Halloween Costume ideas 2015

इस्लाम आणि स्त्रियांचे हक्क

मांगी हुई राहतोंसे बेचैनिया बेहतर हैं
खैरात की नींद का हर ख्वाब पराया है


फार काळापुर्वी पैगंबर मुहम्मद(स.) यांच्या एका अनुयायाने इस्लामचा संदेश पोहोचवण्यासाठी एका शहरात प्रवेश केला तेव्हा त्यानी तो संदेश स्त्रीयांसमोर अतिशय सुंदरपणे मांडला  आणि ते म्हणाले, मी तुम्हाला पुरुषांच्या गुलामीगीरीतून मुक्त करुन तुम्हास ईश्वराच्या दास्यत्वात आणण्यासाठी आलो आहे. कारण इस्लाम काळापुर्वी स्त्री ही शापित होती जागातील  सारी पापे करावी आणि त्याचे प्रायश्चित्त म्हणजे स्त्रीच्या रुपात जन्माला यावे अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. एखाद्याला मुलगी झाली की, पाप समजुन तिला जमीनीत गाडुन  टाकत असत. स्त्रीया ह्या शैतानाच्या सुत्रधार आहेत, स्त्रीचा चेहरा पाहणे अपयशी समजायचे. अशा वातावरणात ज्याने केवळ कायदेशीरपणे व प्रत्यक्षपणेच नव्हे तर बौद्धिक दृष्ट्या  देखील एक महान आंदोलन उभे केले ते म्हणजे ईस्लाम आहे . ईस्लामने स्त्रीजन्म हा शापित नाही तर वरदान आहे हे शिकविले. त्याने 1400 वर्षापूर्वीच सांगितले की, कोणत्याही  मणुष्याने दुसऱ्या मनुष्याची हत्या केली म्हणजे त्याने सर्व मानवजातीची हत्या केली. त्याचबरोबर ते पैगम्बर मुहम्मद (सल्ल.) यांचेच व्यक्तीत्व आहे ज्यानी स्त्रीला अपमान वा  लज्जेच्या गर्तेतून उचलून सन्मानीत उंचीवर पोहोचविले.
त्यानी पित्यांना सांगितले जो कोणी आपल्या मुलीला दफन करणार नाही वा तिला अपमान वा लज्जेचा गोष्ट न मानता तिचे पालन-पोषण करुन तिचे अधिकार देण्यास प्राधान्य देईन  त्या व्यक्तीला ईश्वर स्वर्गात स्थान देईल. अशाप्रकारे ईस्लामनेच स्त्री वा पुरुष यांच्या प्रवृत्तीत सकारात्मक परिवर्तन घडवून आणले. त्या काळात दोन प्रकारच्या स्त्रीया होत्या. एक  पत्नी जिला फक्त घर होते, प्रतिष्ठा नाही आणि दुसरीकडे दासी च्या रुपात जिचा फक्त कामेच्छा तृप्त करण्याकरिता वापर केला जात असे. एखादी सुंदर दासी असेल तर तिच्यावर  पैज लावुन जुगार खेळत असत. आणि तिने त्यास विरोध केल्यास तिला विस्तवाचे चटके देत असत. याबाबतीत आपण ईस्लामपूर्व काळाबरोबर आपल्या ईतिहासावर दृष्टिक्षेप टाकतो  तेव्हा आपण एकिकडे पाहातो तीच स्त्री जी आई म्हणुन मनुष्याला जन्म देते व पत्नी म्हणुन पुरुषाची सहचारिणी बनते,तिला सेविका नव्हे तर दासीच्या पदावर ठेवण्यात आले. परंतु  स्त्रीची प्रतिष्ठा वा स्त्री-पुरुष समानता या विचारांची सुरुवात देखील मानवाच्या डोक्यात इस्लामनेच घातली आहे आणि हे विचार पैगम्बर मुहम्मद (सल्ल.) यांच्या तोंडून निघाले. ज्या  विचारांनी मानवी विचारांची दिशा कायमची बदलली व जगाला दाखवुन दिले की स्त्री सुद्धा तशीच मनुष्य आहे ज्याप्रामाणे पुरुष आहेत. ’लोकहो, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा  ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी बनविली आणि या एकाच जोडप्यापासून समस्त पुरूष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्याकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर रहा. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर  लक्ष ठेवून आहे.’( सुरे निसा : 1)
मासिक पाळि येणे ही नैसर्गीक बाब आहे मात्र त्या दिवसात स्त्रीला अपवित्र समजायचे त्यामुळे तिला घरापासुन दुर ठेवायचे व तिला पाप व अपमानाचा पुतळा समजण्यात यायचे. ईस्लामने तिला फक्त प्रार्थना करण्यास मनाई केली मात्र ती मासिक पाळीच्या कालावधीत तशीच वावरु शकते जाशी ती रोज वावरते. ती शापित म्हणून तिला सम्पती वा वारसाहक्कापासुन वंचित ठेवले कारण ती एक हुंडा देवुन विक्रीची वस्तु आहे असे समजले जात होते, पालक आपल्या मुलीला परायाधन समजायचे म्हणुन ते तिला अशिक्षित ठेवायचे आणि जिथे कमी पैशात तिची विक्री होईल तिथे तिचे लग्न करुन द्यायचे. करायचे मग तो जोडीदार तिला पसंत असो वा नसो याचा विचार पण करत नसत. ईस्लामने मात्र स्त्रीलाही पुरुषाप्रमाने वारसाहक्काचे हकदार बनविले.
ईस्लामने विवाहाच्या बाबतीत मुलीच्या पालकास प्राधान्य जरुर दिलेले आहे परंतु हेही स्पष्ट केले आहे की तिचा विवाह तिच्या परवानगिनेच व्हावा. त्याचबरोबर पैगम्बरिनी स्त्री ही  परायाधन आहे या विचारांचा नायनाट केला आणि आदेश दिले. स्त्री ऐवजी पुरुषाने स्त्रीला हुंडा द्यायचा ज्याला अरेबिक मधे मेहर म्हणतात. एखाद्यावेळी ती आपल्या पतीसोबत समाधानी नसेल तर तिला कोणताही हक्क नव्हता (विभक्त) घटस्फोट घेण्याचा मात्र पतीला तिला कधीही सोडण्याचा अधिकार होता. मात्र अशा वेळेस ईस्लामने स्त्री जर पतीसोबत  समाधानी नसेन तर तीला पण विवाह बंधन तोडुन विभक्त होण्यास व्यापक अधिकार दिलेले आहेत.
स्त्री जर विधवा झाली तर तिचे मुंडण करायचे व पृथ्वीवरील सर्व सुख-सुविधांचा त्याग करणे अनिवार्य आहे, असे नियम तिच्यावर लादायचे अणि ती तिला कुठलाही श्रृंगार करण्याचा अधिकार नव्हता. आकर्षक कपडे परिधान करणे म्हणजे तिच्या विवाहाची स्थीती दर्शविणे, असा समजला जात असे. विधवा स्त्रीला कधी-कधी प्राणी असे म्हटले जाते. कारण केवळ  तिच्या पतीच्या उपस्थितीनेच तिला मानवी दर्जा दिला जातो. त्याशिवाय विधवेला दुसरे लग्न करण्यास मनाई होती कारण तिला निव्वळ पाशवी ईच्छांची गुलाम व कामुक वस्तू  समजले जात असे. ईस्लामने विधवेला मानवी हक्कापासून दूर न ठेवता तिला समाजात आदर व सन्मान दिला आहे. त्याचप्रमाणे तिला पुन्हा लग्न करण्याची परवानगीही दिली.  पैगम्बर मुहम्मद (सल्ल.) एका माणसाला म्हणाले सर्वात मोठे दान म्हणजे आपल्या त्या मुलीवर उपकार जी (वैधव्यामुळे अथवा घटस्फोट दिला गेल्यामुळे) तुझ्याकडे परत पाठवीली  गेली असेल आणि तुमच्या शिवाय दुसरा कोणिही तिचा पालक नसेन.
या अधिकाराशिवाय ईस्लामने तिला मतदानाचा अधिकार, धनसंपत्तीचा अधिकार, स्त्रीला व्यवसाय वा उद्योगधंद्याचे स्वातंत्र्यही दिलेले आहे. पुढे ईस्वीसनाच्या अठराव्या शतकात  युरोपीय तत्वज्ञांनी व लेखकानी जेव्हा समाजाच्या विरुद्ध व्यक्तिच्या अधिकारांचा पक्ष घेऊन आवाज उठविला व व्यक्ती स्वातंत्र्याची तुतारी फुंकली आणि ही तुतारी ग्रीस रोम ईराणप्रमाणे हिंदुस्थानात देखील पोचली आणि तीने संसर्गजन्य रोगाप्रमाणे पसरुन शतकानुशतकासाठी मनुष्याला ऱ्हास व पतनाच्या खड्ड्यात लोटले.परिणामी पाश्चिमात्य संस्कृती
व सभ्यतेच्या प्रगतीची गती त्या मार्गावर लागली ज्यावर वाटचाल करीत तीने आज मोठी मजल मारली आहे. या अधिकारांनी जरी स्त्रीच्या दर्जे ला उंचावाले आणि तिच्या हक्काना  उभारले गेले तरी याचा स्त्री स्वातंत्र्यावर वाईट परिणाम झाला नसून सुपरिणाम झाला आहे. समानतेचा अर्थ असा घेतला की स्त्री व पुरुष केवळ नैतीक दर्जा व मानवी अधिकारात  समान आहेत असे नव्हे तर सांस्कृतिक जीवनात देखील स्त्री ने तीच कामे करावीत जी पुरुष करतात. याची सुरुवात म्हणजे पाश्चिमात्य देशात अठराव्या शतकात स्त्रीला शिक्षणाचा  अधिकार मिळाला आणि हिंदुस्थानात तिला अधिकर 1948 मध्ये मिळाला अर्थातच याचे श्रेय डॉ.आंबेडकरांना दिले पाहिजे. मात्र आपण हे पण नजरेत घेतले पाहिजे की खऱ्या स्त्री  शिक्षणाची सुरूवात 1400 वर्षापुर्वी ईस्लामनेच केली. ज्याचे उत्तम उदाहरण म्हणजे फातिमा अल-फिही ज्यांनी 900 व्या शतकात जगातील सर्वात पहिले विद्यापीठ मोरक्कोमध्ये उभारले.
आज स्त्रीया मनुष्याच्या दास्यत्वात इतक्या वाहून गेल्या आहेत की ज्या गोष्टीत त्यांची स्वत:ची योग्यता, मुल्य यश-अपयश नियंत्रित करतात तेच तिचे आता प्रभू बनलेले आहेत. पण  ईस्लामने तिला शिकविले की, तू फक्त ईश्वराची दास बणून रहा नाकी पुरुषांची. आपला निर्माता ज्याने महीलेचे मूल्य व योग्यता परीभाषित केलेली आहे, कालांतराने तिच्या या मानवी  मुल्यांना समाजाने पुरुषांसमोर वारंवार दुय्यम दर्जा दिलेला आहे. परिणामतः स्त्रीला पुरुषांच्या संबंधात तिची योग्यता, मूल्य शोधण्यास भाग पाडण्यात आले. कुरआनमध्ये म्हटलेले आहे  की, ’’लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरूष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ  तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’’ (कुरान 49 :13).
आधुनिक काळात काही स्त्रियांनी एक दोषपूर्ण मान्यता स्वीकारली आहे ती म्हणजे पुरुष हाच एकमेव तिचा आदर्श आहे आणि ती कधीच परिपूर्ण मानव होऊ शकत नाही जो पर्यंत ती  एक पुरुषासारखी बनत नाही. परंतु ईश्वर कुरानात सांगतोय स्त्री आणि पुरुषांचा दर्जा ईश्वरसमोर समान आहे. मात्र त्यांचे हक्क व जबाबदाऱ्या भिन्न आहेत आणि तो स्त्री-पुरुष दोघांना  सन्मानित करतो-त्यांच्या समानतेत नाही- तर त्यांच्या विशिष्टतेत करतो. मात्र विचित्र पाश्चिमात्य समानतेने स्त्रीला तिच्या नैसर्गीक दैनंदीन कर्तव्यापासून गाफिल व परावृत्त केले  याचा परिणाम हा संस्कृतीवर तर झालाच त्याचबरोबर मानवाच्या अस्तित्वावर सुद्धा झाला. जेव्हा स्त्री आर्थीक, राजनैतीक, सामुहिक उद्योगात उत्साहाने सहभागी होत गेली तेव्हा  समाजाने तिला एक अतिशय स्पष्ट संदेश शिकवला. आणि तो संदेश म्हणजे: पातळ व्हा. कामुक व्हा. आकर्षक व्हा. त्यासाठी मेक-अप करा , कमी कपडे परिधान करा व देह प्रदर्शन  करा.
सुंदर राहण्याच्या कारणांसाठी आपले जीवन, आपले शरीर, आपली प्रतिष्ठा, प्राणपणास लावा आणि तिने हे आंधळेपणाने आत्मसात केले या हव्यासापोटी जर पूर्वी आम्ही आमच्या  शरीराला झाकण्यासाठी कपडे घालत होतो तेव्हा आम्हाला पुरुषाप्रमाणे किमत मिळत नव्हती, पण आज आम्ही ते मिळविण्यासाठी व फॅशनसाठी कमीत कमी घालतो व जास्तीत जास्त  शरीर प्रदर्शन करतो जेणेकरुन आम्ही अधिक आधुनिक व सुंदर दिसू आणि जास्तीत जास्त पुरूषांना आकर्षित होणे हेच माझ्या सुंदरतेचे प्रतीक आहे. परिणामतः तिने विेशास ठेवला  की आपण स्वत:च्या नैसर्गीक गुणवत्तेप्रमाणे काही केलेले महत्त्वाचे नाही, आपण केवळ त्या पदासाठी पात्र आहोत ते म्हणजे जितके आपण पुरुषांना प्रसन्न करु आणि पुरुषांकरिता  सुंदर दिसू. अशाप्रकारे स्त्रीने आपले शरीर जाहिरातदारांना विक्री करण्यास दिले. परिणामतः पोर्नोग्राफी चा जन्म झाला आणि समाजाच्या करमणुकीच्या कार्यक्रमात भागीदारी, क्लब व  रंगमंच, नृत्य व संगीतातील निमग्नता हे स्त्रीचे प्रमुख व्यवसाय झाले आहेत. ज्याद्वारे ती कोणते नैतीक कामाचे पैसे न कमविता तिच्या शरीर प्रदर्शनाचे पैसे कमवित आहे. तिच्या  या कामाला समाजाने कला असे सोज्वळ नावाने संबोधित केले. पण दुसरीकडे बलात्काराचे प्रमाण वाढू लागले. कालांतराने तिने स्वतःच बलात्काराचा शेवट केला व स्वतःच शरिराला  विकू लागली आणि त्याला तिने लिविंग रिलेशनशिप असे नवीन नाव दिले.
स्त्री या व्यवसायात पुरुषांपेक्षा जास्त पैसे कमवू लागली आणि तीने प्रगतीचा उच्चांक गाठला पण खरच प्रत्येक पुरुषाने स्वतः च्या मुलीला, बायकोला व आईला हा प्रश्न जरुर करावा  की, काय स्त्रीने देह प्रदर्शन करुन प्रगती करणे योग्य आहे की तिने देह झाकुन प्रगती करणे योग्य आहे? जागरुक बुद्धि आणि सवेदनशील अंतःकरण असेल तर ईस्लामने आणलेली  पडदा पद्धत म्हणजे हिजाब याला सडेतोड उत्तर देते. प्रत्येकाला पडद्यात असलेली मुस्लिम स्त्री गावंढळ वाटते परंतु ते विसरतात की ही पद्धत स्त्रीच्या लज्जतेचे पूर्ण संरक्षण करते.  तिचे शरीर एक सामाजिक प्रदर्शनीय वस्तू नसून ते फक्त तिच्या पतीसाठीचे समर्पण दर्शविते आणि त्याचबरोबर वाईट माणसाच्या नजरेतून संरक्षण करते. शारिरिक प्रदर्शनाऐवजी  व्यक्तीमत्वाला महत्व देते व त्याचबरोबर पोशाख स्पर्धा संपविते. परदा पद्धत अशा कोणत्याच प्रगतीमधे अडसर ठरत नाही ज्या प्रगतीत तिला तिचे नारीत्व शीलत्व आणि तिची  प्राणप्रतिष्ठा गमावून बसावे लागेल. जोपर्यंत स्त्री पुरुषांची नक्कल करण्याचे प्रयत्न व त्यांच्याप्रमाणे वागणे थांबवणार नाही आणि जोपर्यंत ईश्वराने तिला दिलेल्या स्वतःमधील सौंदर्याची  व विशिष्टतेची किंमत कळणार नाही तोपर्यंत ती स्त्री म्हणून कधीही मुक्ती मिळवू शकणार नाही. तुम्ही सन्मानित आहात परंतु, परपुरुषांसोबत संबंध बनवून नाही किंवा त्यांना प्रसन्न करुन देखील नाही. स्त्री म्हणून आपले मूल्य आपल्या शरिराचा आकार , कीती पुरुष तुमचे प्रशंसक आहेत, किंवा आपल्या पुरुष मित्रांची संख्या मोजून नाही. तर मानव म्हणून आपले  मूल्य उच्च प्रमाणात मोजले जाते ते म्हणजे धार्मिकता, सात्विकता आणि पवित्रतेच्या प्रमाणात. स्त्री म्हणून आपले पूर्णत्व अल्लाहपासुन आणि त्याच्यापर्यंतच आपले नाते आहे. ..
मी तुम्हाला ईथे उभे राहून सांगेन की  तुम्ही कशाचेही गुलाम नाहीत. ना फॅशन चे, ना सौंदर्याचे न पुरुषाचे. आपण केवळ ईश्वराचे गुलाम आणि केवळ ईश्वराचेच आहोत. मी अगदी धाडसाने सांगते तुम्हाला सांगा, या सर्व जगाला की आपण आपले मन, शरीर हे पुरुषांना संतुष्ट करण्यासाठी येथे नाही आहोत तर आपण ईश्वरास संतुष्ट करण्यासाठी येथे आहोत.  त्यांना सांगा की आपण येथे एक शोभेची वस्तु नाहीत, ना ही प्रदर्शनात ठेवणारी वस्तु आहोत आणि ना ही आपले शरीर सार्वजनिक वापरासाठी आहे.खात्री करुन द्या ह्या जगाला की  त्याने तुमची किंमत एक विक्रीची वस्तु एवढी नाही आकारली पाहीजे किंवा पायांची एक जोडी म्हणून नुसते सुंदर पाय दाखवून शुज विकायला वापरली नाही पाहिजे. आपला एक  आत्मा, एक मन, ईश्वराचे सेवक आहेत. आणि स्त्रीचे मूल्य त्या आत्म्याच्या सौंदर्याने परिभाषित केले जाते, ज्या हृदयाने ती ईश्वराला समर्पित होवुन जाते ना की पुरुषाला. तिचे शरीर  ती फॅशनच्या दुनियेला प्रदर्शित करण्यास वापरत नाही तर त्याला झाकून ठेवून ईश्वराच्या नियमावलीप्रमाणे कर्म करण्यास व्यतीत करते जी जवाबदारी ईश्वराने स्त्री म्हणून तिला देऊ  केली आहे. ईस्लामने स्त्रीला दिलेल्या उच्च दर्जाची वा अधिकाराची स्तुती मी ह्यासाठी करीत नाही की मी ईस्लामवर ईमान आणला आहे, वस्तुतः मी ईस्लामवर ईमान मुळी अशासाठी  आणला आहे की मला त्यात कमालीचे संतुलन व प्रमाणबद्धता आणि निसर्गाच्या कायद्याशी सदृश्यता दिसून येते. जे पाहून माझे मन ग्वाही देते की हा कायदा बनविणारा तोच तर  आहे जो पृथ्वी व आकाशाचा निर्माता आहे आणि अप्रत्यक्ष व प्रत्यक्षाचा जाणकार आहे आणि सत्य असे आहे की ईस्लाम हा ईश्वराचा धर्म आहे आणि विभिन्न देशात भटकणाऱ्या  मानवाना न्याय वा मध्यम मार्गाची दृढपद्धत तोच दाखवून देणारा आहे. सर्वमहान ईश्वर म्हणतो, ’’श्रद्धावंत पुरुष व श्रद्धावंत स्त्रिया हे सर्व एक दुसऱ्याचे मित्र आहेत, भलेपणाचा आदेश  देतात व वाईट गोष्टीपासून रोखतात, नमाज कायम करतात, जकात देतात आणि अल्लाह व त्याच्या पैगंबराचे आज्ञाधारक आहेत, हे ते लोक आहेत ज्यांच्यावर अल्लाहचा कृपावर्षाव  होणारच. खचितच अल्लाह सर्वांवर प्रभावी आणि चतूर व बुद्धिमान आहे. या श्रद्धावंत पुरुष आणि स्त्रियांसाठी अल्लाहचे वचन आहे की त्यांना अशा बागा प्रदान करील ज्यांच्या खालून  कालवे वाहात असतील, आणि ते त्याच्यात सदैव राहतील, त्या सदाबहार बागांत त्यांच्याकरिता स्वच्छ निवासस्थाने असतील, आणि सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे अल्लाहची प्रसन्नता त्यांना प्राप्त होईल. हेच मोठे यश आहे.(सुरह तौबा 71-72)

मांगी हुई राहतोंसे बेचैनिया बेहतर है.
खैरात की नींद का हर ख्वाब पराया है.

सीमा देशपांडे
7798981535

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget