Halloween Costume ideas 2015

मुस्लिम महिलांच्या क्रांतीची सुरूवात १४५० वर्षांपूर्वीची – डॉ. साहिबा खान

जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर महिला विभागातर्फे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा

Woman's Day
नागपूर (डॉ. एम. ए. रशीद)
आज मुस्लिम महिला आपल्या परंपरांना तोडून ज्या शक्तीने एकत्र होऊन क्रांती घडविण्यासाठी आपल्या घरातून बाहेर येत आहेत हे पाहता असे लक्षात येते की याद्वारे मुस्लिम स्त्रिया  खूप मोठा बदल घडवून आणित आहेत. परंतु मुस्लिम स्त्रियांनी अशा प्रकारे क्रांती आताच घडविली नाही तर आजपासून १४५० वर्षापूर्वीच त्यांनी या क्रांतीची सुरूवात केली आहे, ८ मार्च  रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर महिला विभागाच्या अध्यक्षा डॉ. साहिबा खान यांनी आपले विचार व्यक्त केले. हा कार्यक्रम अंजुमन पॉलिटेक्निक  सभागृहामध्ये पार पडला. सदर कार्यक्रमाचा विषय होता ‘क्रांतीची मूर्ती आहे स्त्री’. डॉ. साहिबा खान पुढे म्हणाल्या की पैगंबर मोहम्मद (स.) यांच्या काळात महिला सफल उद्योजक,  प्रख्यात पंडित, विचारवंत होत्या. आज आम्ही बाहेर आलो आहोत तर स्वत:साठी नाही, तर आपल्या देशाला आणि संविधानाला वाचविण्यासाठी. लोकांच्या घृणेचा सामना आम्ही  आमच्या देशात करीत आहोत, हे आमच्यासाठी अतिशय दुर्दैवी आहे. आम्हाला बुरख्यामध्ये पाहून लोकांच्या चेहऱ्याचे हावभाव बदलून जातात. अशा वेळी आमच्या मुलींना परीक्षा केंद्रावर संशयाच्या दृष्टीने पहिला जाते. आमच्या तरुण पिढीला लोकांनसमोर मारले जाते. आमची संपत्ती, आमची घरे हे सर्व आगीत भस्म करून टाकल्या जाते. ते म्हणतात की  आम्हाला आर्थिक व शारीरिकरित्या सक्षम केल्या जात आहे, पण आज आम्ही जागृत होऊन घराबाहेर आलो आहोत. आता आम्ही मागे वळून पाहणार नाही. आम्ही मरण पत्करू, नष्ट  होऊ मात्र आम्ही आपल्या मातृभूमीला सोडून कुठेही जाणार नाही.
अरूणा सबाने यांनी सांगितले की जसे स्वातंत्र्य पुरुष मंडळी व मुलांना आहे तसे स्त्रियांना आणि मुलींना नाही. घरी आणि बाहेर सर्वत्र मुली व स्त्रिया अत्याचार सहन करीत आहेत.  स्त्रियांनी शक्तिशाली बनणे गरजेचे आहे. आम्ही मुलांना अशी शिकवण दिली पाहिजे की ज्यामुळे त्यांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे. पत्नीवर पतीच्या अत्याचारात वाढ होत आहे.  स्त्रियांना माहीत आहे की त्यांनी आपला भाऊ, वडील आणि पतीचा किती सन्मान केला पाहिजे, ती सर्वांचा सन्मान करते, तरीसुद्धा त्यांच्यावर होणारा अत्याचार थांबत नाही.
छाया खोबरागडे यांनी ‘नारी शक्ती विकसित समाज’ या विषयावर आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, आजपर्यंत आम्ही असे समजत होतो की मुस्लिम महिला खूप भित्र्या आहे.  फक्त आपल्या घरातच त्या राहतात. त्यांना डांबून ठेवण्यात येते. परंतु आज मुस्लिम स्त्रियांनी हे सिद्ध केले आहे की असे अजिबात नाही. आज शाहीन बागच नव्हे तर संपूर्ण भारत  देशात त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आज गरज आहे की आम्ही सर्वांनी मिळून समोर आले पाहिजे. आम्हाला संविधानाच्या आधारावर भारताला विकसित करायचे आहे. आम्ही काळ्या  कायद्याचा जोरदार विरोध करीत आहोत.
जेबा खान यांनी ‘नारी शक्ती की उड़ान कितना पैâला आसमान’ या विषयावर मत व्यक्त करताना म्हटले की हजरत मरियम अलैहिस्सलाम या अत्यंत निसर्गसेविका होत्या. बीबी  हाजरा यांनी खाना ए काबाच्या निर्मितीत आपले अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले. सहाबियात रजि. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या संरक्षणार्थ आपल्या जीवांची पर्वा करीत नव्हत्या.  राहिला कौसर यांनी म्हटले की स्त्री ही कुटुंबांची मुख्य सदस्य असते. ती महत्त्वपूर्ण अर्थव्यवस्था सांभाळणारी अर्थतज्ज्ञ असते. बजेट लक्षात घेत आपले घर व्यवस्थितरित्या चालवीत  असते. देशात मुस्लिम महिलांनी संविधान वाचविण्यासाठी आणि सध्याच्या परिस्थितत काळ्या कायद्याच्या विरोधात लक्षावधी शाहीनबाग बनवून आपल्या पराक्रमाची छाप सोडली  आहे. आपली छबी समाजासमोर प्रकट केली आहे.
सना यास्मीन यांनी ‘वर्तमान परिस्थितीत मुस्लिम मुलींची भूमिका’ या विषयावरील आपल्या भाषणात मुलींचे शिक्षण किती महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला. जी आई ओ द्वारे  मुलींचे चारित्र्य निर्माण, त्यांचे व्यक्तित्व साकारणे, त्यांना स्वत्वाची जाणीव करून देणे, त्यांना उच्च शिक्षणातसुद्धा बुरखा परिधान करण्याचे प्रोत्साहन मिळते. प्रज्वला तत्ते आणि  जुल्फी शेख यांना ‘शाहीनबाग पारितोषिक’ देण्यात आले. शाहीन नावाचा एक पक्षी आहे जो शायर अल्लामा इकबाल यांच्या साहित्यातील नायक आहे. हा पक्षी खूप उंच भरारी घेतो.  तो  कुणी मारलेली शिकार खात नाही. तो स्वत: आपली शिकार करतो. जीवनाच्या शेवटच्या वेळी तो बसून खातो. तिथे त्याची नखे आणि त्याची त्वचा निघून पडते, तत्पश्चात त्याचे  विचार व नखे त्याला पूणर्जाrवित करतात आणि तो पुन्हा उंच भरारी घेतो.
तत्पश्चात स्त्रीत्व आणि मानवतावाद या विषयावर वाद-विवाद ठेवण्यात आला. प्रज्वला तत्ते, सुनिता जिचकार, सरोज आगलवे, रुमाना कौसर, डॉ साहिबा खान यांनी या वाद-विवादात  भाग घेतला. संपूर्ण शहरात तीन दिवसीय महिला दिनावर कार्यक्रम घेण्यात आले. या वादविवादाचे सूत्र संचालन बेनजीर खान यांनी केले. इरफाना कुलसुम यांनी जमाअत ए इस्लामी  हिंद नागपूरच्या कार्याचा आढावा घातला तर राहिला कौसर यांनी मुस्लिम मुलींच्या संघटनेचा परिचय करून दिला. पवित्र कुरआनमधील सूरह अहजाबच्या ३५व्या ओळीच्या पठणाने  मध्यवर्ती स्थानिक अध्यक्षा जाहिदा अंसारी यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. आभार प्रदर्शन संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा शबनम परवीन यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांचा  सहभाग होता. मंच संचालन सुमय्या खान यांनी केले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget