंबंधीचे निर्देश दिलेले आहेत. यासंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी एक प्रसिद्ध हदीस या ठिकाणी नमूद करण्याचा मोह सोडवत नाहीये. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी म्हटले आहे की, ”तुमच्यापैकी चांगले पुरूष ते आहेत जे आपल्या पत्नींसोबत चांगला व्यवहार करणारे आणि आपल्या आपत्यांबरोबर उदारतेने वागणारे आहेत.”
    वर नमूद अधिकार हे, फक्त नावापुरतेच नसून जर कोणी ते नाकारत असेल तर ते हस्तगत करण्यासाठी महिलेला इस्लामी न्यायालयात संबंधितांविरूद्ध दाद मागण्याचाही अधिकार कुरआनने दिलेला आहे. याशिवाय विधवा आणि घटस्फोटीत महिलांना पुनर्विवाहाचा केवळ अधिकारच बहाल करण्यात आलेला नाही तर असे विवाह करण्यासाठी समाजाला उत्तेजन सुद्धा देण्यात आलेले आहे. पुनर्विवाहनंतर पूर्वीच्या पतीचा किंवा त्यांच्या कुटुंबियांचा कुठलाही अधिकार महिलेवर राहणार नाही, याचीही व्यवस्था केली गेलेली आहे. दिवाणी आणि फौजदारी कायद्यामध्ये केवळ साक्षीमध्ये अपवाद वगळता कुठलाही भेदभाव केलेला नाही. एक पुरूषाच्या साक्षी बरोबर दोन महिलांची साक्ष हा भेदभाव नसून त्यामागे निश्‍चित असे कारण आहे. ते काय आहे? या संबंधीचे विवेचन पुन्हा कधी तरी करूया.
    सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांना धार्मिक तसेच भौतिक शिक्षण घेण्याचा पुरूषांएवढाच अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. मात्र शिक्षणाच्या स्वरूपामध्ये थोडेसे अंतर जरूर केलेले आहे. या संबंधी जमाते इस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी (रहे.) असे म्हणतात की, ”जहाँ तक तालीम व तरबियत का तआल्लुक है इस्लाम में औरत और मर्द के बीच कोई अंतर नहीं किया गया है. अलबत्ता स्वरूप में अंतर जरूरी है. इस्लामी दृष्टी से औरत की सही तालीम व तरबियत वो है जो उसको बेहतरीन बिवी, बेहतरीन माँ और एक बेहतरीन गृहिणी बनाए. उसका कार्यक्षेत्र घर है. इसलिए उसे विशेष रूप से उन विषयों की तालीम दी जानी चाहिए जो उस क्षेत्र में उसे ज्यादा फायदा पहूंचा सकते हैं. साथ ही वो ज्ञान भी उसके लिए आवश्यक है जो इन्सान को इन्सान बनानेवाले और उसके अख्लाक संवारनेवाले और उसकी नजर को व्यापक बनानेवाले हैं. ऐसी तालीम और ऐसी तरबियत हासिल करना हर मुसलमान औरत के लिए जरूरी है. इसके बाद अगर कोई औरत गैरमामुली ़जहेनी (बौद्धिक) योग्यता रखती हो और उन विषयों के अलावा दूसरे विषयों की तालीम भी हासिल करना चाहती हो तो इस्लाम उसके राह में रोडा नहीं बनता. बशर्ते की उन हदों से वो आगे न बढे जो शरियत ने औरतों के लिए मुकर्रर किए हुए हैं.” (संदर्भ : परदा, पान क्र.197).
    इस्लाम ने महिलांना जरी आर्थिक आणि सामाजिक अधिकार दिलेले असले तरी भारतीय उपमहाद्विपामध्ये या संदर्भात मुस्लिमेत्तरच काय स्वत: मुस्लिम स्त्री-पुरूषांमध्ये सुद्धा या अधिकारासंबंधीच्या जाणीवेची वाणवा आहे. त्यामुळे प्रत्यक्षात महिलांना अनेक अधिकार नाकारले जातात. मुलीच्या लग्नामध्ये जो केेलेला अनाठायी खर्च असतो त्यावरच तिची बोळवण केली जाते व त्या खर्चालाच तिच्या वारसा हक्काच्या संपत्तीचा खर्च मानला जातो. या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागरण करण्याची खुद्द मुस्लिम समाजामध्येच आवश्यकता आहे. 

    महिलांचा खरा उद्धार
    महिलांचा खरा उद्धार कसा होईल? यासंदर्भात मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात की, ”सिर्फ अधिकार ही नहीं इस्लामने औरतों पर इससे बडा जो एहसान किया है उसका तो अंदाजा नहीं किया जा सकता. मानव समाज का पूरा इतिहास इस बात पर गवाह है के, औरत का अस्तित्व दुनिया में जिल्लत (अपमानास्पद), शर्म (लज्जास्पद) और गुनाह का वजूद था. बेटी की पैदाईश बाप के लिए बडा ऐब और अपमान का कारण समझी जाती थी. ससुराली रिश्ते रूसवाई के रिश्ते समझे जाते थे. यहां तक की ’ससूर’ और ’साले’ जैसे शब्द इसी अज्ञानता के विचारों के तहेत आज भी गाली की तरह उपयोग में लाये जाते हैं. बहोतसी कौमों में इस रूसवाई से बचने के लिए लडकीयों को पैदा होते ही ़कत्ल कर देने का रिवाज आम हो गया था. आम लोगों को तो छोडिए धर्मगुरूओं तक में प्राचीन काल में मुद्दतों तक इस प्रश्‍न पर बहेस छिडी रही के, औरत इन्सान है भी के नहीं? और खुदा ने उसे आत्मा बक्षी है के नहीं? सदीयों के उत्पीड़न, अधिनता और विश्‍वव्यापी अपमान के बरताव ने खुद महिलाओं के ़जहेन (सोंच) में भी अपनी इज्जत की संवेदना मिटा दी थी. वो खुद भी इस बात को भूल गई थीं के, उनके लिए भी इ़ज्जत की कोई जगह है. पुरूष उन पर ़जुल्म करना अपना अधिकार समझता था तो वो उसके ़जुल्म को सहेना अपना कर्तव्य समझती थी. गुलामी की जहेनियत इस हद तक उसमें पैदा कर दी गई थी के, वो गर्व के साथ अपने आपको अपने पती की दासी कहेती थी.” (संदर्भ : परदा, पान क्र. 198)
    आपल्या देशातच नव्हे तर अनेक देशात आजही या स्थितीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. अगदी अलिकडेच कन्या भ्रुण हत्येसंबंधी प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी ’सम-विषम’ या अर्थाने सूचक विधान केले होते. ग्रामीण भागामध्ये आजही महिला आपल्या  पतीला ’मालक’ म्हणतात. एकीकडे आधुनिकतेच्या नावाखाली तिचे शोषण केले जाते तर दूसरीकडे पारंपारिक जीवन पद्धतीमध्ये संस्कृतीच्या नावाखाली तिचे शोषण केले जाते. 

स्त्रीच्या अस्तित्वाचा उद्देश्य
    कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ”आणि त्याच्या (अल्लाहच्या) संकेतचिन्हांपैकी (एक संकेतचिन्ह) हे आहे की त्याने (अल्लाहने) तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नी बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली. निश्‍चितपणे यात बरीच संकेतचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात. (कुरआन: सुरे रोम, आयत नं. 21)
    लैंगिक संतोष ही मानवासाठी ईश्‍वराने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. या एका संतुष्टीमधून ईश्‍वराने अनेक उद्देश्य साध्य केलेले आहेत. पहिला उद्देश्य स्त्री आणि पुरूषांच्या जीवनामध्ये संतोष आणणे, दूसरा उद्देश्य त्यांच्यापासून संतती निर्माण करून मानववंश पुढे चालविणे. ही दोन्ही उद्दीष्टे लग्न न करताही प्राप्त करता येतात. आजकाल पाश्‍चिमात्य देशातच नव्हे तर आपल्या देशातही लग्न न करताच ही दोन्ही उद्दीष्टे प्राप्त करणार्‍या जोडप्यांची संख्या कमी नाही. मात्र इस्लाम विवाहाला एवढे जास्त महत्त्व देतो की, विवाह व्यतिरिक्त या दोन्ही उद्दिष्टांना प्राप्त करण्यास निषिद्ध ठरवितो. एवढेच नव्हे तर विवाह व्यतिरिक्त ही उद्दीष्टे प्राप्त करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याच्या भयंकर परिणामांची चेतावनी देतो व अशा लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा फरमावितो. विवाहाशिवाय ही दोन्ही उद्दीष्टे प्राप्त करणार्‍या देशांमधील सामाजिक परिस्थिती किती वाईट झालेली आहे हे आपल्याला माहितच आहे. या संदर्भात विस्तार भयामुळे जास्त लिहिण्याचे टाळले आहे. या संदर्भात केवळ एकच गोष्ट नमूद करणे पुरेसे आहे की, अशा विवाहमुक्त संबंधातून जन्माला येणारी पीढि ही देशाच्याही उपयोगाची नाही आणि मानवतेच्याही उपयोगाची नाही. गुन्हेगारीचा जो आगडोंब आज जागतिक पातळीवर उसळलेला आहे तो विवाहशिवाय निर्माण होणार्‍या संस्कारहीन पीढिमुळे उसळलेला आहे, असे म्हटले तरीही चुकीचे ठरणार नाही.
    महिला आणि पुरूष दोहोंना लैंगिक संतुष्टी विवाहाच्या चौकटी बाहेर मिळविण्यासाठी अनेक गुन्हे करावे लागतात व अशा संबंधातून उदयास आलेली पीढि संस्कारहीन निपजते. हीच संतुष्टी जर विवाहाच्या चौकटीत मिळत असेल तर त्यातून निर्माण होणारी संतती ही संस्कारी, लोकहितकारीच नव्हे तर देशालाही उत्तम दर्जाचे नागरिक पुरविणारी ठरते. महिलांनी पादत्राणे निर्मितीच्या कारखान्यात जॉब करण्यापेक्षा घरात राहून आदर्श पीढिच्या निर्मितीच्या जॉबसाठी वाहून घेतले तर या ऐवढे दुसरे उपकार मानवतेवर दुसरे कुठलेच होणार नाही. हे विचार अनेकांना रूचणार नाही. प्रतिगामी आणि संकीर्ण वाटतील. मात्र कोणी मान्य करो अथवा न करो, सत्य हेच आहे. आज अमेरिकेसह जगभरात भारतीय तरूण आपल्या यशाची जी पताका फडकवत आहेत, त्यात त्यांच्या जुन्या पीढितील आई-वडिलांनी त्यांच्यावर केलेल्या संस्काराचा फार मोठा वाटा आहे. मागील काही वर्षांपासून जी संस्कार विहीन पीढि निर्माण होत आहे व त्यातून महिलांवर अत्याचार, गुन्हेगारी बोकाळली आहे, त्याचे हेच कारण आहे की, अलिकडच्या पीढितील जोडप्यांनी पारंपारिक वैवाहिक बंधने एक तर झुगारून दिलेली आहेत किंवा ती सैल केेलेली आहेत.
    शेवटी महिला दिनानिमित्त इस्लाममध्ये महिलांचे नेमके काय स्थान आहे? हे समजून घेण्यासाठी सय्यद अबुल आला मौदूदी यांचे परदा नावाचे अंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले पुस्तक जे की हिंदीमध्ये ’परदा’ आणि मराठीमध्ये ’गोशा’ नावाने सुद्धा उपलब्ध आहे ते जरूर वाचावे. जमाते इस्लामीच्या स्थानिक कार्यालयामधून ते सहज मिळविता येते. ते मिळवून पूर्वगृह बाजूला ठेऊन प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच वाचावे, असे हे पुस्तक आहे. मला विश्‍वासच नव्हे तर खात्री आहे की, हे पुस्तक वाचणार्‍याच्या मनामध्ये महिलांच्या समाजातील नक्की स्थानाबद्दल खरी जाणीव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हे पुस्तक जरी महिलांविषयी असले तरी ते पुरूषांनी वाचावे असे आहे. नि:संशय महिलांनाही स्वत:ची नव्याने ओळख करून घ्यावयाची असल्यास त्यांनीही हे पुस्तक नक्कीच वाचावे. महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget