Halloween Costume ideas 2015

पूरग्रस्तांना जेवनासह स्वच्छतेच्या साहित्याचे वाटप

प्रतिनिधी/ कोल्हापूर
महापुरात अडकलेल्या पूरग्रस्तांसाठी शहरातील २५ निवारा केंद्रावर राहण्याची सोय करण्यात आली होती. या पूरग्रस्तांना विविध सामाजिक संघटना, राजकीय नेत्यांनी जेवनापासून  अन्नधान्याची मदत केली आहे. महापुराच्या नवव्या दिवशीही मदतीचा ओघ कायम आहे. काही निवारा केंद्रातील पूरग्रस्त आपआपल्या घरी परतले आहेत. काहींच्या घरात अद्याप घान  असल्याने ते निवारा केंद्रात राहण्यासाठी आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुस्लिम बोर्डींग, जैन मठ, जुना बुधवार तालिम मंडळ, यासह शहरातील अन्य निवारा केंद्रावर पूरग्रस्त गेल्या ९ दिवसापासून वास्तव्यास आहेत. त्यांच्या घराची स्वच्छता झाली  नसल्याने अद्याप ते निवारा केंद्रामध्ये आहेत. या पूरग्रस्तांना आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जात आहेत. तसेच त्यांच्या घराच्या स्वच्छतेसाठी खराटा, ब्लिचिंग पावडर, फिनेल आदींचा  पुरवठा करण्यात आला. सुतारवाडयातील घरांच्या स्वच्छतेसाठी आणखी काही दिवस जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

उद्योजक सचिन झवर यांच्याकडून १०० किलो ब्लिचिंग पावडर
पूराचे पाणी ओसरले असले तरी पूरग्रस्तांची घरांचे निर्जंतूकीकरण करणे काळची गरज आहे. याची गरज ओळखून मुस्लिम बोर्डींगमधील महापूर सहायता केंद्रात उद्योजक सचिन झंवर  यांनी १०० किलो ब्लिचिंग पावडर दिली आहे. ब्लिचिंग पावडरमुळे रोगजंतूचा नाश होण्यास मदत होते. त्यामुळे पूरग्रस्तांना या पावडरचे वाटप करण्यास सुरूवात केली आहे.

जमादार कुटुंबियांकडून पूरग्रस्तांसाठी धान्यासह पाणी
कोल्हापूरात अतिवृष्टीमुळे महापूर आल्याने बरीच गावे, घरे पाण्याखाली गेली. त्यामुळे हजारो लोक निवारा केंद्रावर राहात आहेत. हे कळताच सोलापूर जिल्हयातील अकलूज येथील  मुबारक जमादार, जावेद जमादार, आसिफ जमादार यांनी १ टेंपो धान्य, भाजी व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या पूरग्रस्तांसाठी दिल्या आहेत. हे साहित्य मुस्लिम बोर्डींगमधील महापूर  सहायता केंद्राकडे सुपुर्द करण्यात आले आहे. मावळा कोल्हापूर पूरपरिस्थितीत रंकाळयातील बोटीच्या माध्यमातून महावीर कॉलेज, जिल्हाधिकारी कार्यालय, मुक्त सैनिक वसाहत येथे  बचाव कार्य केले. पूरग्रस्तांसाठी जेवन व दूध तर आर्मीच्या जवानांसाठी फळ वाटप करण्यात आले. शिरोळ येथील पूरग्रस्तांना राजगिरा लाडू देण्यात आले. तसेच बुधवारी शाहुपुरी  कुंभार गल्ली येथील १०० घरांना स्वच्छतेचे साहित्य वाटप केले. यामध्ये खराटा, ब्लिचिंग पावडर, फिनेल, मास्क आदी साहित्यांचा समावेश आहे. यावेळी उमेश पोवार, विनोद साळोखे,  संदीप बोरगावकर, अनिकेत सावंत, सोमनाथ माने, मयूर पाटील, युवराज पाटील, अभिजित भोसले आदी उपस्थित होते.

कल्याणी हॉलमधील पूरग्रस्त आपल्या घरी परतले

कल्याणी हॉलमधील जवळपास ३०० पूरग्रस्त राहण्यासाठी होते. हे पूरग्रस्त बुधवारी आपआपल्या घरी परतले आहेत. येथे राहात असताना युवकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.  येथील युवकांनी केलेल्या मदत कार्यामुळे पूरग्रस्तांबरोबर आपुलकीचे आणि आपलेपणाचे नाते निर्माण झाले, अशा भावना पूरग्रस्तांनी व्यक्त केल्या.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget