Halloween Costume ideas 2015

घरांना, महालांना महिलांची नावं देणारा समतावादी मुस्लिम समाज

प्रेषित मुहम्मद (सलअम्) यांना वयाच्या चाळीसाव्या वर्षी बोधी प्राप्त झाली. अल्लाहकडून त्यांना कुरआनच्या अध्यायांच्या स्वरूपात संदेश येऊ लागले आणि समतेची शिकवण देणारे  ते संदेश प्रेषित (सल्ल.) लोकांना सांगू लागले. हो, समतेची शिकवण देणारे ते अल्लाहचे संदेश होते. उदाहरणार्थ -
‘‘...अन् त्यादिवशी जीवंत गाडलेल्या मुलीशी विचारलं जाईल की, तीला कोणत्या अपराधापायी मारलं?’’ (कुरआन-81:8-9)
म्हणजे महाप्रलयानंतर (कयामतनंतर) अल्लाहला या दुष्कृत्याबद्दल अपराधी बापाला किंवा भ्रूणहत्या करणाऱ्यांना जाब द्यावा लागेल, असा त्याचा अर्थ आहे. अशा प्रकारे मनाला  भिडणारं प्रबोधन प्रेषित (सल्ल.) करू लागले अन् पाहता पाहता रसातळाला गेलेला पूर्ण अरबस्तान हा एक प्रगत, विकसित समाज बनला. प्रेषित मुहम्मद सलअम् यांनी ऐन उमेदीच्या  पंचविसाव्या वर्षी त्यांनी चाळीस वर्षाच्या अन् दोनदा विधवा झालेल्या एका महिलेशी, आदरणीय खतीजामाईंशी लग्न केले.
माता खतिजा यांचा त्यावेळी चार देशात आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचा. लग्नानंतरही प्रेषितांनी त्यांना रोखलं नाही. महिलांना त्यांनी स्वतःची ओळख कायम ठेवण्यासाठी प्रोत्साहीत  केले. उदाहरणार्थ - इस्लामनुसार लग्नानंतरही मुस्लिम महिलेचं नाव बदलत नसते, तिच्या बापाच्या जागी तिच्या पतीचे नाव, आडनाव लागत नसते किंवा शेख-सय्यद असं दुहेरी  आडनाव लावायची गरज नसते. घटस्फोटीत महिलेला पोटगी म्हणजे पोट भरण्याची भरपाई दिली जात नसल्याचा गैरसमज पसरविला जातो. तीचा तलाक होवो की न होवो, पण  लग्नाआधीच तीला महेरच्या स्वरूपात पोटगी मिळत असते. तसेच तलाकनंतरही ही पोटगी देण्याची जबाबदारी एकतर इस्लामी शासनाची असते, ते नसेल तर ती देण्याची जबाबदारी  वक्फ बोर्डाची असते.
तलाक देण्याचा अधिकार हा फक्त पुरूषांनाच असतो हा देखील गैरसमज पसरविला जातो. पण निकाहआधीच वाटाघाटी करून खुलाअ व तलाक ए तफवीजचे अधिकार पत्नीला बहाल  केले जाऊ शकतात, ही समतामूलक शिकवण अनेक मराठी जणांना अजूनही माहित नाही. तालेबानच्या तुरूंगात दिवस काढलेल्या बीबीसीची पत्रकार इवॉन्न रिडलेने जेंव्हा हे वाचले की,  कुरआनची सर्वात पहिली अधिकृत प्रत प्रेषितांनी उम्मे हानी नावाच्या एका महिलेकडे ठेऊन एका महिलेच्या विेशासार्हतेवर विेशास ठेऊन प्रेषितांनी महिलांचा गौरव केलेला आहे, तेंव्हा  तीने इस्लामची दिक्षा घेतली. पण त्याच शांतीदूत पत्रकार रिडलेला भारतात केरळला येण्याची यापुर्वीच्या पुरोगामी सरकारने मनाई केली होती, असो. प्रेषितांनी जी अकरा लग्ने केली  होती, ती तिथल्या विविध टोळ्यांमध्ये असलेलं वैर संपुष्टात आणण्याकरिता एका-एका टोळीच्या एका एका मुलीशी लग्न करून सगळ्यांना नातेसंबंधात जोडून सामाजिक एकात्मता  कायम केली होती. हाच सामाजिक एकात्मतेच्या उदात्त हेतूनेच आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांनीही आठ लग्ने केली होती. इस्लाममध्ये जो बहुपत्नीत्वाची परवानगी (आदेश नव्हे)  दिलेली आहे, त्यामागे निराधार महिलांना आधार देण्याचा, त्यांना सेक्स वर्कर्स बनण्यापासून रोखण्याचा उद्देश आहे. पण आज निराधार महिलांशी लिव्ह इन रिलेशन किंवा फ्रेंडशिप म्हणून विवाहबाह्यसंबंध ठेवणे तर गुन्हा नाही, पण तिच्याशी दुसरं लग्न करणं गुन्हा ठरवला जातोय, असो.
सर्व पत्नींशी न्याय करण्याची कडक अट या बहुपत्नीत्वात घालून दिलेली आहे, हे विशेष! न्याय होत नसेल तर तीला कोर्टात तक्रार करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. प्रेषितांनी  आपल्या प्रत्येक पत्नीला एक एक स्वतंत्र घर घेऊन दिलं होतं. ते घर प्रेषितांच्या नव्हे तर त्या पत्नींच्या नावे ओळखले जात होते. जसे सौदांचं घर, आयेशांचं घर, उम्मे सलमांचं घर  वगैरे. हीच परंपरा पुढे भारतीय बादशहांनीही पुढे चालू ठेवली. इथेही मुमताज महाल, बीबी का मकबरा, चांद बीबी का मकबरा वगैरे महिलांच्या नावे महालांची नावे ठेवण्याची परंपरा  होती. आज जर आपल्या बायकोच्या नावाने कुणी अमुक विल्ला, तमूक मेंशन नाव ठेवलं तर तीची टर उडवली जाते. पण प्रेषितांची ही महान समतामूलक परंपरा मुस्लिम बादशहांनी  पुढे सुरू ठेवली होती. प्रेषितांनी महिलांना मशिदीतही प्रवेश दिला होता. हीच परंपरा पुढे मुस्लिम बादशहांनीही सुरू ठेवली होती. आजही औरंगाबादला शाही मशिदीजवळ महिलांची मशिद  आहे. ती मशिद पुरूषांच्या मशिदीच्या थोडी पुढे आहे. याचा अर्थ त्यात नमाज पढत असणाऱ्या महिलांची रांग ही पुरूषांच्या मशिदीत नमाजचं नेतृत्व करणाऱ्या इमामच्या पुढे जात  होती. पण इमामच्या पुढे जाऊन त्या इमामच्याच नेतृत्वात कुणालाच नमाज पढता येत नाही, त्यासाठी वेगळी जमात बनवावी लागते. याचाच अर्थ त्या मशिदित महिलांची वेगळी  जमात नमाज पढायला उभी राहत होती अन् साहजिकच आहे की, त्या महिला एका महिला इमामच्याच नेतृत्वात नमाज अदा करत होत्या. अन् विशेष म्हणजे हे सगळं पुरोगामी कार्य  सर्वात कट्टर मानला जाणाऱ्या औरंगजेबाच्या काळात घडत होतं. अन् औरंगाबादला अशा एक नाही तर तीन तीन महिलांच्या मशिदी आहेत. या पुरोगामी कार्याच्या मूळाशी प्रेषितांचीच  समतामूलक शिकवण आहे.

- नौशाद उस्मान
औरंगाबाद
9029429489
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget